एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…
अमोल मिटकरी यांच्या 'भार्या समर्पयामि'च्या वादग्रस्त विधानानंतर टीवीवरच्या एका संवादात ब्राह्मण सभेचे आनंद दवे मिटकरींना 'तुम्हाला मंत्र-विधी चिकित्सेचा अधिकार कुणी दिला,' असा प्रश्न विचारत होते. या प्रश्नात अहंकार आहे; तुच्छता आहे. 'हा अधिकार आम्हाला महात्मा फुले यांनी मिळवून दिलाय,' असं ठणकावून ऐकवलं पाहिजे होतं. कारण त्यात 'देवळाला दार नको आणि देव-धर्माला दलाल नको,' हा आग्रह आहे.
‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हा संपादित ग्रंथ नुकताच ११ एप्रिलला प्रकाशित झाला. यात प्रामुख्याने महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजासंबंधीची अस्सल कागदपत्रं एकत्र केलीत. इतिहास लिहिताना अस्सल कागदाचं एक चिटोरं अनेक ग्रंथांना वरचढ ठरतं. रा.ना. चव्हाण यांच्या संग्रहातली ही कागदपत्रं प्रकाशित झाल्यानं सत्यशोधक समाजाची वाटचाल कशी होती हे समजायला मदत होईल.
देशभक्त केशवराव जेधे यांची आज १२५ वी जयंती. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला नवी सुयोग्य दिशा देण्याचं काम केशवराव जेधेंनी सलग ४० वर्ष केलं. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ‘बहुजन हिताय’ धोरण जपणारे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहेच; पण अस्पृश्यता निर्मूलन तसंच शेतकरी, कामगारांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकंच महत्वाचं आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांची ११ एप्रिलला १९४ वी जयंती. तर आज १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती. कृतिशील आणि सर्जनशील समाजाचं चित्र प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी दोन्ही विचारवंतांनी आंदोलनाचा आणि चळवळीचा मार्ग स्वीकारला असला, तरी तो मार्ग लोकशाही चौकटीतला होता. या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या वैचारिक ऋणानुबंधाचा घेतलेला वेध.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली.