'टीडीएम' हा मराठी सिनेमा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. ग्रामीण महाराष्ट्रातल्या जिगरबाज तरुणाची कथा सांगणारा हा सिनेमा सिनेव्यवसायातल्या अर्थकारण आणि राजकारणापुढे सपशेल फेल ठरला. त्यामुळे 'आम्हाला शो द्या' असं म्हणत 'टीडीएम'चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे भर थियेटरमधे ढसाढसा रडताना दिसले. मराठी सिनेमांना महाराष्ट्रातच शो मिळत नसल्याचं यामुळे पुन्हा दिसू लागलंय.
'टीडीएम' हा मराठी सिनेमा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. ग्रामीण महाराष्ट्रातल्या जिगरबाज तरुणाची कथा सांगणारा हा सिनेमा सिनेव्यवसायातल्या अर्थकारण आणि राजकारणापुढे सपशेल फेल ठरला. त्यामुळे 'आम्हाला शो द्या' असं म्हणत 'टीडीएम'चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे भर थियेटरमधे ढसाढसा रडताना दिसले. मराठी सिनेमांना महाराष्ट्रातच शो मिळत नसल्याचं यामुळे पुन्हा दिसू लागलंय......
'स्कूल कॉलेज आणि लाईफ' हा मराठी सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झाला. रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद लाभतोय. दुसरीकडे काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'रौंदळ' आणि 'घर बंदूक बिर्याणी'ला मात्र प्रेक्षकांची अजूनही गर्दी होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर बॉलीवूडला मराठी प्रेक्षकांची नस ओळखण्यात आलेलं अपयश पुन्हा एकदा ठळक झालंय.
'स्कूल कॉलेज आणि लाईफ' हा मराठी सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झाला. रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद लाभतोय. दुसरीकडे काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'रौंदळ' आणि 'घर बंदूक बिर्याणी'ला मात्र प्रेक्षकांची अजूनही गर्दी होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर बॉलीवूडला मराठी प्रेक्षकांची नस ओळखण्यात आलेलं अपयश पुन्हा एकदा ठळक झालंय......
मराठी सिनेमात अनेक प्रयोग होतायत. त्यातले काही लोकांना आवडतायत, तर काही सपशेल फेल गेलेत. या सगळ्या सिनेमांच्या रांगेत ‘तेंडल्या’ हा सिनेमा गोष्ट कशी सांगावी याचा आदर्श वस्तुपाठ घालून देतोय. त्यात माणसं जशी आहेत तशी भेटतात. ‘तेंडल्या’मधे भेटतो तो क्रिकेटच्या प्रभावाचा गावगाडा. मराठी सिनेमातील ‘स्टोरी’ची गोष्ट आणि ‘तेंडल्या’चं वेगळेपण समजून घ्यायला हवं.
मराठी सिनेमात अनेक प्रयोग होतायत. त्यातले काही लोकांना आवडतायत, तर काही सपशेल फेल गेलेत. या सगळ्या सिनेमांच्या रांगेत ‘तेंडल्या’ हा सिनेमा गोष्ट कशी सांगावी याचा आदर्श वस्तुपाठ घालून देतोय. त्यात माणसं जशी आहेत तशी भेटतात. ‘तेंडल्या’मधे भेटतो तो क्रिकेटच्या प्रभावाचा गावगाडा. मराठी सिनेमातील ‘स्टोरी’ची गोष्ट आणि ‘तेंडल्या’चं वेगळेपण समजून घ्यायला हवं......
‘आरआरआर’ हा २०२२च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांपैकी एक सिनेमा. याच सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या लोकप्रिय तेलुगू गाण्याने नुकतंच सिनेसृष्टीतल्या मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. ऑस्कर मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय. या गाण्याच्या निमिताने दक्षिण भारतातल्या आजवरच्या सिनेसंगीत आणि सिनेगीतांचा मुद्दा चर्चेत आलाय.
‘आरआरआर’ हा २०२२च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांपैकी एक सिनेमा. याच सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या लोकप्रिय तेलुगू गाण्याने नुकतंच सिनेसृष्टीतल्या मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. ऑस्कर मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय. या गाण्याच्या निमिताने दक्षिण भारतातल्या आजवरच्या सिनेसंगीत आणि सिनेगीतांचा मुद्दा चर्चेत आलाय......
साखर कारखान्यामागचं राजकारण सांगणारा गजानन पडोळ दिग्दर्शित ‘रौंदळ’ हा मराठी सिनेमा थियेटरमधे स्क्रीन मिळवण्यासाठी धडपडतोय. राजकारणाचा आणि समाजजीवनाचा संबंध जवळून दाखवणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत आता ‘रौंदळ’चीही भर पडलीय. मराठी सिनेमांमधे असलेली ही सामाजिक-राजकीय घटकांबद्दलची जाणीव ‘रौंदळ’च्या निमित्ताने आणखी ठळक होऊ पाहतेय.
साखर कारखान्यामागचं राजकारण सांगणारा गजानन पडोळ दिग्दर्शित ‘रौंदळ’ हा मराठी सिनेमा थियेटरमधे स्क्रीन मिळवण्यासाठी धडपडतोय. राजकारणाचा आणि समाजजीवनाचा संबंध जवळून दाखवणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत आता ‘रौंदळ’चीही भर पडलीय. मराठी सिनेमांमधे असलेली ही सामाजिक-राजकीय घटकांबद्दलची जाणीव ‘रौंदळ’च्या निमित्ताने आणखी ठळक होऊ पाहतेय......
भारतीय सिनेसृष्टीत नायिकाप्रधान सिनेमांची कमतरता नाही. सध्याचा महिलावर्ग अबला नसून सबला आहे हे या सिनेमांच्या माध्यमातून ठामपणे ठसवलं जातंय. नायकासोबतचं स्त्रीपात्र म्हणजेच नायिका ही संकुचित व्याख्या आता बदलत चाललीय. या महिला दिनाच्या निमित्ताने, नायिका असण्याची ही नवी सिनेमॅटीक व्याख्या आपण समजून घ्यायलाच हवी.
