दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट.
छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय.
ताजमहाल कुणाचा यावरून सध्या वाद निर्माण झालाय. मुळात वास्तुरचना हिंदू की पर्शियन हा वाद भोंगळ आहे. वास्तुरचनांमधे आणि त्यावरच्या कलाकारीत संस्कृती-संगम अपरिहार्यपणे होत असतो. रायगडावरचं जगदिश्वराचं मंदिर मुस्लिम शैलीत आहे. ते कोणी मुस्लिमानं बांधलं असा तर्क केला तर तो जेवढा वेडगळपणाचा होईल तसं हिंदू खाणाखुणा मिळाल्या तर ताज हे हिंदू राजांचं वास्तुशिल्प होतं असा दावा करणं मूर्खपणाचं होऊन जाईल.
विज्ञानाच्या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व असल्यानं विज्ञानाच्या गुंतागुंतीमधे स्त्रियांना सहजता येऊ शकत नाही, हे सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. ही स्त्री-पुरुष तफावत दूर करणं सोपं नाही. कारण आपल्यापैकी बहुतेकांची ही लैंगिक पक्षपाती मानसिकता लहानपणापासूनच असते.
अमोल मिटकरी यांच्या 'भार्या समर्पयामि'च्या वादग्रस्त विधानानंतर टीवीवरच्या एका संवादात ब्राह्मण सभेचे आनंद दवे मिटकरींना 'तुम्हाला मंत्र-विधी चिकित्सेचा अधिकार कुणी दिला,' असा प्रश्न विचारत होते. या प्रश्नात अहंकार आहे; तुच्छता आहे. 'हा अधिकार आम्हाला महात्मा फुले यांनी मिळवून दिलाय,' असं ठणकावून ऐकवलं पाहिजे होतं. कारण त्यात 'देवळाला दार नको आणि देव-धर्माला दलाल नको,' हा आग्रह आहे.
ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे.
२०१४ला पंजाबमधल्या अजनाला शहरातल्या एका विहिरीत काही मानवी सांगाडे आढळून आले होते. पंजाब सरकारने त्याचा अभ्यास करण्यासाठी मानववंशशास्त्रज्ञ जे. एस. सेहरावत यांच्या नेतृत्वात एक रिसर्च टीम तयार केली. हे मानवी सांगाडे १८५७ला ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांचे असल्याचं या नव्या संशोधनातून समोर आलंय. अतिशय क्रूर पद्धतीने या सैनिकांना संपवण्यात आल्याचं या अभ्यासावरून कळतंय.
राजर्षी शाहू महाराजांचा द्रष्टेपणा केवळ भारताच्या नाही, तर जगाच्या इतिहासात अधोरेखित करण्यासारखा आहे. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त केलं. बहुजन समाजाप्रमाणेच महाराजांनी स्त्री शिक्षणासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रशासकीय सेवेतली ब्राह्मण समाजाची मक्तेदारी मोडून समाजातल्या सर्व घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व असलेली सर्वसमावेशक प्रशासकीय व्यवस्था शाहू महाराजांनी निर्माण केली.