पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीत खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला जाणं टाळलं. गेल्या महिन्यात पंतप्रधानांसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही आपला ईशान्य भारत दौरा रद्द केला होता. नागरिकत्व कायद्याबद्दल जनजागृतीसाठी सरकारकडून, भाजपकडून देशभर कार्यक्रम राबवले जाताहेत. अशा कुठल्या जनजागृतीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री ईशान्य भारतात जात नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीत खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला जाणं टाळलं. गेल्या महिन्यात पंतप्रधानांसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही आपला ईशान्य भारत दौरा रद्द केला होता. नागरिकत्व कायद्याबद्दल जनजागृतीसाठी सरकारकडून, भाजपकडून देशभर कार्यक्रम राबवले जाताहेत. अशा कुठल्या जनजागृतीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री ईशान्य भारतात जात नाहीत......
महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्या. ब्रिजमोहन लोया संशयास्पद मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचे संकेत दिलेत. लोया प्रकरणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप झालेत. त्यामुळे देशमुखांनी खरंच हिंमत दाखवली तर लोया प्रकरणात राजकारण उलटंपालटं करण्याची ताकद आहे. म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय आहे, हे समजून घ्यायला हवंय.
महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्या. ब्रिजमोहन लोया संशयास्पद मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचे संकेत दिलेत. लोया प्रकरणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप झालेत. त्यामुळे देशमुखांनी खरंच हिंमत दाखवली तर लोया प्रकरणात राजकारण उलटंपालटं करण्याची ताकद आहे. म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय आहे, हे समजून घ्यायला हवंय......
२०१९ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीचा विषय चर्चेला येईल तेव्हा भाजपच्या पराभवाची नाही तर मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या सरयू राय यांची चर्चा होईल. २०१९ ची आठवण निघाल्यावर भाजपलाही आपल्या मुख्यमंत्र्यांचा पराभव छळू लागेल. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खावू घालणाऱ्या आणि एकाचं राजकीय भविष्य पराभूत करणाऱ्या सरयू राय यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा.
२०१९ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीचा विषय चर्चेला येईल तेव्हा भाजपच्या पराभवाची नाही तर मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या सरयू राय यांची चर्चा होईल. २०१९ ची आठवण निघाल्यावर भाजपलाही आपल्या मुख्यमंत्र्यांचा पराभव छळू लागेल. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खावू घालणाऱ्या आणि एकाचं राजकीय भविष्य पराभूत करणाऱ्या सरयू राय यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा......
हरियाणात जननायक जनता पार्टीच्या नवोदित नेत्याला हाताशी धरून कसंबसं सरकार स्थापन करण्यात पक्षाला यश आलं. महाराष्ट्रात मात्र कुरघोडीच्या राजकारणात ३० वर्षांपासूनचा जुना साथीदार असलेल्या शिवसेनेने भाजपला अस्मान दाखवलंय. अपयशाच्या गर्तेतून नेते आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचं खडतर आव्हान भाजपसमोर आहे. त्यामुळेच झारखंडची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची बनलीय.
हरियाणात जननायक जनता पार्टीच्या नवोदित नेत्याला हाताशी धरून कसंबसं सरकार स्थापन करण्यात पक्षाला यश आलं. महाराष्ट्रात मात्र कुरघोडीच्या राजकारणात ३० वर्षांपासूनचा जुना साथीदार असलेल्या शिवसेनेने भाजपला अस्मान दाखवलंय. अपयशाच्या गर्तेतून नेते आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचं खडतर आव्हान भाजपसमोर आहे. त्यामुळेच झारखंडची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची बनलीय......
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार कोसळलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या या दोन कर्तृत्ववान नेत्यांच्या राजकारणाचा आलेख खटकन खाली आला. दोघांचंही राजकारण संपलेलं नाही. पण त्याला मोठा ब्रेक नक्की बसलाय. त्यांना पुढचा काही काळ चाचपडत राहावं लागेल. यामागे आहे तरी कोण? त्यांच्या नेत्यांनाच त्यांचं ओझं झालं नव्हतं ना?
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार कोसळलं. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या या दोन कर्तृत्ववान नेत्यांच्या राजकारणाचा आलेख खटकन खाली आला. दोघांचंही राजकारण संपलेलं नाही. पण त्याला मोठा ब्रेक नक्की बसलाय. त्यांना पुढचा काही काळ चाचपडत राहावं लागेल. यामागे आहे तरी कोण? त्यांच्या नेत्यांनाच त्यांचं ओझं झालं नव्हतं ना?.....
विधानसभेचा निकाल लागल्यावर विसाव्या दिवशी दिल्लीत वेगाने घडामोडी घडल्या. आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. जो शेवटचा पर्याय होता, तोच आता फर्स्ट प्रेफरन्स म्हणून अमलात आलाय. हे राजकीय पक्षांपेक्षाही राज्यपालांचंच अपयश जास्त आहे, कारण सरकार स्थापन होण्याच्या राजकीय शक्यता दिसत असूनही त्यासाठी अनुकूल प्रयत्न केले नाहीत.