भारतीय सिनेसृष्टीत नायिकाप्रधान सिनेमांची कमतरता नाही. सध्याचा महिलावर्ग अबला नसून सबला आहे हे या सिनेमांच्या माध्यमातून ठामपणे ठसवलं जातंय. नायकासोबतचं स्त्रीपात्र म्हणजेच नायिका ही संकुचित व्याख्या आता बदलत चाललीय. या महिला दिनाच्या निमित्ताने, नायिका असण्याची ही नवी सिनेमॅटीक व्याख्या आपण समजून घ्यायलाच हवी......
गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे.
गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे......
अकादमी म्हणजेच ऑस्कर हा सिनेक्षेत्रातला मानाचा पुरस्कार. यावर्षी मार्च महिन्यात ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतोय. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नामांकित कलाकृतींची यादी नुकतीच जाहीर झालीय. ‘आरआरआर’ या तेलुगू सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीच्या पुरस्काराचं नामांकन मिळवलंय. असं नामांकन मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय.
अकादमी म्हणजेच ऑस्कर हा सिनेक्षेत्रातला मानाचा पुरस्कार. यावर्षी मार्च महिन्यात ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतोय. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नामांकित कलाकृतींची यादी नुकतीच जाहीर झालीय. ‘आरआरआर’ या तेलुगू सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीच्या पुरस्काराचं नामांकन मिळवलंय. असं नामांकन मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय......
पाकिस्तानचा ‘शोले’ अशी ओळख असलेला ‘मौला जाट’ हा सिनेमा येऊन तेहतीस वर्षांचा काळ लोटलाय. मध्यंतरी पाकिस्तानच्या सिनेजगतावर बराच काळ ‘मौला जाट’ आणि त्याच्या धारदार ‘गंडासा’चा प्रभाव होता. गेल्या काही वर्षांत गंडासाची बोथट झालेली धार आता ‘द लिजंड ऑफ मौला जाट’च्या निमित्ताने पुन्हा एकदा तळपू लागलीय.
पाकिस्तानचा ‘शोले’ अशी ओळख असलेला ‘मौला जाट’ हा सिनेमा येऊन तेहतीस वर्षांचा काळ लोटलाय. मध्यंतरी पाकिस्तानच्या सिनेजगतावर बराच काळ ‘मौला जाट’ आणि त्याच्या धारदार ‘गंडासा’चा प्रभाव होता. गेल्या काही वर्षांत गंडासाची बोथट झालेली धार आता ‘द लिजंड ऑफ मौला जाट’च्या निमित्ताने पुन्हा एकदा तळपू लागलीय......
पा. रंजितचा ‘नक्षत्रम नगरगिरदू’ हा तमिळ सिनेमा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झाला. २०१८च्या ‘काला’नंतर थियेटरमधे प्रदर्शित होणारा रंजितचा हा पहिलाच सिनेमा होता. आजवरच्या प्रत्येक सिनेमात आपल्या आशयाचा आणि कलेचा दर्जा उंचावत नेणाऱ्या रंजितने याही सिनेमात तेच केलं. पण या सिनेमाला तिकीटबारीवर मात्र फारशी कमाल दाखवता आली नाही.
पा. रंजितचा ‘नक्षत्रम नगरगिरदू’ हा तमिळ सिनेमा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झाला. २०१८च्या ‘काला’नंतर थियेटरमधे प्रदर्शित होणारा रंजितचा हा पहिलाच सिनेमा होता. आजवरच्या प्रत्येक सिनेमात आपल्या आशयाचा आणि कलेचा दर्जा उंचावत नेणाऱ्या रंजितने याही सिनेमात तेच केलं. पण या सिनेमाला तिकीटबारीवर मात्र फारशी कमाल दाखवता आली नाही......
गेल्या रविवारी, भोजपुरी सिनेसृष्टीतला सुपरस्टार निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादव हा उत्तरप्रदेशच्या आझमगढ मतदारसंघांतून खासदार म्हणून निवडून आला. याआधीही रवी किशन आणि मनोज तिवारी या भोजपुरी सुपरस्टार्सनी खासदारकी मिळवलीय. आता नव्याने खासदार झालेल्या निरहुआच्या निमित्ताने भोजपुरी सिनेवर्तुळात राजकीय गप्पागोष्टींना उधाण आलंय.
गेल्या रविवारी, भोजपुरी सिनेसृष्टीतला सुपरस्टार निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादव हा उत्तरप्रदेशच्या आझमगढ मतदारसंघांतून खासदार म्हणून निवडून आला. याआधीही रवी किशन आणि मनोज तिवारी या भोजपुरी सुपरस्टार्सनी खासदारकी मिळवलीय. आता नव्याने खासदार झालेल्या निरहुआच्या निमित्ताने भोजपुरी सिनेवर्तुळात राजकीय गप्पागोष्टींना उधाण आलंय......
कमल हासन अभिनित आणि लोकेश कनकराज दिग्दर्शित ‘विक्रम’ हा तमिळ सिनेमा देशभरातल्या थियेटरमधे जोमाने गर्दी खेचून आणतोय. दिग्दर्शक लोकेश हा खरं तर कमल हासनचा डाय-हार्ड फॅन! आपला आदर्श असलेल्या सिनेनायकाला किंवा नायिकेला घेऊन सिनेमा बनवणारे दिग्दर्शक सिनेजगताला काही नवीन नाहीत. अशाच काही फॅनबॉय दिग्दर्शकांनी गेल्या काही वर्षात तमिळ सिनेमाला वेगळीच दिशा मिळवून दिलीय.
कमल हासन अभिनित आणि लोकेश कनकराज दिग्दर्शित ‘विक्रम’ हा तमिळ सिनेमा देशभरातल्या थियेटरमधे जोमाने गर्दी खेचून आणतोय. दिग्दर्शक लोकेश हा खरं तर कमल हासनचा डाय-हार्ड फॅन! आपला आदर्श असलेल्या सिनेनायकाला किंवा नायिकेला घेऊन सिनेमा बनवणारे दिग्दर्शक सिनेजगताला काही नवीन नाहीत. अशाच काही फॅनबॉय दिग्दर्शकांनी गेल्या काही वर्षात तमिळ सिनेमाला वेगळीच दिशा मिळवून दिलीय......
आज अभिनेता मनोज वाजपेयीचा वाढदिवस. ‘सत्या’ सिनेमा नंतर मनोज सर्वात जास्त कशात आवडला असेल तर तो २०१२ला आलेल्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ मधे. अनुरागच्या या फिल्ममधे तो टक्कल करून ‘सरदार खान’ बनून आला. या फिल्मने एक नवा माईलस्टोन सेट करत सबकी कह के ली.
