ट्विटर लेडी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट २०१९ ला वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. ट्विटरवर त्या नर्मविनोदी, हजरबाबी भूमिकेसाठी ओळखल्या जात. आपल्या मानवतावादी भूमिकेने तर त्यांनी जगभरात आपले चाहते तयार केले. अल्लानंतर तुमच्याकडूनच मदतीला अपेक्षा आहे, असं अगदी पाकिस्तानातले लोकही त्यांच्याविषयी म्हणत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावणी, टाळ्या वाजवण्याचं आवाहन केल्यावर त्याला विरोध झाला. पण पंतप्रधानांनी मास्क वापर म्हटल्यावर सगळ्यांनी त्याचं अंमल सुरू केला. तिकडे अमेरिकेत मात्र मास्क वापरण्यावरून देशात दोन गट निर्माण झाले. ‘मास्क‘वाद निर्माण झालाय.
पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध असो किंवा १९८०-९० मधलं शीतयुद्ध असो जगाची दोन महासत्तांच्या नेतृत्वात विभागणी झाली. कोविडनंतरच्या जगातली सत्ताविभागणी खूप गुंतागुंतीची आहे. महासत्ताधीश अमेरिकेच्या बेजबाबदारपणामुळे हा गुंता आणखी वाढतोय. आणि याच गुंत्याचा चीन पुरेपूर फायदा उठवतोय.
चीनी मालावर बहिष्कार टाका, चीनला धडा शिकवा असे मेसेज सोशल मीडियावर फिरतयात. स्वदेशी वापराचा नारा पुन्हा पुन्हा दिला जातोय. चीननं भारतात भली मोठी गुंतवणूक केलीय. डिजिटल इंडियाचा सगळा डोलाराही चीनी गुंतवणुकीवरच उभारलाय. त्यामुळे भारत चीन व्यापार संबंध संपवले तर भारतालाच त्याचा मोठा फटका सहन करावा लागेल.
महाराष्ट्रातल्या शाळांना एप्रिल आणि मे असे दोन महिने उन्हाळी सुट्टी असतेच. यंदा कोरोना वायरसच्या सावटाखाली जूनमधे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल की नाही याची काळजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना लागून राहिलीय. अनेक देशांनी लॉकडाऊनंतर शाळा सुरू केल्या. पण शाळेतून कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यामुळे पुन्हा बंद कराव्या लागल्या. त्यांना आलेल्या अनुभवातून आपण बरंच काही शिकू शकतो.
कोरोना संकटाच्या काळातच महाराष्ट्रावर नवं संकट घोंगावतंय. आमदारकीअभावी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याचा. विधान परिषदेवर नियुक्तीसाठी मंत्रिमंडळानं शिफारस करून १३ दिवस झाले तरी राज्यपालांनी निर्णय रेंगाळत ठेवलाय. पण ठाकरे आमदार होण्यात कायद्याचा कोणताच अडसर नाही. त्यामुळे राज्यपालांनी तत्काळ ठाकरेंच्या नियुक्तीला मंजुरी दिली पाहिजे, असं ख्यातनाम कायदेतज्ञ फैजान मुस्तफा सांगतात.
लॉकडाऊन असताना आपल्या परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी आडवळणानं गुजरातकडे निघालेल्या तिघांची एका झुंडीनं हत्या केली. महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सीमेवरच्या झुंडबळीच्या घटनेनं सारा देश हादरलाय. चार दिवसांनी अचानक देशाचं पॉलिटिक्स ढवळून काढणाऱ्या या घटनेचे रोज नवेनवे अँगल समोर येताहेत. या निमित्तानं काही प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजेत.