सप्टेंबर २०१८मधे सुप्रीम कोर्टाने समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. पण आता केंद्र सरकार कोर्टात सांगतंय की, समलैंगिक संबंध हा गुन्हा नसला, तरी समलैंगिक विवाह हा कायदेशीर नाही. अद्याप या प्रकरणी कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे. पण आता यामुळे विवाह म्हणजे नक्की काय? समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना विवाहाचा हक्कच नाही का? असे प्रश्न ऐरणीवर आलेत.
सप्टेंबर २०१८मधे सुप्रीम कोर्टाने समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. पण आता केंद्र सरकार कोर्टात सांगतंय की, समलैंगिक संबंध हा गुन्हा नसला, तरी समलैंगिक विवाह हा कायदेशीर नाही. अद्याप या प्रकरणी कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे. पण आता यामुळे विवाह म्हणजे नक्की काय? समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना विवाहाचा हक्कच नाही का? असे प्रश्न ऐरणीवर आलेत......
'द एलिफन्ट विस्पर्स' या डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्करमुळे सध्या देशात जल्लोष आहे. सोशल मीडियावर तर देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात डॉक्युमेंटरीच्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं. आज हत्ती आणि माणसामधला संघर्ष प्रचंड वाढतोय. माणसांच्या वस्तीत हत्ती घुसतायत आणि माणूस हत्तींना संपवतोय. हे सारं थांबेल का? आता तरी आपण हत्तीच्या हाका ऐकणार का?
'द एलिफन्ट विस्पर्स' या डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्करमुळे सध्या देशात जल्लोष आहे. सोशल मीडियावर तर देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात डॉक्युमेंटरीच्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं. आज हत्ती आणि माणसामधला संघर्ष प्रचंड वाढतोय. माणसांच्या वस्तीत हत्ती घुसतायत आणि माणूस हत्तींना संपवतोय. हे सारं थांबेल का? आता तरी आपण हत्तीच्या हाका ऐकणार का?.....
आज चिकन टिक्का ही इंग्लंडची ‘नॅशनल डिश’ म्हणून ओळखली जाते. तर मध्यपूर्वेतला मांस भरलेला सम्बुसा आणि पोर्तुगिजांचा बटाटा एकत्र होऊन, भारताचा फेवरीट समोसा बनतो. जगभर हे कायमच होत आलंय. हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की, तुर्कस्थानची किंवा मध्यपूर्वेची सिग्नेचर स्वीट डिश असलेली ‘बकलावा’ ही मिठाई, चक्क पुण्यातल्या चितळे बंधूंनी बाजारात आणलीय.
आज चिकन टिक्का ही इंग्लंडची ‘नॅशनल डिश’ म्हणून ओळखली जाते. तर मध्यपूर्वेतला मांस भरलेला सम्बुसा आणि पोर्तुगिजांचा बटाटा एकत्र होऊन, भारताचा फेवरीट समोसा बनतो. जगभर हे कायमच होत आलंय. हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की, तुर्कस्थानची किंवा मध्यपूर्वेची सिग्नेचर स्वीट डिश असलेली ‘बकलावा’ ही मिठाई, चक्क पुण्यातल्या चितळे बंधूंनी बाजारात आणलीय......
धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं.
धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं......
मुंबईचा इतिहास हा साधारणपणे पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण दिलेल्या बेटांपासून सांगितला जातो. पण, त्याआधीच्या शैव, बौद्धकालीन इतिहासाबद्दल फारशी माहिती नसल्यानं, तो फारसा सांगितला जात नाही. मुंबईच्या या प्राचीन इतिहासाची साक्ष असणारी एक शिवशंकराची बारा तोंडांची मूर्ती परळच्या बारादेवी मंदिरात आहे. पाचव्या-सहाव्या शतकातली ही मूर्ती ऐतिहासिक ठेवा म्हणून संरक्षित केलीय.
मुंबईचा इतिहास हा साधारणपणे पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण दिलेल्या बेटांपासून सांगितला जातो. पण, त्याआधीच्या शैव, बौद्धकालीन इतिहासाबद्दल फारशी माहिती नसल्यानं, तो फारसा सांगितला जात नाही. मुंबईच्या या प्राचीन इतिहासाची साक्ष असणारी एक शिवशंकराची बारा तोंडांची मूर्ती परळच्या बारादेवी मंदिरात आहे. पाचव्या-सहाव्या शतकातली ही मूर्ती ऐतिहासिक ठेवा म्हणून संरक्षित केलीय......
गोविंदाचे थर लावणारी, गणपतीच्या मिरवणुकीत नाचणारी हातिसकर वाडीतली मंडळी नव्या वर्षाचं कँलेंडर आणल्याबरोबर पहिल्यांदा माघ पौर्णिमा कधी आहे ते बघतात. कारण त्या दिवशी असतो पीर बाबरशेखचा उरुस. खरं तर या दिवशी उरुसाचा मुख्य कार्यक्रम होतो तो रत्नागिरीतल्या हातिसमधे. पण हिंदू-मुसलमान ऐक्याचा हा सोहळा याच दिवशी मुंबईतही दणक्यात साजरा होतो.
गोविंदाचे थर लावणारी, गणपतीच्या मिरवणुकीत नाचणारी हातिसकर वाडीतली मंडळी नव्या वर्षाचं कँलेंडर आणल्याबरोबर पहिल्यांदा माघ पौर्णिमा कधी आहे ते बघतात. कारण त्या दिवशी असतो पीर बाबरशेखचा उरुस. खरं तर या दिवशी उरुसाचा मुख्य कार्यक्रम होतो तो रत्नागिरीतल्या हातिसमधे. पण हिंदू-मुसलमान ऐक्याचा हा सोहळा याच दिवशी मुंबईतही दणक्यात साजरा होतो......
महात्मा गांधींजींचा जन्म गुजरातेतल्या पोरबंदरचा, तर मृत्यू राजधानी नवी दिल्लीत. त्यांचं घर म्हणावं तर ते साबरमती किंवा वर्ध्याचं सेवाग्राम. पण तरीही गांधीजींच्या आयुष्यात मुंबईला खूप मोठं महत्त्व आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक निर्णायक घटना मुंबईत घडल्या. मुंबईच्या किनाऱ्यावरून सुटाबुटात इंग्लंडला गेलेल्या मोहनदासचा, उघडाबंब महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास या शहराच्या साक्षीनं झालाय.
महात्मा गांधींजींचा जन्म गुजरातेतल्या पोरबंदरचा, तर मृत्यू राजधानी नवी दिल्लीत. त्यांचं घर म्हणावं तर ते साबरमती किंवा वर्ध्याचं सेवाग्राम. पण तरीही गांधीजींच्या आयुष्यात मुंबईला खूप मोठं महत्त्व आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक निर्णायक घटना मुंबईत घडल्या. मुंबईच्या किनाऱ्यावरून सुटाबुटात इंग्लंडला गेलेल्या मोहनदासचा, उघडाबंब महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास या शहराच्या साक्षीनं झालाय......
पहिल्या दलित आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचा जन्म मार्च १९२३ चा. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले ते एप्रिल १९२३ ला. त्यांचा पहिला खटला हा महार जातीवरच्या अन्यायाचा. म्हणजेच शांताबाईंनी बाबासाहेबांची जातीअंताची संपूर्ण लढाई, एका महार घरात आणि तेही बाई म्हणून अनुभवली. खंबीरपणे शब्दांमधे मांडली. त्यांचं २५ जानेवारीला निधन झालंय. शांताबाई समजून घेणं हे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे.
पहिल्या दलित आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचा जन्म मार्च १९२३ चा. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले ते एप्रिल १९२३ ला. त्यांचा पहिला खटला हा महार जातीवरच्या अन्यायाचा. म्हणजेच शांताबाईंनी बाबासाहेबांची जातीअंताची संपूर्ण लढाई, एका महार घरात आणि तेही बाई म्हणून अनुभवली. खंबीरपणे शब्दांमधे मांडली. त्यांचं २५ जानेवारीला निधन झालंय. शांताबाई समजून घेणं हे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे......
भारताचे 'लिओनार्दो दा विन्ची' अशी ओळख असलेले आणि भारतीय अणुऊर्जा प्रकल्पाचे संस्थापक होमी जहाँगीर भाभा यांचा आज स्मृतिदिन. होमी भाभा यांच्या नेतृत्त्वाखाली भारतातला अणुऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या आकार घेत होता. भारत-रशिया मैत्रीमुळे हे यश रशियाचं पारडं जड करेल, या भीतीनं भाभांना अमेरिकेनं मारलं, अशी चर्चा आजही कधी आडून तर कधी जाहीरपणे होत असते.
