कोरोना वायरसच्या साथीवर नियंत्रण मिळवून सुटकेचा निःश्वास टाकला त्याला काही महिने उलटतात न उलटतात तोच देशात सध्या एच३ एन२ या वायरसमुळे होणार्या संसर्गाची प्रकरणं वाढताना दिसतायत. दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत या वायरसमुळे संसर्ग होण्याची लाखो प्रकरणं सर्रास घडतात. पण यंदा नेहमीपेक्षा जास्त प्रकरणं समोर आली आहेत.
कोरोना वायरसच्या साथीवर नियंत्रण मिळवून सुटकेचा निःश्वास टाकला त्याला काही महिने उलटतात न उलटतात तोच देशात सध्या एच३ एन२ या वायरसमुळे होणार्या संसर्गाची प्रकरणं वाढताना दिसतायत. दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत या वायरसमुळे संसर्ग होण्याची लाखो प्रकरणं सर्रास घडतात. पण यंदा नेहमीपेक्षा जास्त प्रकरणं समोर आली आहेत......
अमेरिकन कॅन्सर सोसायटीने १९९१ पासून कॅन्सरच्या माहितीचा अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यानुसार अमेरिकेतल्या कॅन्सर पेशंटच्या मृत्यूमधे ३३ टक्क्यांनी घट झाली आहे, तर अंदाजे ३८ लाख कॅन्सर पेशंटचे जीव वाचवले आहेत. याउलट स्थिती भारतात आहे. भारतामधे कॅन्सरवरच्या संशोधनाला चालना आणि त्यासाठी मोठा संशोधन निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीने १९९१ पासून कॅन्सरच्या माहितीचा अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यानुसार अमेरिकेतल्या कॅन्सर पेशंटच्या मृत्यूमधे ३३ टक्क्यांनी घट झाली आहे, तर अंदाजे ३८ लाख कॅन्सर पेशंटचे जीव वाचवले आहेत. याउलट स्थिती भारतात आहे. भारतामधे कॅन्सरवरच्या संशोधनाला चालना आणि त्यासाठी मोठा संशोधन निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे......
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख.
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख......
जवळपास गेली चार वर्षं माणसाला कोंडून ठेवणारी कोरोनाची साथ आता अखेरच्या टप्प्यात आलीय, असं शास्त्रज्ञ सांगतायत. ही खरंच दिलासा देणारी गोष्ट आहे. पण, विषाणू आणि माणूस यांच्यातला हा संघर्ष यापुढेही महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळेच प्राण्यांकडून माणसांकडं होणारं संक्रमण अर्थात 'झुनॉसिस' हा आज जागतिक आरोग्यासमोरचा सर्वात महत्त्वाचा आणि वाढत चाललेला धोका आहे.
जवळपास गेली चार वर्षं माणसाला कोंडून ठेवणारी कोरोनाची साथ आता अखेरच्या टप्प्यात आलीय, असं शास्त्रज्ञ सांगतायत. ही खरंच दिलासा देणारी गोष्ट आहे. पण, विषाणू आणि माणूस यांच्यातला हा संघर्ष यापुढेही महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळेच प्राण्यांकडून माणसांकडं होणारं संक्रमण अर्थात 'झुनॉसिस' हा आज जागतिक आरोग्यासमोरचा सर्वात महत्त्वाचा आणि वाढत चाललेला धोका आहे......
भारतातल्या तसंच जगातल्या काही देशांमधे 'गोवर' आजाराची साथ वेगाने पसरतेय. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगामधे गोवरची साथ पसरणाऱ्या देशांमधे आफ्रिकेतला नायजेरिया पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतोय. भारतातला गोवरचा उद्रेक म्हणजे आपलं सार्वजनिक आरोग्य अजूनही समाधानकारक नसल्याचं द्योतक आहे.
भारतातल्या तसंच जगातल्या काही देशांमधे 'गोवर' आजाराची साथ वेगाने पसरतेय. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगामधे गोवरची साथ पसरणाऱ्या देशांमधे आफ्रिकेतला नायजेरिया पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतोय. भारतातला गोवरचा उद्रेक म्हणजे आपलं सार्वजनिक आरोग्य अजूनही समाधानकारक नसल्याचं द्योतक आहे......
कोरोनानं व्यापलेल्या गेल्या तीन वर्षात देशभरातल्या आत्महत्या वाढल्यात, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून स्पष्ट झालंय. त्यातही सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमधले आकडेही मोठे आहेत. एवढ्या लोकांना जगण्यापेक्षा मरणं का सोपं वाटतंय, हे वेळेतच समजून घ्यायला हवं.
कोरोनानं व्यापलेल्या गेल्या तीन वर्षात देशभरातल्या आत्महत्या वाढल्यात, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून स्पष्ट झालंय. त्यातही सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमधले आकडेही मोठे आहेत. एवढ्या लोकांना जगण्यापेक्षा मरणं का सोपं वाटतंय, हे वेळेतच समजून घ्यायला हवं......
डासांपासून होणार्या आजारांनी आज जगापुढे आव्हान उभं केलंय. यामधे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा समावेश होतो. गेल्या अनेक वर्षांपासून डेंग्यू हा जागतिक आरोग्य धोक्यात आणणारा वायरस म्हणून ओळखला जात आहे. सध्यस्थितीत जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला या वायरसचा संसर्ग होण्याचा धोका आहे.
डासांपासून होणार्या आजारांनी आज जगापुढे आव्हान उभं केलंय. यामधे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा समावेश होतो. गेल्या अनेक वर्षांपासून डेंग्यू हा जागतिक आरोग्य धोक्यात आणणारा वायरस म्हणून ओळखला जात आहे. सध्यस्थितीत जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला या वायरसचा संसर्ग होण्याचा धोका आहे......
कोरोनात ताप आल्यावर आपल्याला डोलो गोळी घ्यायचा सल्ला दिला जायचा. मेडिकल स्टोअर्समधे गेल्यावर आताही डोलोच पुढं केली जाते. पण ही गोळी बनवणाऱ्या 'मायक्रो लॅब' कंपनीनं डोलोच्या नावावर मोठा झोल केलाय. अवैध मार्गाने गोळीचा खप वाढवण्यासाठी कंपनीने डॉक्टरना कोट्यवधींची गिफ्ट दिलीत. असा झोल करत अनेक औषध कंपन्या सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळतायत.
कोरोनात ताप आल्यावर आपल्याला डोलो गोळी घ्यायचा सल्ला दिला जायचा. मेडिकल स्टोअर्समधे गेल्यावर आताही डोलोच पुढं केली जाते. पण ही गोळी बनवणाऱ्या 'मायक्रो लॅब' कंपनीनं डोलोच्या नावावर मोठा झोल केलाय. अवैध मार्गाने गोळीचा खप वाढवण्यासाठी कंपनीने डॉक्टरना कोट्यवधींची गिफ्ट दिलीत. असा झोल करत अनेक औषध कंपन्या सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळतायत......
कोरोनाच्या साथीनंतर गेल्या कित्येक महिन्यांपासून दररोज नवनवीन जीवजंतूंच्या नावांची चर्चा होतेय. सध्या मंकीपॉक्स आणि स्वाईन फ्लूची चर्चा सुरू आहे. वास्तविक, हे सर्व वायरस अचानक जन्माला आलेले नाहीत. मुलाच्या जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंत अंदाजे ४ हजार प्रकारचे वायरस, बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर रोगजंतू त्याच्यावर आक्रमण करत असतात. या आक्रमणांना समर्थपणे तोंड देतच मानवी प्रतिकारशक्ती विकसित होतेय.
कोरोनाच्या साथीनंतर गेल्या कित्येक महिन्यांपासून दररोज नवनवीन जीवजंतूंच्या नावांची चर्चा होतेय. सध्या मंकीपॉक्स आणि स्वाईन फ्लूची चर्चा सुरू आहे. वास्तविक, हे सर्व वायरस अचानक जन्माला आलेले नाहीत. मुलाच्या जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंत अंदाजे ४ हजार प्रकारचे वायरस, बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर रोगजंतू त्याच्यावर आक्रमण करत असतात. या आक्रमणांना समर्थपणे तोंड देतच मानवी प्रतिकारशक्ती विकसित होतेय......
मंकीपॉक्स हा वायरस ७८पेक्षा अधिक देशांमधे पसरलाय. जगभरात २० हजारापेक्षा अधिक पेशंट आढळून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला 'जागतिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केलंय. भारतातही मंकीपॉक्सचे पेशंट आढळलेत. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात.
मंकीपॉक्स हा वायरस ७८पेक्षा अधिक देशांमधे पसरलाय. जगभरात २० हजारापेक्षा अधिक पेशंट आढळून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला 'जागतिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केलंय. भारतातही मंकीपॉक्सचे पेशंट आढळलेत. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात......
दोन वर्षांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्यानं होऊ लागला तेव्हाच आगामी काही वर्षं कोरोनासोबत जगावं लागणार, असं विषाणूतज्ज्ञांकडून सांगितलं जात होतं. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे आणि एका मर्यादेपलीकडे अथक प्रवास केल्यामुळे या विषाणूंची क्षमता कमी होत जाते. पण त्यांच्यातलं म्युटेशन सुरुच असतं. त्यातून नवे वेरियंट जन्माला येतात. सध्या अशाच दोन वेरियंटमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय.
दोन वर्षांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्यानं होऊ लागला तेव्हाच आगामी काही वर्षं कोरोनासोबत जगावं लागणार, असं विषाणूतज्ज्ञांकडून सांगितलं जात होतं. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे आणि एका मर्यादेपलीकडे अथक प्रवास केल्यामुळे या विषाणूंची क्षमता कमी होत जाते. पण त्यांच्यातलं म्युटेशन सुरुच असतं. त्यातून नवे वेरियंट जन्माला येतात. सध्या अशाच दोन वेरियंटमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय......
'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या नुकत्याच झालेल्या वार्षिक बैठकीत ऑक्सफॅमचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. 'प्रॉफिटिंग फ्रॉम पेन' नावाच्या या अहवालात कोरोना काळात लोक भूक, गरिबीमुळे आक्रोश करत असताना औषध, तेल, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या ठराविक कंपन्यांनी भरमसाठ कमाई केलीय. त्यातून कोरोना काळात प्रत्येक ३० व्या मिनिटाला एका अब्जाधीशाचा जन्म झाला. या काळातली सरकारची धोरणं त्यांच्या फायद्याची ठरलीत.
'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या नुकत्याच झालेल्या वार्षिक बैठकीत ऑक्सफॅमचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. 'प्रॉफिटिंग फ्रॉम पेन' नावाच्या या अहवालात कोरोना काळात लोक भूक, गरिबीमुळे आक्रोश करत असताना औषध, तेल, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या ठराविक कंपन्यांनी भरमसाठ कमाई केलीय. त्यातून कोरोना काळात प्रत्येक ३० व्या मिनिटाला एका अब्जाधीशाचा जन्म झाला. या काळातली सरकारची धोरणं त्यांच्या फायद्याची ठरलीत......
कोरोनाचा संसर्ग कमी होत गेल्यामुळे जगभरात बर्याच अंशी दिलासादायक स्थिती असतानाच, आता या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरून वादंग माजलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार, कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी होत गेल्यामुळे जगभरात बर्याच अंशी दिलासादायक स्थिती असतानाच, आता या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरून वादंग माजलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार, कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे......
मुंबई आणि गुजरातमधे ओमायक्रॉनचा नवा एक्सई वेरियंट आढळून आला होता. हा वेरियंट याआधीच्या बीए.२.च्या तुलनेत दहा पट अधिक वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. त्यामुळे टेंशन वाढलं होतं. मुंबईत आढळलेल्या पेशंटमधे मात्र एक्सई वेरियंट नव्हताच असा दावा केंद्रीय आरोग्य खात्याने केलाय.
मुंबई आणि गुजरातमधे ओमायक्रॉनचा नवा एक्सई वेरियंट आढळून आला होता. हा वेरियंट याआधीच्या बीए.२.च्या तुलनेत दहा पट अधिक वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. त्यामुळे टेंशन वाढलं होतं. मुंबईत आढळलेल्या पेशंटमधे मात्र एक्सई वेरियंट नव्हताच असा दावा केंद्रीय आरोग्य खात्याने केलाय......
चीनसोबतच हाँगकाँग, विएतनाम आणि दक्षिण कोरियामधे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतेय. चीनमधल्या दहा शहरांमधे कडक लॉकडाऊन लावलाय. जवळपास १० कोटी लोकसंख्या घरात बसली असल्याचा अंदाज आहे. कोरोनावॅक ही चिनी लस कोरोनावर पुरेशी परिणामकारक ठरली नव्हती, असा युरोपियन आणि अमेरिकन आरोग्य यंत्रणेचा दावा होता. तो खरा ठरताना दिसतोय.
चीनसोबतच हाँगकाँग, विएतनाम आणि दक्षिण कोरियामधे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतेय. चीनमधल्या दहा शहरांमधे कडक लॉकडाऊन लावलाय. जवळपास १० कोटी लोकसंख्या घरात बसली असल्याचा अंदाज आहे. कोरोनावॅक ही चिनी लस कोरोनावर पुरेशी परिणामकारक ठरली नव्हती, असा युरोपियन आणि अमेरिकन आरोग्य यंत्रणेचा दावा होता. तो खरा ठरताना दिसतोय......
कोरोना काळात विद्यार्थ्यांनी बरंच काही गमावल्याचं वेगवेगळ्या पाहणीतून समोर आलंय. अगदी प्राथमिक स्तरावर पायाभूत क्षमतांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं स्पष्ट झालंय. देशात ५ कोटी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात असतानाही निरक्षर असल्याचं दिसून आलंय. अशा स्थितीत सरकारने ठाम भूमिका घेऊन विद्यार्थ्यांचं हित जपणारी पावलं उचलायला हवीत.
कोरोना काळात विद्यार्थ्यांनी बरंच काही गमावल्याचं वेगवेगळ्या पाहणीतून समोर आलंय. अगदी प्राथमिक स्तरावर पायाभूत क्षमतांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं स्पष्ट झालंय. देशात ५ कोटी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात असतानाही निरक्षर असल्याचं दिसून आलंय. अशा स्थितीत सरकारने ठाम भूमिका घेऊन विद्यार्थ्यांचं हित जपणारी पावलं उचलायला हवीत......
ओमायक्रॉन वेरियंटच्या झपाट्याने झालेल्या प्रसारामुळे आणि नगण्य मृत्यूंमुळे हा कोरोना वायरस साथीच्या रोगाचा शेवटचा टप्पा आहे, असं म्हटलं जातंय. त्यामुळे भविष्यात कोरोना वायरसची साथ पुन्हा येईल ही शक्यता फारच कमी आहे. कोरोना वायरसमधे अनेक प्रकारचे बदल होऊन जरी तो पुन्हा आला तरी त्यामुळे पुन्हा जग बंद करण्याची गरज पडणार नाही.
ओमायक्रॉन वेरियंटच्या झपाट्याने झालेल्या प्रसारामुळे आणि नगण्य मृत्यूंमुळे हा कोरोना वायरस साथीच्या रोगाचा शेवटचा टप्पा आहे, असं म्हटलं जातंय. त्यामुळे भविष्यात कोरोना वायरसची साथ पुन्हा येईल ही शक्यता फारच कमी आहे. कोरोना वायरसमधे अनेक प्रकारचे बदल होऊन जरी तो पुन्हा आला तरी त्यामुळे पुन्हा जग बंद करण्याची गरज पडणार नाही......
भारतात १० टक्के लोकांकडे ५७ टक्के संपत्ती आहे आणि तळातल्या लोकांकडे फक्त १३ टक्के संपत्ती आहे. उपभोगासाठी लोकांच्या खिशात पैसाच नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मागणी नाही. मागणी नसल्यामुळे गुंतवणूक नाही आणि परिणामी मंदीसदृश स्थिती निर्माण झालीय. बेरोजगारी, गरिबी, भाववाढ आणि विषमता असा हा समस्यांचा चक्रव्यूह आहे.
भारतात १० टक्के लोकांकडे ५७ टक्के संपत्ती आहे आणि तळातल्या लोकांकडे फक्त १३ टक्के संपत्ती आहे. उपभोगासाठी लोकांच्या खिशात पैसाच नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मागणी नाही. मागणी नसल्यामुळे गुंतवणूक नाही आणि परिणामी मंदीसदृश स्थिती निर्माण झालीय. बेरोजगारी, गरिबी, भाववाढ आणि विषमता असा हा समस्यांचा चक्रव्यूह आहे......
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही सरकार शाळा, कॉलेज बंद करण्यावर भर देतंय. पण त्यामुळे मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होतंय ते सरकारला समजत नाही का? असे प्रश्नही यातून निर्माण होतायत. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आणि लहान मुलांबद्दल आपण इतके संवेदनशील का असतो हे समजून घेण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागेल. राजकारणाचा नैतिक पाया या संकल्पनेत त्याचं उत्तर दडलंय.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही सरकार शाळा, कॉलेज बंद करण्यावर भर देतंय. पण त्यामुळे मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होतंय ते सरकारला समजत नाही का? असे प्रश्नही यातून निर्माण होतायत. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आणि लहान मुलांबद्दल आपण इतके संवेदनशील का असतो हे समजून घेण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागेल. राजकारणाचा नैतिक पाया या संकल्पनेत त्याचं उत्तर दडलंय......
