तो समाजवादी घरातला मराठमोळा ब्राम्हण मुलगा. ती मोडकंतोडकं इंग्रजी बोलणारी तमिळ ख्रिश्चन मुलगी. पण प्रेमासाठी दोघांनी धर्म, भाषा आणि प्रांताच्या मर्यादा ओलांडल्या. लाख अडचणींवर मात करून मुंबईतल्या समाजवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचं लग्न लावलं. ४० वर्षांपूर्वीच्या या अनोख्या ‘लव जिहाद’ची गोष्ट प्रत्येक प्रेमी युगुलाने वाचायलाच हवी.
तो समाजवादी घरातला मराठमोळा ब्राम्हण मुलगा. ती मोडकंतोडकं इंग्रजी बोलणारी तमिळ ख्रिश्चन मुलगी. पण प्रेमासाठी दोघांनी धर्म, भाषा आणि प्रांताच्या मर्यादा ओलांडल्या. लाख अडचणींवर मात करून मुंबईतल्या समाजवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचं लग्न लावलं. ४० वर्षांपूर्वीच्या या अनोख्या ‘लव जिहाद’ची गोष्ट प्रत्येक प्रेमी युगुलाने वाचायलाच हवी......
आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. उद्याचा भारत सर्वांना सन्मानाची हमी आणि विकासाची समान संधी देणारा बनावा, हे स्वप्न नेत्यांनी आणि जनतेनं सामूहिकपणे पाहिलं होतं. हेच स्वप्न भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीयांनी स्वीकारलंय. याच संविधानातल्या तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी व्हावी म्हणून जनमताचा दबाव निर्माण करणार आहोत का? यावर भारताचं आणि भारतीयांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. उद्याचा भारत सर्वांना सन्मानाची हमी आणि विकासाची समान संधी देणारा बनावा, हे स्वप्न नेत्यांनी आणि जनतेनं सामूहिकपणे पाहिलं होतं. हेच स्वप्न भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीयांनी स्वीकारलंय. याच संविधानातल्या तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी व्हावी म्हणून जनमताचा दबाव निर्माण करणार आहोत का? यावर भारताचं आणि भारतीयांचं भवितव्य अवलंबून असणार आहे......
२९ जून २०२२ला आयटी मुंबईच्या प्रांगणात जातविषयक खुल्या चर्चेसाठी ओपन हाऊसचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी फक्त विद्यार्थीच नाही, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या चर्चेत भाग घेऊन आपल्या समस्या सगळ्यांसमोर मांडल्या. याचीच निष्पत्ती आयआयटी मुंबईने जातजाणिवेवर नवा आणि सर्वांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात झालीय.
२९ जून २०२२ला आयटी मुंबईच्या प्रांगणात जातविषयक खुल्या चर्चेसाठी ओपन हाऊसचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी फक्त विद्यार्थीच नाही, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या चर्चेत भाग घेऊन आपल्या समस्या सगळ्यांसमोर मांडल्या. याचीच निष्पत्ती आयआयटी मुंबईने जातजाणिवेवर नवा आणि सर्वांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात झालीय......
एकीकडे गणेशोत्सव, मुंज, वैदिक पद्धतीनं लग्न तर दुसरीकडे ‘थँक्स गिविंग’सारख्या अमेरिकन उत्सवाची नक्कल, यात उच्चवर्णीय अडकलेत, तर त्याचवेळी इथून गेलेल्या बहुजनांना ते वाईट वागणूक देत असल्याच्या तक्रारी पुढं येतायत.
एकीकडे गणेशोत्सव, मुंज, वैदिक पद्धतीनं लग्न तर दुसरीकडे ‘थँक्स गिविंग’सारख्या अमेरिकन उत्सवाची नक्कल, यात उच्चवर्णीय अडकलेत, तर त्याचवेळी इथून गेलेल्या बहुजनांना ते वाईट वागणूक देत असल्याच्या तक्रारी पुढं येतायत......
सांस्कृतिक-धार्मिक राष्ट्रवाद, मुसलमानविरोधाच्या मुद्द्यावर सर्व जातींतल्या हिंदुत्वाच्या ओळखीला ठळक करणं, हे सत्ताधाऱ्यांचे विकासापेक्षाही प्रमुख आधार बनतायत. त्यामुळे जात, धर्म, संस्कृती, राष्ट्रवाद, अल्पसंख्याक, सेक्युलॅरिझम याबाबतचं आपलं नरेटिव विरोधकांना नक्की करावं लागेल. ते जनतेत प्रचारावं लागेल. ही लढाई लांबची आहे. आपल्याला टिकायचं असेल तर ती करावीच लागेल.
सांस्कृतिक-धार्मिक राष्ट्रवाद, मुसलमानविरोधाच्या मुद्द्यावर सर्व जातींतल्या हिंदुत्वाच्या ओळखीला ठळक करणं, हे सत्ताधाऱ्यांचे विकासापेक्षाही प्रमुख आधार बनतायत. त्यामुळे जात, धर्म, संस्कृती, राष्ट्रवाद, अल्पसंख्याक, सेक्युलॅरिझम याबाबतचं आपलं नरेटिव विरोधकांना नक्की करावं लागेल. ते जनतेत प्रचारावं लागेल. ही लढाई लांबची आहे. आपल्याला टिकायचं असेल तर ती करावीच लागेल......
देशात ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्गातल्या जातींची लोकसंख्या किती आहे, याची खरी आकडेवारी सांगितली जात नाही. कारण, प्रत्येक जातीचा नेता आपापल्या जातीची लोकसंख्या बर्याच प्रमाणात वाढवून सांगतो. ही संख्या हा प्रत्येक नेत्याच्या राजकारणाचा आधार बनतो किंवा बनवला जातो. त्यामुळे प्रत्येक राजकीय नेत्याला मोठी संख्या असलेल्या जाती आणि जमातीपुढे झुकायला भाग पडतं.
देशात ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्गातल्या जातींची लोकसंख्या किती आहे, याची खरी आकडेवारी सांगितली जात नाही. कारण, प्रत्येक जातीचा नेता आपापल्या जातीची लोकसंख्या बर्याच प्रमाणात वाढवून सांगतो. ही संख्या हा प्रत्येक नेत्याच्या राजकारणाचा आधार बनतो किंवा बनवला जातो. त्यामुळे प्रत्येक राजकीय नेत्याला मोठी संख्या असलेल्या जाती आणि जमातीपुढे झुकायला भाग पडतं......
भारतातल्या विचारवंत-विदुषी डॉ. गेल ऑम्व्हेट यांचं निधन झालंय. अमेरिकेतून त्या भारतात आल्या. डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबतचं त्यांचं सहजीवन म्हणजे निखळ मानवी प्रेमाची परीकथा होतं. ऑम्व्हेट यांनी आपलं आयुष्य कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी समर्पित केलं. त्यांचं लेखन सामाजिक राजकीय चळवळींसाठी दस्तऐवज बनलं. त्यांच्या कामाचा वेध घेणारी संपत देसाई यांची फेसबुक पोस्ट.
भारतातल्या विचारवंत-विदुषी डॉ. गेल ऑम्व्हेट यांचं निधन झालंय. अमेरिकेतून त्या भारतात आल्या. डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबतचं त्यांचं सहजीवन म्हणजे निखळ मानवी प्रेमाची परीकथा होतं. ऑम्व्हेट यांनी आपलं आयुष्य कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी समर्पित केलं. त्यांचं लेखन सामाजिक राजकीय चळवळींसाठी दस्तऐवज बनलं. त्यांच्या कामाचा वेध घेणारी संपत देसाई यांची फेसबुक पोस्ट......
मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरमधे झालेल्या हत्यांकांडाला जुलै महिन्यात २४ वर्ष पूर्ण झाली. अमानुष पद्धतीने लोकांची हत्या करणाऱ्या जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. आजही ही परिस्थिती बदलेली नाही. रचनात्मक आणि व्यवस्थात्मक पातळीवर जातीची समस्या सोडवण्यासाठी कधीच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळेच पायल तडवी, रोहित वेमुलासारखे बळी जात राहतात.
मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरमधे झालेल्या हत्यांकांडाला जुलै महिन्यात २४ वर्ष पूर्ण झाली. अमानुष पद्धतीने लोकांची हत्या करणाऱ्या जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. आजही ही परिस्थिती बदलेली नाही. रचनात्मक आणि व्यवस्थात्मक पातळीवर जातीची समस्या सोडवण्यासाठी कधीच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळेच पायल तडवी, रोहित वेमुलासारखे बळी जात राहतात......
१३ मेला अक्षयतृतीया होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवशी २७२ वर्षांपूर्वी एका मातंग समाजातल्या पुरुषाचा पेशव्यांनी बळी दिला होता. ते ठिकाण आज नवसाला पावणारा मांगीरबाबा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातल्या 'मांगवीर', 'मांगीर' किंवा 'मांगीरबाबा' या मातंग समाजातल्या हुतात्म्यांची गाथा सांगणाऱ्या लोकदैवतांचा इतिहास सांगणारी ही फेसबुक पोस्ट.
१३ मेला अक्षयतृतीया होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवशी २७२ वर्षांपूर्वी एका मातंग समाजातल्या पुरुषाचा पेशव्यांनी बळी दिला होता. ते ठिकाण आज नवसाला पावणारा मांगीरबाबा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातल्या 'मांगवीर', 'मांगीर' किंवा 'मांगीरबाबा' या मातंग समाजातल्या हुतात्म्यांची गाथा सांगणाऱ्या लोकदैवतांचा इतिहास सांगणारी ही फेसबुक पोस्ट......
महात्मा बसवेश्वर यांची आज जयंती. आयुष्यातल्या अनेक प्रसंगातून मानवी संवेदना कशी जपावी याचा कृतिशील संदेश त्यांनी जगाला दिला. आज कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करणं, कोरोनाग्रस्त लोकांना प्रेमाचे दोन शब्द बोलून त्यांचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचा उत्सव करण्यापेक्षा त्यांचे विचार समजून घेऊन अस्वस्थ वर्तमानातल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत.
महात्मा बसवेश्वर यांची आज जयंती. आयुष्यातल्या अनेक प्रसंगातून मानवी संवेदना कशी जपावी याचा कृतिशील संदेश त्यांनी जगाला दिला. आज कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करणं, कोरोनाग्रस्त लोकांना प्रेमाचे दोन शब्द बोलून त्यांचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचा उत्सव करण्यापेक्षा त्यांचे विचार समजून घेऊन अस्वस्थ वर्तमानातल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत......
महाराष्ट्र सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा ५ मेला सुप्रीम कोर्टाने रद्द केला. आरक्षणविरोधी म्हणून भाजपची ओळख आहे. पण मुस्लिमांचे लाड करतात म्हणून काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजपाच्या फडणवीस सरकारनेच मराठा आरक्षणाचा कायदा केला. त्यातून मराठ्यांचं लांगुलचालन करण्याचा सरकारचा प्रयत्न उघड दिसतो, सांगताहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ फैझान मुस्तफा.
महाराष्ट्र सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा ५ मेला सुप्रीम कोर्टाने रद्द केला. आरक्षणविरोधी म्हणून भाजपची ओळख आहे. पण मुस्लिमांचे लाड करतात म्हणून काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजपाच्या फडणवीस सरकारनेच मराठा आरक्षणाचा कायदा केला. त्यातून मराठ्यांचं लांगुलचालन करण्याचा सरकारचा प्रयत्न उघड दिसतो, सांगताहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ फैझान मुस्तफा......
‘आसुरन’या सिनेमासाठी अभिनेता धनुष याला २०१९ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणं या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट तमिळ सिनेमाचा पुरस्कार घोषित झाला. धनुष हा मुळातच संवेदनशील अभिनेता आहे. प्रत्येक भूमिकेत तो जीव ओतून काम करतो. त्याचं फळ त्याला या पुरस्काराच्या रूपानं मिळालंय. पण यानिमित्तानं ‘आसुरन’विषयी थोडं बोलायला हवं.
‘आसुरन’या सिनेमासाठी अभिनेता धनुष याला २०१९ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणं या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट तमिळ सिनेमाचा पुरस्कार घोषित झाला. धनुष हा मुळातच संवेदनशील अभिनेता आहे. प्रत्येक भूमिकेत तो जीव ओतून काम करतो. त्याचं फळ त्याला या पुरस्काराच्या रूपानं मिळालंय. पण यानिमित्तानं ‘आसुरन’विषयी थोडं बोलायला हवं......