भारताचे 'लिओनार्दो दा विन्ची' अशी ओळख असलेले आणि भारतीय अणुऊर्जा प्रकल्पाचे संस्थापक होमी जहाँगीर भाभा यांचा आज स्मृतिदिन. होमी भाभा यांच्या नेतृत्त्वाखाली भारतातला अणुऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या आकार घेत होता. भारत-रशिया मैत्रीमुळे हे यश रशियाचं पारडं जड करेल, या भीतीनं भाभांना अमेरिकेनं मारलं, अशी चर्चा आजही कधी आडून तर कधी जाहीरपणे होत असते......
जोशीमठला पडलेले तडे पाहून, सगळ्यांना पर्यावरण आठवू लागलंय. सोशल मीडियापासून संसदेपर्यंत निसर्ग, पर्यावरण वगैरे शब्द ऐकू येतायत. पण, गेली कित्येक वर्ष पर्यावरणवादी चळवळी हेच उर फोडून सांगत आहेत. तेव्हा त्यांना विकासविरोधी ठरवून त्यांना जंगलात पाठवण्याची भाषा केली गेली. किमान आता तरी हा आसुरी विकास आपलं आयुष्य भकास करण्याआधी या चळवळी समजून घ्यायला हव्यात.
जोशीमठला पडलेले तडे पाहून, सगळ्यांना पर्यावरण आठवू लागलंय. सोशल मीडियापासून संसदेपर्यंत निसर्ग, पर्यावरण वगैरे शब्द ऐकू येतायत. पण, गेली कित्येक वर्ष पर्यावरणवादी चळवळी हेच उर फोडून सांगत आहेत. तेव्हा त्यांना विकासविरोधी ठरवून त्यांना जंगलात पाठवण्याची भाषा केली गेली. किमान आता तरी हा आसुरी विकास आपलं आयुष्य भकास करण्याआधी या चळवळी समजून घ्यायला हव्यात......
जवळपास गेली चार वर्षं माणसाला कोंडून ठेवणारी कोरोनाची साथ आता अखेरच्या टप्प्यात आलीय, असं शास्त्रज्ञ सांगतायत. ही खरंच दिलासा देणारी गोष्ट आहे. पण, विषाणू आणि माणूस यांच्यातला हा संघर्ष यापुढेही महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळेच प्राण्यांकडून माणसांकडं होणारं संक्रमण अर्थात 'झुनॉसिस' हा आज जागतिक आरोग्यासमोरचा सर्वात महत्त्वाचा आणि वाढत चाललेला धोका आहे.
जवळपास गेली चार वर्षं माणसाला कोंडून ठेवणारी कोरोनाची साथ आता अखेरच्या टप्प्यात आलीय, असं शास्त्रज्ञ सांगतायत. ही खरंच दिलासा देणारी गोष्ट आहे. पण, विषाणू आणि माणूस यांच्यातला हा संघर्ष यापुढेही महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळेच प्राण्यांकडून माणसांकडं होणारं संक्रमण अर्थात 'झुनॉसिस' हा आज जागतिक आरोग्यासमोरचा सर्वात महत्त्वाचा आणि वाढत चाललेला धोका आहे......
भारत-पाक युद्धावर १९९७ मधे आलेला 'बॉर्डर' हा सिनेमा तुफान गाजला होता. राजस्थानच्या थार वाळवंटातल्या लोंगेवाला इथं झालेल्या या घनघोर लढाईत भारताच्या छोट्या तुकडीनं पाकिस्तानच्या रणगाड्यांच्या बटालियनला धूळ चारली होती. सिनेमातली ही लढाई प्रत्यक्षात लढलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या नाईक भैरोसिंग राठोड यांचं नुकतंच निधन झालंय.
भारत-पाक युद्धावर १९९७ मधे आलेला 'बॉर्डर' हा सिनेमा तुफान गाजला होता. राजस्थानच्या थार वाळवंटातल्या लोंगेवाला इथं झालेल्या या घनघोर लढाईत भारताच्या छोट्या तुकडीनं पाकिस्तानच्या रणगाड्यांच्या बटालियनला धूळ चारली होती. सिनेमातली ही लढाई प्रत्यक्षात लढलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या नाईक भैरोसिंग राठोड यांचं नुकतंच निधन झालंय......
आज मुंबईतल्या इमारती आकाशाला भिडल्या असल्या तरी ही मुंबई घडली ती चाळीतल्या माणसांच्या घामावरच. गिरगावामधल्या फणसवाडीच्या चाळीत राहणारी बबन अशीच गणपतीच्या कार्यक्रमात, त्यावेळी होणाऱ्या मेळ्यामधे गाणं म्हणायची. जेमतेम चौथीपर्यंत शिकलेल्या तिनं पोटासाठी गाणं म्हणायला सुरवात केली आणि ती पुढे प्रसिद्ध लावणीगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण बनली.
