'बेबी काम डाऊन' हे गाणं इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालतंय. खरं तर गाणं रिलीज होऊन एव्हाना एक वर्ष झालंय. हे गाणं गाणारा रेमा नावाचा नायजेरियन रॅपर नुकताच भारत दौऱ्यावर येऊन गेला. दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या प्रमुख शहरांमधे झालेल्या त्याच्या कॉन्सर्टला त्याच्या असंख्य भारतीय चाहत्यांसोबतच इथल्या सेलिब्रिटींनीही दमदार हजेरी लावली होती.
'बेबी काम डाऊन' हे गाणं इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालतंय. खरं तर गाणं रिलीज होऊन एव्हाना एक वर्ष झालंय. हे गाणं गाणारा रेमा नावाचा नायजेरियन रॅपर नुकताच भारत दौऱ्यावर येऊन गेला. दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या प्रमुख शहरांमधे झालेल्या त्याच्या कॉन्सर्टला त्याच्या असंख्य भारतीय चाहत्यांसोबतच इथल्या सेलिब्रिटींनीही दमदार हजेरी लावली होती. .....
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने या आंतरराष्ट्रीय संस्थेने काही दिवसांपूर्वी जागतिक माध्यमस्वातंत्र्य निर्देशांक जाहीर केला. या निर्देशांकानुसार १६१व्या स्थानावर असलेल्या भारतात माध्यमांचं स्वातंत्र्य आणि अस्तित्व धोक्यात आल्याचं अधोरेखित झालंय. श्रीलंका आणि पाकिस्तान या अस्थिर शेजारी राष्ट्रांचंही स्थान भारतापेक्षा वर आहे. त्यामुळे १८० देशांमधल्या माध्यमस्वातंत्र्याचा आढावा घेणारा हा निर्देशांक मोदी सरकारसाठी एक डोकेदुखीच ठरलाय.
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने या आंतरराष्ट्रीय संस्थेने काही दिवसांपूर्वी जागतिक माध्यमस्वातंत्र्य निर्देशांक जाहीर केला. या निर्देशांकानुसार १६१व्या स्थानावर असलेल्या भारतात माध्यमांचं स्वातंत्र्य आणि अस्तित्व धोक्यात आल्याचं अधोरेखित झालंय. श्रीलंका आणि पाकिस्तान या अस्थिर शेजारी राष्ट्रांचंही स्थान भारतापेक्षा वर आहे. त्यामुळे १८० देशांमधल्या माध्यमस्वातंत्र्याचा आढावा घेणारा हा निर्देशांक मोदी सरकारसाठी एक डोकेदुखीच ठरलाय......
गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधे रक्तरंजित दंगलींना तोंड फुटलंय. ईशान्य भारताच्या एका कोपऱ्यात उसळलेल्या या आगडोंबात गेल्या काही दिवसात पन्नासहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. ‘माझं मणिपूर जळतंय. कृपया मदत करा’, असं कळकळीचं वायरल ट्विट आंतरराष्ट्रीय ख्यातीची बॉक्सर मेरी कोमनं केलं. आता तरी ईशान्य भारताचा हा आक्रोश आपण ऐकणार की नाही?
गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधे रक्तरंजित दंगलींना तोंड फुटलंय. ईशान्य भारताच्या एका कोपऱ्यात उसळलेल्या या आगडोंबात गेल्या काही दिवसात पन्नासहून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. ‘माझं मणिपूर जळतंय. कृपया मदत करा’, असं कळकळीचं वायरल ट्विट आंतरराष्ट्रीय ख्यातीची बॉक्सर मेरी कोमनं केलं. आता तरी ईशान्य भारताचा हा आक्रोश आपण ऐकणार की नाही?.....
'अमेरिकन नोकरी आणि देशी छोकरी' हा फॉर्म्युला वापरून सुखी होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. दुसरीकडे भारतातल्या अर्थव्यवस्थेला मंदीची चाहूल लागली असून, महागाई आणि बेकारीमुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळेच अनेक भारतीय मिळेल त्या मार्गानं अमेरिकेत घुसण्यासाठी प्रयत्न करतायत. या बेकादेशीर घुसखोरांमुळे अमेरिका हैराण झाली असून, त्यात गुजराती लोकांची संख्या लक्षणीय आहे.
'अमेरिकन नोकरी आणि देशी छोकरी' हा फॉर्म्युला वापरून सुखी होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. दुसरीकडे भारतातल्या अर्थव्यवस्थेला मंदीची चाहूल लागली असून, महागाई आणि बेकारीमुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळेच अनेक भारतीय मिळेल त्या मार्गानं अमेरिकेत घुसण्यासाठी प्रयत्न करतायत. या बेकादेशीर घुसखोरांमुळे अमेरिका हैराण झाली असून, त्यात गुजराती लोकांची संख्या लक्षणीय आहे......
ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय.
ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय......
युक्रेनमधलं युद्ध संपताना दिसत नाही. एकीकडे रशिया आणि दुसरीकडे अमेरिकेच्या पाठिंब्यानं युक्रेन असं स्वरूप असलेलं हे युद्ध दोन महासत्त्तांमधला संघर्ष ठरलाय. त्यात चीन आणि रशिया एकत्र आहेत. या पार्श्वभूमीवर नुकत्याच युक्रेनच्या परराष्ट्र उपमंत्री एमिन झापारोवा भारतात मदत मागायला आल्या होत्या. त्यामुळे आजवर अलिप्त राहिलेल्या भारताची अडचण आता वाढताना दिसतेय.
युक्रेनमधलं युद्ध संपताना दिसत नाही. एकीकडे रशिया आणि दुसरीकडे अमेरिकेच्या पाठिंब्यानं युक्रेन असं स्वरूप असलेलं हे युद्ध दोन महासत्त्तांमधला संघर्ष ठरलाय. त्यात चीन आणि रशिया एकत्र आहेत. या पार्श्वभूमीवर नुकत्याच युक्रेनच्या परराष्ट्र उपमंत्री एमिन झापारोवा भारतात मदत मागायला आल्या होत्या. त्यामुळे आजवर अलिप्त राहिलेल्या भारताची अडचण आता वाढताना दिसतेय......
राज्यघटना आणि धर्म हा सध्या चर्चेचा विषय आहे. सुप्रीम कोर्टानंही अत्यंत परखड भाषेत सरकारला सुनावलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर धर्म आणि घटनेतली धर्मनिरपेक्षता याबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांनी १९८३मधे 'साधना'मधे लिहिलेला हा लेख आजही महत्त्वाचा आहे. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांनी मांडलेलं ‘समाजातलं धर्माचं स्थान’ समजून घ्यायला हवं.
राज्यघटना आणि धर्म हा सध्या चर्चेचा विषय आहे. सुप्रीम कोर्टानंही अत्यंत परखड भाषेत सरकारला सुनावलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर धर्म आणि घटनेतली धर्मनिरपेक्षता याबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांनी १९८३मधे 'साधना'मधे लिहिलेला हा लेख आजही महत्त्वाचा आहे. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांनी मांडलेलं ‘समाजातलं धर्माचं स्थान’ समजून घ्यायला हवं......
अमीर खुसरो हा मध्ययुगीन काळातला एक महत्वाचा कवी होता. भारतीय संस्कृतीची पालखी खांद्यावर घेत खुसरो हिंदू-मुस्लिम सलोख्याचा पाईक बनला. मानवी जाणिवा आणि समतेचं तत्व भारतीय समाजात रुजवण्यासाठी त्यानं शब्दांचं माध्यम वापरलं. शेतकऱ्यांचे प्रश्न ते अगदी चिमणीच्या खोप्याविषयी लिहिणाऱ्या खुसरोला बहिणाबाई चौधरी यांचा सहोदर कवी म्हणता येईल. त्याच्याविषयी इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट.
अमीर खुसरो हा मध्ययुगीन काळातला एक महत्वाचा कवी होता. भारतीय संस्कृतीची पालखी खांद्यावर घेत खुसरो हिंदू-मुस्लिम सलोख्याचा पाईक बनला. मानवी जाणिवा आणि समतेचं तत्व भारतीय समाजात रुजवण्यासाठी त्यानं शब्दांचं माध्यम वापरलं. शेतकऱ्यांचे प्रश्न ते अगदी चिमणीच्या खोप्याविषयी लिहिणाऱ्या खुसरोला बहिणाबाई चौधरी यांचा सहोदर कवी म्हणता येईल. त्याच्याविषयी इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट......
