लॅटिन अमेरिकेकडे जगातील निम्मे लिथियम, ३५ टक्के तांबे आणि चांदी, ग्राफाईट, टिन, निकेल आदींचा विपुल साठा आहे. लॅटिन अमेरिकेतील चिलीमधे 'लिथियमसारखा महत्त्वाचा धातू साध्या वाळूच्या बाष्पीभवनातून बाहेर निघतो. जगातील 'एकूण सोयाबीनच्या निर्यातीत लॅटिन अमेरिकेचा वाटा ६० टक्के आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनं आणि बदलती जागतिक समीकरणं, यामुळे लॅटिन अमेरिका ही नवी आर्थिक शक्ती ठरू शकते.
0
मुंबईतील गिरगावामधील शंकर बारी लेनच्या चाळीत राहणाऱ्या सात अशिक्षित महिलांनी ६४ वर्षापूर्वी एक क्रांती घडवली. घरातला स्वयंपाक झाल्यावर मिळणाऱ्या वेळेत त्यांनी पापड लाटण्याचा घरगुती उद्योग सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग ८० रुपये उधार घेऊन, सुरू झालेला हा उद्योग आज 'लिज्जत' नावाचा ग्लोबल ब्रँड बनला. हा इतिहास घडविणाऱ्या पद्मश्री जसवंतीबेन पोपट यांचं नुकतंच निधन झालं.
0
महात्मा फुलेंनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आज त्याला दीडेशे वर्ष पूर्ण होताहेत. समाजातील उपेक्षित, कष्टकरी आणि पिचलेल्या घटकांचा आवाज ठरलेल्या या चळवळीनं खऱ्या अर्थानं क्रांती घडवली. या विचारक्रांतीचा प्रसार जनमानसात व्हावा, यासाठी सत्यशोधक पत्रकारिता जन्माला आली. तत्कालीन प्रस्थापित उच्चवर्णियांच्या पत्रकारितेला दिलेला तो जबर धक्का होता.
0
जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रसंग स्वातंत्र्योत्तर भारताच्या लोकशाहीतील आणि राजकीय प्रवासातील एक ऐतिहासिक क्षण आहे. जुने संसद भवन ही केवळ दगडमातीनं उभारलेली इमारत नाही, तर देशाची समृद्ध संसदीय परंपरा पुढे नेणारी आणि तिचे आधार बळकट करणारी वास्तू आहे, हे विसरता येणार नाही.
0
काही माणसं सदासर्वदा प्रसन्न असतात. निराशा, उदासीनता त्यांच्या जवळपासही फिरकत नाही. प्रत्येक काम ही माणसं मनापासून करतात. फायदा-तोट्याच्या गणितात ती अडकत नाहीत. कधी कोणाशी स्पर्धा करत नाहीत. खूप सकारात्मक दृष्टीनं आयुष्य जगणाऱ्या अशा प्रेरणादायी माणसांमधील एक नाव होतं, प्राचार्य मदन धनकर. ते उत्कृष्ट शिक्षक, पत्रकार, लेखक तर होतेच, पण त्याही आधी ते विदर्भाच्या मातीतला कार्यकर्ता होते.
0
भारत-कॅनडा तणाव सध्या प्रचंड वाढलाय. खलिस्तानवादी निज्जर यांच्या हत्येमागे, भारत असल्याचं सांगत कॅनडानं थेट पंगा घेतलाय. पण हे प्रकरण दिसतं तेवढं सरळ नाही. यातील अनेक गोष्टी आपल्याला कधीच कळणार नाहीत. पण खलिस्तानची मागणीची मुळं ही स्वातंत्र्यपू्र्व काळापर्यंत जातात. हा घटनाक्रम नीट समजून घेतला तरच, आज वरवरची दिसणारी ही जखम किती खोल आहे, याचा अंदाज येईल.