समाजवादी कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक एस.एम. जोशी यांची आज पुण्यतिथी. राष्ट्र सेवा दलाचे ते पहिले दलप्रमुख होते. कामगार, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून, राजकारणातून संघर्ष करताना एसेम यांनी अनेक रचनात्मक कामही केली. त्यांच्या रचनात्कम संघर्षाच्या मार्गावर चालणाऱ्या तरुणांची आज अत्यंत गरज आहे. सुभाष वारे यांनी फेसबुकवर लिहिलेला हा लेख इथं देत आहोत.
समाजवादी कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक एस.एम. जोशी यांची आज पुण्यतिथी. राष्ट्र सेवा दलाचे ते पहिले दलप्रमुख होते. कामगार, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून, राजकारणातून संघर्ष करताना एसेम यांनी अनेक रचनात्मक कामही केली. त्यांच्या रचनात्कम संघर्षाच्या मार्गावर चालणाऱ्या तरुणांची आज अत्यंत गरज आहे. सुभाष वारे यांनी फेसबुकवर लिहिलेला हा लेख इथं देत आहोत......
प्रेमात पडलं की समाजमान्यता मिळते. स्टेटस मिळतं. हे स्टेटस चारचौघात मिरवता येतं. या उद्देशानंही नव्या पिढीतले अनेक जण प्रेमात पडतात. पण प्रेमातली आडवळणं, धक्के, अपमान याचा अनुभव गाठीशी आल्यावर त्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजतो. या नव्या पिढीचा हा प्रवास समजून घेण्यासाठी रेश्माची ही गोष्ट वाचायलाच हवी.
प्रेमात पडलं की समाजमान्यता मिळते. स्टेटस मिळतं. हे स्टेटस चारचौघात मिरवता येतं. या उद्देशानंही नव्या पिढीतले अनेक जण प्रेमात पडतात. पण प्रेमातली आडवळणं, धक्के, अपमान याचा अनुभव गाठीशी आल्यावर त्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजतो. या नव्या पिढीचा हा प्रवास समजून घेण्यासाठी रेश्माची ही गोष्ट वाचायलाच हवी......
नजरेतून होणारं पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमाची सुरवात खरंतर. या प्रेमाचे किस्से आपण जगभर सांगत हिंडावं इतकं ते हवंहवंसं वाटतं. पण त्यात जात, धर्म आडवा आला तर? सगळं फिस्कटतं. प्रेम व्यक्त करण्याआधीच हे सगळं घडतं. अशावेळी निरपेक्ष प्रेमाच्या चिंधड्या उडतात. प्रेमाची स्वप्न ही स्वप्नच राहतात.
नजरेतून होणारं पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमाची सुरवात खरंतर. या प्रेमाचे किस्से आपण जगभर सांगत हिंडावं इतकं ते हवंहवंसं वाटतं. पण त्यात जात, धर्म आडवा आला तर? सगळं फिस्कटतं. प्रेम व्यक्त करण्याआधीच हे सगळं घडतं. अशावेळी निरपेक्ष प्रेमाच्या चिंधड्या उडतात. प्रेमाची स्वप्न ही स्वप्नच राहतात......
अपेक्षित उत्पन्न लक्षात घेऊन त्याप्रमाणात किंवा काहीवेळा चॅनल नवं असेल तर किंवा ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी खूपच जास्तही खर्च केला जातो. खर्च ही एकप्रकारे गुंतवणूक असते कारण प्रत्येक चॅनल किंवा टीवी समूह ज्यासाठी सर्व आटापिटा करत असतो. ते लक्ष्य असतं ३२ हजार कोटींचं! हा आकडा भारतातील टीवी चॅनलना मिळणाऱ्या वार्षिक जाहिरात उत्पन्नाचा आहे. यासाठी सगळे चॅनेल प्रयत्न करत असतात.
अपेक्षित उत्पन्न लक्षात घेऊन त्याप्रमाणात किंवा काहीवेळा चॅनल नवं असेल तर किंवा ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी खूपच जास्तही खर्च केला जातो. खर्च ही एकप्रकारे गुंतवणूक असते कारण प्रत्येक चॅनल किंवा टीवी समूह ज्यासाठी सर्व आटापिटा करत असतो. ते लक्ष्य असतं ३२ हजार कोटींचं! हा आकडा भारतातील टीवी चॅनलना मिळणाऱ्या वार्षिक जाहिरात उत्पन्नाचा आहे. यासाठी सगळे चॅनेल प्रयत्न करत असतात......