कोरोना वायरसमुळे गेल्या वर्षभरात कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाली. वेंटिलेटर, बेड, ऑक्सिजनअभावी लोकांचा तडफडून मृत्यू झाला. सरकारची भूमिका मात्र सब चंगा सी अशीच होती. देश सुतकात असताना सरकार राजेशाही कार्यक्रमांमधे दंग होतं. या सगळ्या भानगडीत लोकांनी आपली ‘ती’ गोष्ट म्हणजेच विवेक कसा हरवलाय ते सांगतायत ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार.
कोरोना वायरसमुळे गेल्या वर्षभरात कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाली. वेंटिलेटर, बेड, ऑक्सिजनअभावी लोकांचा तडफडून मृत्यू झाला. सरकारची भूमिका मात्र सब चंगा सी अशीच होती. देश सुतकात असताना सरकार राजेशाही कार्यक्रमांमधे दंग होतं. या सगळ्या भानगडीत लोकांनी आपली ‘ती’ गोष्ट म्हणजेच विवेक कसा हरवलाय ते सांगतायत ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार......
२०२१ला बाय-बाय करण्याची वेळ आलीय. वर्षभरात अनेक घडामोडी घडल्यात. कोरोना वायरस होताच पण त्याच सोबतीनं बेरोजगारीचे आकडेही डोळे पांढरे करणारे होते. पेट्रोल-डिझेलसोबत महागाईही वाढत होती. सर्वसामान्य लोकांना मात्र याचा विसर पडला. भारतात नव्या कॅटेगरींचा झालेला उदय यामागचं खरं कारण होतं. त्याबद्दल सांगतायत ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार. त्यांच्या एनडीटीवीवरच्या प्राईम टाईमचं हे शब्दांकन.
२०२१ला बाय-बाय करण्याची वेळ आलीय. वर्षभरात अनेक घडामोडी घडल्यात. कोरोना वायरस होताच पण त्याच सोबतीनं बेरोजगारीचे आकडेही डोळे पांढरे करणारे होते. पेट्रोल-डिझेलसोबत महागाईही वाढत होती. सर्वसामान्य लोकांना मात्र याचा विसर पडला. भारतात नव्या कॅटेगरींचा झालेला उदय यामागचं खरं कारण होतं. त्याबद्दल सांगतायत ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार. त्यांच्या एनडीटीवीवरच्या प्राईम टाईमचं हे शब्दांकन......
तिसर्या लाटेची शक्यता विचारात घेऊन केंद्र सरकारने कोरोना उपचाराला कवच देणार्या विमा पॉलिसीचा कालावधी मार्च २०२२ पर्यंत वाढवलाय. कोरोना रक्षक आणि कोरोना कवच विमा पॉलिसी या बर्यापैकी स्वस्त विमा योजना आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित पेशंटची संख्या वाढत चाललीय. त्यामुळे आता अशा प्रकारच्या पॉलिसीची खरेदी करून कोरोनाच्या उपचाराला विमा सुरक्षा कवच घेणं गरजेचं आहे.
तिसर्या लाटेची शक्यता विचारात घेऊन केंद्र सरकारने कोरोना उपचाराला कवच देणार्या विमा पॉलिसीचा कालावधी मार्च २०२२ पर्यंत वाढवलाय. कोरोना रक्षक आणि कोरोना कवच विमा पॉलिसी या बर्यापैकी स्वस्त विमा योजना आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित पेशंटची संख्या वाढत चाललीय. त्यामुळे आता अशा प्रकारच्या पॉलिसीची खरेदी करून कोरोनाच्या उपचाराला विमा सुरक्षा कवच घेणं गरजेचं आहे......
कोरोना वायरसच्या ओमायक्रॉन या नव्या वेरियंटमुळे जगभरात पुन्हा काळजीचं वातावरण आहे. ओमायक्रोनमधे डेल्टा वेरियंटपेक्षा ५० प्रकारची म्युटेशन झाली असून, त्यामधली ३० ते ३२ प्रोटिनशी संबंधित आहेत. त्यामुळे त्याची मानवी पेशीला संसर्ग करण्याची क्षमता दुपटीने वाढलीय. हा वायरस आफ्रिकन खंडातून बदलून आल्यामुळे जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे.
कोरोना वायरसच्या ओमायक्रॉन या नव्या वेरियंटमुळे जगभरात पुन्हा काळजीचं वातावरण आहे. ओमायक्रोनमधे डेल्टा वेरियंटपेक्षा ५० प्रकारची म्युटेशन झाली असून, त्यामधली ३० ते ३२ प्रोटिनशी संबंधित आहेत. त्यामुळे त्याची मानवी पेशीला संसर्ग करण्याची क्षमता दुपटीने वाढलीय. हा वायरस आफ्रिकन खंडातून बदलून आल्यामुळे जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे......
कोरोना काळात हजारो लोकांना नोकर्यांना मुकावं लागलंय. कामावरून कमी करणार्या कंपनीकडून फारसं आर्थिक सहकार्य न मिळाल्याने नोकरदारांची स्थिती हलाखीची झाली. केंद्राने याची दखल घेत नोकरी गमावणार्या व्यक्तीला बेरोजगार भत्ता देण्याचं निश्चित केलं. केंद्र सरकारच्या योजनेनुसार कोरोना काळात एखाद्या कर्मचार्याची नोकरी गेली असेल, तर त्याला बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद करण्यात आलीय.
कोरोना काळात हजारो लोकांना नोकर्यांना मुकावं लागलंय. कामावरून कमी करणार्या कंपनीकडून फारसं आर्थिक सहकार्य न मिळाल्याने नोकरदारांची स्थिती हलाखीची झाली. केंद्राने याची दखल घेत नोकरी गमावणार्या व्यक्तीला बेरोजगार भत्ता देण्याचं निश्चित केलं. केंद्र सरकारच्या योजनेनुसार कोरोना काळात एखाद्या कर्मचार्याची नोकरी गेली असेल, तर त्याला बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद करण्यात आलीय......
कोरोना वायरसने जगाला काही धडे दिलेत. त्यातून नवनवी संशोधनं उभी राहिली. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एक नवं कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलंय. या सॉफ्टवेअरमुळे भविष्यात कोरोनासारखा एखादा साथरोग, त्याचे दमछाक करणारे वॅरियंट शोधणं सहज शक्य होईल या संशोधकांना वाटतंय. तसं झालं तर ही कम्प्युटर विज्ञानातली एक क्रांती ठरेल.
कोरोना वायरसने जगाला काही धडे दिलेत. त्यातून नवनवी संशोधनं उभी राहिली. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एक नवं कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलंय. या सॉफ्टवेअरमुळे भविष्यात कोरोनासारखा एखादा साथरोग, त्याचे दमछाक करणारे वॅरियंट शोधणं सहज शक्य होईल या संशोधकांना वाटतंय. तसं झालं तर ही कम्प्युटर विज्ञानातली एक क्रांती ठरेल......
२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे.
२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे......
कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत.
कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत......
कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने शाळा आणि धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतलाय. पण अनेकजण तिसर्या लाटेची भीती व्यक्त करतायत. वास्तविक सिरो सर्वेची आकडेवारी आणि झालेलं लसीकरण पाहता बहुसंख्य लोकांमधे अँटिबॉडी विकसित झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर बनलीय.
कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने शाळा आणि धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतलाय. पण अनेकजण तिसर्या लाटेची भीती व्यक्त करतायत. वास्तविक सिरो सर्वेची आकडेवारी आणि झालेलं लसीकरण पाहता बहुसंख्य लोकांमधे अँटिबॉडी विकसित झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर बनलीय......
गेल्या वर्षीच्या केरळमधल्या ओणम सणानंतर तिथं कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ झाली होती. याहीवर्षी केरळनं तोच अनुभव घेतलाय. महाराष्ट्रातही उत्सवांचा हंगाम सुरू होतोय. ओणमनंतर केरळला ठेच लागलीय. त्यातून महाराष्ट्रानं शहाणं होणं अपेक्षित आहे. येणार्या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलायला हवी. उत्सव साजरे करताना विवेकाचं भान ठेवायला हवं.
गेल्या वर्षीच्या केरळमधल्या ओणम सणानंतर तिथं कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ झाली होती. याहीवर्षी केरळनं तोच अनुभव घेतलाय. महाराष्ट्रातही उत्सवांचा हंगाम सुरू होतोय. ओणमनंतर केरळला ठेच लागलीय. त्यातून महाराष्ट्रानं शहाणं होणं अपेक्षित आहे. येणार्या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलायला हवी. उत्सव साजरे करताना विवेकाचं भान ठेवायला हवं......
स्वाईन फ्लू, प्लेग, इबोला, स्पॅनिश फ्लू अशा वेगवेगळ्या वायरसच्या साथी जगानं पाहिल्या. काही आल्या, काही गेल्या तर काहींनी पुन्हा डोकं वर काढलं. सध्या कोरोनाच्या वेगवेगळ्या लाटा जगभर येतायत. भारतातही कोरोनाची तिसरी लाट येतेय. वायरस कायम राहील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. अशातच डब्ल्यूएचओच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोना भारतात एंडेमिक अवस्थेला पोचल्याचं म्हटलंय.
स्वाईन फ्लू, प्लेग, इबोला, स्पॅनिश फ्लू अशा वेगवेगळ्या वायरसच्या साथी जगानं पाहिल्या. काही आल्या, काही गेल्या तर काहींनी पुन्हा डोकं वर काढलं. सध्या कोरोनाच्या वेगवेगळ्या लाटा जगभर येतायत. भारतातही कोरोनाची तिसरी लाट येतेय. वायरस कायम राहील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. अशातच डब्ल्यूएचओच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोना भारतात एंडेमिक अवस्थेला पोचल्याचं म्हटलंय......
आज ५ सप्टेंबर. राष्ट्रीय शिक्षक दिन. मुलांच्या अफाट गुणवत्तेला वाव मिळू शकेल, अशी शालेय शिक्षण प्रणाली अंगीकारणं ही काळाची गरज आहे. येणार्या पिढीला भविष्यातल्या आव्हानांसाठी तयार करताना शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीने मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी धोरणात्मक पावलं उचलावी लागतील. अंमलबजावणीत कणखरता दाखवावी लागेल.
आज ५ सप्टेंबर. राष्ट्रीय शिक्षक दिन. मुलांच्या अफाट गुणवत्तेला वाव मिळू शकेल, अशी शालेय शिक्षण प्रणाली अंगीकारणं ही काळाची गरज आहे. येणार्या पिढीला भविष्यातल्या आव्हानांसाठी तयार करताना शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीने मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी धोरणात्मक पावलं उचलावी लागतील. अंमलबजावणीत कणखरता दाखवावी लागेल......
कोरोनाचा सगळ्यात कमी धोका असणारा वयोगट लहान मुलांचाच आहे. शाळा उघडल्यामुळे आपल्या मुलांना धोका नाही, हे सांगणारे पुरावे वाढत आहेत. मुलांच्या आरोग्याचं रक्षण करण्याच्या अतिउत्साही प्रयत्नांमुळे आपण आपल्या मुलांना आवश्यक जीवन-कौशल्यांपासून आणि समग्र शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये, जे मुलांना केवळ स्वतः शाळेत गेल्यावरच मिळू शकतं.
कोरोनाचा सगळ्यात कमी धोका असणारा वयोगट लहान मुलांचाच आहे. शाळा उघडल्यामुळे आपल्या मुलांना धोका नाही, हे सांगणारे पुरावे वाढत आहेत. मुलांच्या आरोग्याचं रक्षण करण्याच्या अतिउत्साही प्रयत्नांमुळे आपण आपल्या मुलांना आवश्यक जीवन-कौशल्यांपासून आणि समग्र शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये, जे मुलांना केवळ स्वतः शाळेत गेल्यावरच मिळू शकतं......
इंडोनेशियातल्या एका गावात राहणाऱ्या असियांतो यांनी एक रोबोट बनवलाय. त्याला 'डेल्टा रोबोट' असं नावंही त्यांनी दिलंय. इंडोनेशिया सध्या आशियातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असताना टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला डेल्टा रोबोट घरपोच जेवण पोचवण्यासारखी कामं करतोय. त्यामुळेच कोरोना पेशंटसाठी तो वरदान ठरलाय.
इंडोनेशियातल्या एका गावात राहणाऱ्या असियांतो यांनी एक रोबोट बनवलाय. त्याला 'डेल्टा रोबोट' असं नावंही त्यांनी दिलंय. इंडोनेशिया सध्या आशियातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असताना टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला डेल्टा रोबोट घरपोच जेवण पोचवण्यासारखी कामं करतोय. त्यामुळेच कोरोना पेशंटसाठी तो वरदान ठरलाय......
पहिल्या, दुसऱ्या लाटेनंतर आता कोरोना वायरसच्या तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जातेय. लहान मुलं या लाटेचं लक्ष्य असतील असं म्हटलं जातंय. त्यामुळेच सरकारसोबतच पालकांचं टेंशनही वाढायला लागलंय. अशातच केंद्रीय आरोग्य खात्याने लहान मुलांच्या लसीकरणाचे संकेत दिलेत. कॅनडा, अमेरिकेनं तर लहान मुलांना लस द्यायला सुरवातही केलीय.
पहिल्या, दुसऱ्या लाटेनंतर आता कोरोना वायरसच्या तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जातेय. लहान मुलं या लाटेचं लक्ष्य असतील असं म्हटलं जातंय. त्यामुळेच सरकारसोबतच पालकांचं टेंशनही वाढायला लागलंय. अशातच केंद्रीय आरोग्य खात्याने लहान मुलांच्या लसीकरणाचे संकेत दिलेत. कॅनडा, अमेरिकेनं तर लहान मुलांना लस द्यायला सुरवातही केलीय......
कोरोना विरुद्धच्या लढ्यात इटलीने केलेल्या उपाययोजना जगभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अशातच संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करणाऱ्या इटलीतल्या एका वैज्ञानिक संशोधन केंद्रानं स्थानिक कंपनीच्या मदतीने एक लेझर मशीन आणलीय. या मशीनमुळे अवघ्या ५० सेकंदात हवेतला कोरोना वायरस नष्ट होईल असा दावा केला जातोय.
कोरोना विरुद्धच्या लढ्यात इटलीने केलेल्या उपाययोजना जगभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अशातच संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करणाऱ्या इटलीतल्या एका वैज्ञानिक संशोधन केंद्रानं स्थानिक कंपनीच्या मदतीने एक लेझर मशीन आणलीय. या मशीनमुळे अवघ्या ५० सेकंदात हवेतला कोरोना वायरस नष्ट होईल असा दावा केला जातोय......
केंद्राच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत देशातल्या ३ कोटी लोकांना कोरोनाची लागण झालीय. पण आयसीएमआरनं केलेल्या सिरो सर्वेत जवळपास २९ कोटी लोकांकडे कोरोनाच्या अँटीबॉडी असल्याचं समजलंय. असाच सिरो सर्वे मुंबईत झाला तेव्हा ५० टक्के मुलांना कोरोना होऊन गेल्याचं समोर आलं. हे आकडे धक्कादायक आहेत. कोरोनाच्या पाऊलखुणा ओळखायला हा सिरो सर्वे मदत करू शकतो.
केंद्राच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत देशातल्या ३ कोटी लोकांना कोरोनाची लागण झालीय. पण आयसीएमआरनं केलेल्या सिरो सर्वेत जवळपास २९ कोटी लोकांकडे कोरोनाच्या अँटीबॉडी असल्याचं समजलंय. असाच सिरो सर्वे मुंबईत झाला तेव्हा ५० टक्के मुलांना कोरोना होऊन गेल्याचं समोर आलं. हे आकडे धक्कादायक आहेत. कोरोनाच्या पाऊलखुणा ओळखायला हा सिरो सर्वे मदत करू शकतो......
पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झालाय. या डेल्टा प्लसवर लस काम करत नाही. त्यामुळे भारतात तिसरी लाट येणार आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सुरूय. हा डेल्टा प्लस पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीलाही निष्क्रिय करतोय असं काही निरीक्षणांवरून दिसून आलं असलं तरी त्यावर आताच्या लसी प्रभावी ठरतायत.
पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झालाय. या डेल्टा प्लसवर लस काम करत नाही. त्यामुळे भारतात तिसरी लाट येणार आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सुरूय. हा डेल्टा प्लस पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीलाही निष्क्रिय करतोय असं काही निरीक्षणांवरून दिसून आलं असलं तरी त्यावर आताच्या लसी प्रभावी ठरतायत......
भारतात सगळ्यात जास्त चर्चा चाललीय ती तिसऱ्या लाटेची. याबरोबरच अजून एक भीती सगळ्या भारतीयांमधे आहे ती म्हणजे तिसरी लाट लहान मुलांना अधिक घातक असेल का? कदाचित याचं उत्तर ‘हो’ असं असू शकतं. कारण, भारतामधल्या अजून एकाही लहान मुलाला लस मिळाली नाही आणि २०२१ च्या शेवटापर्यंत ती त्यांना मिळेल याची शक्यताही धूसर आहे.
भारतात सगळ्यात जास्त चर्चा चाललीय ती तिसऱ्या लाटेची. याबरोबरच अजून एक भीती सगळ्या भारतीयांमधे आहे ती म्हणजे तिसरी लाट लहान मुलांना अधिक घातक असेल का? कदाचित याचं उत्तर ‘हो’ असं असू शकतं. कारण, भारतामधल्या अजून एकाही लहान मुलाला लस मिळाली नाही आणि २०२१ च्या शेवटापर्यंत ती त्यांना मिळेल याची शक्यताही धूसर आहे. .....