0
‘धनगर समाजाला आरक्षण द्या, अन्यथा महाराष्ट्रात जाट आंदोलनासारखे तीव्र आंदोलन उभे करू!’ असा इशारा भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. पण सरकारमधेच असणाऱ्याला रस्त्यावरच्या आंदोलनाची भाषा का करायला हवी? फडणवीसांनीच सत्तेत आल्यावर धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. मग आता जाब फडणवीसांना विचारायचा, की आंदोलनासाठी जनतेला वेठीस धरायचं?
गणेश ही ज्ञानाची देवता. मस्तक हे ज्याप्रमाणे शरीरात सर्वोच्च स्थानी असते, त्याप्रमाणे द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही जेथे एकरूप होतात तेथे अध्यात्माची सर्वोच्च सीमा येते, असाही या विचाराचा ज्ञानाच्या अंगाने अर्थ लागतो. तोही ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे. आज गणेश चतुर्थी. त्यानिमित्त योगियांची माऊली असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दप्रतिभेने साकारलेला गणपती बाप्पा समजून घेऊ.
देशात सणासुदीचे दिवस सुरू होताहेत. पर्यटकांची गर्दीही आता वाढेल. गणपतीसाठी मुंबई, पुण्यात होणारी लक्षावधींची गर्दीही आपण दरवर्षी पाहतो. ही सगळी गर्दी व्यवस्थेवर आणि निसर्गावर असह्य ताण आणतेय. काही वर्षांपूर्वी जिथं काही शेकडो लोक जायचे, तिथे आज लाखांची गर्दी होतेय. पर्यटनाची अर्थव्यवस्था मान्य केली तरीही, हे सगळं फुटेल एवढं वाढलंय. युरोप हे रोखण्यासाठी पावलं उचलतंय, भारताचं काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी देशातील आरक्षणाचं समर्थन करणारं एक विधान केलं. ते म्हणालेत की, 'जोपर्यंत भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहिलेच पाहिजे.' पण याच भागवत यांनी, काही वर्षांपूर्वी, 'देशात आरक्षणाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे' असंही विधान केलं होतं. त्यामुळे त्यांची भूमिका बदललीय की आगामी निवडणुकीची तयारी सुरू झालीय.
महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या वेळी 'हे राज्य मराठ्यांचं की मराठीचं?’ असा प्रश्न माडखोलकरांनी यशवंतराव चव्हाणांना विचारला होता, हे सुप्रसिद्ध आहे. तिथपासून आजपर्यंत मराठा जातीचा राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव राहिलाय. पण आता मराठे आरक्षण मागताहेत. या सगळ्यामागं काही तरी सुत्रे आहेत. जरांगे पाटलांचं आरक्षण आंदोलन, पंकजा मुंडेंची यात्रा आणि भाजपचं राजकारण नीट समजून घ्यायला हवं.
‘शाहरुख संपलाय, शाहरुख संपलाय’ अशा अफवांना लगाम लावत शाहरुखचा ‘जवान’ गेला आठवडाभर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कमाईच्या अनेक विक्रमांची नोंद करत ‘जवान’ने शाहरुखच्या स्टारडमची जादू अजूनही ओसरलेली नाही, हेच दाखवून दिलंय. यानिमित्तानं, उत्तर आणि दक्षिण हे हटके कॉम्बिनेशन गाजू लागलंय. ‘जवान’च्या घवघवीत यशामागे असलेल्या कारणांपैकी हे एक खास कारण आहे.
गणेशोत्सव आला की, दरवर्षी मूर्ती शाडू मातीची असावी की पीओपीची यावरून वाद होतो. पण विज्ञान सांगतं की, पीओपीची मूर्ती जेवढी पर्यावरणासाठी घातक, तेवढीच शाडू मातीची मूर्तीही घातक आहे. त्यावरील रासायनिक रंग तर आणखी धोकादायक आहेत. पण खरा मुद्दा हा आहे, तो विसर्जनाच्या पद्धतीचा. त्यामुळे निसर्गाला घातक न ठरणारे विसर्जनाचे पर्याय शोधणं, हाच उपाय आहे.
जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलनात सतत नवं घडतंय. संवैधानिक मार्गाने आरक्षण मागणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला झाल्यानं, सरकारचा सर्वांनीच निषेध केला. एकीकडे मराठे आंदोलनाची धार वाढवत, राजकीय दबाव आणताहेत. तर, दुसरीकडे ओबीसी त्याच्या विरोधात उभे राहू लागलेत. ओबीसी आंदोलनाची भूमिकाही समजून घ्यायला हवी. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटणं हिताचं नाही.
सोशल मीडियावर पसरविल्या गेलेल्या आक्षेपार्ह मेसेजमुळे साताऱ्यातील पुसेसावळीमधे दंगल भडकली. यात एकाचा मृत्यू झाला तर १० जण जखमी आहेत. परिस्थिती आवरण्यासाठी, काहींना अटक करण्यात आली, तसंच इंटरनेटही बंद करण्यात आलं. हे सगळं भीषण आहे. साताऱ्यासारख्या सर्वसमावेशकतेचा इतिहास असलेल्या शहरात दंगे घडवून कोणीतरी आपला डाव साधू पाहताहेत. याचं भान तातडीनं यायला हवंय.
जगात चौथ्या क्रमांकावर असणार्या ‘भारतीय रेल्वे’च्या १८६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ‘रेल्वे मंडळा’च्या अध्यक्षपदी एका कर्तबगार महिला अधिकार्याची नियुक्ती झाली आहे. जया वर्मा सिन्हा त्यांचे नाव. आता त्या रेल्वे मंडळाच्या चेअरमन आणि सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्या आहेत. बालासोर अपघातानंतर त्यांनी लोकांसमोर जाऊन मांडलेल्या भूमिकेमुळे त्यांचं काम लक्षवेधी ठरलं होतं.
दूरवरच्या अवकाशप्रवासासाठी चंद्र हा एक थांबा म्हणून उपयोगात आणायचा आहे. त्यासाठी तिथं अवकाशतळ उभारायचा आहे. या सर्व गोष्टींसाठी भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडरनं चंद्राच्या भूमीवरून घेतलेली ’उडी’ महत्त्वाची आहे. चंद्रावरच्या मातीत गंधक असल्याचं आढळणं, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळं चंद्र हा कसकसा उत्क्रांत होत गेला, यावर प्रकाश पडू शकतो.
भाजप देशातल्या संघराज्य संरचनेला आणि लोकशाहीला धक्के देत आहे. ते पाहता अस्तित्वासाठी का होईना पण भाजपविरोधा उभ्या राहिलेल्या, इंडिया आघाडीत जवळपास दोन डझन राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. यात ११ राज्यांत सत्तेवर असलेले पक्षही आहेत. या सर्वांचे मिळून संसदेत २४० खासदार आहेत आणि १७०६ आमदार आहेत. त्यामुळेच ही एकी टिकली तर सत्ताधारी भाजपला आव्हान देऊ शकते.
'ज्यांची हृदये झाडांची, त्यांनाच फक्त फुले येतात' अशी मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे. असं झाडांचं हृदय असणारी, रसरशीत जगणारी माणसंच या एरव्ही रुक्ष असणार्या जगात ओलावा भरतात, हे जग सर्वांसाठी सुंदर बनवतात. आशा भोसले यांचा आवाज, त्यांची गाणी याच प्रकारातली. रसरशीत.. जगणं सुरेल, सुंदर बनवणारी. आज ८ सप्टेंबर २०२३ रोजी आशाताईंना ९० वर्षे पूर्ण होत आहेत.
आधीच उशिरा आलेल्या 'पावसानं ऑगस्टमधे पुन्हा दडी मारल्यामुळे जवळपास निम्म्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट उभे राहिलंय. राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांची संख्या २० वर आणि तालुक्यांची संख्या १३० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. काळ जसा पुढे जाईल तशी दुष्काळाची तीव्रता वाढत जाणार आहे. एल निनोचा वाढता प्रभाव पाहता, परतीच्या पावसावरही 'फारशी भिस्त ठेवून चालणार नाही.