'फेडरल रिझर्व’च्या बरोबरीने जगातल्या इतर देशांतल्या मध्यवर्ती बँकाही व्याजदर वाढवत सुटल्यात. भारतीय रिझर्व बँकही याला अपवाद नाही. अमेरिकी 'फेड’ने तर अगदी शून्यापासून साडेचारपर्यंत व्याजदर वाढवले. याचे परिणाम बँकांना भोगावे लागतील, अशी शंका व्यक्त केली जात होतीच त्यावर सिलिकॉन वॅली बँकने शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळेच, आपल्या रिझर्व बँकेने रेपोदर वाढवण्याचा सपाटा बंद करावा, अशी सूचना स्टेट बँकेनं केली.
'फेडरल रिझर्व’च्या बरोबरीने जगातल्या इतर देशांतल्या मध्यवर्ती बँकाही व्याजदर वाढवत सुटल्यात. भारतीय रिझर्व बँकही याला अपवाद नाही. अमेरिकी 'फेड’ने तर अगदी शून्यापासून साडेचारपर्यंत व्याजदर वाढवले. याचे परिणाम बँकांना भोगावे लागतील, अशी शंका व्यक्त केली जात होतीच त्यावर सिलिकॉन वॅली बँकने शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळेच, आपल्या रिझर्व बँकेने रेपोदर वाढवण्याचा सपाटा बंद करावा, अशी सूचना स्टेट बँकेनं केली......
७०च्या दशकात कॅम्पा कोला या सॉफ्ट ड्रिंकनं भारतीय बाजारात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. पुढे परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत हा ब्रँड कायमचा बंद झाला. आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सनं कॅम्पा कोलाला खरेदी केलंय. 'द ग्रेट इंडियन टेस्ट' या जुन्याच टॅगखाली त्याला बाजारात उतरवत कोकाकोला, पेप्सीसारख्या परदेशी ब्रँडना टक्कर देण्याची तयारी अंबानी करतायत.
७०च्या दशकात कॅम्पा कोला या सॉफ्ट ड्रिंकनं भारतीय बाजारात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. पुढे परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत हा ब्रँड कायमचा बंद झाला. आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सनं कॅम्पा कोलाला खरेदी केलंय. 'द ग्रेट इंडियन टेस्ट' या जुन्याच टॅगखाली त्याला बाजारात उतरवत कोकाकोला, पेप्सीसारख्या परदेशी ब्रँडना टक्कर देण्याची तयारी अंबानी करतायत......
कोरोना वायरसच्या साथीवर नियंत्रण मिळवून सुटकेचा निःश्वास टाकला त्याला काही महिने उलटतात न उलटतात तोच देशात सध्या एच३ एन२ या वायरसमुळे होणार्या संसर्गाची प्रकरणं वाढताना दिसतायत. दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत या वायरसमुळे संसर्ग होण्याची लाखो प्रकरणं सर्रास घडतात. पण यंदा नेहमीपेक्षा जास्त प्रकरणं समोर आली आहेत.
कोरोना वायरसच्या साथीवर नियंत्रण मिळवून सुटकेचा निःश्वास टाकला त्याला काही महिने उलटतात न उलटतात तोच देशात सध्या एच३ एन२ या वायरसमुळे होणार्या संसर्गाची प्रकरणं वाढताना दिसतायत. दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत या वायरसमुळे संसर्ग होण्याची लाखो प्रकरणं सर्रास घडतात. पण यंदा नेहमीपेक्षा जास्त प्रकरणं समोर आली आहेत......
संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलंय. त्यादृष्टीनं केंद्र सरकारनंही पावलं टाकलीत. सर्वसाधारणपणे १९६० पर्यंत भारतातल्या सर्वसामान्य जनतेच्या वापरामधे ज्वारी, बाजरी अशा प्रकारची भरडधान्यं असायची. पण पुढच्या काळात भरड धान्यांचा वापर कमी झाला. आता सर्वसामान्य जनतेला भरड धान्यांच्या किंमती परवडल्या पाहिजेत यासाठी काय करावं याचा विचार व्हायला हवा.
संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलंय. त्यादृष्टीनं केंद्र सरकारनंही पावलं टाकलीत. सर्वसाधारणपणे १९६० पर्यंत भारतातल्या सर्वसामान्य जनतेच्या वापरामधे ज्वारी, बाजरी अशा प्रकारची भरडधान्यं असायची. पण पुढच्या काळात भरड धान्यांचा वापर कमी झाला. आता सर्वसामान्य जनतेला भरड धान्यांच्या किंमती परवडल्या पाहिजेत यासाठी काय करावं याचा विचार व्हायला हवा......
कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना गेल्यावर्षी जगाला रशिया-युक्रेन युद्धानं एका नव्या संकटाच्या खाईत लोटलं. वर्षभरात लाखो जणांचा बळी जाऊनही युक्रेनच्या अवघ्या १८ टक्के भूभागावरच रशियाला कब्जा मिळवता आला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला या युद्धामुळे बसलेला फटका ३२ लाख कोटींहून अधिक आहे. इतकं नुकसान होऊनही हे युद्ध कधी संपेल, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना गेल्यावर्षी जगाला रशिया-युक्रेन युद्धानं एका नव्या संकटाच्या खाईत लोटलं. वर्षभरात लाखो जणांचा बळी जाऊनही युक्रेनच्या अवघ्या १८ टक्के भूभागावरच रशियाला कब्जा मिळवता आला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला या युद्धामुळे बसलेला फटका ३२ लाख कोटींहून अधिक आहे. इतकं नुकसान होऊनही हे युद्ध कधी संपेल, हा प्रश्न अनुत्तरीत आहे......
धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं.
धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार वाढला की काय होतं, हे पाहायचं असेल तर पाकिस्तानची आजची अवस्था पाहायला हवी. आज पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटात असून, महागाईनं जनता हवालदिल झालीय. पाकिस्तानच्या या अवस्थेला हसण्यापेक्षा, त्यातून शहाणपण शिकायला हवं......
सध्या देशभर बोलबाला असलेली 'वंदे भारत एक्सप्रेस' ही रेल्वेत अधिकारी राहिलेल्या सुधांशू मणी यांची कल्पना. त्यांनी २०१६ला देशातल्या पहिल्या सेमी हाय-स्पीड ट्रेनचं स्वप्न पाहिलं. सहकाऱ्यांच्या सोबतीनं त्यांनी हे स्वप्न साकार केलं. आज सगळीकडे वंदे भारतचं जोरदार स्वागत केलं जातंय. पण त्यामागे सुधांशू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची अतोनात मेहनत आहे हे विसरता नये.
सध्या देशभर बोलबाला असलेली 'वंदे भारत एक्सप्रेस' ही रेल्वेत अधिकारी राहिलेल्या सुधांशू मणी यांची कल्पना. त्यांनी २०१६ला देशातल्या पहिल्या सेमी हाय-स्पीड ट्रेनचं स्वप्न पाहिलं. सहकाऱ्यांच्या सोबतीनं त्यांनी हे स्वप्न साकार केलं. आज सगळीकडे वंदे भारतचं जोरदार स्वागत केलं जातंय. पण त्यामागे सुधांशू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची अतोनात मेहनत आहे हे विसरता नये......
नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही.
नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही......
सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्यामधे न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवरुन सुरु झालेला वाद आणि त्यावरुन लोकशाही व्यवस्थेच्या या दोन प्रमुख स्तंभांमधे निर्माण झालेला तणाव हा लोकशाहीसाठी हिताचा नाही. न्यायाधीशांची निवड पारदर्शकपणे होण्यासाठी लवचिकता दाखवून सामोपचाराने, चर्चेने हा मुद्दा निकाली काढला पाहिजे.
सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्यामधे न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवरुन सुरु झालेला वाद आणि त्यावरुन लोकशाही व्यवस्थेच्या या दोन प्रमुख स्तंभांमधे निर्माण झालेला तणाव हा लोकशाहीसाठी हिताचा नाही. न्यायाधीशांची निवड पारदर्शकपणे होण्यासाठी लवचिकता दाखवून सामोपचाराने, चर्चेने हा मुद्दा निकाली काढला पाहिजे......