पत्रकारितेतला नोबेल समजला जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची ११ जूनला घोषणा झाली. यावर्षी जॉर्ज फ्लॉईडची हत्या, ब्लॅक लाइव मॅटर चळवळ आणि कोरोना साथरोगाचं पडद्यामागचं सत्य सांगणाऱ्या पत्रकारांनीच बहुतेक पुरस्कार पटकावलेत. फक्त बातम्या नाहीत तर त्यापलीकडचे संदर्भ आणि दृष्टिकोन देणारे हे पत्रकार आहेत. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या जोसेफ पुलित्झर यांचा वारसा चालवणारे हे पत्रकार आहेत.
पत्रकारितेतला नोबेल समजला जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची ११ जूनला घोषणा झाली. यावर्षी जॉर्ज फ्लॉईडची हत्या, ब्लॅक लाइव मॅटर चळवळ आणि कोरोना साथरोगाचं पडद्यामागचं सत्य सांगणाऱ्या पत्रकारांनीच बहुतेक पुरस्कार पटकावलेत. फक्त बातम्या नाहीत तर त्यापलीकडचे संदर्भ आणि दृष्टिकोन देणारे हे पत्रकार आहेत. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या जोसेफ पुलित्झर यांचा वारसा चालवणारे हे पत्रकार आहेत......
शिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे.
शिवसेनेच्या वैद्यकिय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या मदत कक्षासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आजपर्यंत लाखो रुग्णांना उपचारासाठी निधी मिळालाय. त्यातल्या अनेकांचे प्राण वाचलेत. पत्रकारितेतली चांगली नोकरी सोडून रुग्णसेवेसाठी धावपळ करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याविषयी निवांतपणे वाचण्याचा आजचा दिवस आहे......
अनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या उत्तर प्रदेशमधे जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं ही सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सगळ्या आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय. त्यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय.
अनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या उत्तर प्रदेशमधे जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं ही सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सगळ्या आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय. त्यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय......
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा अर्थव्यवस्थेवरचा गंभीर परिणाम झालाय. महागाईबरोबरच बेरोजगारीची परिस्थिती चिंताजनक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्यतेलांच्या किमतीत दुपटीने वाढ झालीय. केंद्रीय अर्थसंकल्पात वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत आर्थिक तूट प्रचंड मोठी असू शकते. त्यासाठी केंद्र सरकारला अधिक कर्ज घ्यावं लागेल आणि त्यामुळे व्याजदर कमी पातळीवर ठेवणं अवघड होऊन बसेल.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा अर्थव्यवस्थेवरचा गंभीर परिणाम झालाय. महागाईबरोबरच बेरोजगारीची परिस्थिती चिंताजनक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्यतेलांच्या किमतीत दुपटीने वाढ झालीय. केंद्रीय अर्थसंकल्पात वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत आर्थिक तूट प्रचंड मोठी असू शकते. त्यासाठी केंद्र सरकारला अधिक कर्ज घ्यावं लागेल आणि त्यामुळे व्याजदर कमी पातळीवर ठेवणं अवघड होऊन बसेल......
गेल्यावर्षी जून महिन्यात कोरोना उपचारासाठी सर्व कंपन्यांनी कोरोना कवचच्या नावाने आरोग्य विमा लाँच केल्या होत्या. या विमा योजना कोरोनाच्या उपचारासाठी सुरू केल्या होत्या. या पॉलिसीनुसार किमान ५० हजार आणि कमाल ५ लाखांचं कवच मिळतं. कोरोना कवच पॉलिसीधारकांना चौदा दिवसापर्यंतच्या होम आयसोलेशनच्या उपचाराचा खर्चही मिळतो.
गेल्यावर्षी जून महिन्यात कोरोना उपचारासाठी सर्व कंपन्यांनी कोरोना कवचच्या नावाने आरोग्य विमा लाँच केल्या होत्या. या विमा योजना कोरोनाच्या उपचारासाठी सुरू केल्या होत्या. या पॉलिसीनुसार किमान ५० हजार आणि कमाल ५ लाखांचं कवच मिळतं. कोरोना कवच पॉलिसीधारकांना चौदा दिवसापर्यंतच्या होम आयसोलेशनच्या उपचाराचा खर्चही मिळतो......
लॉकडाऊनचा विचार केला तर जगभरात वेगवेगळं चित्र दिसतं. परदेशातल्या लॉकडाऊनची स्थिती आपल्यापेक्षा वेगळी आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या सारख्या विकसित देशातली जनता मुळात शिस्तप्रिय आहे. तिथंही आपल्या सारखी गजबज असते. पण त्यात एक शिस्त असल्याचं जाणवतं. आपल्याकडे मात्र ’ब्रेक द चेन’चा अर्थ कुणालाच समजलेला नाही, किंवा समजूनही आपण त्याकडे दुर्लक्ष केलंय.
लॉकडाऊनचा विचार केला तर जगभरात वेगवेगळं चित्र दिसतं. परदेशातल्या लॉकडाऊनची स्थिती आपल्यापेक्षा वेगळी आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या सारख्या विकसित देशातली जनता मुळात शिस्तप्रिय आहे. तिथंही आपल्या सारखी गजबज असते. पण त्यात एक शिस्त असल्याचं जाणवतं. आपल्याकडे मात्र ’ब्रेक द चेन’चा अर्थ कुणालाच समजलेला नाही, किंवा समजूनही आपण त्याकडे दुर्लक्ष केलंय......
आज ५ जून. जागतिक पर्यावरण दिवस. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे भारतातलं पर्यावरण, हवेचा दर्जा, पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. याशिवाय, कार्बन उत्सर्जन, कचरा, नद्यांचं प्रदुषणही कमी झालंय. वर्षभरातली ही बेरीज वजाबाकी समजून घेताना पुढच्या वर्षात कोणत्या सवयींचा गुणाकार करायचा याचं साधं सोपं गणित मांडणारा यंदाचा पर्यावरण दिवस आहे.
आज ५ जून. जागतिक पर्यावरण दिवस. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे भारतातलं पर्यावरण, हवेचा दर्जा, पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. याशिवाय, कार्बन उत्सर्जन, कचरा, नद्यांचं प्रदुषणही कमी झालंय. वर्षभरातली ही बेरीज वजाबाकी समजून घेताना पुढच्या वर्षात कोणत्या सवयींचा गुणाकार करायचा याचं साधं सोपं गणित मांडणारा यंदाचा पर्यावरण दिवस आहे......
कोरोना वायरसच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झालीय. पुढचं लक्ष्य लहान मुलं असतील असं म्हटलं जातंय. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे काही दिवे लावलेत त्याची दखल थेट आंतरराष्ट्रीय मीडियानं घेतलीय. आपलं हसं झालंय. या लाटांनी अर्थव्यवस्थेलाही फटका दिलाय. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचायचं तर पुढचे धोके समजून घेऊन तसं नियोजन करावं लागेल.
कोरोना वायरसच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झालीय. पुढचं लक्ष्य लहान मुलं असतील असं म्हटलं जातंय. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे काही दिवे लावलेत त्याची दखल थेट आंतरराष्ट्रीय मीडियानं घेतलीय. आपलं हसं झालंय. या लाटांनी अर्थव्यवस्थेलाही फटका दिलाय. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचायचं तर पुढचे धोके समजून घेऊन तसं नियोजन करावं लागेल......
भारतातला बी १.६१७ हा कोरोना वायरसचा नवा वेरियंट जगातल्या ४४ देशांमधे पसरलाय. त्याचा संसर्गही वेगाने वाढतोय. हा धोका लक्षात घेऊन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं त्याला 'वायरस ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं. जगभरातला मीडिया त्याला 'भारतीय वेरियंट' म्हणत असताना भारताचं आरोग्य खातं मात्र त्यावर आक्षेप घेतंय. पण त्यामुळे वेरियंटचा धोका कमी होत नाही.
भारतातला बी १.६१७ हा कोरोना वायरसचा नवा वेरियंट जगातल्या ४४ देशांमधे पसरलाय. त्याचा संसर्गही वेगाने वाढतोय. हा धोका लक्षात घेऊन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं त्याला 'वायरस ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं. जगभरातला मीडिया त्याला 'भारतीय वेरियंट' म्हणत असताना भारताचं आरोग्य खातं मात्र त्यावर आक्षेप घेतंय. पण त्यामुळे वेरियंटचा धोका कमी होत नाही......
कोरोनातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमधे काही व्यक्तींंमधे म्युकर मायकोसिस हा गंभीर आजार आढळून येतोय. या बुरशीजन्य आजाराचा शरीरात पसरण्याचा वेग कॅन्सरपेक्षा जवळपास दहा पटींनी अधिक असतो. त्यामुळेच याचं गांभीर्य ओळखायला हवं. आजाराची लक्षण असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोरोनातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमधे काही व्यक्तींंमधे म्युकर मायकोसिस हा गंभीर आजार आढळून येतोय. या बुरशीजन्य आजाराचा शरीरात पसरण्याचा वेग कॅन्सरपेक्षा जवळपास दहा पटींनी अधिक असतो. त्यामुळेच याचं गांभीर्य ओळखायला हवं. आजाराची लक्षण असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा......
कोरोना लसीच्या उत्पादनाचा वेग वाढावा यासाठी मुंबईतल्या हाफकिन इन्स्टिट्यूटला लस उत्पादनासाठी परवानगी मिळालीय. भारतातल्या संशोधनावर आधारलेली भारतातच निर्मिती झालेली प्लेगची पहिली लस या संस्थेनं काढली होती. यासारख्या अनेक लसींवर हाफकिन आपल्या छाप उमटवला. पण त्यानंतरच्या काळात सरकारी अनास्थेमुळे सुरु झालेली संस्थेची वाताहत अगदी आजही सुरू आहे.
कोरोना लसीच्या उत्पादनाचा वेग वाढावा यासाठी मुंबईतल्या हाफकिन इन्स्टिट्यूटला लस उत्पादनासाठी परवानगी मिळालीय. भारतातल्या संशोधनावर आधारलेली भारतातच निर्मिती झालेली प्लेगची पहिली लस या संस्थेनं काढली होती. यासारख्या अनेक लसींवर हाफकिन आपल्या छाप उमटवला. पण त्यानंतरच्या काळात सरकारी अनास्थेमुळे सुरु झालेली संस्थेची वाताहत अगदी आजही सुरू आहे......
उत्तर प्रदेश, बिहार राज्यात गंगा नदीत मृतदेह तरंगताना दिसले. या कोरोनाच्या काळात भारताची परिस्थिती इतकी वाईट झालीय की जिवंतपणी ऑक्सिजन, बेड, औषधं आणि मेल्यानंतर जाळायला लाकडंही उपलब्ध होत नाहीत. संविधानात, कायद्यात जिवंत माणसांसाठी तरतूद आहे. पण मेल्यानंतर काय? मेलेल्या माणसाला, एखाद्या मृतदेहालाही असे कायदेशीर अधिकार असतात का?
उत्तर प्रदेश, बिहार राज्यात गंगा नदीत मृतदेह तरंगताना दिसले. या कोरोनाच्या काळात भारताची परिस्थिती इतकी वाईट झालीय की जिवंतपणी ऑक्सिजन, बेड, औषधं आणि मेल्यानंतर जाळायला लाकडंही उपलब्ध होत नाहीत. संविधानात, कायद्यात जिवंत माणसांसाठी तरतूद आहे. पण मेल्यानंतर काय? मेलेल्या माणसाला, एखाद्या मृतदेहालाही असे कायदेशीर अधिकार असतात का?.....
गुंतवणूकदारांसाठी शेअर मार्केट हा उत्तम पर्याय असतो. काळजीपूर्वक गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारा परतावा हमखास फायद्याचा ठरतो. गेल्यावर्षी अर्थव्यवस्थेची घसरण होत असताना शेअर मार्केट तेजीत होतं. कंपन्यांच्या नफ्यात कित्येक पटीने वाढ होत होती. यावर्षी मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला फटका बसताना इतर देश यातून हळूहळू बाहेर पडतायत. या सगळ्याचा फटका शेअर मार्केटला बसतोय.
गुंतवणूकदारांसाठी शेअर मार्केट हा उत्तम पर्याय असतो. काळजीपूर्वक गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारा परतावा हमखास फायद्याचा ठरतो. गेल्यावर्षी अर्थव्यवस्थेची घसरण होत असताना शेअर मार्केट तेजीत होतं. कंपन्यांच्या नफ्यात कित्येक पटीने वाढ होत होती. यावर्षी मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला फटका बसताना इतर देश यातून हळूहळू बाहेर पडतायत. या सगळ्याचा फटका शेअर मार्केटला बसतोय......
महाराष्ट्रातले निम्म्याहून अधिक लोक शहरांमधे राहतात. या सगळ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणं आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका मुंबई मॉडेलने आपलं भागणार नाही. सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल आपल्याला राज्यातल्या प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावांमधे उभं करण्याची गरज आहे. मुंबईच्या यशाने आपण त्या दिशेने अधिक दमदार पावलं टाकू याची खात्री आहे.
महाराष्ट्रातले निम्म्याहून अधिक लोक शहरांमधे राहतात. या सगळ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभी करणं आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका मुंबई मॉडेलने आपलं भागणार नाही. सार्वजनिक आरोग्याचं सर्वांगीण मॉडेल आपल्याला राज्यातल्या प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावांमधे उभं करण्याची गरज आहे. मुंबईच्या यशाने आपण त्या दिशेने अधिक दमदार पावलं टाकू याची खात्री आहे......
सध्या तरी देशाचं एकूणच जीवन कोरोनानं व्यापून टाकलंय. बारकाईने विचार केला तर भयानक परिस्थितीचं विश्लेषण करणारी एकच बाजू समाजापुढे येत आहे. दुसर्या बाजूचा विचार फारसा होताना दिसत नाही. आपली कामगिरी सरस दिसतेय. पण ती केवळ सांत्वना आहे, समस्येचं समाधान मुळीच नाही हे मात्र विसरता नये.
सध्या तरी देशाचं एकूणच जीवन कोरोनानं व्यापून टाकलंय. बारकाईने विचार केला तर भयानक परिस्थितीचं विश्लेषण करणारी एकच बाजू समाजापुढे येत आहे. दुसर्या बाजूचा विचार फारसा होताना दिसत नाही. आपली कामगिरी सरस दिसतेय. पण ती केवळ सांत्वना आहे, समस्येचं समाधान मुळीच नाही हे मात्र विसरता नये......
आयपीएल हा टीआरपी क्षेत्रातला सगळ्यात मोठा भारतीय ब्रँड आहे. त्यामुळे अनेक उत्पादनं आणि सेवा या ब्रँडचा वापर करुन आपले उखळ पांढरे करुन घेत असतात. कोरोनामुळे आयपीएलचा १४ वा हंगाम मध्यावरच थांबवावा लागल्याने जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
आयपीएल हा टीआरपी क्षेत्रातला सगळ्यात मोठा भारतीय ब्रँड आहे. त्यामुळे अनेक उत्पादनं आणि सेवा या ब्रँडचा वापर करुन आपले उखळ पांढरे करुन घेत असतात. कोरोनामुळे आयपीएलचा १४ वा हंगाम मध्यावरच थांबवावा लागल्याने जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता वर्तवली जातेय......
प्रसिद्ध संगीतकार आणि लेखक टी. एम. कृष्णा यांनी इंडियन एक्सप्रेसला लेख लिहिला आहे. कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका सगळ्यांनाच बसतोय. वेळीच पावलं उचलली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं म्हणणं आहे. भारताविषयी प्रेम, आस्था, काळजी असेल तर तुम्ही बोलाल असं म्हणत त्यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साद घातलीय. त्यांच्या लेखाचा श्रीरंजन आवटे यांनी केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय.
प्रसिद्ध संगीतकार आणि लेखक टी. एम. कृष्णा यांनी इंडियन एक्सप्रेसला लेख लिहिला आहे. कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका सगळ्यांनाच बसतोय. वेळीच पावलं उचलली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं म्हणणं आहे. भारताविषयी प्रेम, आस्था, काळजी असेल तर तुम्ही बोलाल असं म्हणत त्यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साद घातलीय. त्यांच्या लेखाचा श्रीरंजन आवटे यांनी केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय......
लॅन्सेट हे जगप्रसिद्ध आरोग्यविषयक मॅगझिन आहे. या मॅगझिनमधे ८ मेला भारतातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करणारं संपादकीय आलंय. भारतातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या काही चुका झाल्यात त्याला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवण्यात आलंय. हे असंच चालू राहिलं तर १ ऑगस्टपर्यंत भारतात कोरोनामुळे १० लाख मृत्यू होऊ शकतात असा इशारा लॅन्सेटनं दिलाय.
लॅन्सेट हे जगप्रसिद्ध आरोग्यविषयक मॅगझिन आहे. या मॅगझिनमधे ८ मेला भारतातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करणारं संपादकीय आलंय. भारतातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या काही चुका झाल्यात त्याला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवण्यात आलंय. हे असंच चालू राहिलं तर १ ऑगस्टपर्यंत भारतात कोरोनामुळे १० लाख मृत्यू होऊ शकतात असा इशारा लॅन्सेटनं दिलाय......
जगभर कोरोनामुळे जे काही मृत्यू होतायत त्याला शरीरातलं सायटोकाइन प्रोटिन कारण ठरतंय. हे प्रोटिन खरंतर शरीरातली रोगप्रतिकार शक्ती वाढवायला मदत करतं. पण एकाएकी सायटोकाइनचं स्वतःवरचं नियंत्रण सुटतं. या अवस्थेला सायटोकाइन स्टॉर्म म्हटलं जातं. अशावेळी रोगप्रतिकार शक्ती जास्तच सक्रिय होते. रोगाशी लढण्याऐवजी ती आपल्या शरीराचं नुकसान करायला सुरवात करते.
जगभर कोरोनामुळे जे काही मृत्यू होतायत त्याला शरीरातलं सायटोकाइन प्रोटिन कारण ठरतंय. हे प्रोटिन खरंतर शरीरातली रोगप्रतिकार शक्ती वाढवायला मदत करतं. पण एकाएकी सायटोकाइनचं स्वतःवरचं नियंत्रण सुटतं. या अवस्थेला सायटोकाइन स्टॉर्म म्हटलं जातं. अशावेळी रोगप्रतिकार शक्ती जास्तच सक्रिय होते. रोगाशी लढण्याऐवजी ती आपल्या शरीराचं नुकसान करायला सुरवात करते......
भारतात मागच्या १८ दिवसांमधे रोज तीन लाखांपेक्षा अधिक कोरोना पेशंट आढळून आलेत. मागच्या चार दिवसांमधे रोजचा आकडा ४ लाखांवर पोचलाय. रोज ३ हजारांपेक्षा अधिक मृत्यू होतायत. दुसरीकडे आकडे लपवले जात असल्याचे आरोप होत आहेत. त्यासाठी केवळ व्यवस्थेला दोष देऊन काही होणार नाही. त्याची मूळ कारणंही शोधायला हवीत.
भारतात मागच्या १८ दिवसांमधे रोज तीन लाखांपेक्षा अधिक कोरोना पेशंट आढळून आलेत. मागच्या चार दिवसांमधे रोजचा आकडा ४ लाखांवर पोचलाय. रोज ३ हजारांपेक्षा अधिक मृत्यू होतायत. दुसरीकडे आकडे लपवले जात असल्याचे आरोप होत आहेत. त्यासाठी केवळ व्यवस्थेला दोष देऊन काही होणार नाही. त्याची मूळ कारणंही शोधायला हवीत. .....
पश्चिम बंगालमधली निवडणुकीची रणधुमाळी विशेष ठरली. एकीकडे ममता बॅनर्जी तर दुसरीकडे त्यांना हरवण्यासाठी मैदानात उतरलेली मोदी-शहा जोडगोळी. या जोडीच्या विखारी प्रचाराला बंगाली जनतेनं चपराक दिली. कशी ते सांगतायत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा. न्यूयॉर्क टाइम्समधे प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखाची अनंत घोटगाळकर यांनी अनुवादित केलेली ही फेसबुक पोस्ट.
पश्चिम बंगालमधली निवडणुकीची रणधुमाळी विशेष ठरली. एकीकडे ममता बॅनर्जी तर दुसरीकडे त्यांना हरवण्यासाठी मैदानात उतरलेली मोदी-शहा जोडगोळी. या जोडीच्या विखारी प्रचाराला बंगाली जनतेनं चपराक दिली. कशी ते सांगतायत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा. न्यूयॉर्क टाइम्समधे प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखाची अनंत घोटगाळकर यांनी अनुवादित केलेली ही फेसबुक पोस्ट......
प्यारे खान यांचं नाव सध्या चर्चेत आहे. ते भारतातले टॉपचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. रिक्षा चालक ते ६०० कोटींचा मालक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सध्या ते आपला सगळा व्यवसाय सोडून कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलेत. नागपूर आणि विदर्भातल्या अनेक हॉस्पिटलमधे आतापर्यंत त्यांनी ४०० मेट्रिक टन इतका ऑक्सिजन मोफत पोचवलाय.
प्यारे खान यांचं नाव सध्या चर्चेत आहे. ते भारतातले टॉपचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. रिक्षा चालक ते ६०० कोटींचा मालक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सध्या ते आपला सगळा व्यवसाय सोडून कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलेत. नागपूर आणि विदर्भातल्या अनेक हॉस्पिटलमधे आतापर्यंत त्यांनी ४०० मेट्रिक टन इतका ऑक्सिजन मोफत पोचवलाय......
कोरोनाची सगळी लक्षणं दिसत असतानाही पेशंटची आरटीपीसीआर टेस्ट अनेकदा निगेटिव येते. यालाच फॉल्स निगेटिव असं म्हणतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अशी फॉल्स निगेटिव रिझल्ट येणाऱ्यांची संख्या फार वाढलीय. निगेटिव रिझल्टमुळे पेशंटना उपचार मिळायलाही उशीर होतोय.
कोरोनाची सगळी लक्षणं दिसत असतानाही पेशंटची आरटीपीसीआर टेस्ट अनेकदा निगेटिव येते. यालाच फॉल्स निगेटिव असं म्हणतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अशी फॉल्स निगेटिव रिझल्ट येणाऱ्यांची संख्या फार वाढलीय. निगेटिव रिझल्टमुळे पेशंटना उपचार मिळायलाही उशीर होतोय. .....
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढलाय. अशातच संरक्षण मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतलाय. कोरोनात मदत व्हावी म्हणून सैन्याला तातडीचे आर्थिक अधिकार देण्यात आलेत. त्यातून हॉस्पिटल, बेड आणि इतर आवश्यक वैद्यकीय गरजा सैन्य आपल्या स्तरावर पूर्ण करू शकेल. पण केवळ त्यावर विसंबून राहून चालणार नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढलाय. अशातच संरक्षण मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतलाय. कोरोनात मदत व्हावी म्हणून सैन्याला तातडीचे आर्थिक अधिकार देण्यात आलेत. त्यातून हॉस्पिटल, बेड आणि इतर आवश्यक वैद्यकीय गरजा सैन्य आपल्या स्तरावर पूर्ण करू शकेल. पण केवळ त्यावर विसंबून राहून चालणार नाही......
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मरणारे अनेक लोक कोरोनाने मेले, असं म्हणता येणार नाही. कारण या लोकांना वेळेत ऑक्सिजन, वेंटिलेटर, औषधं आणि हॉस्पिटलमधे बेड मिळाले असते तर यापैकी अनेकांचे जीव वाचू शकले असते. मुळात कोरोनाला देशात पाय पसरायला मिळाला तो मोदींच्या नाकर्तेपणामुळे आणि स्वार्थी राजकारणामुळेच.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मरणारे अनेक लोक कोरोनाने मेले, असं म्हणता येणार नाही. कारण या लोकांना वेळेत ऑक्सिजन, वेंटिलेटर, औषधं आणि हॉस्पिटलमधे बेड मिळाले असते तर यापैकी अनेकांचे जीव वाचू शकले असते. मुळात कोरोनाला देशात पाय पसरायला मिळाला तो मोदींच्या नाकर्तेपणामुळे आणि स्वार्थी राजकारणामुळेच......
मासिक पाळीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये, असं सांगणारा एक मेसेज वायरल झाला होता. पाळीत बाई निगेटिव वेवमधे किंवा मॅग्नेटिक फिल्डमधे असते अशी वरवर वैज्ञानिक वाटणारी माहितीही सतत दिली जाते. विज्ञानातल्या संकल्पना वापरून पाळीच्या अंधश्रद्धा कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याची धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे याचा शोध घ्यायला हवा.
मासिक पाळीत रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने लस घेऊ नये, असं सांगणारा एक मेसेज वायरल झाला होता. पाळीत बाई निगेटिव वेवमधे किंवा मॅग्नेटिक फिल्डमधे असते अशी वरवर वैज्ञानिक वाटणारी माहितीही सतत दिली जाते. विज्ञानातल्या संकल्पना वापरून पाळीच्या अंधश्रद्धा कशा वैज्ञानिक आहेत हे दाखवण्याची धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे याचा शोध घ्यायला हवा......
कोरोनामुळे महाराष्ट्रात शुटिंग शक्य नसल्यामुळे अनेक टीवी सिरियलवाले गोव्यात गेले. पर्यटक तर जातच होते. त्यामुळे गोव्यात नेहमीप्रमाणे सगळं सुशेगाद असेल असं चित्र निर्माण झालं. पण अचानक तिथे तीन दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे याला धक्का बसला. गोव्यात ही वेळ आली तरी कशामुळे?
कोरोनामुळे महाराष्ट्रात शुटिंग शक्य नसल्यामुळे अनेक टीवी सिरियलवाले गोव्यात गेले. पर्यटक तर जातच होते. त्यामुळे गोव्यात नेहमीप्रमाणे सगळं सुशेगाद असेल असं चित्र निर्माण झालं. पण अचानक तिथे तीन दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे याला धक्का बसला. गोव्यात ही वेळ आली तरी कशामुळे?.....
ज्यांच्याकडे कोरोनाशी निगडित विमा योजना आहेत, त्या कंपन्या लसीकरणानंतर होणार्या उपचाराचा खर्च देत आहेत. पण सामान्य आरोग्य विमा पॉलिसीधारकांना मात्र खर्च द्यायला काही कंपन्या नकार देतायत. ही गोष्ट विमा नियामक संस्था इर्डाच्या समोर आल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलत सर्व विमा कंपन्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
ज्यांच्याकडे कोरोनाशी निगडित विमा योजना आहेत, त्या कंपन्या लसीकरणानंतर होणार्या उपचाराचा खर्च देत आहेत. पण सामान्य आरोग्य विमा पॉलिसीधारकांना मात्र खर्च द्यायला काही कंपन्या नकार देतायत. ही गोष्ट विमा नियामक संस्था इर्डाच्या समोर आल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलत सर्व विमा कंपन्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत......
एकीकडे कोरोनाचे आकडे वाढत होते आणि आपले राजकीय नेते सभांमधे दंग होते. गर्दी जमवली जात होती. कोरोना प्रोटोकॉलचा फज्जा उडाला. दुसरीकडे हॉस्पिटल, बेड, ऑक्सिजनसाठी देशभर माणसं वणवण भटकतायत. राजकीय नेत्यांच्या बेफिकीरीला वेळीच लगाम घालण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर होती. त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळेच मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं.
एकीकडे कोरोनाचे आकडे वाढत होते आणि आपले राजकीय नेते सभांमधे दंग होते. गर्दी जमवली जात होती. कोरोना प्रोटोकॉलचा फज्जा उडाला. दुसरीकडे हॉस्पिटल, बेड, ऑक्सिजनसाठी देशभर माणसं वणवण भटकतायत. राजकीय नेत्यांच्या बेफिकीरीला वेळीच लगाम घालण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर होती. त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळेच मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं......
कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलंय. जनतेच्या मनातून सर्वच राजकीय नेते उतरलेत. डोळ्यासमोर हजारो लोक मरतायत. जनतेच्या मनातला व्यवस्थेवरचा विश्वासही उडू लागलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मागच्या खूर्चीवर बसून काही महिने डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ञांना निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत. त्यांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होते का ते पहावं.
कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलंय. जनतेच्या मनातून सर्वच राजकीय नेते उतरलेत. डोळ्यासमोर हजारो लोक मरतायत. जनतेच्या मनातला व्यवस्थेवरचा विश्वासही उडू लागलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मागच्या खूर्चीवर बसून काही महिने डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ञांना निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत. त्यांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होते का ते पहावं......
मागच्या १० वर्षांमधे जगभरातल्या बालविवाहाच्या संख्येत १५ टक्क्यांची घट पहायला मिळाली. पण कोरोना साथीनं एक नवं संकट उभं केलंय. मागच्या महिन्यात युनिसेफचा 'कोविड १९ - अ थ्रेट टू प्रोग्रेस अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज' रिपोर्ट आलाय. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक, सामाजिक संकटामुळे पुढच्या दशकभरात १ कोटी बालविवाह होऊ शकतात असं यात म्हटलंय.
मागच्या १० वर्षांमधे जगभरातल्या बालविवाहाच्या संख्येत १५ टक्क्यांची घट पहायला मिळाली. पण कोरोना साथीनं एक नवं संकट उभं केलंय. मागच्या महिन्यात युनिसेफचा 'कोविड १९ - अ थ्रेट टू प्रोग्रेस अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज' रिपोर्ट आलाय. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक, सामाजिक संकटामुळे पुढच्या दशकभरात १ कोटी बालविवाह होऊ शकतात असं यात म्हटलंय......
नॉर्वेच्या पंतप्रधान एरना सोलबर्ग यांच्या बर्थडेला कौटुंबिक पार्टी करण्यात केली. तिथं कोरोनामुळे जमावबंदी असल्याने त्यांना दंड आकारण्यात आला. सोलबर्ग यांनी चूक मान्य केली. जाहीर माफीही मागितली. भारतात कोरोनामुळे मृत्यूचा आकडा दोन लाखांवर पोचत असताना आपले पंतप्रधान मात्र निवडणुकांमधे व्यस्त आहेत.
नॉर्वेच्या पंतप्रधान एरना सोलबर्ग यांच्या बर्थडेला कौटुंबिक पार्टी करण्यात केली. तिथं कोरोनामुळे जमावबंदी असल्याने त्यांना दंड आकारण्यात आला. सोलबर्ग यांनी चूक मान्य केली. जाहीर माफीही मागितली. भारतात कोरोनामुळे मृत्यूचा आकडा दोन लाखांवर पोचत असताना आपले पंतप्रधान मात्र निवडणुकांमधे व्यस्त आहेत. .....
फेब्रुवारीत देशातल्या पाच राज्यांमधे निवडणुकीची घोषणा झाली. राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांनी वातावरण तापलं. लाखोंच्या सभा झाल्या. त्याचवेळी या राज्यांमधल्या कोरोना पेशंटच्या संख्येत कित्येक पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. गेल्या तीन दिवसात कोरोनाच्या आकडेवारीत रोज दोन लाखाची भर पडतेय. निवडणूक आयोगाच्या निवडणुकीतल्या कोरोना गाईडलाईनचे राजकीय पक्षांनी तीनतेरा वाजवलेत.
फेब्रुवारीत देशातल्या पाच राज्यांमधे निवडणुकीची घोषणा झाली. राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांनी वातावरण तापलं. लाखोंच्या सभा झाल्या. त्याचवेळी या राज्यांमधल्या कोरोना पेशंटच्या संख्येत कित्येक पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. गेल्या तीन दिवसात कोरोनाच्या आकडेवारीत रोज दोन लाखाची भर पडतेय. निवडणूक आयोगाच्या निवडणुकीतल्या कोरोना गाईडलाईनचे राजकीय पक्षांनी तीनतेरा वाजवलेत. .....
'लॉकडाऊन'ला पर्याय म्हणून लसीकरण वेगाने वाढवा, असं सांगितलं जातंय. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हे महत्त्वाचं पूरक पाऊल आहे. मात्र सध्याच्या लाटेतून निर्माण झालेल्या आजच्या महत्त्वाच्या प्रश्नावर हॉस्पिटल खाटांच्या तुडवड्यावर लसीकरण ताबडतोबीचं उत्तर नाही. लसीमुळे प्रसार थांबतो, असा त्या कंपन्यांचाही दावा नाहीय. डॉ. अनंत फडके यांचा हा वायरल होत असलेला लेख इथं देत आहोत.
'लॉकडाऊन'ला पर्याय म्हणून लसीकरण वेगाने वाढवा, असं सांगितलं जातंय. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हे महत्त्वाचं पूरक पाऊल आहे. मात्र सध्याच्या लाटेतून निर्माण झालेल्या आजच्या महत्त्वाच्या प्रश्नावर हॉस्पिटल खाटांच्या तुडवड्यावर लसीकरण ताबडतोबीचं उत्तर नाही. लसीमुळे प्रसार थांबतो, असा त्या कंपन्यांचाही दावा नाहीय. डॉ. अनंत फडके यांचा हा वायरल होत असलेला लेख इथं देत आहोत......
‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा.
‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा......
लसींची खरेदी, आयात, तिचं वितरण यांचे अधिकार केंद्राने आपल्या हाती एकवटून ठेवण्याऐवजी राज्यांना द्यायला हवे. १६ जानेवारीला लसीकरण सुरू झालं तेव्हा लस उत्सव समजून घेता आला असता. मात्र आज देशात लशींची टंचाई असताना लस-उत्सव म्हणजे जनतेला केंद्र सरकारला धारेवर धरण्याची संधी देणारे ‘टीका उत्सव’ साजरे करण्यासारखं आहे.
लसींची खरेदी, आयात, तिचं वितरण यांचे अधिकार केंद्राने आपल्या हाती एकवटून ठेवण्याऐवजी राज्यांना द्यायला हवे. १६ जानेवारीला लसीकरण सुरू झालं तेव्हा लस उत्सव समजून घेता आला असता. मात्र आज देशात लशींची टंचाई असताना लस-उत्सव म्हणजे जनतेला केंद्र सरकारला धारेवर धरण्याची संधी देणारे ‘टीका उत्सव’ साजरे करण्यासारखं आहे......
सध्या कोरोनावरच्या रेमडेसिविर या औषधाची सगळीकडे चर्चा आहे. कोरोना पेशंटची संख्या वाढल्यामुळे औषधाच्या मागणीतही वाढ झालीय. त्यासाठी मेडिकल बाहेर लांबच लांब रांगा लागतायत. भरमसाठ किंमत आकारली जातेय. रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने औषधाची निर्यातही थांबवलीय. पेशंटला एवढं विश्वासार्ह वाटणारं हे औषध खरंच कोरोनावर काम करतं का?
सध्या कोरोनावरच्या रेमडेसिविर या औषधाची सगळीकडे चर्चा आहे. कोरोना पेशंटची संख्या वाढल्यामुळे औषधाच्या मागणीतही वाढ झालीय. त्यासाठी मेडिकल बाहेर लांबच लांब रांगा लागतायत. भरमसाठ किंमत आकारली जातेय. रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने औषधाची निर्यातही थांबवलीय. पेशंटला एवढं विश्वासार्ह वाटणारं हे औषध खरंच कोरोनावर काम करतं का?.....