आपण विष्णूची सहस्त्रनामे पवित्र मानतो, गणपतीची १०८ नावं नियमित म्हटली जातात. एवढंच काय तर, अल्लाचीही ९९ नावं असल्याचे संदर्भ आहेत. तसंच, आपण देशाला मातृभूमी म्हणून, देवाएवढंच महत्व देतो. मग आपल्या देशाला एकाच नावानं ओळखलं जावं, हा आग्रह कशासाठी? इंडिया, भारत ही दोन नावं तर घटनेनं स्वीकारलेली आहेत. त्यामुळे एकाच नावाचा आग्रह विविधतेच्या गाभ्याला धक्का पोहचवणारा आहे.
पापलेटला राज्यमासा ही मान्यता मिळाल्यावर मीडियात आणि सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट दिसू लागल्यात. गेल्या काही दशकांमधे पापलेटचं कमी झालेलं उत्पादन रोखून त्याचं संवर्धन व्हावं, हा या मागचा खरा उद्देश आहे. पण फक्त पापलेटचंच उत्पादन कमी झालंय का? तसं नाही. हवामान बदल आणि चुकीची धोरणं यामुळे मासेमारीची सर्व गणित कोलमडलीत. फक्त राज्यमाशाचा दर्जा देऊन हे प्रश्न सुटतील का?
तुम्हाला आलेला एखादा मेसेज, फोटो किंवा विडिओ आपल्याला पटला, आवडला तर तो फॉरवर्ड करताना त्याच्या खऱ्याखोट्यापणाबद्दल आपण विचार करतो का? बहुसंख्य लोकांचं या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असंचं आहे. कारण जे आपल्याला पटलं, आवडलं ते खरंच असतं हा मानवी स्वभाव आहे. या सगळ्याचा फायदा जगभरात खोटं पसरवाणारे घेताहेत. आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे, तर काय खरं काय खोटं हे कळणंही अवघड झालंय.
युक्रेनविरोधातील युद्ध अद्याप संपत नसताना, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलंय. रशियातील बंडखोर खासगी लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू, हा पुतीन यांनी घडविलेला 'कोल्ड ब्लडेड गेम' असल्याची शंका सर्वांनाच वाटतेय. पुतीन यांनी वॅगनरला शिक्षा होणार हे जाहीरपणे सांगितलं होतं. पण हा गेम इथेच संपेल की त्याला पुढे नवं वळण मिळेल?
पराग चोळकर यांचं ‘अवघी भूमी जगदीशाची : भूदान ग्रामदान आंदोलनाची कहाणी’ आणि डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांचं ‘बिजापूर डायरी’ ही दोन वेगवेगळी पुस्तकं. एकात विनोबांच्या भूदानाची गोष्ट आहे, तर ‘बिजापूर डायरी’त छत्तीसगडमधील बस्तर भागात केलेल्या कामाचा अनुभव आहे. ही दोन पुस्तकं वेगळी असली, तरी त्यांना जोडणारा धागा गांधी विचाराचा, शेवटच्या माणसासाठी धडपडणाऱ्यांचा आहे.
पृथ्वीच्या चोहोबाजूंनी सध्या दोन हजार उपग्रह प्रदक्षिणा घालत आहेत. त्याचवेळी तीन हजारांपेक्षा अधिक निष्क्रिय उपग्रह आहेत. हे निष्क्रिय उपग्रह आणि रॉकेटसूच्या निरुपयोगी भागांच्या कचरा अंतराळात वाढत चालला आहे. या सगळ्या कचऱ्याबद्दल जगभरातील अवकाश संशोधकांना चिंता आहे. त्याबद्दल एक उल्लेखनीय यश भारताच्या इस्रोला मिळालंय. त्यामुळे भविष्यात अंतराळातील कचरा कमी होऊ शकेल.