आज मुंबईतल्या इमारती आकाशाला भिडल्या असल्या तरी ही मुंबई घडली ती चाळीतल्या माणसांच्या घामावरच. गिरगावामधल्या फणसवाडीच्या चाळीत राहणारी बबन अशीच गणपतीच्या कार्यक्रमात, त्यावेळी होणाऱ्या मेळ्यामधे गाणं म्हणायची. जेमतेम चौथीपर्यंत शिकलेल्या तिनं पोटासाठी गाणं म्हणायला सुरवात केली आणि ती पुढे प्रसिद्ध लावणीगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण बनली......
मी फ्रान्समधे जन्मलो. पण मी मेल्यानंतर माझ्या कबरीवर माझा जन्म, मृत्यू लिहिल्यानंतर, मी कोलकत्त्याचा 'सिटीझन ऑफ ऑनर' आहे हे मात्र नक्की लिहा, असं सांगणारा फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपिएर यांचं फ्रान्समधे निधन झालंय. भारताची स्वातंत्र्यकथा, कोलकात्यातल्या रिक्षावाल्याचं आयुष्य आणि भोपाळ गॅस दुर्घटनेची वेदना शब्दात मांडणारा हा लेखक मनानं सच्चा भारतीय होता.
मी फ्रान्समधे जन्मलो. पण मी मेल्यानंतर माझ्या कबरीवर माझा जन्म, मृत्यू लिहिल्यानंतर, मी कोलकत्त्याचा 'सिटीझन ऑफ ऑनर' आहे हे मात्र नक्की लिहा, असं सांगणारा फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपिएर यांचं फ्रान्समधे निधन झालंय. भारताची स्वातंत्र्यकथा, कोलकात्यातल्या रिक्षावाल्याचं आयुष्य आणि भोपाळ गॅस दुर्घटनेची वेदना शब्दात मांडणारा हा लेखक मनानं सच्चा भारतीय होता......
कोकणातून नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडलेला चाकरमानी तेव्हा बोटीने मुंबईत यायचा किंवा कराचीला जायचा. तेव्हा पाकिस्तान नव्हताच. कराचीत मराठी वस्ती होती, मराठी शाळा होत्या, मराठी बोलणारी दुकानं होती. याच कराचीत बाबासाहेबांचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं गेलं, तेही त्यांच्या हयातीत. तानाजी बाळाजी खरावतेकर यांचं हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्वाचं आहे.
कोकणातून नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडलेला चाकरमानी तेव्हा बोटीने मुंबईत यायचा किंवा कराचीला जायचा. तेव्हा पाकिस्तान नव्हताच. कराचीत मराठी वस्ती होती, मराठी शाळा होत्या, मराठी बोलणारी दुकानं होती. याच कराचीत बाबासाहेबांचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं गेलं, तेही त्यांच्या हयातीत. तानाजी बाळाजी खरावतेकर यांचं हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्वाचं आहे......
देशभर थंडी पडलीय. गरमागरम चहाकॉफी किंवा सूप प्यायचे दिवस असताना, अचानक थंडगार रसनाची आठवण कशाला आली, असा प्रश्न कुणालाही पडू शकेल. पण रसना आज आठवण्याचं कारण, म्हणजे 'रसना'चे मालक अरीज फिरोजशॉ खंबाटा यांचं निधन झालंय. आपल्या आयुष्यातले अनेक उन्हाळे थंड करत 'आय लव यू रसना' म्हणायला शिकवणाऱ्या, या माणसाला 'थँक यू रसना' म्हणायला हवं.
देशभर थंडी पडलीय. गरमागरम चहाकॉफी किंवा सूप प्यायचे दिवस असताना, अचानक थंडगार रसनाची आठवण कशाला आली, असा प्रश्न कुणालाही पडू शकेल. पण रसना आज आठवण्याचं कारण, म्हणजे 'रसना'चे मालक अरीज फिरोजशॉ खंबाटा यांचं निधन झालंय. आपल्या आयुष्यातले अनेक उन्हाळे थंड करत 'आय लव यू रसना' म्हणायला शिकवणाऱ्या, या माणसाला 'थँक यू रसना' म्हणायला हवं......
