१९७० मधे 'गोपी' नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात प्रभू श्रीराम सीतेला 'असं घोर कलियुग येईल, जिथं कर्म, धर्म असेल पण लाजलज्जा नसेल' असं म्हणतात. पन्नास वर्षात युग बदलत नाही, पण मागच्या पन्नास वर्षांतच एक नवं कलियुग आल्याचं आपल्याला दिसतंय. या लाजलज्जा संपलेल्या अनेक गोष्टी राज कुंद्राच्या ताज्या घटनेसह सहज आठवतायत.
आज ६ जुलै. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिवस. २०-२२ वर्षांचे असतानाच नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या व्यक्तिचरित्रातून त्यांनी वाचकांचं लक्षं वेधून घेतलं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी लेखकांच्या पिढ्यांनी दिल्या त्यापेक्षा त्यांच्या कथा कितीतरी वेगळ्या होत्या. त्यांच्या संपूर्ण साहित्यातच कथेचं प्राबल्य आहे. या कथा पाच प्रकारात समाविष्ट करता येऊ शकतात.
हिंगणघाट जळीतकांडातल्या तरूणीचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. समाज म्हणून हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आपण दुसरं काहीच करू शकत नाही. आपली न्यायव्यवस्था न्याय द्यायला कमी पडतेय हे वास्तव तर स्वीकारायला हवंच. त्यासोबत दोन महिन्यांच्या मुलीचा वेश्याव्यवसायाठी सौदा करणाऱ्या समाजातल्या धंदेवाईक यंत्रणाही वाढताहेत हेही लक्षात घ्यायला हवं