जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलनात सतत नवं घडतंय. संवैधानिक मार्गाने आरक्षण मागणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला झाल्यानं, सरकारचा सर्वांनीच निषेध केला. एकीकडे मराठे आंदोलनाची धार वाढवत, राजकीय दबाव आणताहेत. तर, दुसरीकडे ओबीसी त्याच्या विरोधात उभे राहू लागलेत. ओबीसी आंदोलनाची भूमिकाही समजून घ्यायला हवी. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटणं हिताचं नाही.
सोशल मीडियावर पसरविल्या गेलेल्या आक्षेपार्ह मेसेजमुळे साताऱ्यातील पुसेसावळीमधे दंगल भडकली. यात एकाचा मृत्यू झाला तर १० जण जखमी आहेत. परिस्थिती आवरण्यासाठी, काहींना अटक करण्यात आली, तसंच इंटरनेटही बंद करण्यात आलं. हे सगळं भीषण आहे. साताऱ्यासारख्या सर्वसमावेशकतेचा इतिहास असलेल्या शहरात दंगे घडवून कोणीतरी आपला डाव साधू पाहताहेत. याचं भान तातडीनं यायला हवंय.
जगात चौथ्या क्रमांकावर असणार्या ‘भारतीय रेल्वे’च्या १८६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ‘रेल्वे मंडळा’च्या अध्यक्षपदी एका कर्तबगार महिला अधिकार्याची नियुक्ती झाली आहे. जया वर्मा सिन्हा त्यांचे नाव. आता त्या रेल्वे मंडळाच्या चेअरमन आणि सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्या आहेत. बालासोर अपघातानंतर त्यांनी लोकांसमोर जाऊन मांडलेल्या भूमिकेमुळे त्यांचं काम लक्षवेधी ठरलं होतं.
आधीच उशिरा आलेल्या 'पावसानं ऑगस्टमधे पुन्हा दडी मारल्यामुळे जवळपास निम्म्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट उभे राहिलंय. राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांची संख्या २० वर आणि तालुक्यांची संख्या १३० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. काळ जसा पुढे जाईल तशी दुष्काळाची तीव्रता वाढत जाणार आहे. एल निनोचा वाढता प्रभाव पाहता, परतीच्या पावसावरही 'फारशी भिस्त ठेवून चालणार नाही.
पापलेटला राज्यमासा ही मान्यता मिळाल्यावर मीडियात आणि सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट दिसू लागल्यात. गेल्या काही दशकांमधे पापलेटचं कमी झालेलं उत्पादन रोखून त्याचं संवर्धन व्हावं, हा या मागचा खरा उद्देश आहे. पण फक्त पापलेटचंच उत्पादन कमी झालंय का? तसं नाही. हवामान बदल आणि चुकीची धोरणं यामुळे मासेमारीची सर्व गणित कोलमडलीत. फक्त राज्यमाशाचा दर्जा देऊन हे प्रश्न सुटतील का?
युक्रेनविरोधातील युद्ध अद्याप संपत नसताना, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलंय. रशियातील बंडखोर खासगी लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू, हा पुतीन यांनी घडविलेला 'कोल्ड ब्लडेड गेम' असल्याची शंका सर्वांनाच वाटतेय. पुतीन यांनी वॅगनरला शिक्षा होणार हे जाहीरपणे सांगितलं होतं. पण हा गेम इथेच संपेल की त्याला पुढे नवं वळण मिळेल?
भारत हा जगातील सर्वाधिक प्रमाणात जेनेरिक औषधे निर्यात करणारा देश आहे. दरवर्षी भारतातून ५० हजार कोटी रुपयांची जेनेरिक औषधांची निर्यात वेगवेगळ्या देशांत होते. अमेरिका आणि युरोपमध्ये भारतातील जेनेरिक औषधांबाबत मोठी विश्वासार्हता आहे. पण भारतात मात्र अनेक पटीने महाग विकल्या जाणार्या ब्रॅण्डेड औषधांचाच बाजार आहे. त्यामुळे जेनेरिकच्या गुणवत्तेवर भर द्ययला हवाय.
एक काळ असा होता की, पोरीचं लग्न म्हटलं की बापाच्या पोटात खड्डा पडायचा. हुंडा, सोनं, मानमरताब, लग्नाचा खर्चामुळे तो कर्जबाजारी व्हायचा. पण आता चित्र बदलतंय. बेरोजगारी, शेतीतली अनिश्चितता, बदललेल्या अपेक्षा, स्त्री-पुरुष गुणोत्तरातील गोंधळ यामुळे गावाकडच्या मुलग्यांची लग्नच जमेनाशी झालीत. त्यामुळे नवरी आपल्याच जातीतील पाहिजे, ही अट पाठी पडतेय. पण, स्वेच्छेनं नव्हे तर मजबुरीनं.