अकादमी म्हणजेच ऑस्कर हा सिनेक्षेत्रातला मानाचा पुरस्कार. यावर्षी मार्च महिन्यात ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतोय. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नामांकित कलाकृतींची यादी नुकतीच जाहीर झालीय. ‘आरआरआर’ या तेलुगू सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीच्या पुरस्काराचं नामांकन मिळवलंय. असं नामांकन मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय.
अकादमी म्हणजेच ऑस्कर हा सिनेक्षेत्रातला मानाचा पुरस्कार. यावर्षी मार्च महिन्यात ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतोय. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी नामांकित कलाकृतींची यादी नुकतीच जाहीर झालीय. ‘आरआरआर’ या तेलुगू सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीच्या पुरस्काराचं नामांकन मिळवलंय. असं नामांकन मिळवणारं हे पहिलंच भारतीय गाणं ठरलंय......
आज भारतीय प्रजासत्ताक दिन. आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा बंधुता या मुल्याबद्दल होताना दिसत नाही. खरंतर बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणं अशक्य आहे.
आज भारतीय प्रजासत्ताक दिन. आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा बंधुता या मुल्याबद्दल होताना दिसत नाही. खरंतर बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणं अशक्य आहे......
भारताचे 'लिओनार्दो दा विन्ची' अशी ओळख असलेले आणि भारतीय अणुऊर्जा प्रकल्पाचे संस्थापक होमी जहाँगीर भाभा यांचा आज स्मृतिदिन. होमी भाभा यांच्या नेतृत्त्वाखाली भारतातला अणुऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या आकार घेत होता. भारत-रशिया मैत्रीमुळे हे यश रशियाचं पारडं जड करेल, या भीतीनं भाभांना अमेरिकेनं मारलं, अशी चर्चा आजही कधी आडून तर कधी जाहीरपणे होत असते.
भारताचे 'लिओनार्दो दा विन्ची' अशी ओळख असलेले आणि भारतीय अणुऊर्जा प्रकल्पाचे संस्थापक होमी जहाँगीर भाभा यांचा आज स्मृतिदिन. होमी भाभा यांच्या नेतृत्त्वाखाली भारतातला अणुऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या आकार घेत होता. भारत-रशिया मैत्रीमुळे हे यश रशियाचं पारडं जड करेल, या भीतीनं भाभांना अमेरिकेनं मारलं, अशी चर्चा आजही कधी आडून तर कधी जाहीरपणे होत असते......
अमेरिकन कॅन्सर सोसायटीने १९९१ पासून कॅन्सरच्या माहितीचा अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यानुसार अमेरिकेतल्या कॅन्सर पेशंटच्या मृत्यूमधे ३३ टक्क्यांनी घट झाली आहे, तर अंदाजे ३८ लाख कॅन्सर पेशंटचे जीव वाचवले आहेत. याउलट स्थिती भारतात आहे. भारतामधे कॅन्सरवरच्या संशोधनाला चालना आणि त्यासाठी मोठा संशोधन निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीने १९९१ पासून कॅन्सरच्या माहितीचा अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यानुसार अमेरिकेतल्या कॅन्सर पेशंटच्या मृत्यूमधे ३३ टक्क्यांनी घट झाली आहे, तर अंदाजे ३८ लाख कॅन्सर पेशंटचे जीव वाचवले आहेत. याउलट स्थिती भारतात आहे. भारतामधे कॅन्सरवरच्या संशोधनाला चालना आणि त्यासाठी मोठा संशोधन निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे......
नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तिचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास मांडणारी बीबीसीची डॉक्युमेंट्री सध्या प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. ही डॉक्युमेंट्री भारतात कुणाला पाहता येऊ नये, म्हणून तिच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्यात. तिच्यासंदर्भातले ट्विट्सही ब्लॉक केले गेलेत. पण, आपण आपलं काम चोख केलंय, असं 'बीबीसी'चं म्हणणं आहे.
नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तिचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास मांडणारी बीबीसीची डॉक्युमेंट्री सध्या प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. ही डॉक्युमेंट्री भारतात कुणाला पाहता येऊ नये, म्हणून तिच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्यात. तिच्यासंदर्भातले ट्विट्सही ब्लॉक केले गेलेत. पण, आपण आपलं काम चोख केलंय, असं 'बीबीसी'चं म्हणणं आहे......
या वर्षाच्या शेवटी भारतात वनडे क्रिकेट वर्ल्डकप आयोजित केला जातोय. या वर्ल्डकपसाठी संभाव्य खेळाडू कोण आहेत हे तपासणं आवश्यक ठरतं. गुणवत्ता, वय आणि अनुभव या तीन घटकांवर टीम बांधली तर ती आपसूकच मजबूत होते. नव्या पद्धतीनं क्रिकेट खेळायला आपल्याकडे गुणवत्तेला तोटा नाही पण टीमनिवडीचे निकष काय लावले जातात हे महत्वाचं ठरतं.
या वर्षाच्या शेवटी भारतात वनडे क्रिकेट वर्ल्डकप आयोजित केला जातोय. या वर्ल्डकपसाठी संभाव्य खेळाडू कोण आहेत हे तपासणं आवश्यक ठरतं. गुणवत्ता, वय आणि अनुभव या तीन घटकांवर टीम बांधली तर ती आपसूकच मजबूत होते. नव्या पद्धतीनं क्रिकेट खेळायला आपल्याकडे गुणवत्तेला तोटा नाही पण टीमनिवडीचे निकष काय लावले जातात हे महत्वाचं ठरतं......
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?.....
'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी' अर्थात सीएमआयईच्या बेरोजगारीवरच्या रिपोर्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय. नोव्हेंबर २०२२ अखेर भारतातल्या बेरोजगारीचा आकडा ५ कोटींच्या वर पोचलाय. नोव्हेंबरमधल्या आकड्यांनी आधीच्या तीन महिन्यांचे रेकॉर्ड मोडलेत. त्याचवेळी शहरी बेरोजगारीमधेही मोठी वाढ झाल्याचं आकडे सांगतायत. यातून सावरण्यासाठी रघुराम राजन यांच्यासारखे अर्थतज्ञ पर्याय सुचवतायत. त्याकडे गांभीर्याने पहायला हवं.
'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी' अर्थात सीएमआयईच्या बेरोजगारीवरच्या रिपोर्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय. नोव्हेंबर २०२२ अखेर भारतातल्या बेरोजगारीचा आकडा ५ कोटींच्या वर पोचलाय. नोव्हेंबरमधल्या आकड्यांनी आधीच्या तीन महिन्यांचे रेकॉर्ड मोडलेत. त्याचवेळी शहरी बेरोजगारीमधेही मोठी वाढ झाल्याचं आकडे सांगतायत. यातून सावरण्यासाठी रघुराम राजन यांच्यासारखे अर्थतज्ञ पर्याय सुचवतायत. त्याकडे गांभीर्याने पहायला हवं......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मानवमुक्तीच्या लढ्यातलं काम कुठल्या एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळेच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करु पाहणारी आजची तरुणाई बाबासाहेबांना आपला आयकॉन मानतेय. ज्यांची मूळ प्रेरणा बाबासाहेब नाहीत अशी तरुणाईही बाबासाहेब समजून घ्यायला उत्सुक आहे. त्यामुळेच त्यांनी बाबासाहेबांचा शोध कसा घेतलाय, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब नेमके कसे पोचले ते आज समजून घ्यायला हवं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मानवमुक्तीच्या लढ्यातलं काम कुठल्या एका जातीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळेच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करु पाहणारी आजची तरुणाई बाबासाहेबांना आपला आयकॉन मानतेय. ज्यांची मूळ प्रेरणा बाबासाहेब नाहीत अशी तरुणाईही बाबासाहेब समजून घ्यायला उत्सुक आहे. त्यामुळेच त्यांनी बाबासाहेबांचा शोध कसा घेतलाय, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब नेमके कसे पोचले ते आज समजून घ्यायला हवं......
सध्या मुंबईत एक भन्नाट शिरगणती सुरूय. दोनेक कोटी माणसांनी खचाखच भरलेल्या मुंबईत सोनेरी कोल्ह्यांचा शोध घेतला जातोय. एकेकाळी या जमिनीवर वास्तव्य असलेले हे कोल्हे आता फक्त खारफुटीमधे आणि काही जंगली भागातच उरलेत. अतिनागरीकरण किंवा ओवरअर्बनायझेशनच्या प्रक्रियेमधे, या अशा मुंबईकर प्राण्यांना आज आपलं अस्तित्व टिकवणं अवघड झालंय.