आज अभिनेता मनोज वाजपेयीचा वाढदिवस. ‘सत्या’ सिनेमा नंतर मनोज सर्वात जास्त कशात आवडला असेल तर तो २०१२ला आलेल्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ मधे. अनुरागच्या या फिल्ममधे तो टक्कल करून ‘सरदार खान’ बनून आला. या फिल्मने एक नवा माईलस्टोन सेट करत सबकी कह के ली......
सध्या देशभर ‘केजीएफ: चाप्टर २’ची तुफान चर्चा होतेय. हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत डब झालेल्या या मूळच्या कन्नड सिनेमाने लोकप्रियतेचा कळस गाठलाय. ‘केजीएफ’च्या निमित्ताने का होईना, लोक पुन्हा एकदा तेलुगू, तमिळ आणि मल्याळम सिनेसृष्टीच्या बरोबरीने कन्नड सिनेसृष्टीचं नाव घेऊ लागलेत.
सध्या देशभर ‘केजीएफ: चाप्टर २’ची तुफान चर्चा होतेय. हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत डब झालेल्या या मूळच्या कन्नड सिनेमाने लोकप्रियतेचा कळस गाठलाय. ‘केजीएफ’च्या निमित्ताने का होईना, लोक पुन्हा एकदा तेलुगू, तमिळ आणि मल्याळम सिनेसृष्टीच्या बरोबरीने कन्नड सिनेसृष्टीचं नाव घेऊ लागलेत......
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटच्या बर्थडेला ‘आरआरआर' सिनेमातलं ‘शोले’ हे गाणं रिलीज करण्यात आलं. भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना या गाण्यातून मानवंदना देण्यात आलीय. यातल्या बऱ्याच जणांचं नावही कित्येकांना माहीत नाहीय. त्या स्वातंत्र्ययोद्ध्यांची ओळख करून देणारा हा लेख.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटच्या बर्थडेला ‘आरआरआर' सिनेमातलं ‘शोले’ हे गाणं रिलीज करण्यात आलं. भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना या गाण्यातून मानवंदना देण्यात आलीय. यातल्या बऱ्याच जणांचं नावही कित्येकांना माहीत नाहीय. त्या स्वातंत्र्ययोद्ध्यांची ओळख करून देणारा हा लेख......
बोनी कपूरची निर्मिती असलेला ‘वलिमाई’ २४ फेब्रुवारीला रिलीज झाला. गेल्या आठवड्याभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. जास्तीत जास्त प्रेक्षकांना हा सिनेमा बघता यावा म्हणून चक्क पहाटे चार वाजल्यापासून ‘वलिमाई’चे शो लावले जातायत. ‘वलिमाई’च्या या उत्सवीकरणाचं कारण एकच, अजित कुमार!
बोनी कपूरची निर्मिती असलेला ‘वलिमाई’ २४ फेब्रुवारीला रिलीज झाला. गेल्या आठवड्याभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. जास्तीत जास्त प्रेक्षकांना हा सिनेमा बघता यावा म्हणून चक्क पहाटे चार वाजल्यापासून ‘वलिमाई’चे शो लावले जातायत. ‘वलिमाई’च्या या उत्सवीकरणाचं कारण एकच, अजित कुमार!.....
हॉलीवूड आणि बॉलीवूडसोबतच आता मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमाची मेजवानी यावर्षी प्रेक्षकांच्या दिमतीला हजर असणार आहे. थिएटरवर लावल्या जाणाऱ्या सततच्या लहरी निर्बंधांमुळे बऱ्याच सिनेमांना रिलीजचा मुहूर्तच सापडला नव्हता. पण आता येत्या चार महिन्यात तमाम थिएटर ‘हाऊसफुल’ होण्याची दाट शक्यता आहे.
हॉलीवूड आणि बॉलीवूडसोबतच आता मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमाची मेजवानी यावर्षी प्रेक्षकांच्या दिमतीला हजर असणार आहे. थिएटरवर लावल्या जाणाऱ्या सततच्या लहरी निर्बंधांमुळे बऱ्याच सिनेमांना रिलीजचा मुहूर्तच सापडला नव्हता. पण आता येत्या चार महिन्यात तमाम थिएटर ‘हाऊसफुल’ होण्याची दाट शक्यता आहे......
मराठी सिनेमे एकाच साच्यात बनवले जातात, त्यात प्रयोगशीलतेचा कसलाही लवलेश नसतो, हॉलीवूड किंवा इतर भाषेतल्या सिनेमाची सर मराठीला कधी येणारच नाही अश्या टीकांना जबरदस्त उत्तर देणारा ‘झोंबिवली’ नुकताच रिलीज झालाय. मराठीतला हा पहिलाच झाँबीपट तरुण प्रेक्षकवर्गाला भावतोय.
मराठी सिनेमे एकाच साच्यात बनवले जातात, त्यात प्रयोगशीलतेचा कसलाही लवलेश नसतो, हॉलीवूड किंवा इतर भाषेतल्या सिनेमाची सर मराठीला कधी येणारच नाही अश्या टीकांना जबरदस्त उत्तर देणारा ‘झोंबिवली’ नुकताच रिलीज झालाय. मराठीतला हा पहिलाच झाँबीपट तरुण प्रेक्षकवर्गाला भावतोय......
तमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे.
तमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे......
लॉकडाऊनमधे उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समधे जमणाऱ्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे. पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणाऱ्या बॉलीवूड पुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केलेत. पूर्वी बॉक्स ऑफीसवर एकहाती गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे.
लॉकडाऊनमधे उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समधे जमणाऱ्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे. पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणाऱ्या बॉलीवूड पुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केलेत. पूर्वी बॉक्स ऑफीसवर एकहाती गल्ला कमावणाऱ्या बॉलीवूडला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे......
आज ६ डिसेंबर. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचा ‘शिका, संघर्ष करा, संघटित व्हा,’ हा संदेश आचरणात आणण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाल्याचं अनेक सिनेमे सांगतात. वंचितांचा हा हुंकार रुपेरी पडद्यावर व्यापून उरतोय. फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्याशी आणि त्यांना अभिप्रेत असणार्या मानवतावादाशी, सांविधानिक मूल्यांशी असणारं नातं पुनःपुन्हा अधोरेखित करतोय.