कोरोनाचा परिणाम आपल्यावर होतोय, तसा आपल्या मुलांवरही होतोय. कोरोनामुळे घराच्या चार भींतींबाहेरचं जग यातल्या अनेकांनी पाहिलेलंही नाहीय, अशी मुलं कोरोनानं घडवलेल्या या पॅनडेमिक जनरेशनमधे आहेत. तशीच शाळा बंद पडल्यामुळे मजुरीवर जाणारी मुलंही याच जनरेशनची आहेत. आणखी २० वर्षांनी या पॅनडेमिक जनरेशनच्या माध्यमातून कोरोना आपल्या प्रत्येक गोष्टीवर छाप पडत राहणार, यात शंका नाही.
कोरोनाचा परिणाम आपल्यावर होतोय, तसा आपल्या मुलांवरही होतोय. कोरोनामुळे घराच्या चार भींतींबाहेरचं जग यातल्या अनेकांनी पाहिलेलंही नाहीय, अशी मुलं कोरोनानं घडवलेल्या या पॅनडेमिक जनरेशनमधे आहेत. तशीच शाळा बंद पडल्यामुळे मजुरीवर जाणारी मुलंही याच जनरेशनची आहेत. आणखी २० वर्षांनी या पॅनडेमिक जनरेशनच्या माध्यमातून कोरोना आपल्या प्रत्येक गोष्टीवर छाप पडत राहणार, यात शंका नाही......
गेल्यावर्षी डिसेंबरपासून कोरोनाबाधितांचे आकडे कमी व्हायला लागले. तसं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल हलगर्जीपणा दिसून आला. हा हलगर्जीपणा दुसर्या लाटेच्या रूपाने आव्हान म्हणून उभा राहिलाय. आज देशात दररोज सापडणार्या कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊन पोचलाय. महाराष्ट्रात दिवसात ५५ ते ६० हजार पेशंटची भर पडतेय. यामागे तीन प्रमुख कारणं आहेत.
गेल्यावर्षी डिसेंबरपासून कोरोनाबाधितांचे आकडे कमी व्हायला लागले. तसं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल हलगर्जीपणा दिसून आला. हा हलगर्जीपणा दुसर्या लाटेच्या रूपाने आव्हान म्हणून उभा राहिलाय. आज देशात दररोज सापडणार्या कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊन पोचलाय. महाराष्ट्रात दिवसात ५५ ते ६० हजार पेशंटची भर पडतेय. यामागे तीन प्रमुख कारणं आहेत......
भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलीय. महाराष्ट्र देशातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. रोज ५० हजार पेशंटचा आकडा पार होतोय. युरोप आणि अमेरिकेने गेल्यावर्षी दुसऱ्या लाटेचा अनुभव घेतलाय. या लाटेमुळे आरोग्य सुविधांवर ताण पडला. आपणही सध्या त्याच स्थितीतून जात आहोत.
भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलीय. महाराष्ट्र देशातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. रोज ५० हजार पेशंटचा आकडा पार होतोय. युरोप आणि अमेरिकेने गेल्यावर्षी दुसऱ्या लाटेचा अनुभव घेतलाय. या लाटेमुळे आरोग्य सुविधांवर ताण पडला. आपणही सध्या त्याच स्थितीतून जात आहोत......
संकट आलं की महाराष्ट्र एकदिलाने एकजूट होऊन सामना करतो, असा आजवरचा अनुभव आहे. सगळे वाद विरोध मावळतात. पण आता कोरोनाकाळात असं होताना दिसत नाही. राजकारणी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे लढत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण सगळेही विभागलोत. एका महाराष्ट्राचे किती महाराष्ट्र झालेत?
संकट आलं की महाराष्ट्र एकदिलाने एकजूट होऊन सामना करतो, असा आजवरचा अनुभव आहे. सगळे वाद विरोध मावळतात. पण आता कोरोनाकाळात असं होताना दिसत नाही. राजकारणी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे लढत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण सगळेही विभागलोत. एका महाराष्ट्राचे किती महाराष्ट्र झालेत?.....
रक्ताचा तुटवडा हा भारतातला कळीचा प्रश्न आहे. भारतातल्या २० टक्के लोकांचा वेळेत रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. कोरोनाच्या काळात तर रक्ताची फारच चणचण भासू लागलीय. शिवाय, कोरोनाची लस घेतल्यानंतर जवळपास २ महिने रक्तदान करता येत नाहीय. देशाचे नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी विशेषतः तरुणांनी लस घेण्याआधीच रक्तदान करायला हवं.
रक्ताचा तुटवडा हा भारतातला कळीचा प्रश्न आहे. भारतातल्या २० टक्के लोकांचा वेळेत रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. कोरोनाच्या काळात तर रक्ताची फारच चणचण भासू लागलीय. शिवाय, कोरोनाची लस घेतल्यानंतर जवळपास २ महिने रक्तदान करता येत नाहीय. देशाचे नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी विशेषतः तरुणांनी लस घेण्याआधीच रक्तदान करायला हवं......
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे. आता मोठ्या माणसांसारखं लहानांना कोरोना झाला तरी त्यांना एकटं क्वारंटाइन करता येत नाही. आजारी असताना स्वतःची काळजी कशी घ्यायची याची समजही मुलांना नसते. अशात स्वतःला संसर्ग होऊ न देता कोरोना झालेल्या मुलांची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्यायला हवं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे. आता मोठ्या माणसांसारखं लहानांना कोरोना झाला तरी त्यांना एकटं क्वारंटाइन करता येत नाही. आजारी असताना स्वतःची काळजी कशी घ्यायची याची समजही मुलांना नसते. अशात स्वतःला संसर्ग होऊ न देता कोरोना झालेल्या मुलांची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्यायला हवं......
भारतात कोरोना वायरसचा एक नवा प्रकार आढळून आलाय. वायरसच्या जनुकीय रचनेत दोन प्रकारचे बदल आढळून आलेत. यालाच डबल म्युटेशन म्हटलं जातंय. ४ एप्रिलला कोरोना पेशंटच्या आकडेवारीने अचानक लाखभराचा आकडा गाठला. त्यामागे हा डबल म्युटेशन वायरस असल्याचा अंदाज बांधला जातोय. वायरसमधल्या या नव्या बदलामुळे सगळ्यांची काळजी मात्र वाढलीय.
भारतात कोरोना वायरसचा एक नवा प्रकार आढळून आलाय. वायरसच्या जनुकीय रचनेत दोन प्रकारचे बदल आढळून आलेत. यालाच डबल म्युटेशन म्हटलं जातंय. ४ एप्रिलला कोरोना पेशंटच्या आकडेवारीने अचानक लाखभराचा आकडा गाठला. त्यामागे हा डबल म्युटेशन वायरस असल्याचा अंदाज बांधला जातोय. वायरसमधल्या या नव्या बदलामुळे सगळ्यांची काळजी मात्र वाढलीय......
भारताने दक्षिण आशियात ‘दादा’ बनू नये आणि छोट्या देशांना सन्मानाने बरोबरीने वागणूक द्यावी, अशी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांची अपेक्षा आहे. प्रसंगी चीनला झुकतं माप द्यायची या देशांची तयारी आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन दिवसांची बांगलादेश भेट महत्त्वाची ठरलीय. द्विपक्षीय सहकार्याला वेग देताना चीनच्या तुलनेत भारताचं महत्त्व अबाधित राखायचा प्रयत्न मोदींनी केलाय.
भारताने दक्षिण आशियात ‘दादा’ बनू नये आणि छोट्या देशांना सन्मानाने बरोबरीने वागणूक द्यावी, अशी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांची अपेक्षा आहे. प्रसंगी चीनला झुकतं माप द्यायची या देशांची तयारी आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन दिवसांची बांगलादेश भेट महत्त्वाची ठरलीय. द्विपक्षीय सहकार्याला वेग देताना चीनच्या तुलनेत भारताचं महत्त्व अबाधित राखायचा प्रयत्न मोदींनी केलाय......
कोरोनाची लस शरीराला वायरसशी दोन हात करणाऱ्या अँटिबॉडी पुरवण्याचं काम करते. म्हणूनच कोरोनापासून वाचण्यासाठी सगळे जबाबदारीनं लस घेतायत. पण ज्यांना आधीच कोरोना होऊन गेलाय, त्याचं काय? कोरोनातून बरं झालेल्या माणसांच्या शरीरात अँटिबॉडी आपोआप तयार झालेल्या असतात. मग अशा माणसांनी लस घ्यायची की नाही?
कोरोनाची लस शरीराला वायरसशी दोन हात करणाऱ्या अँटिबॉडी पुरवण्याचं काम करते. म्हणूनच कोरोनापासून वाचण्यासाठी सगळे जबाबदारीनं लस घेतायत. पण ज्यांना आधीच कोरोना होऊन गेलाय, त्याचं काय? कोरोनातून बरं झालेल्या माणसांच्या शरीरात अँटिबॉडी आपोआप तयार झालेल्या असतात. मग अशा माणसांनी लस घ्यायची की नाही?.....
रामदेवबाबांच्या कोरोनिल औषधाच्या चांगल्या गुणांपेक्षा त्याच्या फसवेगिरीचीच चर्चा जास्त होताना दिसते. आयएमए या संस्थेनंही कोरोनिलने केलेले दावे लोकांना फसवणारे असल्याचं सांगितलंय. कोरोनिलनं कशाप्रकारे चुकीच्या विज्ञानाचा वापर करून वैद्यकीय नीतीमत्तेचे तीन तेरा वाजवलेत हे सांगणारा एक लेख अलिकडेच कारवान मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी इथं देत आहोत.
रामदेवबाबांच्या कोरोनिल औषधाच्या चांगल्या गुणांपेक्षा त्याच्या फसवेगिरीचीच चर्चा जास्त होताना दिसते. आयएमए या संस्थेनंही कोरोनिलने केलेले दावे लोकांना फसवणारे असल्याचं सांगितलंय. कोरोनिलनं कशाप्रकारे चुकीच्या विज्ञानाचा वापर करून वैद्यकीय नीतीमत्तेचे तीन तेरा वाजवलेत हे सांगणारा एक लेख अलिकडेच कारवान मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी इथं देत आहोत......
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी शिक्षण ऑनलाईन घेतल्याने दहावी बारावीच्या परीक्षाही ऑनलाईनच असल्या पाहिजेत, असं मत व्यक्ती केलं जातंय. तर सरकारानं या परीक्षा ऑफलाईन घ्यायचं ठरवलंय. ३० लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेणं शक्य नाही, हे खरंच. अशावेळी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेणं ही खरंतर आपल्यासमोरची परीक्षाच असणार आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी शिक्षण ऑनलाईन घेतल्याने दहावी बारावीच्या परीक्षाही ऑनलाईनच असल्या पाहिजेत, असं मत व्यक्ती केलं जातंय. तर सरकारानं या परीक्षा ऑफलाईन घ्यायचं ठरवलंय. ३० लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेणं शक्य नाही, हे खरंच. अशावेळी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेणं ही खरंतर आपल्यासमोरची परीक्षाच असणार आहे......
मागच्या महिन्यात इस्त्राईल या देशानं वॅक्सिन पासपोर्ट आणला. आपल्याकडच्या कोरोना पासचं हे ऍडवान्स रूप आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरायचं तर हा पासपोर्ट हवाच. अमेरिकेसोबत पर्यटनक्षेत्रातल्या अनेक कंपन्या असा पासपोर्ट आणायचा विचारत करतायत. त्यातून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, असंही म्हटलं जातंय. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनं असे पासपोर्ट नैतिकदृष्ट्या योग्य नाहीत असं म्हणत विरोध केलाय.
मागच्या महिन्यात इस्त्राईल या देशानं वॅक्सिन पासपोर्ट आणला. आपल्याकडच्या कोरोना पासचं हे ऍडवान्स रूप आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरायचं तर हा पासपोर्ट हवाच. अमेरिकेसोबत पर्यटनक्षेत्रातल्या अनेक कंपन्या असा पासपोर्ट आणायचा विचारत करतायत. त्यातून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, असंही म्हटलं जातंय. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनं असे पासपोर्ट नैतिकदृष्ट्या योग्य नाहीत असं म्हणत विरोध केलाय......
कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. अशातच कोरोनाच्या दोन डोसमधे २८ दिवसांऐवजी ६ आठवड्यांचं अंतर असावं अशा सुचना केंद्र सरकारने राज्याला दिल्यात. यामुळे लस लाभार्थींमधे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. दोन लसींमधे नेमकं किती दिवसांचं अंतर ठेवायचं आणि अंतर ठेवण्याची गरज काय असे अनेक प्रश्न नागरिकांना पडतायत.
कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. अशातच कोरोनाच्या दोन डोसमधे २८ दिवसांऐवजी ६ आठवड्यांचं अंतर असावं अशा सुचना केंद्र सरकारने राज्याला दिल्यात. यामुळे लस लाभार्थींमधे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. दोन लसींमधे नेमकं किती दिवसांचं अंतर ठेवायचं आणि अंतर ठेवण्याची गरज काय असे अनेक प्रश्न नागरिकांना पडतायत......
मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला आपण मास्क घालत नसल्याची बेधडक कबुली राज ठाकरे यांनी दिली. राजकीय नेते हे त्यांच्या अंधभक्तांसाठी, अनुयायांसाठी आणि सर्वसामान्यांसाठीही एक प्रकारचे रोल मॉडेल असतात. ‘साहेब मास्क घालत नाहीत ना? मग आपण तरी का घालावा?’ असं वाटून काही मनसैनिकांनी तसंच केलं त्यांचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला आपण मास्क घालत नसल्याची बेधडक कबुली राज ठाकरे यांनी दिली. राजकीय नेते हे त्यांच्या अंधभक्तांसाठी, अनुयायांसाठी आणि सर्वसामान्यांसाठीही एक प्रकारचे रोल मॉडेल असतात. ‘साहेब मास्क घालत नाहीत ना? मग आपण तरी का घालावा?’ असं वाटून काही मनसैनिकांनी तसंच केलं त्यांचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो......
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिकण्यात अडथळा येऊ नये म्हणून राज्य सरकारनं ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरु’ ही ऑनलाईन अभ्यासमाला सुरू केली होती. पण ऑनलाईन शिक्षणातले अडथळे सगळ्यांनाच माहितीयत. इथल्या शाळा बंद झाल्या की, कुणी काहीही केलं की शिकण्याची प्रक्रिया आपोआपच बंद होते. कारण मुलांसाठी वर्गाबाहेर काहीतरी शिकण्याच्या संधी निर्माण करणारी व्यवस्थाच आपल्याकडे नाही.
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिकण्यात अडथळा येऊ नये म्हणून राज्य सरकारनं ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरु’ ही ऑनलाईन अभ्यासमाला सुरू केली होती. पण ऑनलाईन शिक्षणातले अडथळे सगळ्यांनाच माहितीयत. इथल्या शाळा बंद झाल्या की, कुणी काहीही केलं की शिकण्याची प्रक्रिया आपोआपच बंद होते. कारण मुलांसाठी वर्गाबाहेर काहीतरी शिकण्याच्या संधी निर्माण करणारी व्यवस्थाच आपल्याकडे नाही......
मराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी? तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत.
मराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी? तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत......
कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात आपली प्रयोगशाळा, हॉस्पिटल सुसज्ज करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लॉकडाऊन महत्त्वाचं होतं. ते पुन्हा लागू करणं योग्य नाही. स्वतःवर काही आवश्यक बंधनं घालून घेतली तर लॉकडाऊन न करताही आपल्याला कोरोनाचा बंदोबस्त करता येईल. आता तर आपल्या मदतीला लसही आलीय. कोरोनासोबत जगायला शिकणं आता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे.
कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात आपली प्रयोगशाळा, हॉस्पिटल सुसज्ज करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लॉकडाऊन महत्त्वाचं होतं. ते पुन्हा लागू करणं योग्य नाही. स्वतःवर काही आवश्यक बंधनं घालून घेतली तर लॉकडाऊन न करताही आपल्याला कोरोनाचा बंदोबस्त करता येईल. आता तर आपल्या मदतीला लसही आलीय. कोरोनासोबत जगायला शिकणं आता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे......
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख.
वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख. .....
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात जानेवारी महिन्यात पार पडला. अशा महोत्सवाविषयी ऐकलं की कसे होते सिनेमे हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण खरंतर रसिक कोणत्या पायरीवरून या दुनियेच्या सफरीकडे पाहतो, त्यावर या प्रश्नाचं उत्तरं मिळतं. आपल्या डोक्यातल्या चित्रपटाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर अवलंबून असतो. या महोत्सवाच्या छटा दाखवणारा हा लेख.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात जानेवारी महिन्यात पार पडला. अशा महोत्सवाविषयी ऐकलं की कसे होते सिनेमे हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण खरंतर रसिक कोणत्या पायरीवरून या दुनियेच्या सफरीकडे पाहतो, त्यावर या प्रश्नाचं उत्तरं मिळतं. आपल्या डोक्यातल्या चित्रपटाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर अवलंबून असतो. या महोत्सवाच्या छटा दाखवणारा हा लेख......
अर्थसंकल्प जवळ येतोय तशी त्याबद्दलची उत्सुकताही वाढू लागलीय. कोरोना नंतरच्या या अर्थसंकल्पात नेमके काय बदल करायला हवेत याविषयी चर्चाही सुरू झालीय. तेव्हाच कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाचं स्वरूप आणि प्रमाण याबाबत अर्थसंकल्पात स्पष्टता हवी, अशी मागणी नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष माँटेकसिंह अहलुवालिया यांनी केलीय. त्यांनी एनडीटीवीला दिलेल्या मुलाखतीचा हा सारांश.