सध्या मुंबईत एक भन्नाट शिरगणती सुरूय. दोनेक कोटी माणसांनी खचाखच भरलेल्या मुंबईत सोनेरी कोल्ह्यांचा शोध घेतला जातोय. एकेकाळी या जमिनीवर वास्तव्य असलेले हे कोल्हे आता फक्त खारफुटीमधे आणि काही जंगली भागातच उरलेत. अतिनागरीकरण किंवा ओवरअर्बनायझेशनच्या प्रक्रियेमधे, या अशा मुंबईकर प्राण्यांना आज आपलं अस्तित्व टिकवणं अवघड झालंय......
२२ नोव्हेंबरला आसाम पोलीस आणि वनविभागाने आसाम-मेघालय सीमाभागात गोळीबार केला. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात मेघालयातल्या पाच गावकऱ्यांचा आणि आसामच्या एका वनरक्षकाचा मृत्यू झाला. या हिंसाचारानंतर दोन्ही राज्यांमधे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. त्याचबरोबर, सीमावादाचा ५० वर्षं जुना प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
२२ नोव्हेंबरला आसाम पोलीस आणि वनविभागाने आसाम-मेघालय सीमाभागात गोळीबार केला. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात मेघालयातल्या पाच गावकऱ्यांचा आणि आसामच्या एका वनरक्षकाचा मृत्यू झाला. या हिंसाचारानंतर दोन्ही राज्यांमधे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. त्याचबरोबर, सीमावादाचा ५० वर्षं जुना प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय......
काही महिन्यांपूर्वी भारतातून गाशा गुंडाळायच्या तयारीत असलेलं नेटफ्लिक्स आता पुन्हा एकदा सावरू पाहतंय. डॉक्युसिरीजचा भारतीयांसाठी नवा असलेला जॉनर यावेळी नेटफ्लिक्सच्या मदतीला धावून आलाय. त्यातही भारतातल्या गुन्हेगारी घटनांवर आधारित डॉक्युसिरीजकडे प्रेक्षकांचा कल वाढताना दिसतोय. या वर्षी आलेल्या ‘इंडियन प्रिडेटर’ डॉक्युसिरीजने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलंय.
काही महिन्यांपूर्वी भारतातून गाशा गुंडाळायच्या तयारीत असलेलं नेटफ्लिक्स आता पुन्हा एकदा सावरू पाहतंय. डॉक्युसिरीजचा भारतीयांसाठी नवा असलेला जॉनर यावेळी नेटफ्लिक्सच्या मदतीला धावून आलाय. त्यातही भारतातल्या गुन्हेगारी घटनांवर आधारित डॉक्युसिरीजकडे प्रेक्षकांचा कल वाढताना दिसतोय. या वर्षी आलेल्या ‘इंडियन प्रिडेटर’ डॉक्युसिरीजने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलंय......
टी-२० विश्वचषकात झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमवर टीका होतेय. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली. खेळाडूंची कामगिरी उत्तम असली तरी बेभरवशी असल्याचं या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आलं. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, यावर चिंतन करण्याची खरंच गरज आहे.
टी-२० विश्वचषकात झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमवर टीका होतेय. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली. खेळाडूंची कामगिरी उत्तम असली तरी बेभरवशी असल्याचं या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आलं. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, यावर चिंतन करण्याची खरंच गरज आहे......
संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्येविषयीचा एक रिपोर्ट आलाय. १५ नोव्हेंबरला जगाच्या लोकसंख्येनं ८०० कोटींचा आकडा गाठल्याचं हा रिपोर्ट सांगतोय. हा केवळ एक आकडा नाहीय तर आपल्या पृथ्वीचं पुढचं भविष्यही यामधे दडलंय. लोकसंख्या वाढ हे सध्याचं आव्हान असलं तरी त्यातून विकासाच्या अनेक शक्यता निर्माण होतील असं म्हटलं जातंय. पण त्याआधी आपल्या मूळ प्रश्नांचा शोध घ्यायला हवा.
संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्येविषयीचा एक रिपोर्ट आलाय. १५ नोव्हेंबरला जगाच्या लोकसंख्येनं ८०० कोटींचा आकडा गाठल्याचं हा रिपोर्ट सांगतोय. हा केवळ एक आकडा नाहीय तर आपल्या पृथ्वीचं पुढचं भविष्यही यामधे दडलंय. लोकसंख्या वाढ हे सध्याचं आव्हान असलं तरी त्यातून विकासाच्या अनेक शक्यता निर्माण होतील असं म्हटलं जातंय. पण त्याआधी आपल्या मूळ प्रश्नांचा शोध घ्यायला हवा......
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातली ग्रीन बॉण्डची घोषणा आता प्रत्यक्षात येतेय. केंद्र सरकारला या ग्रीन बॉण्डमधून १६ हजार कोटी उभे करायचेत. हा सगळा पैसा पर्यावरणानुकूल प्रकल्पांसाठी वापरला जाईल. यातल्या कर सवलतीमुळे गुंतवणूकदार ग्रीन बॉण्डकडे आकर्षित होतायत. त्यामुळे भविष्यात ग्रीन बॉण्ड हा गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय ठरू शकेल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातली ग्रीन बॉण्डची घोषणा आता प्रत्यक्षात येतेय. केंद्र सरकारला या ग्रीन बॉण्डमधून १६ हजार कोटी उभे करायचेत. हा सगळा पैसा पर्यावरणानुकूल प्रकल्पांसाठी वापरला जाईल. यातल्या कर सवलतीमुळे गुंतवणूकदार ग्रीन बॉण्डकडे आकर्षित होतायत. त्यामुळे भविष्यात ग्रीन बॉण्ड हा गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय ठरू शकेल......
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवून देणारा विराट कोहली पुन्हा त्याच्या मूळ भूमिकेत परतलाय. जवळपास तीन वर्षं तो अपयशाची घेऊन वावरत होता. मनासारखं काहीच घडत नव्हतं. पण या खेळीनंतर त्या जखमेचा मागमूसही राहिला नव्हता. विराटच्या यशाची ऊर्जा ही स्वयंप्रेरणेची आहे. तो हिंमत न हरता अखेरच्या चेंडूपर्यंत लढतो. आपली सकारात्मकता तो कायम ठेवतो.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवून देणारा विराट कोहली पुन्हा त्याच्या मूळ भूमिकेत परतलाय. जवळपास तीन वर्षं तो अपयशाची घेऊन वावरत होता. मनासारखं काहीच घडत नव्हतं. पण या खेळीनंतर त्या जखमेचा मागमूसही राहिला नव्हता. विराटच्या यशाची ऊर्जा ही स्वयंप्रेरणेची आहे. तो हिंमत न हरता अखेरच्या चेंडूपर्यंत लढतो. आपली सकारात्मकता तो कायम ठेवतो......
भारताचं सहकार्य अमेरिकेला हवं असेल; तर आता पाकिस्तानबाबतचं दुटप्पी धोरण अमेरिकेला सोडावं लागेल. आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या मोठ्या असलेल्या भारताशी चांगले संबंध ठेवायचे की, दिवाळखोरी आणि दहशतवादात अडकलेल्या पाकला जवळ करायचं, हे अमेरिकेला येत्या काळात ठरवावं लागणार आहे.
भारताचं सहकार्य अमेरिकेला हवं असेल; तर आता पाकिस्तानबाबतचं दुटप्पी धोरण अमेरिकेला सोडावं लागेल. आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या मोठ्या असलेल्या भारताशी चांगले संबंध ठेवायचे की, दिवाळखोरी आणि दहशतवादात अडकलेल्या पाकला जवळ करायचं, हे अमेरिकेला येत्या काळात ठरवावं लागणार आहे......
कॅन्सर, डायबेटीस, हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांमधे कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान वापरात आणण्याचं भारताने ठरवलंय. २०२५ पर्यंत भारत त्यावर ११.७८ बिलियन डॉलर इतका खर्चही करणार आहे. आरोग्य क्षेत्रामधे असं तंत्रज्ञान येणं भारताच्या हिताचं आहे. त्यातून गुंतवणूक वाढली तर भारताच्या अर्थव्यवस्थेतही २०३५ पर्यंत १ ट्रिलियन डॉलरची भर पडण्याचा अंदाज 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' व्यक्त केलाय.