बेगमपूर म्हणजे दुःख नसलेलं शहर. जातपात, धर्म, लिंग, श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसणारं एक गाव नाही, तर शहर रविदासांना प्रत्यक्षात आणायचं होतं. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ’शहराकडे चला’ सारखंच. संत रविदासांचा युटोपिया पुढे बाबासाहेबांच्या संविधानात वास्तवात येण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी जबाबदार आणि कुशल राज्यकर्त्यांची गरज आहे.
बेगमपूर म्हणजे दुःख नसलेलं शहर. जातपात, धर्म, लिंग, श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसणारं एक गाव नाही, तर शहर रविदासांना प्रत्यक्षात आणायचं होतं. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ’शहराकडे चला’ सारखंच. संत रविदासांचा युटोपिया पुढे बाबासाहेबांच्या संविधानात वास्तवात येण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी जबाबदार आणि कुशल राज्यकर्त्यांची गरज आहे......
मधल्या काळात देशातल्या बहुसंख्य मध्यमवर्गाला हिंदू - मुस्लिमद्वेषी चर्चा आणि विध्वंसक अजेंड्यावर आनंदाचं भरतं यायचं. पुढे अर्थव्यवस्था कोसळली, नोकऱ्या गेल्या, बेरोजगार तरूण आणखी निराश झाले. अशात पुर्वीच्या गुदगुल्यांचं रुपांतर आता वेदनेत झालंय. मोदींना मिळालेला सरसकट पाठींबा हा देशात नंगानाच करण्यासाठी नव्हता. तर काम करण्यासाठी होता, हा सुर आता निघू लागलाय.
मधल्या काळात देशातल्या बहुसंख्य मध्यमवर्गाला हिंदू - मुस्लिमद्वेषी चर्चा आणि विध्वंसक अजेंड्यावर आनंदाचं भरतं यायचं. पुढे अर्थव्यवस्था कोसळली, नोकऱ्या गेल्या, बेरोजगार तरूण आणखी निराश झाले. अशात पुर्वीच्या गुदगुल्यांचं रुपांतर आता वेदनेत झालंय. मोदींना मिळालेला सरसकट पाठींबा हा देशात नंगानाच करण्यासाठी नव्हता. तर काम करण्यासाठी होता, हा सुर आता निघू लागलाय......
एखाद्या अट्टल गुन्हेगारावरही झाले नसतील एवढे आरोप आजवर महात्मा गांधी या माणसावर झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही हे आरोपसत्र संपत नाही. पण या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींचं चरित्र आणि चारित्र्य पुरेसं आहे. ते नीट समजून घेतलं तर कळतं की हा ‘म्हातारा’ सर्व आरोपांना पुरून दशांगुळे उरतो. निमित्त गांधीजींची जयंती.
एखाद्या अट्टल गुन्हेगारावरही झाले नसतील एवढे आरोप आजवर महात्मा गांधी या माणसावर झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या सत्तर वर्षानंतरही हे आरोपसत्र संपत नाही. पण या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गांधीजींचं चरित्र आणि चारित्र्य पुरेसं आहे. ते नीट समजून घेतलं तर कळतं की हा ‘म्हातारा’ सर्व आरोपांना पुरून दशांगुळे उरतो. निमित्त गांधीजींची जयंती......
आज आपण भारतातल्या कानाकोपऱ्यात जातीवाद पाहतो. बाबासाहेब आंबेडकरांनी तर या जातीवादाविषयी भरपूर काही लिहून ठेवलंय. ते वाचताना जातव्यवस्था निर्माण होण्यापूर्वी जात नसलेली अशी समाजाची घडी या देशात होती का? असा प्रश्न भाषातज्ञ गणेश देवी यांना पडला. त्यातूनच त्यांनी जातव्यवस्थेची सविस्तर गोष्ट मांडलीय.