विधानसभेचा निकाल लागल्यावर विसाव्या दिवशी दिल्लीत वेगाने घडामोडी घडल्या. आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. जो शेवटचा पर्याय होता, तोच आता फर्स्ट प्रेफरन्स म्हणून अमलात आलाय. हे राजकीय पक्षांपेक्षाही राज्यपालांचंच अपयश जास्त आहे, कारण सरकार स्थापन होण्याच्या राजकीय शक्यता दिसत असूनही त्यासाठी अनुकूल प्रयत्न केले नाहीत......
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची सर्वानुमते निवड झालीय. अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीने माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन गटाच्या ब्रिजेश पटेल यांना ओवरटेक करत बाजी मारली. अर्थात त्याबदल्यात ब्रिजेश पटेल यांच्याकडे आयपीएलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीय. गांगुलीने बीसीसीआयचा कारभार पारदर्शक करण्यावर भर देणार असल्याचं आश्वासन दिलंय.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची सर्वानुमते निवड झालीय. अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीने माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन गटाच्या ब्रिजेश पटेल यांना ओवरटेक करत बाजी मारली. अर्थात त्याबदल्यात ब्रिजेश पटेल यांच्याकडे आयपीएलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीय. गांगुलीने बीसीसीआयचा कारभार पारदर्शक करण्यावर भर देणार असल्याचं आश्वासन दिलंय......
भाजपने यंदा लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्चिम बंगालवर लक्ष्य केंद्रीत केलंय. २०११ मधे विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार टक्के मतं मिळाली. २०१४ च्या लोकसभेवेळी भाजपच्या मतांची टक्केवारी १७ वर पोचली. या मतांमुळे भाजपने बंगालमधे आपला पाया रोवायला सुरवात केलीय. इथली लढत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी होतेय.
भाजपने यंदा लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्चिम बंगालवर लक्ष्य केंद्रीत केलंय. २०११ मधे विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार टक्के मतं मिळाली. २०१४ च्या लोकसभेवेळी भाजपच्या मतांची टक्केवारी १७ वर पोचली. या मतांमुळे भाजपने बंगालमधे आपला पाया रोवायला सुरवात केलीय. इथली लढत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी होतेय......
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आला. भाजपचा येण्याच्या मार्गावर आहे. ही औपचारिकता आहे की अपरिहार्यता? सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या शर्यतीत प्रादेशिक पक्षांची भूमिका मर्यादितचं राहिलीय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या मोर्चेबांधणीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आला. भाजपचा येण्याच्या मार्गावर आहे. ही औपचारिकता आहे की अपरिहार्यता? सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या शर्यतीत प्रादेशिक पक्षांची भूमिका मर्यादितचं राहिलीय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या मोर्चेबांधणीवर प्रकाश टाकणारा हा लेख......
आठ वर्षांपूर्वी राज ठाकरे गुजरात भेटीवर गेले होते. तेव्हा नरेंद्र मोदींची त्यांनी तोंडभरून स्तुती केली. आता उद्धव ठाकरेही अमित शाहांचा अर्ज भरायला गुजरातला गेले. राज यांच्या गुजरात भेटीनंतर त्यांचं राजकारण गाळात जायला लागलं. तसंच उद्धव यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे का? मुंबईतल्या मराठी गुजराती अस्मिता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ती तपासायला हवी.
आठ वर्षांपूर्वी राज ठाकरे गुजरात भेटीवर गेले होते. तेव्हा नरेंद्र मोदींची त्यांनी तोंडभरून स्तुती केली. आता उद्धव ठाकरेही अमित शाहांचा अर्ज भरायला गुजरातला गेले. राज यांच्या गुजरात भेटीनंतर त्यांचं राजकारण गाळात जायला लागलं. तसंच उद्धव यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे का? मुंबईतल्या मराठी गुजराती अस्मिता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ती तपासायला हवी......
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर आज भाजपसोबत युती करणार असल्याची घोषणा केलीय. युतीच्या या घोषणेचा निव्वळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. देशभरातले राजकीय विश्लेषक, पत्रकार या युतीचं विश्लेषण करायलेत. पण एका सामान्य मराठी माणसाच्या, शिवसेनेला मतदान करणाऱ्या तरुणाच्या नजरेतून या युतीचं दिलखुलास विश्लेषण.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर आज भाजपसोबत युती करणार असल्याची घोषणा केलीय. युतीच्या या घोषणेचा निव्वळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. देशभरातले राजकीय विश्लेषक, पत्रकार या युतीचं विश्लेषण करायलेत. पण एका सामान्य मराठी माणसाच्या, शिवसेनेला मतदान करणाऱ्या तरुणाच्या नजरेतून या युतीचं दिलखुलास विश्लेषण......