कॅन्सर, डायबेटीस, हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांमधे कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान वापरात आणण्याचं भारताने ठरवलंय. २०२५ पर्यंत भारत त्यावर ११.७८ बिलियन डॉलर इतका खर्चही करणार आहे. आरोग्य क्षेत्रामधे असं तंत्रज्ञान येणं भारताच्या हिताचं आहे. त्यातून गुंतवणूक वाढली तर भारताच्या अर्थव्यवस्थेतही २०३५ पर्यंत १ ट्रिलियन डॉलरची भर पडण्याचा अंदाज 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' व्यक्त केलाय......
भारतीय महिला क्रिकेट टीमनं आशिया कप सातव्यांदा जिंकून नुकतंच आपलं आशिया खंडातलं सम्राज्ञीपद पुन्हा एकदा अधोरेखित केलं. देशात महिला क्रिकेट आज चांगलंच फोफावतंय. त्याचा दर्जा आणि प्रसार राखायचा असेल, तर आर्थिक स्तरावर स्त्री-पुरुष समानता क्रिकेटमधेही यावी लागेल.
भारतीय महिला क्रिकेट टीमनं आशिया कप सातव्यांदा जिंकून नुकतंच आपलं आशिया खंडातलं सम्राज्ञीपद पुन्हा एकदा अधोरेखित केलं. देशात महिला क्रिकेट आज चांगलंच फोफावतंय. त्याचा दर्जा आणि प्रसार राखायचा असेल, तर आर्थिक स्तरावर स्त्री-पुरुष समानता क्रिकेटमधेही यावी लागेल......
भारतीय क्रिकेटपटू आयपीएलसारख्या भरघोस कमाईच्या स्पर्धेत जीव ओतून आणि संबंधित टीमच्या निष्ठेनं खेळतात. पण देशासाठी खेळताना त्यांची ही निष्ठा दिसून येत नाही, हा भारतीय क्रिकेटपटूंवर लागलेला शिक्का आहे. तो पुसून काढण्याची हुकमी संधी त्यांना येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधे मिळतेय. या संधीचं सोनं करण्याची क्षमता निश्चितपणे त्यांच्याकडे आहे.
भारतीय क्रिकेटपटू आयपीएलसारख्या भरघोस कमाईच्या स्पर्धेत जीव ओतून आणि संबंधित टीमच्या निष्ठेनं खेळतात. पण देशासाठी खेळताना त्यांची ही निष्ठा दिसून येत नाही, हा भारतीय क्रिकेटपटूंवर लागलेला शिक्का आहे. तो पुसून काढण्याची हुकमी संधी त्यांना येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधे मिळतेय. या संधीचं सोनं करण्याची क्षमता निश्चितपणे त्यांच्याकडे आहे......
हिजाब कायदा मोडला म्हणून इराणमधे २२ वर्षांच्या महसा अमिनी यांना मागच्या महिन्यात अटक झाली. तीन दिवसानं पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूमुळे तिथल्या इस्लामिक कायद्यांविरोधात महिला रस्त्यावर उतरल्यात. त्यातून उभं राहिलेलं हिजाबविरोधी आंदोलन आता जगभर पोचलंय. महिलांसोबत त्यांच्या इच्छेचाही आदर करा असं सांगणारं हे आंदोलन धार्मिक कट्टरतावाद्यांना आव्हान देतंय.
हिजाब कायदा मोडला म्हणून इराणमधे २२ वर्षांच्या महसा अमिनी यांना मागच्या महिन्यात अटक झाली. तीन दिवसानं पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूमुळे तिथल्या इस्लामिक कायद्यांविरोधात महिला रस्त्यावर उतरल्यात. त्यातून उभं राहिलेलं हिजाबविरोधी आंदोलन आता जगभर पोचलंय. महिलांसोबत त्यांच्या इच्छेचाही आदर करा असं सांगणारं हे आंदोलन धार्मिक कट्टरतावाद्यांना आव्हान देतंय......
डासांपासून होणार्या आजारांनी आज जगापुढे आव्हान उभं केलंय. यामधे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा समावेश होतो. गेल्या अनेक वर्षांपासून डेंग्यू हा जागतिक आरोग्य धोक्यात आणणारा वायरस म्हणून ओळखला जात आहे. सध्यस्थितीत जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला या वायरसचा संसर्ग होण्याचा धोका आहे.
डासांपासून होणार्या आजारांनी आज जगापुढे आव्हान उभं केलंय. यामधे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा समावेश होतो. गेल्या अनेक वर्षांपासून डेंग्यू हा जागतिक आरोग्य धोक्यात आणणारा वायरस म्हणून ओळखला जात आहे. सध्यस्थितीत जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला या वायरसचा संसर्ग होण्याचा धोका आहे......
मोदी-शहांच्या गणराज्य २.० मधे ज्युडिसियरी केवळ कमिटेड नसून कायदेमंडळाचं दुसरं सदन झाली आहे. न्या. रमन्ना यांनी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणं आश्वासक होतं. पण त्यांनीही ‘घालिन लोटांगण’ म्हणत न्यायाला वळसा घालणं जास्त धोक्याचं ठरलं. याच शांततेवर भाष्य करणारं 'परिवर्तनाचा वाटसरू' मासिकाच्या ताज्या अंकातलं राही श्रुती गणेश यांनी फेसबुकवर शेअर केलेलं हे संपादकीय.
मोदी-शहांच्या गणराज्य २.० मधे ज्युडिसियरी केवळ कमिटेड नसून कायदेमंडळाचं दुसरं सदन झाली आहे. न्या. रमन्ना यांनी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणं आश्वासक होतं. पण त्यांनीही ‘घालिन लोटांगण’ म्हणत न्यायाला वळसा घालणं जास्त धोक्याचं ठरलं. याच शांततेवर भाष्य करणारं 'परिवर्तनाचा वाटसरू' मासिकाच्या ताज्या अंकातलं राही श्रुती गणेश यांनी फेसबुकवर शेअर केलेलं हे संपादकीय......
महासत्ता असलेल्या अमेरिकेत रोजच्या ब्रिफिंगला फार महत्व असतं. अनेक गोष्टी अगदी तोलून-मापून बोलाव्या लागतात. ६ सप्टेंबरला याच ब्रिफिंगची जबाबदारी पहिल्यांदाच एका भारतीय-अमेरिकन वंशाच्या व्यक्तीकडे आली. ही जबाबदारी खुबीने पार पाडणाऱ्या ३३ वर्षांच्या वेदांत पटेल यांचा जन्म गुजरातमधे झालाय. त्यांच्यातल्या व्यावसायिक मूल्य आणि भाषण कौशल्याचं अमेरिकन अधिकारी कौतुक करतायत.
महासत्ता असलेल्या अमेरिकेत रोजच्या ब्रिफिंगला फार महत्व असतं. अनेक गोष्टी अगदी तोलून-मापून बोलाव्या लागतात. ६ सप्टेंबरला याच ब्रिफिंगची जबाबदारी पहिल्यांदाच एका भारतीय-अमेरिकन वंशाच्या व्यक्तीकडे आली. ही जबाबदारी खुबीने पार पाडणाऱ्या ३३ वर्षांच्या वेदांत पटेल यांचा जन्म गुजरातमधे झालाय. त्यांच्यातल्या व्यावसायिक मूल्य आणि भाषण कौशल्याचं अमेरिकन अधिकारी कौतुक करतायत......
भारतीय स्टार्टअप कंपनी असलेल्या 'शेलिओस टेक्नोलॅब'नं पुरोस नावाचं हेल्मेट बाजारात आणलंय. प्रदूषित हवेला फिल्टर करू शकणारं हे हेल्मेट एक भन्नाट आयडिया म्हणून पुढे येतंय. केंद्र सरकारनेही या स्टार्टअपमधे भरघोस गुंतवणूक करत त्याला प्रोत्साहन दिलंय. एकीकडे आपल्या बाईक स्टेटस सिम्बॉल बनतायत तर दुसरीकडे झपाट्याने प्रदूषणही वाढतंय. अशावेळी हे हेल्मेट उत्तम पर्याय ठरू शकतं.