आज आपण भारतातल्या कानाकोपऱ्यात जातीवाद पाहतो. बाबासाहेब आंबेडकरांनी तर या जातीवादाविषयी भरपूर काही लिहून ठेवलंय. ते वाचताना जातव्यवस्था निर्माण होण्यापूर्वी जात नसलेली अशी समाजाची घडी या देशात होती का? असा प्रश्न भाषातज्ञ गणेश देवी यांना पडला. त्यातूनच त्यांनी जातव्यवस्थेची सविस्तर गोष्ट मांडलीय......
सोशल डिस्टसिंग हा शब्द आत्ता आत्ताच वापरात आला असला तरी भारताला तो नवा नाही. कित्येक वर्षांपासून इथल्या दलितांबाबत सोशल डिस्टन्सिंगच तर पाळलं गेलंय. डब्लूएचओनेही या शब्दाचा वापर करण्याचं थांबवलंय. पण आंबेडकर जयंतीदिवशी भाषण देताना पंतप्रधानांनी तोच शब्द वापरला. देशातल्या कुणीही हा शब्द वापरू नये, अशी विनंती करणारं पत्र ज्येष्ठ विचारवंत गणेश देवी आणि आमदार कपिल पाटील यांनी पंतप्रधानांना लिहिलंय.
सोशल डिस्टसिंग हा शब्द आत्ता आत्ताच वापरात आला असला तरी भारताला तो नवा नाही. कित्येक वर्षांपासून इथल्या दलितांबाबत सोशल डिस्टन्सिंगच तर पाळलं गेलंय. डब्लूएचओनेही या शब्दाचा वापर करण्याचं थांबवलंय. पण आंबेडकर जयंतीदिवशी भाषण देताना पंतप्रधानांनी तोच शब्द वापरला. देशातल्या कुणीही हा शब्द वापरू नये, अशी विनंती करणारं पत्र ज्येष्ठ विचारवंत गणेश देवी आणि आमदार कपिल पाटील यांनी पंतप्रधानांना लिहिलंय......
कोरोना संकटाच्या काळात भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन माणूस एकत्र येत असताना दुसरीकडे याला छेद देणाऱ्या घटना घडत आहेत. यूपीत जेवण बनवणारा व्यक्ती दलित आहेत म्हणून क्वारंटाईनमधे असलेले काहीजण जेवायला घरी जातात. जीवावर बेतलं असतानाही मनात खोलवर रुजलेल्या जातीच्या अस्मिता टोकदार कशा होतात, हे सांगण्यासाठी ही उदाहरणं पुरेशी बोलकी आहेत.
कोरोना संकटाच्या काळात भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन माणूस एकत्र येत असताना दुसरीकडे याला छेद देणाऱ्या घटना घडत आहेत. यूपीत जेवण बनवणारा व्यक्ती दलित आहेत म्हणून क्वारंटाईनमधे असलेले काहीजण जेवायला घरी जातात. जीवावर बेतलं असतानाही मनात खोलवर रुजलेल्या जातीच्या अस्मिता टोकदार कशा होतात, हे सांगण्यासाठी ही उदाहरणं पुरेशी बोलकी आहेत......
भारताचं बरंवाईट होण्यात जातीचा मोठा वाटा आहे. जातीच्या राजकारणातच अनेकांच्या भरभराटीचं आणि अधोगतीचं रहस्य दडलंय. समकालीन भारतात जात कळीची समस्या बनलीय. याच समस्येला धरून प्रा. दिलीप चव्हाण यांनी 'समकालीन भारतः जातीअंताची' हा ग्रंथ साकारलाय. यात त्यांनी जात मरत का नाही आणि तिला टिकवून ठेवण्यात कुणाचा फायदा होतो यासंबंधीची मांडणी केलीय.
भारताचं बरंवाईट होण्यात जातीचा मोठा वाटा आहे. जातीच्या राजकारणातच अनेकांच्या भरभराटीचं आणि अधोगतीचं रहस्य दडलंय. समकालीन भारतात जात कळीची समस्या बनलीय. याच समस्येला धरून प्रा. दिलीप चव्हाण यांनी 'समकालीन भारतः जातीअंताची' हा ग्रंथ साकारलाय. यात त्यांनी जात मरत का नाही आणि तिला टिकवून ठेवण्यात कुणाचा फायदा होतो यासंबंधीची मांडणी केलीय......