अर्थसंकल्प जवळ येतोय तशी त्याबद्दलची उत्सुकताही वाढू लागलीय. कोरोना नंतरच्या या अर्थसंकल्पात नेमके काय बदल करायला हवेत याविषयी चर्चाही सुरू झालीय. तेव्हाच कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाचं स्वरूप आणि प्रमाण याबाबत अर्थसंकल्पात स्पष्टता हवी, अशी मागणी नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष माँटेकसिंह अहलुवालिया यांनी केलीय. त्यांनी एनडीटीवीला दिलेल्या मुलाखतीचा हा सारांश......
२६ जानेवारीला प्रकाशित झालेल्या ऑक्सफाम अहवालानुसार साथरोगामुळे भारतातली आर्थिक असमानता वाढलीय. भारतातल्या श्रीमंतांच्या संपत्तीत ३५ टक्क्यांनी वाढ झालीय. यावर काही उपाययोजना करायच्या असतील तर येत्या बजेटमधे काही ठोस पावलं उचलावी लागतील. कोरोनानंतरचं हे पहिलंच बजेट. त्यामुळेच काही महत्त्वाच्या सूचना नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी केल्यात.
२६ जानेवारीला प्रकाशित झालेल्या ऑक्सफाम अहवालानुसार साथरोगामुळे भारतातली आर्थिक असमानता वाढलीय. भारतातल्या श्रीमंतांच्या संपत्तीत ३५ टक्क्यांनी वाढ झालीय. यावर काही उपाययोजना करायच्या असतील तर येत्या बजेटमधे काही ठोस पावलं उचलावी लागतील. कोरोनानंतरचं हे पहिलंच बजेट. त्यामुळेच काही महत्त्वाच्या सूचना नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी केल्यात......
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ फारशी बसली नसली तरी कोरोनामुळे भारताचं आर्थिक नुकसान जास्त झालंय. यंदाच्या बजेटमधे काय उपाययोजना हव्यात याविषयी अनेक तज्ञ लोक आपलं मत मांडतायत. यात भारतीय रिजर्व बँकेचे माजी गवर्नर रघुराम राजन यांचं म्हणणंही महत्त्वाचं ठरणारं आहे. एनडीटीवीला दिलेल्या त्यांच्या मुलाखतीचं निखील घाणेकर यांनी केलेलं हे शब्दांकन.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ फारशी बसली नसली तरी कोरोनामुळे भारताचं आर्थिक नुकसान जास्त झालंय. यंदाच्या बजेटमधे काय उपाययोजना हव्यात याविषयी अनेक तज्ञ लोक आपलं मत मांडतायत. यात भारतीय रिजर्व बँकेचे माजी गवर्नर रघुराम राजन यांचं म्हणणंही महत्त्वाचं ठरणारं आहे. एनडीटीवीला दिलेल्या त्यांच्या मुलाखतीचं निखील घाणेकर यांनी केलेलं हे शब्दांकन......
मागच्या १० ते १२ दिवसांमधे देशभर लाखाच्या आकड्यांमधे पक्षांचा मृत्यू झालाय. बर्ड फ्लू म्हणजेच एवियन इन्फ्लूएंजा वायरस त्यामागचं कारण ठरलाय. दिल्ली, महाराष्ट्रासोबत जवळपास ९ राज्यांना या फ्लूनं घेरल्याचं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं जाहीर केलंय. हा वायरस माणसांमधे पोचू नये म्हणून संसर्ग झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरुय. दुसरीकडे पोल्ट्री फार्मसारख्या व्यवसायावर ज्यांची रोजी रोटी चालते त्यांचं काय हा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिलाय.
मागच्या १० ते १२ दिवसांमधे देशभर लाखाच्या आकड्यांमधे पक्षांचा मृत्यू झालाय. बर्ड फ्लू म्हणजेच एवियन इन्फ्लूएंजा वायरस त्यामागचं कारण ठरलाय. दिल्ली, महाराष्ट्रासोबत जवळपास ९ राज्यांना या फ्लूनं घेरल्याचं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं जाहीर केलंय. हा वायरस माणसांमधे पोचू नये म्हणून संसर्ग झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरुय. दुसरीकडे पोल्ट्री फार्मसारख्या व्यवसायावर ज्यांची रोजी रोटी चालते त्यांचं काय हा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिलाय. .....
भारतात लवकरच कोरोनाची लस देणं चालू होणार आहे. त्याचबरोबर लसीमुळे एचआयवी होतो, नपुंसकत्व येतं, त्याचे भयंकर साईड इफेक्ट होतात असे गैरसमज पसरवले जायताय. त्यामुळे लस घ्यायची की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रम तयार होतोय. कोणत्याही लसीचे काही सौम्य साईड इफेक्ट होतातच. पण म्हणून लस न घेणं धोक्याचं ठरेल. कारण, काही डाग चांगले असतात तसे काही साईड इफेक्टही चांगले ठरू शकतात.
भारतात लवकरच कोरोनाची लस देणं चालू होणार आहे. त्याचबरोबर लसीमुळे एचआयवी होतो, नपुंसकत्व येतं, त्याचे भयंकर साईड इफेक्ट होतात असे गैरसमज पसरवले जायताय. त्यामुळे लस घ्यायची की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रम तयार होतोय. कोणत्याही लसीचे काही सौम्य साईड इफेक्ट होतातच. पण म्हणून लस न घेणं धोक्याचं ठरेल. कारण, काही डाग चांगले असतात तसे काही साईड इफेक्टही चांगले ठरू शकतात......
२०२० जात नाहीय. जाणारही नाही. हे वर्ष आपलं कॅलेंडर घेऊन आलंय. ते याआधीच्याच अनेक वर्षांचं आहे. पुढच्या अनेक वर्षांसाठी ते आलंय. प्रगतीच्या वाटेवरून हे जग चालत होतं त्या प्रवासातलं महत्त्वाचं सामान कुठंतरी मागे सुटलंय. त्याची आठवण करून द्यायला २०२० आलंय. हे वर्ष आपल्या पाठीवर वेताळासारखं बसलंय. त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तरं आपण शोधू तेव्हाच ते खाली उतरेल. स्वतःची फसवणूक करणाऱ्यांसाठी २०२१ आलंय. फसवणुकीची जाणीव असलेल्यांना माहितीय २०२० अनेक वर्ष चालेल.
२०२० जात नाहीय. जाणारही नाही. हे वर्ष आपलं कॅलेंडर घेऊन आलंय. ते याआधीच्याच अनेक वर्षांचं आहे. पुढच्या अनेक वर्षांसाठी ते आलंय. प्रगतीच्या वाटेवरून हे जग चालत होतं त्या प्रवासातलं महत्त्वाचं सामान कुठंतरी मागे सुटलंय. त्याची आठवण करून द्यायला २०२० आलंय. हे वर्ष आपल्या पाठीवर वेताळासारखं बसलंय. त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तरं आपण शोधू तेव्हाच ते खाली उतरेल. स्वतःची फसवणूक करणाऱ्यांसाठी २०२१ आलंय. फसवणुकीची जाणीव असलेल्यांना माहितीय २०२० अनेक वर्ष चालेल......
कोरोनाच्या साथीचे परिणाम आणि दुष्परिणाम पुढेही सगळ्याच क्षेत्रात अनुभवावे लागतील. आताच आपला कम्फर्ट झोन नाहीसा झालाय. एकप्रकारची हतबलता आणि भीती सगळीकडे आहे. पुढे नेमकं काय होणार, आयुष्य कसं असणार, असे विचार सतत मनात येतात. ज्यांना अस्वस्थतेचे, नैराश्याचे आजार आहेत त्यांचे आजार वाढतायंत. ज्यांना नाहीत त्यांच्यात ते निर्माण होतायंत. होत राहतील. या परिस्थितीत सकारात्मक, आनंदी दृष्टिकोनच आपल्याला आणि लहान मुलांसह तरुण पिढीला सक्षम बनवेल.
कोरोनाच्या साथीचे परिणाम आणि दुष्परिणाम पुढेही सगळ्याच क्षेत्रात अनुभवावे लागतील. आताच आपला कम्फर्ट झोन नाहीसा झालाय. एकप्रकारची हतबलता आणि भीती सगळीकडे आहे. पुढे नेमकं काय होणार, आयुष्य कसं असणार, असे विचार सतत मनात येतात. ज्यांना अस्वस्थतेचे, नैराश्याचे आजार आहेत त्यांचे आजार वाढतायंत. ज्यांना नाहीत त्यांच्यात ते निर्माण होतायंत. होत राहतील. या परिस्थितीत सकारात्मक, आनंदी दृष्टिकोनच आपल्याला आणि लहान मुलांसह तरुण पिढीला सक्षम बनवेल......
उगवत्या वर्षात सगळ्यात जास्त गरज कशाची असेल, तर संयमाची आणि सुजाणपणाची. आपली मनं भक्कम हवीत! आणि त्यासाठी मनात एक विश्वास हवा, प्रेमाची चार माणसं हवीत, आर्थिक नियोजन हवं आणि न हरण्याची वृत्ती हवी! कोल्हापूरच्या आखाड्यातल्या मल्लाकडे असते तशी! ती फायटर स्पिरिट महत्त्वाची आहे फार.
उगवत्या वर्षात सगळ्यात जास्त गरज कशाची असेल, तर संयमाची आणि सुजाणपणाची. आपली मनं भक्कम हवीत! आणि त्यासाठी मनात एक विश्वास हवा, प्रेमाची चार माणसं हवीत, आर्थिक नियोजन हवं आणि न हरण्याची वृत्ती हवी! कोल्हापूरच्या आखाड्यातल्या मल्लाकडे असते तशी! ती फायटर स्पिरिट महत्त्वाची आहे फार. .....
दीनानाथ वाघमारे यांचं ‘लॉकडाऊन : स्थलांतरित मजूर आणि भटक्या जमाती’ हे पुस्तक २७ डिसेंबरला प्रकाशित झालंय. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या तीन चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना मदत करताना त्यांनी जे अनुभव घेतले, ज्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकल्या, पाहिल्या त्या या पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. त्या गोष्टी तारखेनिशी त्यांनी पुस्तकात नोंदवल्यात. त्या का वाचाव्यात हे सांगणारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुस्तकातली प्रस्तावना.
दीनानाथ वाघमारे यांचं ‘लॉकडाऊन : स्थलांतरित मजूर आणि भटक्या जमाती’ हे पुस्तक २७ डिसेंबरला प्रकाशित झालंय. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या तीन चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना मदत करताना त्यांनी जे अनुभव घेतले, ज्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकल्या, पाहिल्या त्या या पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. त्या गोष्टी तारखेनिशी त्यांनी पुस्तकात नोंदवल्यात. त्या का वाचाव्यात हे सांगणारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुस्तकातली प्रस्तावना......
कोरोनाच्या लसीच्या रूपानं आशेचा किरण दिसत असतानाच जगाच्या काळजीत पुन्हा भर पडलीय. ब्रिटनमधे कोरोना वायरसचा नवा प्रकार आढळून आलाय. हा नवा प्रकार लसीचं काम बिघडवेल की काय अशी भीतीही व्यक्त केली जातेय. नवा वायरस ७० टक्यापेक्षाही अधिक वेगानं पसरू शकतो. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र घाबरायचं कारण नाही असं म्हटलंय.
कोरोनाच्या लसीच्या रूपानं आशेचा किरण दिसत असतानाच जगाच्या काळजीत पुन्हा भर पडलीय. ब्रिटनमधे कोरोना वायरसचा नवा प्रकार आढळून आलाय. हा नवा प्रकार लसीचं काम बिघडवेल की काय अशी भीतीही व्यक्त केली जातेय. नवा वायरस ७० टक्यापेक्षाही अधिक वेगानं पसरू शकतो. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र घाबरायचं कारण नाही असं म्हटलंय......
कोरोनासारख्या साथरोगाच्या काळात एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला आपल्याला सतत लागत असतो. पण हा चांगला डॉक्टर नेमका राहतो कुठे ते काही आपल्याला कळत नाही. भरपूर डिग्र्या असणारा, गाडी वगैरे असणारा, स्मार्ट डॉक्टर चांगला असा गैरसमज अनेकांना असतो. त्यामुळेच एखाद्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधायचा तर त्याच्या आसपासच्या लोकांना आणि त्या डॉक्टरला कोणते प्रश्न विचारायचे ते ठरवावं लागेल.
कोरोनासारख्या साथरोगाच्या काळात एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला आपल्याला सतत लागत असतो. पण हा चांगला डॉक्टर नेमका राहतो कुठे ते काही आपल्याला कळत नाही. भरपूर डिग्र्या असणारा, गाडी वगैरे असणारा, स्मार्ट डॉक्टर चांगला असा गैरसमज अनेकांना असतो. त्यामुळेच एखाद्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधायचा तर त्याच्या आसपासच्या लोकांना आणि त्या डॉक्टरला कोणते प्रश्न विचारायचे ते ठरवावं लागेल......
सोलापूरमधल्या जिल्हा परिषदत शाळेत शिक्षक असणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना नुकताच युनेस्कोचा ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड' मिळालाय. कोरोना काळात शिक्षणाची दैना झालेली असताना अशाप्रकारे शिक्षकाला पुरस्कार मिळणं ही पर्वणीच म्हणावी लागेल. पण आज देशपातळीवर सार्वजनिक शिक्षणाची अवस्था समाधानकारक आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच या पुरस्काराच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेचा विचार करायला हवा.
सोलापूरमधल्या जिल्हा परिषदत शाळेत शिक्षक असणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना नुकताच युनेस्कोचा ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड' मिळालाय. कोरोना काळात शिक्षणाची दैना झालेली असताना अशाप्रकारे शिक्षकाला पुरस्कार मिळणं ही पर्वणीच म्हणावी लागेल. पण आज देशपातळीवर सार्वजनिक शिक्षणाची अवस्था समाधानकारक आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यामुळेच या पुरस्काराच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेचा विचार करायला हवा......
साधारणपणे कोणत्याही वायरसला हरवायचं असेल तर त्याच्या लसीवर जास्त संशोधन केलं जातं. लस ही प्रतिबंधात्मक उपाय असते. माणूस आजारी पडूच नये म्हणून केलेली ती व्यवस्था. लसीने येणारी व्यवस्था साध्य करायला फार मोठा काळ लागतो. त्यामुळेच लसीबरोबर वायरसवरच्या औषधांचीही गरज पडते. आपल्या कोरोना वायरसबाबतीतही तेच दिसतं.
साधारणपणे कोणत्याही वायरसला हरवायचं असेल तर त्याच्या लसीवर जास्त संशोधन केलं जातं. लस ही प्रतिबंधात्मक उपाय असते. माणूस आजारी पडूच नये म्हणून केलेली ती व्यवस्था. लसीने येणारी व्यवस्था साध्य करायला फार मोठा काळ लागतो. त्यामुळेच लसीबरोबर वायरसवरच्या औषधांचीही गरज पडते. आपल्या कोरोना वायरसबाबतीतही तेच दिसतं......
साना मारिन. जगातल्या सगळ्यात तरुण महिला पंतप्रधान. या महिन्यात त्यांच्या फिनलँडमधल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होतंय. मागच्या वर्षभर त्यांनी पाच पक्षांचं आघाडी सरकार समर्थपणे चालवलं. कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय जगासाठी कौतुकाचा विषय ठरले. राजकारणात असल्या तरी त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यातला अवकाश जपलाय.
साना मारिन. जगातल्या सगळ्यात तरुण महिला पंतप्रधान. या महिन्यात त्यांच्या फिनलँडमधल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होतंय. मागच्या वर्षभर त्यांनी पाच पक्षांचं आघाडी सरकार समर्थपणे चालवलं. कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय जगासाठी कौतुकाचा विषय ठरले. राजकारणात असल्या तरी त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यातला अवकाश जपलाय......
म्हाताऱ्या माणसांसाठी कोरोना वायरस जास्त धोकादायक असल्याचं आपण ऐकलं असेल. पण अमेरिकेतल्या आजी या सगळ्याला अपवाद ठरल्यात. मेमधे त्यांना कोरोना वायरसची लागण झाली होती. त्यातून त्या बाहेर आल्या. पण जीवघेण्या साथरोगाशी सामना करायची ही काही त्यांची पहिली वेळ नव्हती. १०० वर्षांपूर्वी त्यांना स्पॅनिश फ्लूचीही लागण झाली होती. त्यातूनही त्या वाचल्या. नुकताच त्यांनी आपला १०८ वा वाढदिवस साजरा केलाय.
म्हाताऱ्या माणसांसाठी कोरोना वायरस जास्त धोकादायक असल्याचं आपण ऐकलं असेल. पण अमेरिकेतल्या आजी या सगळ्याला अपवाद ठरल्यात. मेमधे त्यांना कोरोना वायरसची लागण झाली होती. त्यातून त्या बाहेर आल्या. पण जीवघेण्या साथरोगाशी सामना करायची ही काही त्यांची पहिली वेळ नव्हती. १०० वर्षांपूर्वी त्यांना स्पॅनिश फ्लूचीही लागण झाली होती. त्यातूनही त्या वाचल्या. नुकताच त्यांनी आपला १०८ वा वाढदिवस साजरा केलाय......
२८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना वायरस विरोधातली लस बनवणाऱ्या भारतातल्या कंपन्यांचा दौरा केला. लस बनवणाऱ्या या तीनही संस्थांचा फक्त भारतातच नाही तर जगभरात बोलबाला आहे. प्रत्येक संस्थेची लस बनवण्याची पद्धत वेगळी, लसीचा प्रकार वेगळा तसाच या संस्थांचा इतिहासही वेगळा. नुसता वेगळाच नाही तर अतिशय रंजकही! अशा दर्जेदार संस्थांकडून बनवल्या जाणाऱ्या कोरोना लसीचं कामकाज शेवटच्या टप्प्यात आलंय.