आज ६ डिसेंबर. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचा ‘शिका, संघर्ष करा, संघटित व्हा,’ हा संदेश आचरणात आणण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाल्याचं अनेक सिनेमे सांगतात. वंचितांचा हा हुंकार रुपेरी पडद्यावर व्यापून उरतोय. फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्याशी आणि त्यांना अभिप्रेत असणार्या मानवतावादाशी, सांविधानिक मूल्यांशी असणारं नातं पुनःपुन्हा अधोरेखित करतोय......
निवृत्त न्यायमूर्ती के. चंद्रू हे तामिळनाडूमधेच नाही, तर देशभरात परिचित असलेलं महत्त्वाचं नाव. न्या. चंद्रू यांच्या वकिली कारकिर्दीतल्या एका गाजलेल्या खटल्यावर ‘जय भीम’ हा सिनेमा तयार करण्यात आलेला आहे. चंद्रू यांनी हेबियस कॉर्पस अर्थात सदेह उपस्थितीची याचिका दाखल करून त्याआधारे पोलिस कोठडीतल्या अत्याचारात झालेल्या आदिवासींच्या मृत्यूला वाचा फोडली आणि मरणोत्तर न्याय मिळवून दिला.
निवृत्त न्यायमूर्ती के. चंद्रू हे तामिळनाडूमधेच नाही, तर देशभरात परिचित असलेलं महत्त्वाचं नाव. न्या. चंद्रू यांच्या वकिली कारकिर्दीतल्या एका गाजलेल्या खटल्यावर ‘जय भीम’ हा सिनेमा तयार करण्यात आलेला आहे. चंद्रू यांनी हेबियस कॉर्पस अर्थात सदेह उपस्थितीची याचिका दाखल करून त्याआधारे पोलिस कोठडीतल्या अत्याचारात झालेल्या आदिवासींच्या मृत्यूला वाचा फोडली आणि मरणोत्तर न्याय मिळवून दिला......
भारतातल्या झोपडपट्टीमधलं दर्शन घडवणारा ‘स्लमडॉग मिलेनिअर’ ‘ऑस्कर’मधे चालतो. पण ब्रिटिश साम्राज्यवादाचं हिंसक स्वरूप दाखवणारा ‘सरदार उधम’ का चालत नाही? असा प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत. मुळात एखाद्या कलाकृतीकडे आपण व्यापक कलाव्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, त्यातून काही प्रश्न आणि गुंते निर्माण होत असतात.
भारतातल्या झोपडपट्टीमधलं दर्शन घडवणारा ‘स्लमडॉग मिलेनिअर’ ‘ऑस्कर’मधे चालतो. पण ब्रिटिश साम्राज्यवादाचं हिंसक स्वरूप दाखवणारा ‘सरदार उधम’ का चालत नाही? असा प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत. मुळात एखाद्या कलाकृतीकडे आपण व्यापक कलाव्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, त्यातून काही प्रश्न आणि गुंते निर्माण होत असतात......
१९७० मधे 'गोपी' नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात प्रभू श्रीराम सीतेला 'असं घोर कलियुग येईल, जिथं कर्म, धर्म असेल पण लाजलज्जा नसेल' असं म्हणतात. पन्नास वर्षात युग बदलत नाही, पण मागच्या पन्नास वर्षांतच एक नवं कलियुग आल्याचं आपल्याला दिसतंय. या लाजलज्जा संपलेल्या अनेक गोष्टी राज कुंद्राच्या ताज्या घटनेसह सहज आठवतायत.
१९७० मधे 'गोपी' नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात प्रभू श्रीराम सीतेला 'असं घोर कलियुग येईल, जिथं कर्म, धर्म असेल पण लाजलज्जा नसेल' असं म्हणतात. पन्नास वर्षात युग बदलत नाही, पण मागच्या पन्नास वर्षांतच एक नवं कलियुग आल्याचं आपल्याला दिसतंय. या लाजलज्जा संपलेल्या अनेक गोष्टी राज कुंद्राच्या ताज्या घटनेसह सहज आठवतायत......
सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविक होतं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली.
सामूहिक अंतमर्नाला सहजतेने साद घालण्याची आणि तितक्याच सहजतेने हाक मिळविण्याची विलक्षण हातोटी दिलीपकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे कलांचा भाव व्याकुळतेने, श्रद्धापूर्वक आस्वाद घेणार्या भारतीय मानसिकतेला हा अभिनेता ‘घरातला’ वाटणं स्वाभाविक होतं. श्रद्धाळू भारतीय समाजमनाला भावनेच्या लाटांवर झुलायला आवडतं, त्याला या शोकनायकाच्या सिनेमांनी अलगद ऊब दिली......
केंद्र सरकारने १९५२ च्या सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल सुचवणारं एक विधेयक आणलंय. एखाद्या सिनेमाला परवानगी देण्याची जबाबदारी सेन्सॉर बोर्डाची असते. पण नव्या तरतुदींमुळे या निर्णयात थेट हस्तक्षेप करायचा अधिकार केंद्राला मिळेल. सेन्सॉर बोर्डाच्या निकालाविरोधात अपील करण्यासाठीचं ट्रिब्युनल दिग्दर्शकांसाठी आशेचा किरण होतं. सरकारने ते आधीच रद्द केलंय. त्यामुळे सिने क्षेत्रात अस्वस्थता पसरलीय.
केंद्र सरकारने १९५२ च्या सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल सुचवणारं एक विधेयक आणलंय. एखाद्या सिनेमाला परवानगी देण्याची जबाबदारी सेन्सॉर बोर्डाची असते. पण नव्या तरतुदींमुळे या निर्णयात थेट हस्तक्षेप करायचा अधिकार केंद्राला मिळेल. सेन्सॉर बोर्डाच्या निकालाविरोधात अपील करण्यासाठीचं ट्रिब्युनल दिग्दर्शकांसाठी आशेचा किरण होतं. सरकारने ते आधीच रद्द केलंय. त्यामुळे सिने क्षेत्रात अस्वस्थता पसरलीय. .....
यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडाच्या जंगलात ‘अवनी’ या वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आलं होतं. हेच कथानक असलेला ‘शेरनी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. गावकर्यांचे जीव वाचवतानाच वाघासारखं वन्यजीव वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी वन अधिकाऱ्याची भूमिका अभिनेत्री विद्या बालनने केलीय. माणूस आणि वन्यजीव यांच्यातल्या संघर्षाची किनार या सिनेमाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडाच्या जंगलात ‘अवनी’ या वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आलं होतं. हेच कथानक असलेला ‘शेरनी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. गावकर्यांचे जीव वाचवतानाच वाघासारखं वन्यजीव वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी वन अधिकाऱ्याची भूमिका अभिनेत्री विद्या बालनने केलीय. माणूस आणि वन्यजीव यांच्यातल्या संघर्षाची किनार या सिनेमाला आहे......
आज जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते. त्यानं सलग सहा बिग बजेट सिनेमे काढून नेहरूंना मानवंदना दिलीय. त्यातले तीन सिनेमे तर अगदी मेनस्ट्रीमचे होते. ही मानवंदना नेहरुंच्या विचारांना, खास करून विषमता कमी करणाऱ्या समतावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिलीय.
आज जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. राज कपूरसाठी पंडित नेहरू हे महान नायक होते. त्यानं सलग सहा बिग बजेट सिनेमे काढून नेहरूंना मानवंदना दिलीय. त्यातले तीन सिनेमे तर अगदी मेनस्ट्रीमचे होते. ही मानवंदना नेहरुंच्या विचारांना, खास करून विषमता कमी करणाऱ्या समतावादी विचारांना होती. त्याला के. ए. अब्बासच्या कथा आणि शैलेंद्रच्या अर्थपूर्ण गीतांनी समर्थ साथ दिलीय......
आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती.
आज २७ मे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. नेहरू काळाचं प्रतिबिंब राज कपूरच्या सिनेमांमधे दिसतं. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे १९५१ ला प्रदर्शित झालेला ‘आवारा’. त्यात सामाजिक आणि आर्थिक वर्गभेदाचं जसं तीव्र दर्शन होतं, तसंच ब्रिटिशांनी कंगाल आणि गरीब केलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी एक सुंदर रोमँटिक प्रेमकथाही होती......
कोल्हापूरच्या यशवंत पेठकर यांचा आज जन्मदिवस. व्यवसायाने ते शिक्षक. बालवाडीतल्या लहान मुलांची नाच गाणी बसवत त्यांनी थेट सिनेसृष्टीत प्रवेश केला. चॉकलेट हिरो देव आनंद आणि खलनायक प्राण यांना बॉलिवूडमधे ओळख निर्माण करून देण्याचं श्रेय पेठकर मास्तरांना दिलं जातं.
कोल्हापूरच्या यशवंत पेठकर यांचा आज जन्मदिवस. व्यवसायाने ते शिक्षक. बालवाडीतल्या लहान मुलांची नाच गाणी बसवत त्यांनी थेट सिनेसृष्टीत प्रवेश केला. चॉकलेट हिरो देव आनंद आणि खलनायक प्राण यांना बॉलिवूडमधे ओळख निर्माण करून देण्याचं श्रेय पेठकर मास्तरांना दिलं जातं......
मराठी सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या नागराज मंजुळेंच्या सैराटला पाच वर्ष झालीत. त्यातल्या लवस्टोरीनं अनेकांना भुरळ घातली. अनेकांना त्यातलं सामाजिक वास्तव भावलं. पण सिनेमातली गाणीही फक्त सुपरहिट नाही तर ट्रेण्डसेटर ठरली. कारण ती खऱ्या अर्थाने ग्लोबल आहेत. शब्द, भाषा आणि सुरांचीही कुंपणं ओलांडून हे संगीत जगाला भिडतं.
मराठी सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या नागराज मंजुळेंच्या सैराटला पाच वर्ष झालीत. त्यातल्या लवस्टोरीनं अनेकांना भुरळ घातली. अनेकांना त्यातलं सामाजिक वास्तव भावलं. पण सिनेमातली गाणीही फक्त सुपरहिट नाही तर ट्रेण्डसेटर ठरली. कारण ती खऱ्या अर्थाने ग्लोबल आहेत. शब्द, भाषा आणि सुरांचीही कुंपणं ओलांडून हे संगीत जगाला भिडतं......
‘आसुरन’या सिनेमासाठी अभिनेता धनुष याला २०१९ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणं या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट तमिळ सिनेमाचा पुरस्कार घोषित झाला. धनुष हा मुळातच संवेदनशील अभिनेता आहे. प्रत्येक भूमिकेत तो जीव ओतून काम करतो. त्याचं फळ त्याला या पुरस्काराच्या रूपानं मिळालंय. पण यानिमित्तानं ‘आसुरन’विषयी थोडं बोलायला हवं.
‘आसुरन’या सिनेमासाठी अभिनेता धनुष याला २०१९ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणं या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट तमिळ सिनेमाचा पुरस्कार घोषित झाला. धनुष हा मुळातच संवेदनशील अभिनेता आहे. प्रत्येक भूमिकेत तो जीव ओतून काम करतो. त्याचं फळ त्याला या पुरस्काराच्या रूपानं मिळालंय. पण यानिमित्तानं ‘आसुरन’विषयी थोडं बोलायला हवं......
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. आपल्या पांढरपेशी दुनियेचा हिस्सा नसणार्या वेश्या या बाईविषयी आस्था, आपुलकी असण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही खोकल्याची उबळ यावी तसं बॉलीवूडला अधूनमधून या विषयाचे उमाळे येत राहतात. वेश्यांचं चित्रण करणारे अनेक सिनेमे आपल्याकडे झालेत. त्यात वेश्या नेमक्या कशा होत्या याचं विश्लेषण ‘गुंगूबाई काठियावाडी’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने करायला हवं.
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. आपल्या पांढरपेशी दुनियेचा हिस्सा नसणार्या वेश्या या बाईविषयी आस्था, आपुलकी असण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही खोकल्याची उबळ यावी तसं बॉलीवूडला अधूनमधून या विषयाचे उमाळे येत राहतात. वेश्यांचं चित्रण करणारे अनेक सिनेमे आपल्याकडे झालेत. त्यात वेश्या नेमक्या कशा होत्या याचं विश्लेषण ‘गुंगूबाई काठियावाडी’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने करायला हवं......
