कोणताही राजकीय पक्ष कालसुसंगत आणि गतिमान राहण्यासाठी सातत्याने नवीन नेतृत्व उभं राहणं आवश्यक असतं. भाजपसारखा बलाढ्य राजकीय शत्रू समोर असतानाही काँग्रेस पक्ष पारंपरिक राजकारणात गुरफटून पडलाय. त्यातून जुने-नवे यांच्यातला वाद उफाळून येतो. काँग्रेसला आजही पूर्णवेळ अध्यक्ष नाही. ही निवड पुढच्या वर्षाअखेरपर्यंत होईल. तोपर्यंत पक्षाची दशा आणि दिशा काय असेल, हे काळच ठरवेल.
घोडा हा उमदा प्राणी. फक्त खिंड लढवणारे लढवय्येच त्यांच्या घोड्याचे लाड करतात असं नाही. वेगवेगळ्या जातीतली, धर्मातली आणि स्तरावरची माणसंही आपापल्या परीने घोडा पोसत असतात. या सगळ्याचं घोड्यांशी असणारं नातं सांगणारं, घोड्याचं अर्थकारण सांगणारं ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे यांचं पुस्तक लवकरच बाजारात येतंय. या आगामी पुस्तकातला राजस्थानातल्या पुष्कर गावातल्या घोड्यांच्या प्रदर्शनाच्या आठवणी सांगणारा काही भाग इथं देत आहोत.
चीता, मेहरात आणि काठात हे एकच वैशिष्ट्य असणारे तीन समुदाय राजस्थानातल्या अजमेर, भीलवाडा, पाली आणि राजसमंद या जिल्ह्यात पसरलेत. या समुदायातले एकाचवेळी हिंदू असतात आणि मुसलमानही. दोन्हीकडचे सण आपले म्हणून हे लोक साजरे करतात. पण आता आधुनिक काळाने, खरं म्हणजे साचेबंद समाजाने त्यांच्यासमोर नवे प्रश्न उभे करायला सुरवात केलीय. त्यांच्या या प्रश्नातून आपण त्यांना बाहेर काढू शकू?
एखाद्या गावाची वाट तिथं खायला काय मिळतं यावरून लवकर सापडते. कुंदा या पदार्थानं बेळगावची वाट शोधायला आपल्याला मदत केली. पण ही दुधापासून बनणारी मिठाई बेळगावमधे तयार झाली कशी याची गोष्ट मात्र मोठी गमतीदार आहे. दुष्काळाला कंटाळून बेळगावमधे आलेल्या मारवाड्यांनी चुकून या मिठाईला जन्म दिलाय. या कुंदाच्या जन्माची गोष्ट सांगणारी पूजा भडांगे यांची ही फेसबूक पोस्ट.
भारताची इटली बनण्याच्या मार्गवर असलेल्या राजस्थाननं कोरोनाविरुद्धच्या लढाईचं स्वतःचं नवं मॉडेल साकारलंय. त्या मॉडेलचं नाव आहे भिलवाडा मॉडेल. देशातलं पहिलं कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भिलवाड्यात आज सर्व २७ रूग्णांपैकी १३ जण बरे होऊन घरी परतलेत. आणि आठ दिवसांत एकही नवा पेशंट सापडला नाही. एवढंच नाही तर चार राज्यं आणि १५ जिल्ह्यांत संक्रमणही थांबवण्यात राजस्थानला यश आलंय.
राजस्थानमधील मानवी हक्क आयोगाने 'लिव इन रिलेशन' नातेसंबंधांना विरोध करण्यासाठी राज्य सरकारकडे कायद्याची मागणी केलीय. अर्थात त्यामधे आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नव्हतं. कारण मानवी नातेसंबंधांना लग्नाच्या नात्यापलीकडे पाहू शकेल अशा संस्थात्मक तरतुदी आपल्याकडे मुळातच नाहीत.
नरसी नामदेव हे एक छोटंसं गाव. हे संत नामदेवांचं जन्मगाव मानलं जातं. खरं खोटं नामदेवच जाणोत. पण तिथे त्यांचा जन्म झाला ते घरही आहे. पंजाब, राजस्थानातून भाविक येतात. सोयीसुविधांची बोंब आहे. पण इथल्या भेटीत पत्रकार, संपादक प्रशांत जाधव यांना नामदेवांचं ग्लोबल रूप दिसलं. रिंगण वार्षिकाच्या संत नामदेव विशेषांकातल्या त्यांच्या रिपोर्ताजचा हा संपादित अंश.
आज अशोक गेहलोत तिसऱ्यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री बनले. एका जादूगाराचा मुलगा ते देशातला एक आघाडीचा राजकीय मुत्सद्दी, हा त्यांचा प्रवास जबरदस्त आहे. ते मुख्यमंत्री असताना लढवलेल्या दोन्ही निवडणुकीत काँग्रेस हरली. तरीही आता ते पुन्हा मुख्यमंत्री झालेत. ही जादू एका बाजीगरचीच आहे.
आज राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. एकीकडे राजस्थानमधे दरवर्षी सरकार बदलाची परंपरा आहे. तेलंगणात दुसऱ्यांदाच विधानसभेसाठी मतदान होतंय. दोन्ही राज्यांमधे सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान आहे.