आयपीएलमधून भारताला क्रिकेटमधे नवनवे खेळाडू मिळाले, तसंच खेलो इंडियाबद्दल व्हायला हवं. भविष्यातले ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा, असंच या स्पर्धेचं स्वरूप उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो, हे चित्र बदलण्याची वेळ आता आलीय.
रडार यंत्रणा, लेझर सेन्सर, आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी म्हणून नाटोनं एक नवं तंत्रज्ञान आणलंय. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान ९९ टक्के काम करेल असं म्हटलं जातंय. असं झालं तर हल्ले होण्याआधीच सर्वसामान्यांची सुरक्षा करणं, खबरदारी घेणं सोपं जाईल.
डॉक्युमेंटरी, शॉर्टफिल्म आणि अॅनिमेशनपट यांच्यासाठी हक्काचं विचारपीठ समजला जाणारा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच मिफ नुकताच पार पडला. त्यातून काही लक्षणीय कलाकृती पाहण्यात आल्या. आशय आणि तांत्रिकदृष्ट्या सरस ठरलेल्या या कलाकृतींचा आढावा घेणारा हा लेख.
साधारण पन्नास वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असं ठरलेलं असायचं. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. पण तो कुठं, किती आणि केव्हा पडणार, हे नेमकं सांगता येणं कठीण झालंय. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं दुरावलेलं आहे. झाडं, पशू, पक्षी यांनी ते आजही घट्ट जपलंय. त्यामुळे निसर्गातल्या बदलांबद्दल हे घटक माणसापेक्षा जास्त संवेदनशील असतात. त्याप्रमाणे ते व्यक्त होतात. माणसाला ते समजून येत नाही.
जीवनावश्यक वस्तूंमधल्या भाववाढीचे मे महिन्यातले आकडे आजपर्यंतचे महागाईचे सगळेच रेकॉर्ड ब्रेक करणारे ठरलेत. दुसरीकडे रिझर्व बँकेनं रेपो दरात वाढ केल्यामुळे बँकांनी व्याजदर वाढवलेत. त्यामुळे लोन घेणाऱ्या सर्वसामान्यांचं टेंशन वाढणार आहे. तर इंधनांमधली भाववाढ सर्वसामान्यांचं कंबरडं मोडत असताना जीडीपीच्या फुगीर आकड्यांवर अर्थतज्ञ प्रश्नचिन्ह निर्माण करतायत.
दोन वर्षांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्यानं होऊ लागला तेव्हाच आगामी काही वर्षं कोरोनासोबत जगावं लागणार, असं विषाणूतज्ज्ञांकडून सांगितलं जात होतं. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे आणि एका मर्यादेपलीकडे अथक प्रवास केल्यामुळे या विषाणूंची क्षमता कमी होत जाते. पण त्यांच्यातलं म्युटेशन सुरुच असतं. त्यातून नवे वेरियंट जन्माला येतात. सध्या अशाच दोन वेरियंटमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय.
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे.
कमल हासन अभिनित आणि लोकेश कनकराज दिग्दर्शित ‘विक्रम’ हा तमिळ सिनेमा देशभरातल्या थियेटरमधे जोमाने गर्दी खेचून आणतोय. दिग्दर्शक लोकेश हा खरं तर कमल हासनचा डाय-हार्ड फॅन! आपला आदर्श असलेल्या सिनेनायकाला किंवा नायिकेला घेऊन सिनेमा बनवणारे दिग्दर्शक सिनेजगताला काही नवीन नाहीत. अशाच काही फॅनबॉय दिग्दर्शकांनी गेल्या काही वर्षात तमिळ सिनेमाला वेगळीच दिशा मिळवून दिलीय.
रॉबर्ट झेमेकिस दिग्दर्शित ‘फॉरेस्ट गम्प’ हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांनी गाजला. आता अठ्ठावीस वर्षांनी तो हिंदीत ‘लाल सिंग चढ्ढा’ या नावाने परत येतोय. अमेरिकेतल्या साठ-सत्तरच्या दशकातल्या अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडींना वेगळ्या पद्धतीने पडद्यावर आणणाऱ्या या सिनेमाचं ‘भारतीयीकरण’ हा चर्चेचा नवा विषय ठरू शकतो.
प्रतिष्ठेचं ‘बुकर पारितोषिक’ मिळवणार्या गीतांजली श्री या पहिल्या हिंदी भाषिक लेखिका आहेत. त्यांची ‘रेत समाधी’ ही कादंबरी देशातल्या आणि जगातल्या हिंदी वाचकांच्या आत्म्याशी जोडलेली आहे. या कादंबरीत स्त्रीच्या मनाची अवस्था अतिशय हृदयस्पर्शी आणि संवेदनशील भाषेत साकारली आहे. हिंदीला जागतिक स्तरावर नवं स्थान मिळवून देण्यात गीतांजली श्री यांचं यश महत्त्वाची भूमिका बजावेल.