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात जानेवारी महिन्यात पार पडला. अशा महोत्सवाविषयी ऐकलं की कसे होते सिनेमे हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण खरंतर रसिक कोणत्या पायरीवरून या दुनियेच्या सफरीकडे पाहतो, त्यावर या प्रश्नाचं उत्तरं मिळतं. आपल्या डोक्यातल्या चित्रपटाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर अवलंबून असतो. या महोत्सवाच्या छटा दाखवणारा हा लेख.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात जानेवारी महिन्यात पार पडला. अशा महोत्सवाविषयी ऐकलं की कसे होते सिनेमे हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण खरंतर रसिक कोणत्या पायरीवरून या दुनियेच्या सफरीकडे पाहतो, त्यावर या प्रश्नाचं उत्तरं मिळतं. आपल्या डोक्यातल्या चित्रपटाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर अवलंबून असतो. या महोत्सवाच्या छटा दाखवणारा हा लेख......
१९८३ उच्चारल्यावर भारताने वर्ल्डकप जिंकल्याचं आठवतं. पण त्याचवर्षी भानू अथैय्या या मराठी मुलीनं गांधी सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकला. त्या बेस्ट कॉश्च्युम डिझायनर ठरल्या. आपल्या कलेला त्यांनी पुढे नेत ऑस्करपर्यंत मजल मारली. काल १५ ऑक्टोबरला रात्री त्यांचं निधन झालं. कोल्हापूर ते ऑस्कर हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
१९८३ उच्चारल्यावर भारताने वर्ल्डकप जिंकल्याचं आठवतं. पण त्याचवर्षी भानू अथैय्या या मराठी मुलीनं गांधी सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकला. त्या बेस्ट कॉश्च्युम डिझायनर ठरल्या. आपल्या कलेला त्यांनी पुढे नेत ऑस्करपर्यंत मजल मारली. काल १५ ऑक्टोबरला रात्री त्यांचं निधन झालं. कोल्हापूर ते ऑस्कर हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे......
आज १ जानेवारी. सोनाली बेंद्रेचा बड्डे. आपण या मराठी अभिनेत्रीला आजवर विविध भूमिकांमधे पाहिलं. दुर्दैवानं तिला अलीकडे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या भूमिकेतही आपल्याला पाहावं लागलं. ही ‘भूमिका’ तिच्यासाठी एक कसोटी होती. या कसोटीतून ती पूर्णपणे बाहेर तर आलीच. या भूमिकेतला तिचा सहजपणा, सामान्यपणा तिला ‘असामान्य’ बनवून गेला.
आज १ जानेवारी. सोनाली बेंद्रेचा बड्डे. आपण या मराठी अभिनेत्रीला आजवर विविध भूमिकांमधे पाहिलं. दुर्दैवानं तिला अलीकडे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या भूमिकेतही आपल्याला पाहावं लागलं. ही ‘भूमिका’ तिच्यासाठी एक कसोटी होती. या कसोटीतून ती पूर्णपणे बाहेर तर आलीच. या भूमिकेतला तिचा सहजपणा, सामान्यपणा तिला ‘असामान्य’ बनवून गेला......
हंगेरीमधल्या एका सामान्य माणसाच्या घरात कम्युनिस्ट पोलिस घुसतात. त्यांना पाच दिवस नजरकैदेत ठेवलं जातं. ही सगळी परिस्थिती ऐकायला जितकी गंभीर वाटते, तितकाच विनोदी कॅप्टिव्ज नावाचा सिनेमा जगभर गाजतोय. सध्या गोव्यात सध्या सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामधे या सिनेमाचं स्क्रिनिंग करण्यात आलं.
हंगेरीमधल्या एका सामान्य माणसाच्या घरात कम्युनिस्ट पोलिस घुसतात. त्यांना पाच दिवस नजरकैदेत ठेवलं जातं. ही सगळी परिस्थिती ऐकायला जितकी गंभीर वाटते, तितकाच विनोदी कॅप्टिव्ज नावाचा सिनेमा जगभर गाजतोय. सध्या गोव्यात सध्या सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामधे या सिनेमाचं स्क्रिनिंग करण्यात आलं......
जगप्रसिद्ध फिल्म डायरेक्टर मार्टिन स्कॉर्सेसी यांच्या एका मुलाखतीवरून सध्या चर्चेचं वादळ उठलंय. मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांवर केलेल्या टिप्पणीवरून वाद सुरू आहे. ‘मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांना मी सिनेमा मानत नाही,’ असं ते म्हणाले होते. स्कॉर्सेसींनी सुपरहिरो मुवीजची तुलना एखाद्या आनंदनगरीशी केलीय.
जगप्रसिद्ध फिल्म डायरेक्टर मार्टिन स्कॉर्सेसी यांच्या एका मुलाखतीवरून सध्या चर्चेचं वादळ उठलंय. मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांवर केलेल्या टिप्पणीवरून वाद सुरू आहे. ‘मार्वलच्या सुपरहिरो सिनेमांना मी सिनेमा मानत नाही,’ असं ते म्हणाले होते. स्कॉर्सेसींनी सुपरहिरो मुवीजची तुलना एखाद्या आनंदनगरीशी केलीय......
द स्काय इज पिंक या सिनेमाचं सगळीकडेच कौतुक होतंय. सिनेमाची कथा आणि प्रत्येकाचं आभाळ वेगळ्या रंगाचं असू शकतं हे अधोरेखित करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे हा सिनेमा अद्भूत आहे, असं म्हणावं लागतं. या सिनेमावर भरभरून लिहिलेली पोस्ट ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूकवर लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद.
द स्काय इज पिंक या सिनेमाचं सगळीकडेच कौतुक होतंय. सिनेमाची कथा आणि प्रत्येकाचं आभाळ वेगळ्या रंगाचं असू शकतं हे अधोरेखित करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे हा सिनेमा अद्भूत आहे, असं म्हणावं लागतं. या सिनेमावर भरभरून लिहिलेली पोस्ट ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूकवर लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद......
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो.
फँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो......