लंडनच्या संसदेच्या दुरुस्तीसाठी वापरलेलं सागवानी लाकूड इंग्रजांनी मेळघाटमधून नेलं होतं, असं सांगतात. ते लाकूड वाहून नेणारी शंकुतला एक्स्प्रेस गेली चार वर्षं बंद पडलीय. विदर्भाचा 'गरीबरथ' असलेली ही नॅरोगेज रेल्वे अनेक अर्थानं 'ऐतिहासिक' आहे. ती ब्रॉडगेज करून, पुन्हा सुरू करणार, असं नवं आश्वासन मिळालंय. पण ते आश्वासन म्हणजे विदर्भवासियांची फसवणूक ठरू नये.
लंडनच्या संसदेच्या दुरुस्तीसाठी वापरलेलं सागवानी लाकूड इंग्रजांनी मेळघाटमधून नेलं होतं, असं सांगतात. ते लाकूड वाहून नेणारी शंकुतला एक्स्प्रेस गेली चार वर्षं बंद पडलीय. विदर्भाचा 'गरीबरथ' असलेली ही नॅरोगेज रेल्वे अनेक अर्थानं 'ऐतिहासिक' आहे. ती ब्रॉडगेज करून, पुन्हा सुरू करणार, असं नवं आश्वासन मिळालंय. पण ते आश्वासन म्हणजे विदर्भवासियांची फसवणूक ठरू नये......
एकानं सुरू केलं की ते बघून दुसरा करतो, हा माणसाचा स्वभाव आहे. गावागावातही तसंच होतं. दोन महिन्यांपूर्वी सांगलीतल्या एका ग्रामपंचायतीनं संध्याकाळी गावातले सर्व टीवी-मोबाईल बंद करण्याचा निर्णय घेतला. आता यवतमाळमधेही त्याचं अनुकरण झालंय. सगळ्या गावानं टीवी-मोबाईल बंद करणं, याकडं 'डिग्लोबलायझेशन'च्या दृष्टिनं पाहता येईल. पण ते नेमकं कसं?
एकानं सुरू केलं की ते बघून दुसरा करतो, हा माणसाचा स्वभाव आहे. गावागावातही तसंच होतं. दोन महिन्यांपूर्वी सांगलीतल्या एका ग्रामपंचायतीनं संध्याकाळी गावातले सर्व टीवी-मोबाईल बंद करण्याचा निर्णय घेतला. आता यवतमाळमधेही त्याचं अनुकरण झालंय. सगळ्या गावानं टीवी-मोबाईल बंद करणं, याकडं 'डिग्लोबलायझेशन'च्या दृष्टिनं पाहता येईल. पण ते नेमकं कसं?.....
खाण्यापासून वाणसामानापर्यंत आणि कपड्यापासून मोबाईलपर्यंत सारं आता ऑनलाइन ऑर्डर केलं जातं. ते आपल्या दारापर्यंत आणणाऱ्या डिलिवरी बॉयला अनेकदा लिफ्ट, पार्किंग वापरता येत नाही, एवढंच काय तर साधं पाणीही बहुतेकजण विचारत नाहीत. पोटापाण्याच्या मजबुरीनं, इन्सेंटिव आणि रेटिंगसाठी उन्हातान्हात फिरण्याच्या या नव्या रोजगाराचं वास्तव सांगणारा ‘झ्विगॅटो’ हा सिनेमा येतोय.
खाण्यापासून वाणसामानापर्यंत आणि कपड्यापासून मोबाईलपर्यंत सारं आता ऑनलाइन ऑर्डर केलं जातं. ते आपल्या दारापर्यंत आणणाऱ्या डिलिवरी बॉयला अनेकदा लिफ्ट, पार्किंग वापरता येत नाही, एवढंच काय तर साधं पाणीही बहुतेकजण विचारत नाहीत. पोटापाण्याच्या मजबुरीनं, इन्सेंटिव आणि रेटिंगसाठी उन्हातान्हात फिरण्याच्या या नव्या रोजगाराचं वास्तव सांगणारा ‘झ्विगॅटो’ हा सिनेमा येतोय......
काही परिषदा 'नाव मोठं आणि लक्षण खोटं' म्हणाव्या अशा असतात. कॉप-२७ ही अशीच परिषद आहे का? अशी शंका येऊ लागलीय. पर्यावरणाच्या प्रश्नावर गेली २७ वर्ष चर्चा करणारी ही परिषद भरवण्यासाठी जेवढं कार्बन उत्सर्जन होतं, तेवढं वाचलं तरी पृथ्वीचं भलं होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होतायत. त्यामुळे चर्चेचा हा दिखाऊपणा थांबवून, कृतीचा हिशेब मांडायला हवा.
