अर्थशास्त्रातील सर्वोच्च नोबेल सन्मान मिळवणाऱ्या क्लॉडिया गोल्डीन या विद्यार्थीप्रिय संशोधक, शिक्षिका आहेत. नोबेलचे यशही त्यांनी विद्यार्थ्यांसोबत साजरा केले.…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन वंशाच्या अजयसिंग बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केलीय. बंगा यांचं पदवीपर्यंतचं…
डॉ. पॉल मिलग्रोम आणि डॉ. रॉबर्ट विल्सन यांनी मांडलेल्या लिलावाच्या नव्या पद्धतीमुळे अनेक देशांतले ग्राहक, विक्रेते, करदाते तसंच तिथलं सरकार यांना लाभ झाला. या योगदानाची दखल घेऊन २०२० चं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक या गुरू-शिष्यांना जाहीर झालं. मात्र, त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं भारतातल्या टेलिकॉम कंपन्यांचं गणित बिघडलं. त्यात भारतीय सरकारचीच चूक होती.
बुडीत कर्ज हे भारतीय बँकींग व्यवस्थेचं जुनं दुखणं आहे. त्यावर कुठलंही सरकार उपाययोजना करत नाही. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या या संकटस्थितीत आपण बुडीत कर्जाची समस्या सोडवली नाही, तर अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणखी वाईट होईल, असा इशारा आरबीआयचे माजी गवर्नर रघुराम राजन देतात.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा सावधगिरीचा इशारा दिला होता. गेल्या दोन दिवसांत शेअर बाजार पावसासारखा कोसळला. अमेरिकेनं युरोपियन लोकांवर निर्बंध घातल्यानं कालपासून शेअर बाजार पावसासारखा धोधो कोसळतोय. तब्बल १२ वर्षांनी शेअर मार्केटला असे दिवस बघावे लागतायत.
फळांचे, भाज्यांचे, औषधांचे वाढते भाव, शिक्षणाचं खासगीकरण, वैद्यकिय सुविंधांच्या वाढणाऱ्या किमती यासगळ्यातून महागाई किती वाढतीय हे तर दिसतंच आहे. या वाढत्या महागाईच्या काळात अर्थिक ओझं हलकं करण्यासाठी गुंतवणूकीतून पैसे कमवणं हा बेस्ट मार्ग आहे. पण ही गुंतवणूक योग्य व्हायला हवी.