हिंदी सिनेमातल्या ज्येष्ठ कलाकार विद्या सिन्हा यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. घरातूनच सिनेमाचा वारसा मिळालेल्या विद्या सिन्हांनी सिनेसृष्टी गाजवली. ७० वर्षांच्या सिन्हा यांनी २०११ मधे शेवटचा सिनेमा केला. त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
हिंदी सिनेमातल्या ज्येष्ठ कलाकार विद्या सिन्हा यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. घरातूनच सिनेमाचा वारसा मिळालेल्या विद्या सिन्हांनी सिनेसृष्टी गाजवली. ७० वर्षांच्या सिन्हा यांनी २०११ मधे शेवटचा सिनेमा केला. त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख......
आपल्याला बॉलिवूडचे सिनेमे बघायला खूप आवडतात. त्यात रॉमॅन्स, अॅक्शन, ड्रामा, नाच-गाणी असा सगला मसाला असतो. या बॉलिवूडसारखेच भरपूरसे वूड आपल्या देशातल्या सिनेमा उद्योगात आहेत. प्रादेशिक सिनेमा क्षेत्रांनी त्यांच्या सिनेमा उद्योगाच्या नावांपुढे वूड जोडलंय. आपलं महत्त्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी तसं नामकरण केलंय.
आपल्याला बॉलिवूडचे सिनेमे बघायला खूप आवडतात. त्यात रॉमॅन्स, अॅक्शन, ड्रामा, नाच-गाणी असा सगला मसाला असतो. या बॉलिवूडसारखेच भरपूरसे वूड आपल्या देशातल्या सिनेमा उद्योगात आहेत. प्रादेशिक सिनेमा क्षेत्रांनी त्यांच्या सिनेमा उद्योगाच्या नावांपुढे वूड जोडलंय. आपलं महत्त्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी तसं नामकरण केलंय. .....
गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमारचे सिनेमे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी रिलिज होतायंत. यंदाही मिशन मंगल हा इस्त्रोच्या यशस्वी मॉम अर्थात मंगळयान मोहिमेवर बेतलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याच्या ट्रेलरमधे आपल्याला ५ महिला वैज्ञानिक दिसल्या. कोण आहेत या पाचजणी?
गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमारचे सिनेमे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी रिलिज होतायंत. यंदाही मिशन मंगल हा इस्त्रोच्या यशस्वी मॉम अर्थात मंगळयान मोहिमेवर बेतलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याच्या ट्रेलरमधे आपल्याला ५ महिला वैज्ञानिक दिसल्या. कोण आहेत या पाचजणी?.....
२५ जून १९८३ ला कपिल देवने इंग्लंडमधल्या लॉर्ड्स मैदानाच्या गॅलरीत वर्ल्डकप उंचावला होता. आता या संस्मरणीय विजयावर ‘८३’ हा हिंदी सिनेमा येतोय. यात रणवीर सिंह कपिल देवची भूमिका करणार आहे. त्याला आणि इतर कलाकारांना ते क्रिकेटपटू शोभावेत म्हणून बलविंदर संधू यांनी प्रशिक्षण दिलं. बल्लू ८३च्या त्या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक. यानिमित्त त्याने जागवलेल्या काही आठवणी.
२५ जून १९८३ ला कपिल देवने इंग्लंडमधल्या लॉर्ड्स मैदानाच्या गॅलरीत वर्ल्डकप उंचावला होता. आता या संस्मरणीय विजयावर ‘८३’ हा हिंदी सिनेमा येतोय. यात रणवीर सिंह कपिल देवची भूमिका करणार आहे. त्याला आणि इतर कलाकारांना ते क्रिकेटपटू शोभावेत म्हणून बलविंदर संधू यांनी प्रशिक्षण दिलं. बल्लू ८३च्या त्या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक. यानिमित्त त्याने जागवलेल्या काही आठवणी......
गिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत.
गिरीश कर्नाड गेले. आता त्यांच्या आठवणी उरल्यात. त्यातली एक आठवण त्यांनीच सांगितलेली. कर्नाडांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र आहे, खेळता खेळता आयुष्य. वाचायलाच हवं असं. त्यात ही आठवण आहे. तेव्हा अख्ख्या भारताची ड्रीमगर्ल झालेल्या हेमा मालिनीचं कर्नाडांशी लग्न व्हावं अशी इच्छा होती तिच्या आईची. पण कर्नाडांना ते नको होतं. कारण त्यांच्याच शब्दांत. .....
गिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन.
गिरीश कर्नाड. भारतीय रंगभूमीवरचं महत्त्वाचं नावं. कर्नाड जसे साहित्यात होते, नाटकात होते, तसे ते सिनेमातही होते. प्रसंगी रस्त्यावर उतरुन झगडणाऱ्यांमधेही होते. त्यांनी नाटकाची भाषा बदललीच. पण साहित्याची, चित्रपटाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. साहित्य, समाज, संस्कृतीतला एक मोठा पट आज काळाच्या पडद्याआड गेलाय. कोलाजने त्यांच्याविषयी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना बोलतं केलं. त्याचं हे शब्दांकन. .....
आज ३ जून जागतिक सायकल दिन. कालपरवापर्यंच सायकल चालवणं आउटडेटेड झालं होतं. पण आता सायकल रायडर्सची संख्या वाढतेय. इतके दिवस नजरेआड झालेली सायकल आपल्याला कुठे दिसली की ती पुन्हा हातात घ्यावीशी वाटते. पण आता सायकल चालवायला जागाच कुठंय, असं म्हणत आपण हा विचार मनातल्या मनातच मारून टाकतो. पण असं नाही. सध्या सायकलिंगचेच दिवस आहेत.
आज ३ जून जागतिक सायकल दिन. कालपरवापर्यंच सायकल चालवणं आउटडेटेड झालं होतं. पण आता सायकल रायडर्सची संख्या वाढतेय. इतके दिवस नजरेआड झालेली सायकल आपल्याला कुठे दिसली की ती पुन्हा हातात घ्यावीशी वाटते. पण आता सायकल चालवायला जागाच कुठंय, असं म्हणत आपण हा विचार मनातल्या मनातच मारून टाकतो. पण असं नाही. सध्या सायकलिंगचेच दिवस आहेत......