काही परिषदा 'नाव मोठं आणि लक्षण खोटं' म्हणाव्या अशा असतात. कॉप-२७ ही अशीच परिषद आहे का? अशी शंका येऊ लागलीय. पर्यावरणाच्या प्रश्नावर गेली २७ वर्ष चर्चा करणारी ही परिषद भरवण्यासाठी जेवढं कार्बन उत्सर्जन होतं, तेवढं वाचलं तरी पृथ्वीचं भलं होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होतायत. त्यामुळे चर्चेचा हा दिखाऊपणा थांबवून, कृतीचा हिशेब मांडायला हवा......
दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणीसह सीमावर्ती भागाला संयुक्त महाराष्ट्रातून वगळगल्याबद्दल निषेध व्यक्त करणारा हा दिवस आहे. महाराष्ट्राला आता सीमाभागाबद्दल फारसं काही वाटत नाही, अशी भावना सीमावासीयांची बनत चाललीय. त्यामुळे आता महाराष्ट्रावर विश्वास का ठेवावा, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतोय.
दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणीसह सीमावर्ती भागाला संयुक्त महाराष्ट्रातून वगळगल्याबद्दल निषेध व्यक्त करणारा हा दिवस आहे. महाराष्ट्राला आता सीमाभागाबद्दल फारसं काही वाटत नाही, अशी भावना सीमावासीयांची बनत चाललीय. त्यामुळे आता महाराष्ट्रावर विश्वास का ठेवावा, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतोय......
वर्षानुवर्षं सुका दुष्काळ सोसणाऱ्या मराठवाड्याला यंदा ओल्या दुष्काळानं झोडपलंय. शेतकरी हवालदिल झालाय. आंदोलनं, मोर्चे, उपोषणं सारं करून झालं, तरी सरकारचे डोळे उघडत नाहीत. त्यामुळे अखेर हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधल्या गारखेडा गावातल्या गावकऱ्यांनी आता गुराढोरांसह त्यांचं अख्खं गाव विकायला काढलंय. यामागची हतबलता आंदोलनापलीकडं जाऊन पाहायला हवी.
वर्षानुवर्षं सुका दुष्काळ सोसणाऱ्या मराठवाड्याला यंदा ओल्या दुष्काळानं झोडपलंय. शेतकरी हवालदिल झालाय. आंदोलनं, मोर्चे, उपोषणं सारं करून झालं, तरी सरकारचे डोळे उघडत नाहीत. त्यामुळे अखेर हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधल्या गारखेडा गावातल्या गावकऱ्यांनी आता गुराढोरांसह त्यांचं अख्खं गाव विकायला काढलंय. यामागची हतबलता आंदोलनापलीकडं जाऊन पाहायला हवी......
बीटीएस या कोरियन बँडची तुफान क्रेझ शाळा-कॉलेजच्या पोरांपासून स्वतःला तरुण म्हणवून घेणाऱ्या सर्वांमधे दिसतेय. त्यांनी लाइव कन्सर्टसाठी भारतात यावं म्हणून फिल्डिंग लावली जातेय. या बँडच्या यशामागची कहाणी भन्नाट मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळेच संगीताच्या पलीकडे जाऊन हा बँड खूप काही सांगू पाहतोय.
बीटीएस या कोरियन बँडची तुफान क्रेझ शाळा-कॉलेजच्या पोरांपासून स्वतःला तरुण म्हणवून घेणाऱ्या सर्वांमधे दिसतेय. त्यांनी लाइव कन्सर्टसाठी भारतात यावं म्हणून फिल्डिंग लावली जातेय. या बँडच्या यशामागची कहाणी भन्नाट मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळेच संगीताच्या पलीकडे जाऊन हा बँड खूप काही सांगू पाहतोय......
कोरोनानं व्यापलेल्या गेल्या तीन वर्षात देशभरातल्या आत्महत्या वाढल्यात, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून स्पष्ट झालंय. त्यातही सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमधले आकडेही मोठे आहेत. एवढ्या लोकांना जगण्यापेक्षा मरणं का सोपं वाटतंय, हे वेळेतच समजून घ्यायला हवं.
कोरोनानं व्यापलेल्या गेल्या तीन वर्षात देशभरातल्या आत्महत्या वाढल्यात, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून स्पष्ट झालंय. त्यातही सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमधले आकडेही मोठे आहेत. एवढ्या लोकांना जगण्यापेक्षा मरणं का सोपं वाटतंय, हे वेळेतच समजून घ्यायला हवं......