भारतीय स्टार्टअप कंपनी असलेल्या 'शेलिओस टेक्नोलॅब'नं पुरोस नावाचं हेल्मेट बाजारात आणलंय. प्रदूषित हवेला फिल्टर करू शकणारं हे हेल्मेट एक भन्नाट आयडिया म्हणून पुढे येतंय. केंद्र सरकारनेही या स्टार्टअपमधे भरघोस गुंतवणूक करत त्याला प्रोत्साहन दिलंय. एकीकडे आपल्या बाईक स्टेटस सिम्बॉल बनतायत तर दुसरीकडे झपाट्याने प्रदूषणही वाढतंय. अशावेळी हे हेल्मेट उत्तम पर्याय ठरू शकतं......
माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात एक नवी सावकारशाही काम करत असल्याचं समोर आलंय. अलीकडच्या काळात बनावट चिनी अॅप्सद्वारे देशातल्या असंख्य जणांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक, छळवणूक केल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे यातल्या अनेकांनी या कर्जामुळे होणार्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आलेत. याला लगाम घालण्यासाठी तत्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे.
माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात एक नवी सावकारशाही काम करत असल्याचं समोर आलंय. अलीकडच्या काळात बनावट चिनी अॅप्सद्वारे देशातल्या असंख्य जणांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक, छळवणूक केल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे यातल्या अनेकांनी या कर्जामुळे होणार्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आलेत. याला लगाम घालण्यासाठी तत्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे......
दक्षिण अमेरिकेतल्या चिली देशात १९८०ला नवउदारमतवादी संविधान आलं. आजपर्यंत त्याच संविधानावर देश चालत होता. पण या संविधानानं तिथली आर्थिक, सामाजिक रचनाच मोडीत काढली. मागची तीन वर्ष चिली लोक हे संविधान बदलावं म्हणून आंदोलन करतायत. पण तिथल्या लोकांमधेच संभ्रम आहे. चिलीच्या लोकांना आर्थिक, सामाजिक लोकशाहीची हमी देणारं नवं संविधान आलं खरं पण त्याविरोधात लोकांनी मतदान केलंय.
दक्षिण अमेरिकेतल्या चिली देशात १९८०ला नवउदारमतवादी संविधान आलं. आजपर्यंत त्याच संविधानावर देश चालत होता. पण या संविधानानं तिथली आर्थिक, सामाजिक रचनाच मोडीत काढली. मागची तीन वर्ष चिली लोक हे संविधान बदलावं म्हणून आंदोलन करतायत. पण तिथल्या लोकांमधेच संभ्रम आहे. चिलीच्या लोकांना आर्थिक, सामाजिक लोकशाहीची हमी देणारं नवं संविधान आलं खरं पण त्याविरोधात लोकांनी मतदान केलंय......
अग्निपथ योजनेतून २५ ऑगस्टला नेपाळमधे भारतीय सैन्य भर्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण केवळ ४ वर्षांसाठी होणारी भर्ती नेपाळ सरकारने रद्द केली. गोरखा रेजिमेंट ही भारतीय लष्करातली लढाऊ आणि आक्रमक बटालियन समजली जाते. १९४७च्या एका करारानुसार, नेपाळी नागरिकांची गोरखा सैनिक म्हणून भारतीय सैन्यात भर्ती होत असते. पण आता होऊ घातलेल्या भर्तीवर अनिश्चिततेचं सावट आहे.
अग्निपथ योजनेतून २५ ऑगस्टला नेपाळमधे भारतीय सैन्य भर्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण केवळ ४ वर्षांसाठी होणारी भर्ती नेपाळ सरकारने रद्द केली. गोरखा रेजिमेंट ही भारतीय लष्करातली लढाऊ आणि आक्रमक बटालियन समजली जाते. १९४७च्या एका करारानुसार, नेपाळी नागरिकांची गोरखा सैनिक म्हणून भारतीय सैन्यात भर्ती होत असते. पण आता होऊ घातलेल्या भर्तीवर अनिश्चिततेचं सावट आहे......
इच्छाशक्तीला जर संयम, त्याग आणि अफाट कष्टाची जोड दिली तर अनेक अडचणी येऊनही अशक्य कामगिरी शक्य होते. भारतीय क्रिकेट टीममधली ‘तुफान’ किंवा ‘चकदा एक्स्प्रेस’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या झुलन गोस्वामी हिने अशीच कामगिरी करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सामन्यांमधे हुकूमत गाजवली आहे. झुलनने आता रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय.
इच्छाशक्तीला जर संयम, त्याग आणि अफाट कष्टाची जोड दिली तर अनेक अडचणी येऊनही अशक्य कामगिरी शक्य होते. भारतीय क्रिकेट टीममधली ‘तुफान’ किंवा ‘चकदा एक्स्प्रेस’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या झुलन गोस्वामी हिने अशीच कामगिरी करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सामन्यांमधे हुकूमत गाजवली आहे. झुलनने आता रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय......
जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर १२ ऑगस्टला न्यूयॉर्कमधे एका साहित्यिक कार्यक्रमात भ्याड हल्ला झाला. जगभरातून त्याचा निषेध होत असताना भारतातल्या राजकीय नेत्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. रश्दी यांच्या वादग्रस्त 'द सॅटेनिक वर्सेस' या पुस्तकावर तत्कालीन राजीव गांधी सरकारनं बंदी घातली होती. त्यावेळी रश्दींच्या अभिव्यक्तीचा विचार करणा-या भाजपनं यावेळी मात्र हल्ल्याचा साधा निषेधही केला नाही.
जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर १२ ऑगस्टला न्यूयॉर्कमधे एका साहित्यिक कार्यक्रमात भ्याड हल्ला झाला. जगभरातून त्याचा निषेध होत असताना भारतातल्या राजकीय नेत्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. रश्दी यांच्या वादग्रस्त 'द सॅटेनिक वर्सेस' या पुस्तकावर तत्कालीन राजीव गांधी सरकारनं बंदी घातली होती. त्यावेळी रश्दींच्या अभिव्यक्तीचा विचार करणा-या भाजपनं यावेळी मात्र हल्ल्याचा साधा निषेधही केला नाही......
आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. उद्याचा भारत सर्वांना सन्मानाची हमी आणि विकासाची समान संधी देणारा बनावा, हे स्वप्न नेत्यांनी आणि जनतेनं सामूहिकपणे पाहिलं होतं. हेच स्वप्न भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीयांनी स्वीकारलंय. याच संविधानातल्या तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी व्हावी म्हणून जनमताचा दबाव निर्माण करणार आहोत का? यावर भारताचं आणि भारतीयांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. उद्याचा भारत सर्वांना सन्मानाची हमी आणि विकासाची समान संधी देणारा बनावा, हे स्वप्न नेत्यांनी आणि जनतेनं सामूहिकपणे पाहिलं होतं. हेच स्वप्न भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीयांनी स्वीकारलंय. याच संविधानातल्या तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी व्हावी म्हणून जनमताचा दबाव निर्माण करणार आहोत का? यावर भारताचं आणि भारतीयांचं भवितव्य अवलंबून असणार आहे......
महागाई, बेरोजगारी, भूकबळी या समस्यांनी देशात विक्राळ रूप धारण केलंय. शिक्षण आणि आरोग्य यंत्रणा मध्यमवर्गीयांनाही परवडेनाशी झालीय. अशावेळी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधत हर घर तिरंगाच्या रूपाने एक नवा इवेंट देशभर साजरा केला जातोय. भारताला खरं स्वातंत्र्य हे १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेलं नसून, ते एप्रिल २०१४मधे मिळाल्याचा समज प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे.
महागाई, बेरोजगारी, भूकबळी या समस्यांनी देशात विक्राळ रूप धारण केलंय. शिक्षण आणि आरोग्य यंत्रणा मध्यमवर्गीयांनाही परवडेनाशी झालीय. अशावेळी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधत हर घर तिरंगाच्या रूपाने एक नवा इवेंट देशभर साजरा केला जातोय. भारताला खरं स्वातंत्र्य हे १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेलं नसून, ते एप्रिल २०१४मधे मिळाल्याचा समज प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे......
भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात गेल्या दहा-बारा वर्षांमधे घेतलेली झेप अतिशय कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमधे भारतीय वेटलिफ्टर्सनी सातत्यानं देशाची मान उंचावलीय. ऑलिम्पिकला अजून दोन वर्षे बाकीयत. या कालावधीत अधिकाधिक स्पर्धात्मक सराव करून भारतीय खेळाडू किमान चार-पाच ऑलिम्पिक मेडल मिळवतील, असा विश्वास राष्ट्रकुलमधल्या कामगिरीनं वाटतो.
भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात गेल्या दहा-बारा वर्षांमधे घेतलेली झेप अतिशय कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमधे भारतीय वेटलिफ्टर्सनी सातत्यानं देशाची मान उंचावलीय. ऑलिम्पिकला अजून दोन वर्षे बाकीयत. या कालावधीत अधिकाधिक स्पर्धात्मक सराव करून भारतीय खेळाडू किमान चार-पाच ऑलिम्पिक मेडल मिळवतील, असा विश्वास राष्ट्रकुलमधल्या कामगिरीनं वाटतो......
बर्मिंगहॅम इथल्या कॉमनवेल्थ गेमची नुकतीच सांगता झाली. भारतीय खेळाडूंनी २२ गोल्ड, १६ सिल्वर, २३ ब्रॉंझवर आपलं नाव कोरत ६१ पदकांची घसघशीत कमाई केलीय. यात सगळ्यात चर्चा झाली ती 'लॉन्स बॉल' या खेळाची. भारताच्या महिला आणि पुरुष गटाने पहिल्यांदाच या खेळात गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. लॉन्स बॉलमधल्या तगड्या आणि अनुभवी टीमना त्यांनी अस्मान दाखवलं.
बर्मिंगहॅम इथल्या कॉमनवेल्थ गेमची नुकतीच सांगता झाली. भारतीय खेळाडूंनी २२ गोल्ड, १६ सिल्वर, २३ ब्रॉंझवर आपलं नाव कोरत ६१ पदकांची घसघशीत कमाई केलीय. यात सगळ्यात चर्चा झाली ती 'लॉन्स बॉल' या खेळाची. भारताच्या महिला आणि पुरुष गटाने पहिल्यांदाच या खेळात गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. लॉन्स बॉलमधल्या तगड्या आणि अनुभवी टीमना त्यांनी अस्मान दाखवलं......
म्यानमारमधल्या लष्करी राजवटीने चार लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना फाशी दिल्यामुळे जग हादरून गेलं. म्यानमारच्या लष्करी हुकूमशाहीला चीनचा पाठिंबा आहे आणि चीनला मानवी हक्क किंवा लोकशाही चळवळ याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. उलट, म्यानमारमधल्या लष्करी राजवटीला खुला पाठिंबा देऊन भारताच्या हितसंबंधाला धक्का पोचवण्यात चीनला अधिक रस आहे.
म्यानमारमधल्या लष्करी राजवटीने चार लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना फाशी दिल्यामुळे जग हादरून गेलं. म्यानमारच्या लष्करी हुकूमशाहीला चीनचा पाठिंबा आहे आणि चीनला मानवी हक्क किंवा लोकशाही चळवळ याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. उलट, म्यानमारमधल्या लष्करी राजवटीला खुला पाठिंबा देऊन भारताच्या हितसंबंधाला धक्का पोचवण्यात चीनला अधिक रस आहे......
मंकीपॉक्स हा वायरस ७८पेक्षा अधिक देशांमधे पसरलाय. जगभरात २० हजारापेक्षा अधिक पेशंट आढळून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला 'जागतिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केलंय. भारतातही मंकीपॉक्सचे पेशंट आढळलेत. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात.
मंकीपॉक्स हा वायरस ७८पेक्षा अधिक देशांमधे पसरलाय. जगभरात २० हजारापेक्षा अधिक पेशंट आढळून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला 'जागतिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केलंय. भारतातही मंकीपॉक्सचे पेशंट आढळलेत. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात......
१ जुलैला केंद्र सरकारने 'सिंगल युज प्लॅस्टिक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अशा प्लॅस्टिकमुळे ३५ लाख मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो. त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावासमोर मोठं संकट उभं राहिलंय. त्यादृष्टीने सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह म्हणायला हवं.
१ जुलैला केंद्र सरकारने 'सिंगल युज प्लॅस्टिक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २१ प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदीचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अशा प्लॅस्टिकमुळे ३५ लाख मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो. त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावासमोर मोठं संकट उभं राहिलंय. त्यादृष्टीने सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह म्हणायला हवं......
देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून अपेक्षेनुसार द्रौपदी मुर्मू यांची घवघवीत मताधिक्याने निवड झाली आणि भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक सुवर्णपान लिहिलं गेलं. एकेकाळी शिक्षिका राहिलेल्या आणि आदिवासी समाजातून पुढे आलेल्या मुर्मू यांना सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याची संधी मिळाल्यामुळे एक वेगळा संदेश जगाला दिला गेलाय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाची मान उंचावणारी ही घटना आहे.
देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून अपेक्षेनुसार द्रौपदी मुर्मू यांची घवघवीत मताधिक्याने निवड झाली आणि भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक सुवर्णपान लिहिलं गेलं. एकेकाळी शिक्षिका राहिलेल्या आणि आदिवासी समाजातून पुढे आलेल्या मुर्मू यांना सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याची संधी मिळाल्यामुळे एक वेगळा संदेश जगाला दिला गेलाय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाची मान उंचावणारी ही घटना आहे......
आज मीठ उत्पादक टनामागे २५० ते ३०० रुपये कमवतो. हंगामानुसार त्यात वाढ किंवा घट होते. कधी कधी उत्पादन खर्च निघणंही मुश्कील! एकट्या गुजरातमधे १२,८०० मीठ प्रक्रिया उद्योग आहेत. त्यावर हजारो कामगार आणि कुटुंबं जगतात. पण समस्यारूपी ‘मिठाचा खडा’ या उद्योगाच्या विकासात अडथळा ठरतोय. केंद्र सरकारने यात वेळेवर लक्ष घातलं नाही तर देशाचं मीठ उत्पादनातलं स्थान धोक्यात येऊ शकतं.
आज मीठ उत्पादक टनामागे २५० ते ३०० रुपये कमवतो. हंगामानुसार त्यात वाढ किंवा घट होते. कधी कधी उत्पादन खर्च निघणंही मुश्कील! एकट्या गुजरातमधे १२,८०० मीठ प्रक्रिया उद्योग आहेत. त्यावर हजारो कामगार आणि कुटुंबं जगतात. पण समस्यारूपी ‘मिठाचा खडा’ या उद्योगाच्या विकासात अडथळा ठरतोय. केंद्र सरकारने यात वेळेवर लक्ष घातलं नाही तर देशाचं मीठ उत्पादनातलं स्थान धोक्यात येऊ शकतं......
जगप्रसिद्ध चिनी भारतीय शास्त्रीय नृत्यांगना झांग जून यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीजिंगमधे नुकत्याच एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. झांग जून यांनी भारतातली कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी नृत्यशैली चीनमधे पोचवली. त्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्यातून चीन आणि भारत यांच्यात एक सांस्कृतिक बंध निर्माण झाला.
जगप्रसिद्ध चिनी भारतीय शास्त्रीय नृत्यांगना झांग जून यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीजिंगमधे नुकत्याच एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. झांग जून यांनी भारतातली कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी नृत्यशैली चीनमधे पोचवली. त्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्यातून चीन आणि भारत यांच्यात एक सांस्कृतिक बंध निर्माण झाला......
राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय. मुर्मू देशातल्या आणि झारखंडच्या पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल ठरल्या होत्या. त्यांच्या नावाची घोषणा करून भाजपनं महिला आणि आदिवासी असं दुहेरी कार्ड खेळलंय. त्यामागच्या मिशन पॉलिटिक्सची जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय. मुर्मू देशातल्या आणि झारखंडच्या पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल ठरल्या होत्या. त्यांच्या नावाची घोषणा करून भाजपनं महिला आणि आदिवासी असं दुहेरी कार्ड खेळलंय. त्यामागच्या मिशन पॉलिटिक्सची जोरदार चर्चा आहे......
आयपीएलमधून भारताला क्रिकेटमधे नवनवे खेळाडू मिळाले, तसंच खेलो इंडियाबद्दल व्हायला हवं. भविष्यातले ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा, असंच या स्पर्धेचं स्वरूप उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो, हे चित्र बदलण्याची वेळ आता आलीय.
आयपीएलमधून भारताला क्रिकेटमधे नवनवे खेळाडू मिळाले, तसंच खेलो इंडियाबद्दल व्हायला हवं. भविष्यातले ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा, असंच या स्पर्धेचं स्वरूप उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो, हे चित्र बदलण्याची वेळ आता आलीय. .....