जगप्रसिद्ध कॅन सिनेमा फेस्टिवल सोमवारी, १४ मेला सुरू झाला. आता न्यूजपेपर, टीवी, सोशल मीडिया सगळीकडे कान्सच्या रेड कार्पेटवरचे ग्लॅमरस फोटो येताहेत. दहाएक दिवस हा ट्रेंड असाच सुरू असतो. हे दरवर्षीच ठरलेलं. ही एक प्रथाच होऊन बसलीय. पण कॅन फेस्टिवलला एवढं ग्लॅमर कशामुळे मिळालं? यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा मयूर देवकर यांनी वेध घेतलाय. त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित अंश.
जगप्रसिद्ध कॅन सिनेमा फेस्टिवल सोमवारी, १४ मेला सुरू झाला. आता न्यूजपेपर, टीवी, सोशल मीडिया सगळीकडे कान्सच्या रेड कार्पेटवरचे ग्लॅमरस फोटो येताहेत. दहाएक दिवस हा ट्रेंड असाच सुरू असतो. हे दरवर्षीच ठरलेलं. ही एक प्रथाच होऊन बसलीय. पण कॅन फेस्टिवलला एवढं ग्लॅमर कशामुळे मिळालं? यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा मयूर देवकर यांनी वेध घेतलाय. त्यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित अंश......
एप्रिलच्या सुरवातीपासूनच सर्वत्र बातम्या येत होत्या की अॅवेंजर एंडगेम बाहुबलीचा रेकॉर्ड तोडणार. त्यातच अॅवेंजर सिनेमालिकेचा हा सिनेमा म्हणजे शेवटचा भाग असल्याची घोषणा झाली. त्यामुळे रिलीज व्हायच्या आधीच तरुणाईने सिनेमाला डोक्यावर उचललं. पण ही सिरिज माहिती नसलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. सिनेमा बघितल्यावरही तो अनेकांना समजला नाही. त्यांच्यासाठी हा क्रॅश कोर्स.
एप्रिलच्या सुरवातीपासूनच सर्वत्र बातम्या येत होत्या की अॅवेंजर एंडगेम बाहुबलीचा रेकॉर्ड तोडणार. त्यातच अॅवेंजर सिनेमालिकेचा हा सिनेमा म्हणजे शेवटचा भाग असल्याची घोषणा झाली. त्यामुळे रिलीज व्हायच्या आधीच तरुणाईने सिनेमाला डोक्यावर उचललं. पण ही सिरिज माहिती नसलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. सिनेमा बघितल्यावरही तो अनेकांना समजला नाही. त्यांच्यासाठी हा क्रॅश कोर्स......
आज २५ एप्रिल. ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला. त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट आपल्या देव्हाऱ्यात केली. मोडक यांचा धर्म, अध्यात्माचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात.
आज २५ एप्रिल. ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला. त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट आपल्या देव्हाऱ्यात केली. मोडक यांचा धर्म, अध्यात्माचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात......
फिक्की ही भारतीय उद्योजकांची संघटना दरवर्षी देशातल्या इंटरटेनमेंट आणि मीडिया इंडस्ट्रीचा गोषवारा मांडते. त्यात यंदाच्या वर्षी एक आश्चर्याची गोष्ट समोर आलीय. ती म्हणजे २०१७ तुलनेत २०१८ला रिलीज झालेल्या सिनेमांची संख्या जवळपास शंभराने कमी झालीय. हे चांगलंय की वाईट?
फिक्की ही भारतीय उद्योजकांची संघटना दरवर्षी देशातल्या इंटरटेनमेंट आणि मीडिया इंडस्ट्रीचा गोषवारा मांडते. त्यात यंदाच्या वर्षी एक आश्चर्याची गोष्ट समोर आलीय. ती म्हणजे २०१७ तुलनेत २०१८ला रिलीज झालेल्या सिनेमांची संख्या जवळपास शंभराने कमी झालीय. हे चांगलंय की वाईट?.....
मराठी सिनेमा गाजवणारी पूजा सावंत थेट बॉलीवूडमधे एंट्री करतेय. चक रसेल या नामांकित डायरेक्टरच्या ‘जंगली’ या हिंदी सिनेमातून तिचा प्रवेश होतोय. ती करत असलेली शंकराची भूमिका ही खरंतर तिच्यासाठी तिच्या जगण्याचाच एक भाग आहे. वन्यप्राण्यांविषयी असलेली तिची आत्मीयता हा तिला या सिनेमाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलाय. तिच्याशी साधलेला हा संवाद.
मराठी सिनेमा गाजवणारी पूजा सावंत थेट बॉलीवूडमधे एंट्री करतेय. चक रसेल या नामांकित डायरेक्टरच्या ‘जंगली’ या हिंदी सिनेमातून तिचा प्रवेश होतोय. ती करत असलेली शंकराची भूमिका ही खरंतर तिच्यासाठी तिच्या जगण्याचाच एक भाग आहे. वन्यप्राण्यांविषयी असलेली तिची आत्मीयता हा तिला या सिनेमाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलाय. तिच्याशी साधलेला हा संवाद......
‘महाहाग्रू नाही सुधारणार. एक तर हा थेरडा नाटकी वागतो, नाटकी बोलतो, नाटकी अभिनय करतो. हे कमी की काय म्हणून इतकी वर्ष 'एकापेक्षा एक' घाणेरडे विग घालून फिरतो.’ ही युट्यूबवरची एक कमेंट आहे. महागुरू सचिन पिळगावकर यांच्या 'लव्ह यू जिंदगी' नावाच्या एका सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे महागुरू ट्रोल होतायंत. असं पुन्हा पुन्हा घडतंय. एवढ्या ज्येष्ठ अभिनेत्यासोबत हे असं का घडतंय?
‘महाहाग्रू नाही सुधारणार. एक तर हा थेरडा नाटकी वागतो, नाटकी बोलतो, नाटकी अभिनय करतो. हे कमी की काय म्हणून इतकी वर्ष 'एकापेक्षा एक' घाणेरडे विग घालून फिरतो.’ ही युट्यूबवरची एक कमेंट आहे. महागुरू सचिन पिळगावकर यांच्या 'लव्ह यू जिंदगी' नावाच्या एका सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे महागुरू ट्रोल होतायंत. असं पुन्हा पुन्हा घडतंय. एवढ्या ज्येष्ठ अभिनेत्यासोबत हे असं का घडतंय?.....