२८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना वायरस विरोधातली लस बनवणाऱ्या भारतातल्या कंपन्यांचा दौरा केला. लस बनवणाऱ्या या तीनही संस्थांचा फक्त भारतातच नाही तर जगभरात बोलबाला आहे. प्रत्येक संस्थेची लस बनवण्याची पद्धत वेगळी, लसीचा प्रकार वेगळा तसाच या संस्थांचा इतिहासही वेगळा. नुसता वेगळाच नाही तर अतिशय रंजकही! अशा दर्जेदार संस्थांकडून बनवल्या जाणाऱ्या कोरोना लसीचं कामकाज शेवटच्या टप्प्यात आलंय......
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट जगाच्या डोक्यावर घोंघावतंय. लॉकडाऊन नसल्यानं अनेक लोक इकडून तिकडे प्रवास करतायत, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतायत. पण याच कार्यक्रमात कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो असं समोर आलंय. आजारी पडण्यापूर्वी कोरोनाचे पेशंट याच ठिकाणी जातात.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट जगाच्या डोक्यावर घोंघावतंय. लॉकडाऊन नसल्यानं अनेक लोक इकडून तिकडे प्रवास करतायत, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतायत. पण याच कार्यक्रमात कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो असं समोर आलंय. आजारी पडण्यापूर्वी कोरोनाचे पेशंट याच ठिकाणी जातात......
जानेवारी फेब्रुवारीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय. लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं आपल्याला परवडणारं नाही. आणि लॉकडाऊन नसेल तर या दुसऱ्या लाटेमुळे जास्तीचं नुकसान व्हायची शक्यता आहे. ही लाट साधीसुधी नाही तर त्सुनामी सारखी येईल अशी भीती वाटू लागलीय.
जानेवारी फेब्रुवारीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय. लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं आपल्याला परवडणारं नाही. आणि लॉकडाऊन नसेल तर या दुसऱ्या लाटेमुळे जास्तीचं नुकसान व्हायची शक्यता आहे. ही लाट साधीसुधी नाही तर त्सुनामी सारखी येईल अशी भीती वाटू लागलीय......
जगभरात कोरोना लशीच्या मानवी चाचण्या सुरूयत. कोणती लस किती आणि कसं काम करते हे समजायला अनेक वर्ष जावी लागतात. पण माझीच लस आधी असं म्हणत वेगवेगळ्या कंपन्यांमधे स्पर्धा सुरू झालीय. वेगवेगळे दावे केले जातायत. काही ठिकाणी त्रुटी दिसल्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्या. असे सगळे धोके असताना लस बाजारात आली तरी ती गरीब आणि विकसनशील देशांपर्यंत पोचेल का याबद्दलही शंका आहे.
जगभरात कोरोना लशीच्या मानवी चाचण्या सुरूयत. कोणती लस किती आणि कसं काम करते हे समजायला अनेक वर्ष जावी लागतात. पण माझीच लस आधी असं म्हणत वेगवेगळ्या कंपन्यांमधे स्पर्धा सुरू झालीय. वेगवेगळे दावे केले जातायत. काही ठिकाणी त्रुटी दिसल्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्या. असे सगळे धोके असताना लस बाजारात आली तरी ती गरीब आणि विकसनशील देशांपर्यंत पोचेल का याबद्दलही शंका आहे......
चोहीकडे अंधार आहे म्हणून आपण दिवाळी साजरीच करायची नाही का? करायची ना, नक्की करायची. ती यासाठी करायची की त्यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. आयुष्यातल्या अडचणींचा निचरा करायची उमेद मिळणार आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. या प्रकाशाच्या किरणांतूनच सकारात्मक स्पंदनं मिळत असतात.
चोहीकडे अंधार आहे म्हणून आपण दिवाळी साजरीच करायची नाही का? करायची ना, नक्की करायची. ती यासाठी करायची की त्यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. आयुष्यातल्या अडचणींचा निचरा करायची उमेद मिळणार आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. या प्रकाशाच्या किरणांतूनच सकारात्मक स्पंदनं मिळत असतात......
चौथ्या स्थानावर घसरलेल्या विराटला प्ले ऑफमधेही फाईट करता आली नाही. त्यांनी हैदराबादकडून पराभव स्वीकारत आपला गाशा गुंडाळला. यंदाची आयपीएल युएईत होत असल्याने विराटचा आरसीबी संघ काहीतरी कमाल दाखवेल आणि आपल्या चाहत्यांना पहिल्या वहिल्या विजेतेपदाचा जल्लोष करण्याची संधी देईल, असं वाटत होतं. पण, विराटच्या आरसीबीने निराशा केली. या सततच्या निराशेनंतर आता आरसीबीने आपला नेताच बदलावा अशी मागणी होऊ लागलीय.
चौथ्या स्थानावर घसरलेल्या विराटला प्ले ऑफमधेही फाईट करता आली नाही. त्यांनी हैदराबादकडून पराभव स्वीकारत आपला गाशा गुंडाळला. यंदाची आयपीएल युएईत होत असल्याने विराटचा आरसीबी संघ काहीतरी कमाल दाखवेल आणि आपल्या चाहत्यांना पहिल्या वहिल्या विजेतेपदाचा जल्लोष करण्याची संधी देईल, असं वाटत होतं. पण, विराटच्या आरसीबीने निराशा केली. या सततच्या निराशेनंतर आता आरसीबीने आपला नेताच बदलावा अशी मागणी होऊ लागलीय......
थंडी जवळ येतेय. थंडी वाजू नये म्हणून आपण घरं बंद करून घेतो आणि त्यामुळे हवा खेळती राहत नाही. अशा वेळी संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्याचबरोबर आता थेटर्स आणि शाळा सुरू करण्याची घोषणा झालीय. या पार्श्वभूमीवर घराबाहेर जाताना कोणती काळजी घ्यायची, याबाबत मुलांना घरातच प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. सण, उत्सवांचा हंगामही थंडीबरोबरच येतोय. त्यावेळी आपण एकत्र आलो तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे.
थंडी जवळ येतेय. थंडी वाजू नये म्हणून आपण घरं बंद करून घेतो आणि त्यामुळे हवा खेळती राहत नाही. अशा वेळी संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्याचबरोबर आता थेटर्स आणि शाळा सुरू करण्याची घोषणा झालीय. या पार्श्वभूमीवर घराबाहेर जाताना कोणती काळजी घ्यायची, याबाबत मुलांना घरातच प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. सण, उत्सवांचा हंगामही थंडीबरोबरच येतोय. त्यावेळी आपण एकत्र आलो तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे......
वायरसना नियंत्रित करणारी पर्यावरणीय यंत्रणा नष्ट झाल्याने या वायरसमधे उत्क्रांती घडतेय. ते अधिकाधीक वायरल आणि विषारी होतायत. जैवविविधता नष्ट होतेय. बंदिस्त असणारे वायरस माणसांच्या वस्तीत आणि प्राण्यांमधे शिरू लागलेत. जंगलांच्या विनाशामुळे या वायरसना खाणाऱ्या बॅक्टेरियाचाही नाश होतोय.
वायरसना नियंत्रित करणारी पर्यावरणीय यंत्रणा नष्ट झाल्याने या वायरसमधे उत्क्रांती घडतेय. ते अधिकाधीक वायरल आणि विषारी होतायत. जैवविविधता नष्ट होतेय. बंदिस्त असणारे वायरस माणसांच्या वस्तीत आणि प्राण्यांमधे शिरू लागलेत. जंगलांच्या विनाशामुळे या वायरसना खाणाऱ्या बॅक्टेरियाचाही नाश होतोय......
युरोपात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं जग धास्तावलंय. सणावरांचा उत्साह आणि वाढत जाणारा थंडीच्या कडाक्यात अशी दुसरी लाट भारतातही येऊ शकेल अशी भीती तज्ञांकडून व्यक्त केली जातेय. पण काळजी करायचं कारण नाही. ‘जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही’ हा मंत्र पंतप्रधान मोदींनीही आपल्याला दिलेलाय.
युरोपात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं जग धास्तावलंय. सणावरांचा उत्साह आणि वाढत जाणारा थंडीच्या कडाक्यात अशी दुसरी लाट भारतातही येऊ शकेल अशी भीती तज्ञांकडून व्यक्त केली जातेय. पण काळजी करायचं कारण नाही. ‘जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही’ हा मंत्र पंतप्रधान मोदींनीही आपल्याला दिलेलाय. .....
गेल्या अनेक दशकांपासून ईबोला आफ्रिका खंडात धुमाकूळ घालतोय. २०१४ मधे आलेल्या ईबोलाच्या भयंकर साथीपासून नायजेरिया देशाला डॉक्टर अमेयो अडाडेवोर यांनी वाचवलं. धमक्या, वरिष्ठांचा दबाव असतानाही साथरोग घेऊन आलेल्या पेशंटची त्यांनी काळजी घेतली. त्यातच ईबोला होऊन त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्या जन्मदिवसादिवशी त्यांची आठवण काढायलाच हवी.
गेल्या अनेक दशकांपासून ईबोला आफ्रिका खंडात धुमाकूळ घालतोय. २०१४ मधे आलेल्या ईबोलाच्या भयंकर साथीपासून नायजेरिया देशाला डॉक्टर अमेयो अडाडेवोर यांनी वाचवलं. धमक्या, वरिष्ठांचा दबाव असतानाही साथरोग घेऊन आलेल्या पेशंटची त्यांनी काळजी घेतली. त्यातच ईबोला होऊन त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्या जन्मदिवसादिवशी त्यांची आठवण काढायलाच हवी......
कोरोना काळात मुलांचा अभ्यास ऑनलाईन झालाय. त्यांचा स्क्रिन टाइमही वाढलाय. डोळ्यांच्या तक्रारींनी मुलं कुरकुरतायत. स्क्रिनचा मुलांच्या डोळ्यांवर ताण येणार नाही यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील. मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याच्या या टीप्स डोळ्यात तेल घालूनच वाचायला हव्यात.
कोरोना काळात मुलांचा अभ्यास ऑनलाईन झालाय. त्यांचा स्क्रिन टाइमही वाढलाय. डोळ्यांच्या तक्रारींनी मुलं कुरकुरतायत. स्क्रिनचा मुलांच्या डोळ्यांवर ताण येणार नाही यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील. मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याच्या या टीप्स डोळ्यात तेल घालूनच वाचायला हव्यात......
कोरोना वायरसचं संक्रमण सुरू झाल्यापासून आपल्यापैकी बहुतेकांचं जगणं बदललंय. याचा परिणाम झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवरही होतोय. गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्नं पडत असल्याचं अनेकांनी नोंदवलंय. हसू यावं किंवा भीती वाटावी अशी ही स्वप्न साथरोगाबद्दलचं नवं वास्तव आपल्यासमोर आणतायत.
कोरोना वायरसचं संक्रमण सुरू झाल्यापासून आपल्यापैकी बहुतेकांचं जगणं बदललंय. याचा परिणाम झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवरही होतोय. गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्नं पडत असल्याचं अनेकांनी नोंदवलंय. हसू यावं किंवा भीती वाटावी अशी ही स्वप्न साथरोगाबद्दलचं नवं वास्तव आपल्यासमोर आणतायत......
आपल्या देशाचा जीडीपी विक्रमी टक्क्यांनी घसरलाय. कोरोना आणि लॉकडाऊनने तिचं कंबरडं मोडलंय. लोक खर्चच करत नाहीत. सरकारने अर्थव्यवस्थेत जीव फुंकण्याचे प्रयत्न अगदीच अपुरे ठरलेत. अशावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काय करावं लागेल याचं एक टिपण रिझर्व बँकेचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सोशल मीडियावर सविस्तर दिलंय. त्याचा हा अनुवाद.
आपल्या देशाचा जीडीपी विक्रमी टक्क्यांनी घसरलाय. कोरोना आणि लॉकडाऊनने तिचं कंबरडं मोडलंय. लोक खर्चच करत नाहीत. सरकारने अर्थव्यवस्थेत जीव फुंकण्याचे प्रयत्न अगदीच अपुरे ठरलेत. अशावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काय करावं लागेल याचं एक टिपण रिझर्व बँकेचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सोशल मीडियावर सविस्तर दिलंय. त्याचा हा अनुवाद......
राज्यात, देशभरात कोविडचे पेशंट झपाट्याने वाढतायत. बेड न मिळाल्याच्या, ऑक्सीजन न मिळाल्याच्या बातम्या आपण रोज पाहतो. कोविड पेशंटसाठी नवीन, खास जंबो-हॉस्पिटल उभारली जात असल्याने प्रश्न सुटेल असं सांगण्यात आलं होतं. पण पुण्यातला सुरूवातीचा अनुभव निराशजनक आहे. एकंदरित पहाता खाजगीकरणामुळे दुबळी झालेली सार्वजनिक आरोग्य सेवा आणि नफेखोर खाजगी क्षेत्र यामुळे सध्याची परिस्थिती ओढवली आहे.
राज्यात, देशभरात कोविडचे पेशंट झपाट्याने वाढतायत. बेड न मिळाल्याच्या, ऑक्सीजन न मिळाल्याच्या बातम्या आपण रोज पाहतो. कोविड पेशंटसाठी नवीन, खास जंबो-हॉस्पिटल उभारली जात असल्याने प्रश्न सुटेल असं सांगण्यात आलं होतं. पण पुण्यातला सुरूवातीचा अनुभव निराशजनक आहे. एकंदरित पहाता खाजगीकरणामुळे दुबळी झालेली सार्वजनिक आरोग्य सेवा आणि नफेखोर खाजगी क्षेत्र यामुळे सध्याची परिस्थिती ओढवली आहे......
गेल्या कित्येक दिवसांपासून आपण घरात बंद आहोत. लॉकडाऊनपासून अनेकांना मोकळा वेळ मिळालाय. अशातच सोशल मीडियावर बायकांवरच्या विनोदांना उधाण आलं. हे जोक म्हणजे लॉकडाऊनमधल्या डिप्रेशनवरचा उपाय असल्याचं पुरूष मंडळी सांगतात. डिप्रेशन घालवण्यासाठी बायकांवरच्याच जोकची गरज का पडते?
गेल्या कित्येक दिवसांपासून आपण घरात बंद आहोत. लॉकडाऊनपासून अनेकांना मोकळा वेळ मिळालाय. अशातच सोशल मीडियावर बायकांवरच्या विनोदांना उधाण आलं. हे जोक म्हणजे लॉकडाऊनमधल्या डिप्रेशनवरचा उपाय असल्याचं पुरूष मंडळी सांगतात. डिप्रेशन घालवण्यासाठी बायकांवरच्याच जोकची गरज का पडते? .....
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे.
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यात टीवी ९ या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर म्हणून ते कार्यरत होते. पांडुरंग यांचा व्यवस्थेनं बळी घेतलाय असं आपण म्हणतोय. पण ही व्यवस्था असते काय? ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममधे आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे......
कोरोना वायरसची आरटीपीसीआर आणि अँटीजन टेस्ट कधी केली जावी याबाबत महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने नवे नियम जाहीर केलेत. आरटीपीसीआर, स्वॅब टेस्ट, नेझल ऍस्पिरेट, अँटीबॉडी अशी कोरोनाच्या विविध टेस्टची नावं आपण ऐकत असतो. यातली प्रत्येक टेस्ट महत्त्वाची आहे. वायरसची लागण झालीय हे ओळखण्यासोबतच साथरोगात काय उपाययोजना करायच्या हे शोधायला या टेस्ट सरकारला मदत करत असतात.
कोरोना वायरसची आरटीपीसीआर आणि अँटीजन टेस्ट कधी केली जावी याबाबत महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने नवे नियम जाहीर केलेत. आरटीपीसीआर, स्वॅब टेस्ट, नेझल ऍस्पिरेट, अँटीबॉडी अशी कोरोनाच्या विविध टेस्टची नावं आपण ऐकत असतो. यातली प्रत्येक टेस्ट महत्त्वाची आहे. वायरसची लागण झालीय हे ओळखण्यासोबतच साथरोगात काय उपाययोजना करायच्या हे शोधायला या टेस्ट सरकारला मदत करत असतात......
विज्ञानात शोध आहे, सिद्धता आहे, परीक्षा आहे, दुरुस्ती आहे आणि प्रगतीची खात्रीही आहे. म्हणूनच आजच्या मानवी जगाला 'कोरोना-लसी'ची प्रतीक्षा आहे. त्यासाठीच जगभरातल्या शेकडो प्रयोगशाळांतून हजारो वैज्ञानिक, संशोधक गेले सहा महिने दिवस-रात्र झटत आहेत. यात कुणी देव नाही, देवदूत नाही की कुणी सिद्धपुरुष वा ब्रह्ममाता नाही. ही सगळी माणसंच आहेत.
विज्ञानात शोध आहे, सिद्धता आहे, परीक्षा आहे, दुरुस्ती आहे आणि प्रगतीची खात्रीही आहे. म्हणूनच आजच्या मानवी जगाला 'कोरोना-लसी'ची प्रतीक्षा आहे. त्यासाठीच जगभरातल्या शेकडो प्रयोगशाळांतून हजारो वैज्ञानिक, संशोधक गेले सहा महिने दिवस-रात्र झटत आहेत. यात कुणी देव नाही, देवदूत नाही की कुणी सिद्धपुरुष वा ब्रह्ममाता नाही. ही सगळी माणसंच आहेत......
