झारखंड हे देशातल्या अत्यंत गरीब राज्यांपैकी एक. नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या या राज्याची लूट राजकीय नेते आणि काही नोकरशहा यांनी संयुक्तरीत्या कैक वर्षांपासून चालवलीय. आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांचं प्रकरण हे प्रशासनातल्या भ्रष्टाचाराच्या हिमनगाचं एक टोक आहे. आपली व्यवस्था आंतर्बाह्य कशी किडली आहे, त्याचं हे उदाहरण ठरावं.
हिमाचल प्रदेशातल्या राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ कॉंग्रेस नेते पंडित सुखराम शर्मा यांचं नुकतंच निधन झालं. हिमाचल प्रदेशसारख्या दुर्गम भागात दूरसंचार क्रांती घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचबरोबर पहिल्या दूरसंचार घोटाळ्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख.
देशद्रोहासाठीचं कलम १२४-अ पुन्हा एकदा चर्चेत आलंय. प्रत्येक विरोधी वक्तव्य, टीकात्मक परीक्षण आणि नकार हे सर्व देशद्रोह आहे असं मानणं चुकीचं आहे. विशिष्ट राजकीय पक्षाबद्दल कोणी काही बोलत असेल, तर तो देशाचा अपमान मानता येणार नाही. गेल्या काही वर्षांत तसा प्रकार होताना दिसतोय. मोकळेपणानं विचार व्यक्त करण्याची प्रक्रिया दडपणं हा राजकीय स्वातंत्र्याचा संकोच आहे.
पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय.
महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट करायला निघालेल्या पक्षाला स्वत:ची वेबसाईटसुद्धा नीट उभारता आलेली नाही. त्यामुळे मनसेची दखल घेत राहावं असं काही नाही, पण या पक्षाला उपद्रवमूल्य आहे. ‘उपयुक्ततामूल्य नसेना, उपद्रवमूल्य हीच आमची ताकद’ असं त्यांना अभिमानानं मिरवायचं असेल, आणि त्यावर मिळणाऱ्या टाळ्यांवर खूष व्हायचं असेल तर ते त्यांचं समाधान मात्र कुणालाही हिरावून घेता येणार नाही.