विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना केंद्रशासित प्रदेश पुद्दूचेरीतलं काँग्रेसचं सरकार गडगडलं. येत्या ६ एप्रिलला विधानसभेच्या ३० जागांसाठी तिथं मतदान होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांच्या सभेमुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरतेय. तर मित्रपक्षांमुळे भाजपचा आत्मविश्वासही वाढलाय.
विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना केंद्रशासित प्रदेश पुद्दूचेरीतलं काँग्रेसचं सरकार गडगडलं. येत्या ६ एप्रिलला विधानसभेच्या ३० जागांसाठी तिथं मतदान होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांच्या सभेमुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरतेय. तर मित्रपक्षांमुळे भाजपचा आत्मविश्वासही वाढलाय......
नाट्यमय घडामोडींनंतर अखेर पुद्दूचेरीतलं काँग्रेसचं सरकार कोसळलं. विधानसभेत बहुमत सिद्ध करता न आल्यामुळे मुख्यमंत्री वी. नारायणसामी यांना राजीनामा द्यावा लागला. केंद्र सरकार आणि उपराज्यपाल किरण बेदी यांच्यामुळे आपलं सरकार कोसळल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार कोसळण्यामागे खूप मोठी वादाची पार्श्वभूमीही आहे. त्याचा पुरेपूर फायदा भाजपनं घेतलाय.
नाट्यमय घडामोडींनंतर अखेर पुद्दूचेरीतलं काँग्रेसचं सरकार कोसळलं. विधानसभेत बहुमत सिद्ध करता न आल्यामुळे मुख्यमंत्री वी. नारायणसामी यांना राजीनामा द्यावा लागला. केंद्र सरकार आणि उपराज्यपाल किरण बेदी यांच्यामुळे आपलं सरकार कोसळल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार कोसळण्यामागे खूप मोठी वादाची पार्श्वभूमीही आहे. त्याचा पुरेपूर फायदा भाजपनं घेतलाय. .....