जगभरातील सरकारे आता त्यांच्या अर्थव्यवस्थां हळूहळू अनलॉक करण्याकडे वाटचाल करत आहेत.अशा अनावर वेळेत गुंतवणूकदारांनी त्यांच्या पर्सनल फायनान्स विषयक निर्णयाबाबत अतिशय शिस्तबद्ध असायला हवं. कोरोनाच्या या अभूतपूर्व परिस्थितीत घाईने निर्णय घेणे अपयशाला कारणीभूत ठरू शकते.
जगभरातील सरकारे आता त्यांच्या अर्थव्यवस्थां हळूहळू अनलॉक करण्याकडे वाटचाल करत आहेत.अशा अनावर वेळेत गुंतवणूकदारांनी त्यांच्या पर्सनल फायनान्स विषयक निर्णयाबाबत अतिशय शिस्तबद्ध असायला हवं. कोरोनाच्या या अभूतपूर्व परिस्थितीत घाईने निर्णय घेणे अपयशाला कारणीभूत ठरू शकते......
गेल्या एक दोन दिवसांत भेटलेल्या एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं तर आपल्याला फार भीती वाटू लागते. अनेकदा या भीतीमुळे आपण कोरोनाची टेस्ट करून घेतो. पण एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर नेमकं काय करायचं, टेस्ट कधी करायची यामागे विज्ञान आहे. हे विज्ञान समजून न घेता लगेचच टेस्ट केली तर त्याचा रिझल्ट निगेटिवच येईल.
गेल्या एक दोन दिवसांत भेटलेल्या एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं तर आपल्याला फार भीती वाटू लागते. अनेकदा या भीतीमुळे आपण कोरोनाची टेस्ट करून घेतो. पण एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर नेमकं काय करायचं, टेस्ट कधी करायची यामागे विज्ञान आहे. हे विज्ञान समजून न घेता लगेचच टेस्ट केली तर त्याचा रिझल्ट निगेटिवच येईल......
प्राचीन भारतीय व्यापारी पद्धतीतला बलुतेदारी, आलुतेदारी, फिरस्ते यांच्यावर आधारलेला, गावोगावी ग्रामीण आणि तळागाळातील अर्थकारणाचं चक्र असणारा आठवडी बाजार पुन्हा उभारी धरेल की नाही माहीत नाही. नोटबंदीनंतर आठवडी बाजारावर झालेला हा दुसरा आणि सर्वात मोठा आघात आहे. अनेक वस्तू आणि सेवा आणि यांच्यावर आधारित सहजीवनाचा आणि आत्मनिर्भरता यांचा वारसा असणारा आठवडी बाजार कायम स्वरूपी नष्ट होईल का?
प्राचीन भारतीय व्यापारी पद्धतीतला बलुतेदारी, आलुतेदारी, फिरस्ते यांच्यावर आधारलेला, गावोगावी ग्रामीण आणि तळागाळातील अर्थकारणाचं चक्र असणारा आठवडी बाजार पुन्हा उभारी धरेल की नाही माहीत नाही. नोटबंदीनंतर आठवडी बाजारावर झालेला हा दुसरा आणि सर्वात मोठा आघात आहे. अनेक वस्तू आणि सेवा आणि यांच्यावर आधारित सहजीवनाचा आणि आत्मनिर्भरता यांचा वारसा असणारा आठवडी बाजार कायम स्वरूपी नष्ट होईल का?.....
अनलॉक चालू झाल्यापासून अनेक कंपन्यांची ऑफिस उघडलीयत. कर्मचारी कामावर जाऊ लागलेत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कंपन्याही ऑफिस सॅनिटाईझ करतायत, कर्मचाऱ्यांना काही सोयी पुरवल्या जातायत. यासोबतच कोरोना वायरसचा धोका कमी करण्यासाठी आपण कर्मचाऱ्यांनीही काही काळजी घ्यायला हवी.
अनलॉक चालू झाल्यापासून अनेक कंपन्यांची ऑफिस उघडलीयत. कर्मचारी कामावर जाऊ लागलेत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कंपन्याही ऑफिस सॅनिटाईझ करतायत, कर्मचाऱ्यांना काही सोयी पुरवल्या जातायत. यासोबतच कोरोना वायरसचा धोका कमी करण्यासाठी आपण कर्मचाऱ्यांनीही काही काळजी घ्यायला हवी......
लॉकडाऊनपासून आपण वीडियो कॉन्फरन्सवर एकमेकांना भेटतो आहोत. कसंतरी वेळ मारत आपण हे तंत्रज्ञान हाताळलं. पण आता आपलं पुढचं सगळं भवितव्यच या तंत्रज्ञानावर आधारलंय. त्यामुळे हे तंत्रज्ञान आणि त्यासोबत आपली वीडियो भेट प्रभावी होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायल्याच लागतील. त्यासाठी काही खास टिप्स.
लॉकडाऊनपासून आपण वीडियो कॉन्फरन्सवर एकमेकांना भेटतो आहोत. कसंतरी वेळ मारत आपण हे तंत्रज्ञान हाताळलं. पण आता आपलं पुढचं सगळं भवितव्यच या तंत्रज्ञानावर आधारलंय. त्यामुळे हे तंत्रज्ञान आणि त्यासोबत आपली वीडियो भेट प्रभावी होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायल्याच लागतील. त्यासाठी काही खास टिप्स......
कोरोना वायरसनं जागतिक अर्थव्यवस्थेपुढे भयंकर संकट निर्माण केलंय. या संकटाची धार आपण काहीशी कमी करू शकतो. काही महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांसाठी सरकारनं राजकीय इच्छाशक्ती दाखवायला हवी. तसं झालं तर ते एक धाडसी राजकीय पाऊल म्हणून ओळखलं जाईल.
कोरोना वायरसनं जागतिक अर्थव्यवस्थेपुढे भयंकर संकट निर्माण केलंय. या संकटाची धार आपण काहीशी कमी करू शकतो. काही महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांसाठी सरकारनं राजकीय इच्छाशक्ती दाखवायला हवी. तसं झालं तर ते एक धाडसी राजकीय पाऊल म्हणून ओळखलं जाईल......
मास्क आपल्या रोजच्या जगण्यातली गोष्ट झालीय. फार सहजतेनं आपण मास्क वापरतो आणि तितक्याच सहजतेने मास्क घालताना अनेक चुकाही करतो. या चुका आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाहीत. त्यामुळे आपण याच चुका वेळोवेळी न चुकता करतो. मास्क वापरत असाल तर या चुका नक्की टाळता येण्यासारख्या आहेत.
मास्क आपल्या रोजच्या जगण्यातली गोष्ट झालीय. फार सहजतेनं आपण मास्क वापरतो आणि तितक्याच सहजतेने मास्क घालताना अनेक चुकाही करतो. या चुका आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाहीत. त्यामुळे आपण याच चुका वेळोवेळी न चुकता करतो. मास्क वापरत असाल तर या चुका नक्की टाळता येण्यासारख्या आहेत......
डब्लूएचओकडून १ ते ७ ऑगस्ट हा काळ जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. कोरोनाची लागण झालेल्या आईचं दुध पाजल्याने बाळाला कोरोनाची लागण तर होणार नाही ना, अशी शंका घेतली जातेय. पण खरं म्हणजे, थोडी काळजी घेऊन आईचं दुध बाळाला पाजता येऊ शकतं असं डब्लूएओने आपल्या अहवालात सांगितलंय.
डब्लूएचओकडून १ ते ७ ऑगस्ट हा काळ जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. कोरोनाची लागण झालेल्या आईचं दुध पाजल्याने बाळाला कोरोनाची लागण तर होणार नाही ना, अशी शंका घेतली जातेय. पण खरं म्हणजे, थोडी काळजी घेऊन आईचं दुध बाळाला पाजता येऊ शकतं असं डब्लूएओने आपल्या अहवालात सांगितलंय......
कोरोना वायरसची साथ संपवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे लसीकरण. त्यामुळेच जगातल्या अनेक संस्था कोरोनाची लस शोधण्याचा प्रयत्न करतायत. अंतीम टप्प्यात आलेल्या या संशोधनात माणसांवर प्रयोग केले जातात. मग या प्रयोगात आपल्यालाही भाग घेण्याची संधी आपल्याला मिळाली तर?
कोरोना वायरसची साथ संपवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे लसीकरण. त्यामुळेच जगातल्या अनेक संस्था कोरोनाची लस शोधण्याचा प्रयत्न करतायत. अंतीम टप्प्यात आलेल्या या संशोधनात माणसांवर प्रयोग केले जातात. मग या प्रयोगात आपल्यालाही भाग घेण्याची संधी आपल्याला मिळाली तर?.....
दिवसेंदिवस कोरोना वायरसच्या पेशंटची संख्या वाढतेय. दररोज लाखो लोकांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जातायत आणि हे हजारो लोक जीव मुठीत धरून आपल्या टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहतायत. या काळात आपलं मन शांत ठेवायला हवं. त्यासोबतच आपल्यामुळे इतरांना वायरसची लागण होऊ नये यासाठी काही सोप्या गोष्टी पाळायला हव्यात.
दिवसेंदिवस कोरोना वायरसच्या पेशंटची संख्या वाढतेय. दररोज लाखो लोकांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जातायत आणि हे हजारो लोक जीव मुठीत धरून आपल्या टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहतायत. या काळात आपलं मन शांत ठेवायला हवं. त्यासोबतच आपल्यामुळे इतरांना वायरसची लागण होऊ नये यासाठी काही सोप्या गोष्टी पाळायला हव्यात......
जिल्ह्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. यंत्रणा अपुरी पडतेय. बेड मिळत नाहीत म्हणून पेशंट मरू लागलेत. वेंटिलेटरची गरज असलेल्या पेशंट्सचे नातेवाईक `वेंटिलेटर मिळेल का वेंटिलेटर…` म्हणून आकांत करताहेत. हे सगळे अपयश कोणत्या सरकारचं आहे? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करायला हरकत नाही, पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांनाही जाब विचारायला पाहिजे.
जिल्ह्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. यंत्रणा अपुरी पडतेय. बेड मिळत नाहीत म्हणून पेशंट मरू लागलेत. वेंटिलेटरची गरज असलेल्या पेशंट्सचे नातेवाईक `वेंटिलेटर मिळेल का वेंटिलेटर…` म्हणून आकांत करताहेत. हे सगळे अपयश कोणत्या सरकारचं आहे? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करायला हरकत नाही, पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांनाही जाब विचारायला पाहिजे......
अनलॉक सुरू झाल्यापासून भारतातल्या कोरोना वायरसच्या पेशंटमधे प्रचंड वाढ झाली. पुन्हा देशाला टाळं लावावं लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जातीय. पण लॉकडाऊन न करताही हा प्रसार थांबवणं शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांची एक टीम हवी.
अनलॉक सुरू झाल्यापासून भारतातल्या कोरोना वायरसच्या पेशंटमधे प्रचंड वाढ झाली. पुन्हा देशाला टाळं लावावं लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जातीय. पण लॉकडाऊन न करताही हा प्रसार थांबवणं शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांची एक टीम हवी......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावणी, टाळ्या वाजवण्याचं आवाहन केल्यावर त्याला विरोध झाला. पण पंतप्रधानांनी मास्क वापर म्हटल्यावर सगळ्यांनी त्याचं अंमल सुरू केला. तिकडे अमेरिकेत मात्र मास्क वापरण्यावरून देशात दोन गट निर्माण झाले. ‘मास्क‘वाद निर्माण झालाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावणी, टाळ्या वाजवण्याचं आवाहन केल्यावर त्याला विरोध झाला. पण पंतप्रधानांनी मास्क वापर म्हटल्यावर सगळ्यांनी त्याचं अंमल सुरू केला. तिकडे अमेरिकेत मात्र मास्क वापरण्यावरून देशात दोन गट निर्माण झाले. ‘मास्क‘वाद निर्माण झालाय......
जगभरात दरवर्षी ६५ हजार लोक सिझनल फ्लूने मृत्यूमुखी पडतात. पावसाळा सुरू झाला की भारतातही या सिझनल फ्लूची साथ पसरू लागते. यंदा भारतात ही साथ येईल तेव्हा कोरोना वायरसचा धोका आणि सोबतच आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढेल अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. पण आता कोरोनाच्या साथीमुळे सिझनल फ्लू येणारच नाही, अशी चर्चा सुरू झालीय.
जगभरात दरवर्षी ६५ हजार लोक सिझनल फ्लूने मृत्यूमुखी पडतात. पावसाळा सुरू झाला की भारतातही या सिझनल फ्लूची साथ पसरू लागते. यंदा भारतात ही साथ येईल तेव्हा कोरोना वायरसचा धोका आणि सोबतच आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढेल अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. पण आता कोरोनाच्या साथीमुळे सिझनल फ्लू येणारच नाही, अशी चर्चा सुरू झालीय......
ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करून देशातल्या युनिवर्सिटींनी अंतिम सत्रातल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्याच पाहिजेत, असं परिपत्रक युजीसीनं ६ जुलैला काढलं. त्याविरोधात देशभरातल्या ३१ विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. याचिकेत संविधानातल्या कलमांचं उल्लंघन झाल्याचं सांगितलं गेलंय. या कलमांच्या आधारे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याचा अंदाज बांधता येणं शक्य आहे.
ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करून देशातल्या युनिवर्सिटींनी अंतिम सत्रातल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्याच पाहिजेत, असं परिपत्रक युजीसीनं ६ जुलैला काढलं. त्याविरोधात देशभरातल्या ३१ विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. याचिकेत संविधानातल्या कलमांचं उल्लंघन झाल्याचं सांगितलं गेलंय. या कलमांच्या आधारे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याचा अंदाज बांधता येणं शक्य आहे......
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना कोरोना वायरसची लागण झाल्याचं कळल्यापासून सगळ्या देशानं देव पाण्यात घातलेत. कुठे त्यांच्यासाठी होम हवन करणं चालूय तर कुठे सॅंड आर्ट वगैरे बनवून त्यांना शुभेच्छा दिल्या जातायत. सोशल मीडियानं अमिताभ यांना राष्ट्रीय कोरोना रूग्ण घोषित केलंय. या सगळ्यात अमिताभ यांना कोरोना वायरसची लागण झाली कशी याचा शोध घ्यायला मात्र आपण विरसलो आहोत.
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना कोरोना वायरसची लागण झाल्याचं कळल्यापासून सगळ्या देशानं देव पाण्यात घातलेत. कुठे त्यांच्यासाठी होम हवन करणं चालूय तर कुठे सॅंड आर्ट वगैरे बनवून त्यांना शुभेच्छा दिल्या जातायत. सोशल मीडियानं अमिताभ यांना राष्ट्रीय कोरोना रूग्ण घोषित केलंय. या सगळ्यात अमिताभ यांना कोरोना वायरसची लागण झाली कशी याचा शोध घ्यायला मात्र आपण विरसलो आहोत......
ऑफीस, हॉस्पिटल, बँका अशा ठिकाणी प्रवेश करण्यापुर्वी ताप मोजणारी एक बंदुक आपल्यावर रोखली जाते. या गनमुळे कोरोना वायरसची लागण झालेली व्यक्ती शोधता येते. अनलॉक चालू झाल्यापासून ठिकठिकाणी टेम्परेचर गनचा वापर चालू झालाय. तरीही कोरोना वायरसचा प्रसार थांबलेला नाही. उलट गनच्या चुकीच्या वापरामुळे पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय.
ऑफीस, हॉस्पिटल, बँका अशा ठिकाणी प्रवेश करण्यापुर्वी ताप मोजणारी एक बंदुक आपल्यावर रोखली जाते. या गनमुळे कोरोना वायरसची लागण झालेली व्यक्ती शोधता येते. अनलॉक चालू झाल्यापासून ठिकठिकाणी टेम्परेचर गनचा वापर चालू झालाय. तरीही कोरोना वायरसचा प्रसार थांबलेला नाही. उलट गनच्या चुकीच्या वापरामुळे पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय......
दिल्लीत घरी आयसोलेशनमधे राहणाऱ्या पेशंटचा मृत्यूदर कमी करण्यात ऑक्सिमीटर या मशीनने सुरक्षा कवचासारखं काम केलं असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. हे ऑक्सिमीटर म्हणजे रक्तातलं ऑक्सीजनचं प्रमाण मोजणारं एक यंत्र आहे. चीनवरून आयात केल्या जाणाऱ्या या यंत्राची मागणी कोरोनाच्या काळात भलतीच वाढल्याचं समोर आलंय.
दिल्लीत घरी आयसोलेशनमधे राहणाऱ्या पेशंटचा मृत्यूदर कमी करण्यात ऑक्सिमीटर या मशीनने सुरक्षा कवचासारखं काम केलं असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. हे ऑक्सिमीटर म्हणजे रक्तातलं ऑक्सीजनचं प्रमाण मोजणारं एक यंत्र आहे. चीनवरून आयात केल्या जाणाऱ्या या यंत्राची मागणी कोरोनाच्या काळात भलतीच वाढल्याचं समोर आलंय......
शाळा बंद असताना मुलांकडून अभ्यास करून घेण्याचं ई लर्निंग हे एकमेव साधन पालकांकडे उरलंय. सध्या इंटरनेटवर ६०० पेक्षा जास्त ई लर्निंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. बायजू, नवनीतचं ईसेन्स, सीम्पली लर्न, खान अॅकॅडमी, असे काही प्लॅटफॉर्म भारतात लोकप्रिय आहेत. आता यातला नेमका कोणता प्लॅटफॉर्म किंवा अॅप आपल्या मुलांसाठी निवडायचं हाही मोठा प्रश्न पालकांपुढे आहे.