तेलुगू सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अल्लू अर्जुनला ‘पुष्पा’तल्या भूमिकेसाठी आपला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच तेलुगू अभिनेता ठरलाय. अल्लू अर्जुनपेक्षा सरस अभिनेत्यांना यावेळी डावललं गेलं. त्याचबरोबर एखाद्या तेलुगू अभिनेत्याला पुरस्कार देण्यासाठी हेच वर्ष का निवडलं असावं, यावरूनहा पुरस्कार प्रश्नचिन्हांच्या वावटळीत सापडलाय.
शिवरायांचे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा ही कायमच शौर्यकथांचा विषय ठरली. आजवर कित्येक बखरकारांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, लेखकांना, नाट्य-चित्रपटांंना या कथेनं आकर्षित केलंय. पुन्हापुन्हा सांगूनही ही कथा संपत नाही. नव्या दमाच्या कलाकाराला आपण ही कथा पुन्हा सांगावी अशी वाटते, हीच या कथेची जादू आहे. म्हणूनच आतापर्यंत तानाजींच्या आयुष्यावर पाच सिनेमे आले.
भारत हा जगातील सर्वाधिक प्रमाणात जेनेरिक औषधे निर्यात करणारा देश आहे. दरवर्षी भारतातून ५० हजार कोटी रुपयांची जेनेरिक औषधांची निर्यात वेगवेगळ्या देशांत होते. अमेरिका आणि युरोपमध्ये भारतातील जेनेरिक औषधांबाबत मोठी विश्वासार्हता आहे. पण भारतात मात्र अनेक पटीने महाग विकल्या जाणार्या ब्रॅण्डेड औषधांचाच बाजार आहे. त्यामुळे जेनेरिकच्या गुणवत्तेवर भर द्ययला हवाय.
एक काळ असा होता की, पोरीचं लग्न म्हटलं की बापाच्या पोटात खड्डा पडायचा. हुंडा, सोनं, मानमरताब, लग्नाचा खर्चामुळे तो कर्जबाजारी व्हायचा. पण आता चित्र बदलतंय. बेरोजगारी, शेतीतली अनिश्चितता, बदललेल्या अपेक्षा, स्त्री-पुरुष गुणोत्तरातील गोंधळ यामुळे गावाकडच्या मुलग्यांची लग्नच जमेनाशी झालीत. त्यामुळे नवरी आपल्याच जातीतील पाहिजे, ही अट पाठी पडतेय. पण, स्वेच्छेनं नव्हे तर मजबुरीनं.
कांदा हे भारतीय जेवणातला एक महत्त्वाचा घटक आहे. पण कांद्याचे भाव कधी पडतात तर कधी आकाशाला भिडतात. नुकतेच टॉमेटोने रंग दाखवून झालेत. आता कांद्याच्या भावाच्या चर्चा सुरू झाल्यात. बदललेला पाऊस, व्यापाऱ्यांची मनमानी, सरकारकडून शेतकऱ्याला मिळणारी उपेक्षित वागणूक आणि यंदाचं निवडणुकीचं वर्ष असल्याने निर्यात बंदीचा निर्णय, या साऱ्यामुळे कांद्यांच्या धंद्याचा गुंता वाढलाय.
स्पेन हा जर्मनीनंतर जगातील असा दुसरा देश ठरला की, त्यानं पुरुष आणि महिला या दोन्ही फुटबॉल स्पर्धांचे विश्वविजेतेपद पटकावण्याची किमया करून दाखविलीय. स्पेननं केवळ तिसर्याच प्रयत्नात हे अद्भुत यश मिळवले असले तरी, त्यासाठी त्यांना तीव्र संघर्ष करावा लागलाय. स्पेनच्या प्रत्येक खेळाडूने जीव ओतून समर्पित भावनेने खेळ केला. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर त्यांची कामगिरी उंचावत गेली.