औषध नसलेला आजार अशी ओळख असलेल्या अल्झायमर म्हणजेच स्मृतिभ्रंशावर औषध सापडल्याचा दावा केला गेलाय. कोरोनानंतर या आजाराचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. जगभरात आज या आजाराचे ५ कोटी पेशंट असून, भारतात दरहजारी चार जणांना हा आजार आहे. येत्या दहा वर्षात याचं प्रमाण दुप्पट होईल, अशी भीतीही व्यक्त होतेय. त्यामुळे यावरचं औषध वैद्यक क्षेत्रातलं महत्वाचं पाऊल समजलं जातंय.
औषध नसलेला आजार अशी ओळख असलेल्या अल्झायमर म्हणजेच स्मृतिभ्रंशावर औषध सापडल्याचा दावा केला गेलाय. कोरोनानंतर या आजाराचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. जगभरात आज या आजाराचे ५ कोटी पेशंट असून, भारतात दरहजारी चार जणांना हा आजार आहे. येत्या दहा वर्षात याचं प्रमाण दुप्पट होईल, अशी भीतीही व्यक्त होतेय. त्यामुळे यावरचं औषध वैद्यक क्षेत्रातलं महत्वाचं पाऊल समजलं जातंय......
‘दादर, मुंबई २८’ हा पत्ता आज मुंबईचं स्टेटस सिम्बॉल आहे. या पत्त्यातल्या २८ आकड्यामधली आणखी एक गंमत म्हणजे २८ एकरावर पसरलेलं दादरचं शिवाजी पार्क. शिवाजी पार्कवर दसऱ्याची सभा घ्यायला नेमक्या कोणत्या शिवसेनेला परवानगी मिळणार, हा वाद नुकताच मिटलाय. मुळात शिवसेनेचं मैदान अशी ओळख असणारं शिवाजी पार्क मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सांस्कृतिक इतिहासाची पाऊलखूण आहे.
‘दादर, मुंबई २८’ हा पत्ता आज मुंबईचं स्टेटस सिम्बॉल आहे. या पत्त्यातल्या २८ आकड्यामधली आणखी एक गंमत म्हणजे २८ एकरावर पसरलेलं दादरचं शिवाजी पार्क. शिवाजी पार्कवर दसऱ्याची सभा घ्यायला नेमक्या कोणत्या शिवसेनेला परवानगी मिळणार, हा वाद नुकताच मिटलाय. मुळात शिवसेनेचं मैदान अशी ओळख असणारं शिवाजी पार्क मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सांस्कृतिक इतिहासाची पाऊलखूण आहे......
संत नामदेवांच्या नावावर अनेक चमत्कार नोंदवले गेलेत. पंजाबमधल्या समाधीमंदिराच्या घुमटाच्या आतल्या बाजूवर त्यांच्या आयुष्यातले प्रसंग चितारण्यात आलेत. त्यात या सगळ्या प्रसंगांचा समावेश आहे. खरंच नामदेवांनी असे कोणते चमत्कार घडवून आणले का वादाचा मुद्दा आहे. इतकंच नाही तर त्यांची समाधी, आणि पुण्यतिथीचं नेमकं साल कोणतं याबद्दलही मतमतांतरं आहेत.
संत नामदेवांच्या नावावर अनेक चमत्कार नोंदवले गेलेत. पंजाबमधल्या समाधीमंदिराच्या घुमटाच्या आतल्या बाजूवर त्यांच्या आयुष्यातले प्रसंग चितारण्यात आलेत. त्यात या सगळ्या प्रसंगांचा समावेश आहे. खरंच नामदेवांनी असे कोणते चमत्कार घडवून आणले का वादाचा मुद्दा आहे. इतकंच नाही तर त्यांची समाधी, आणि पुण्यतिथीचं नेमकं साल कोणतं याबद्दलही मतमतांतरं आहेत......
संत शिरोमणी नामदेव महाराजांची आज पुण्यतिथी. आज महाराष्ट्रभर पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. पण महाराष्ट्र आणि पंजाबमधे नामदेव महाराजांची पुण्यतिथी वेगवेगळ्या तिथीला साजरी होते. यावरून पंजाब आणि महाराष्ट्रातल्या अभ्यासकांमधे मतभेद आहेत. या सगळ्या वादाचा वेध घेणारा हा रिपोर्ताज.