बॉलिवूड आपण फारशा गंभीरपणे घेत नाही. पण त्यातले सिनेमे कळत नकळत आपला मेंदू घडवत असतात. त्यामुळे त्यातली जातही शोधावी लागते. म्हणूनच जेएनयूतले प्राध्यापक आणि लेखक डॉ. हरीश वानखेडे यांनी मुंबई विद्यापीठात केलेली जात आणि बॉलिवूड या विषयावरची मांडणी महत्त्वाची ठरते. या भाषणातले हे काही महत्त्वाचे मुद्दे, आपल्याला विचार करायला लावणारे.
बॉलिवूड आपण फारशा गंभीरपणे घेत नाही. पण त्यातले सिनेमे कळत नकळत आपला मेंदू घडवत असतात. त्यामुळे त्यातली जातही शोधावी लागते. म्हणूनच जेएनयूतले प्राध्यापक आणि लेखक डॉ. हरीश वानखेडे यांनी मुंबई विद्यापीठात केलेली जात आणि बॉलिवूड या विषयावरची मांडणी महत्त्वाची ठरते. या भाषणातले हे काही महत्त्वाचे मुद्दे, आपल्याला विचार करायला लावणारे. .....
बजेटमधली एकएक गोष्ट आता बाहेर येतीय. सरकारच्या बजेटमधला काही भाग मागासवर्गीयांसाठी बाजुला काढून ठेवावा लागतो. पण नरेंद्र मोदींच्या सरकारने हा भाग बाजुला काढताना त्याची रक्कम कमी केलीय. देशात ६६ टक्के लोक मागासवर्गीय असताना मोदी सरकारने काढलेल्या पैशाचं गणित पाहता प्रत्येकासाठी दिवसाला फक्त ९ पैसे कमी होतील. तरीही या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही?
बजेटमधली एकएक गोष्ट आता बाहेर येतीय. सरकारच्या बजेटमधला काही भाग मागासवर्गीयांसाठी बाजुला काढून ठेवावा लागतो. पण नरेंद्र मोदींच्या सरकारने हा भाग बाजुला काढताना त्याची रक्कम कमी केलीय. देशात ६६ टक्के लोक मागासवर्गीय असताना मोदी सरकारने काढलेल्या पैशाचं गणित पाहता प्रत्येकासाठी दिवसाला फक्त ९ पैसे कमी होतील. तरीही या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही?.....
पाकिस्तान क्रिकेट टीममधले खेळाडू दानिश कनेरिया या आपल्या हिंदू सहकाऱ्याला वाईट वागणूक द्यायचे. या घटनेकडे पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने लक्ष वेधलंय. त्यावरून एकच खळबळ माजलीय. पण असे भेदाभेद फक्त पाकिस्तानाच नाहीत, तर भारतासह जगभरच्या क्रिकेट इतिहासात सापडतात.
पाकिस्तान क्रिकेट टीममधले खेळाडू दानिश कनेरिया या आपल्या हिंदू सहकाऱ्याला वाईट वागणूक द्यायचे. या घटनेकडे पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने लक्ष वेधलंय. त्यावरून एकच खळबळ माजलीय. पण असे भेदाभेद फक्त पाकिस्तानाच नाहीत, तर भारतासह जगभरच्या क्रिकेट इतिहासात सापडतात......
डॉक्टर पायल तडवी. अतिशय स्कॉलर आणि समाजातली पहिली डॉक्टर. तिच्या आत्महत्येमुळे जातीय विखार समोर आलाय. तिच्या सिनिअर्सकडून सातत्याने तिला जाती वरुन टोकलं जात होत. याला कंटाळून तिने आपला जीव संपवला. जातीची अस्मिता म्हणुन आपण जे मिरवतो. जी नाटकं करतो ती खरंतर आपल्या मनाचं खोटं दर्शन घडवत असतात.
डॉक्टर पायल तडवी. अतिशय स्कॉलर आणि समाजातली पहिली डॉक्टर. तिच्या आत्महत्येमुळे जातीय विखार समोर आलाय. तिच्या सिनिअर्सकडून सातत्याने तिला जाती वरुन टोकलं जात होत. याला कंटाळून तिने आपला जीव संपवला. जातीची अस्मिता म्हणुन आपण जे मिरवतो. जी नाटकं करतो ती खरंतर आपल्या मनाचं खोटं दर्शन घडवत असतात......