संत शिरोमणी नामदेव महाराजांची आज पुण्यतिथी. आज महाराष्ट्रभर पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. पण महाराष्ट्र आणि पंजाबमधे नामदेव महाराजांची पुण्यतिथी वेगवेगळ्या तिथीला साजरी होते. यावरून पंजाब आणि महाराष्ट्रातल्या अभ्यासकांमधे मतभेद आहेत. या सगळ्या वादाचा वेध घेणारा हा रिपोर्ताज......
न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवरच्या थिएटरमधे नाटक सादर होणं, हा नाटककाराचा फार मोठा सन्मान मानला जातो. तळकोकणातल्या बांद्याजवळच्या सरमळे या एका छोट्या खेड्यातल्या अनिल सरमळकर या नाटककाराचं `द फॉक्स` नावाचं नाटक ब्रॉडवेवर सादर होण्याच्या तयारीत आहे. सरमळे ते न्यूयॉर्क हा प्रचंड खाचखळ्यांचा प्रवास मांडतोय, स्वतः नाटककार अनिल सरमळकर.
न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवरच्या थिएटरमधे नाटक सादर होणं, हा नाटककाराचा फार मोठा सन्मान मानला जातो. तळकोकणातल्या बांद्याजवळच्या सरमळे या एका छोट्या खेड्यातल्या अनिल सरमळकर या नाटककाराचं `द फॉक्स` नावाचं नाटक ब्रॉडवेवर सादर होण्याच्या तयारीत आहे. सरमळे ते न्यूयॉर्क हा प्रचंड खाचखळ्यांचा प्रवास मांडतोय, स्वतः नाटककार अनिल सरमळकर......
गाडगेबाबा नावाच्या फकिराला गावोगाव फिरण्यासाठी त्यावेळच्या मुंबई सरकारने गाडी दिली होती. बाबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत ती गाडी ज्यांनी चालविली ते भाऊराव काळे गाडगेबाबांसोबत अहोरात्र असत. बाबांच्याच धर्मशाळेत वाढलेले, बाबांनी ज्यांना ड्रायविंग शिकायला पाठवलं, ज्यांचं लग्नही बाबांनीच लावून दिलं, त्या भाऊरावांना भेटणं म्हणजे प्रत्यक्ष गाडगेबाबा कसं बोलत, कसं वागत हे अनुभवणं आहे. त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा.
गाडगेबाबा नावाच्या फकिराला गावोगाव फिरण्यासाठी त्यावेळच्या मुंबई सरकारने गाडी दिली होती. बाबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत ती गाडी ज्यांनी चालविली ते भाऊराव काळे गाडगेबाबांसोबत अहोरात्र असत. बाबांच्याच धर्मशाळेत वाढलेले, बाबांनी ज्यांना ड्रायविंग शिकायला पाठवलं, ज्यांचं लग्नही बाबांनीच लावून दिलं, त्या भाऊरावांना भेटणं म्हणजे प्रत्यक्ष गाडगेबाबा कसं बोलत, कसं वागत हे अनुभवणं आहे. त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा......
गाडगेबाबा नावाच्या फकिराला गावोगाव फिरण्यासाठी त्यावेळच्या मुंबई सरकारने गाडी दिली होती. बाबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत ती गाडी ज्यांनी चालविली ते भाऊराव काळे गाडगेबाबांसोबत अहोरात्र असत. बाबांच्याच धर्मशाळेत वाढलेले, बाबांनी ज्यांना ड्रायविंग शिकायला पाठवलं, ज्यांचं लग्नही बाबांनीच लावून दिलं, त्या भाऊरावांना भेटणं म्हणजे प्रत्यक्ष गाडगेबाबा कसं बोलत, कसं वागत हे अनुभवणं आहे. त्यांचीशी केलेली ही बातचीत दोन भागात.
गाडगेबाबा नावाच्या फकिराला गावोगाव फिरण्यासाठी त्यावेळच्या मुंबई सरकारने गाडी दिली होती. बाबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत ती गाडी ज्यांनी चालविली ते भाऊराव काळे गाडगेबाबांसोबत अहोरात्र असत. बाबांच्याच धर्मशाळेत वाढलेले, बाबांनी ज्यांना ड्रायविंग शिकायला पाठवलं, ज्यांचं लग्नही बाबांनीच लावून दिलं, त्या भाऊरावांना भेटणं म्हणजे प्रत्यक्ष गाडगेबाबा कसं बोलत, कसं वागत हे अनुभवणं आहे. त्यांचीशी केलेली ही बातचीत दोन भागात......