कोरोनामुळे गेली दोन वर्ष सैन्य दलातली भरती प्रक्रिया लांबणीवर पडत चाललीय. अशातच सरकारने कंत्राटी पद्धतीने सैनिकभरती व्हावी, यासाठी ‘अग्निपथ’ नावाच्या नव्या योजनेची घोषणा केली. संरक्षण दलावर होणारा खर्च कमी व्हावा, हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट असलं तरी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून विरोध होताना दिसतोय.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष सैन्य दलातली भरती प्रक्रिया लांबणीवर पडत चाललीय. अशातच सरकारने कंत्राटी पद्धतीने सैनिकभरती व्हावी, यासाठी ‘अग्निपथ’ नावाच्या नव्या योजनेची घोषणा केली. संरक्षण दलावर होणारा खर्च कमी व्हावा, हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट असलं तरी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून विरोध होताना दिसतोय......
साधारण पन्नास वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असं ठरलेलं असायचं. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. पण तो कुठं, किती आणि केव्हा पडणार, हे नेमकं सांगता येणं कठीण झालंय. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं दुरावलेलं आहे. झाडं, पशू, पक्षी यांनी ते आजही घट्ट जपलंय. त्यामुळे निसर्गातल्या बदलांबद्दल हे घटक माणसापेक्षा जास्त संवेदनशील असतात. त्याप्रमाणे ते व्यक्त होतात. माणसाला ते समजून येत नाही.
साधारण पन्नास वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असं ठरलेलं असायचं. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. पण तो कुठं, किती आणि केव्हा पडणार, हे नेमकं सांगता येणं कठीण झालंय. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं दुरावलेलं आहे. झाडं, पशू, पक्षी यांनी ते आजही घट्ट जपलंय. त्यामुळे निसर्गातल्या बदलांबद्दल हे घटक माणसापेक्षा जास्त संवेदनशील असतात. त्याप्रमाणे ते व्यक्त होतात. माणसाला ते समजून येत नाही......
भारतात राष्ट्रपती निवडणूक नेहमीच चित्तवेधक ठरलेली आहे. देशाच्या राजकारणात राष्ट्रपती निवडणूक दोन वेळा प्रचंड वेगळी ठरली. १९६९ आणि १९७७ या दोन निवडणुका पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने झाल्या होत्या. त्याचप्रमाणे २०२२ मधल्या निवडणुकीलाही वेगळा कंगोरा आहे.
भारतात राष्ट्रपती निवडणूक नेहमीच चित्तवेधक ठरलेली आहे. देशाच्या राजकारणात राष्ट्रपती निवडणूक दोन वेळा प्रचंड वेगळी ठरली. १९६९ आणि १९७७ या दोन निवडणुका पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने झाल्या होत्या. त्याचप्रमाणे २०२२ मधल्या निवडणुकीलाही वेगळा कंगोरा आहे......
दोन वर्षांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्यानं होऊ लागला तेव्हाच आगामी काही वर्षं कोरोनासोबत जगावं लागणार, असं विषाणूतज्ज्ञांकडून सांगितलं जात होतं. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे आणि एका मर्यादेपलीकडे अथक प्रवास केल्यामुळे या विषाणूंची क्षमता कमी होत जाते. पण त्यांच्यातलं म्युटेशन सुरुच असतं. त्यातून नवे वेरियंट जन्माला येतात. सध्या अशाच दोन वेरियंटमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय.
दोन वर्षांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्यानं होऊ लागला तेव्हाच आगामी काही वर्षं कोरोनासोबत जगावं लागणार, असं विषाणूतज्ज्ञांकडून सांगितलं जात होतं. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे आणि एका मर्यादेपलीकडे अथक प्रवास केल्यामुळे या विषाणूंची क्षमता कमी होत जाते. पण त्यांच्यातलं म्युटेशन सुरुच असतं. त्यातून नवे वेरियंट जन्माला येतात. सध्या अशाच दोन वेरियंटमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय......
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे.
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे......
भारतीय खेळाडूंनी अनेक धक्कादायक निकाल नोंदवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातल्या सर्वच मातब्बर टीमचा समावेश होता. पण भारतीय टीमने त्या सर्वांना मात दिली. भारतीय पुरुष टीमची कामगिरी ही भावी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या दिशेनं वाटचाल आहे. बॅडमिंटनपटूंसाठीच नाही, तर प्रत्येक क्रीडा प्रकारातल्या खेळांडूसाठी ही घटना प्रोत्साहन देणारी आहे.
भारतीय खेळाडूंनी अनेक धक्कादायक निकाल नोंदवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातल्या सर्वच मातब्बर टीमचा समावेश होता. पण भारतीय टीमने त्या सर्वांना मात दिली. भारतीय पुरुष टीमची कामगिरी ही भावी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या दिशेनं वाटचाल आहे. बॅडमिंटनपटूंसाठीच नाही, तर प्रत्येक क्रीडा प्रकारातल्या खेळांडूसाठी ही घटना प्रोत्साहन देणारी आहे......
हॉलीवूडच्या काही सिनेमांमधला नायक इतर ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखवला गेला आहे. पण हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्न होता. आता चंद्रावर शेती करण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती.
हॉलीवूडच्या काही सिनेमांमधला नायक इतर ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखवला गेला आहे. पण हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्न होता. आता चंद्रावर शेती करण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती......
विदेशी गंगाजळीची घागर भरलेली असेल, तर रुपया मजबूत होऊन महागाईही नियंत्रणात राहते. रुपया घसरला, याचा अर्थ इंधन तेलासह खाद्यतेल, खतं आणि इतर आवश्यक सुट्या घटकांची आयात महागणार आहे. त्यामुळे अन्नधान्य आणि इतर वस्तूंच्या किमती भडकून सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढणारच आहे.
विदेशी गंगाजळीची घागर भरलेली असेल, तर रुपया मजबूत होऊन महागाईही नियंत्रणात राहते. रुपया घसरला, याचा अर्थ इंधन तेलासह खाद्यतेल, खतं आणि इतर आवश्यक सुट्या घटकांची आयात महागणार आहे. त्यामुळे अन्नधान्य आणि इतर वस्तूंच्या किमती भडकून सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढणारच आहे......
भारतातल्या खाद्यतेलाचा वापर दरवर्षी २२५ दशलक्ष टन इतका आहे. त्यात आठ दशलक्ष टन पामतेलाचा समावेश आहे. खाण्यापासून ते साबण, बिस्किटं, टूथपेस्ट, शॅम्पू या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या निर्मितीमधे पामतेलाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत पामतेलाचं संकट गडद झाल्यामुळे खाद्यतेलाव्यतिरिक्त इतर वस्तूही महागल्या आहेत.
भारतातल्या खाद्यतेलाचा वापर दरवर्षी २२५ दशलक्ष टन इतका आहे. त्यात आठ दशलक्ष टन पामतेलाचा समावेश आहे. खाण्यापासून ते साबण, बिस्किटं, टूथपेस्ट, शॅम्पू या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या निर्मितीमधे पामतेलाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत पामतेलाचं संकट गडद झाल्यामुळे खाद्यतेलाव्यतिरिक्त इतर वस्तूही महागल्या आहेत......
२०१४ला पंजाबमधल्या अजनाला शहरातल्या एका विहिरीत काही मानवी सांगाडे आढळून आले होते. पंजाब सरकारने त्याचा अभ्यास करण्यासाठी मानववंशशास्त्रज्ञ जे. एस. सेहरावत यांच्या नेतृत्वात एक रिसर्च टीम तयार केली. हे मानवी सांगाडे १८५७ला ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांचे असल्याचं या नव्या संशोधनातून समोर आलंय. अतिशय क्रूर पद्धतीने या सैनिकांना संपवण्यात आल्याचं या अभ्यासावरून कळतंय.
२०१४ला पंजाबमधल्या अजनाला शहरातल्या एका विहिरीत काही मानवी सांगाडे आढळून आले होते. पंजाब सरकारने त्याचा अभ्यास करण्यासाठी मानववंशशास्त्रज्ञ जे. एस. सेहरावत यांच्या नेतृत्वात एक रिसर्च टीम तयार केली. हे मानवी सांगाडे १८५७ला ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांचे असल्याचं या नव्या संशोधनातून समोर आलंय. अतिशय क्रूर पद्धतीने या सैनिकांना संपवण्यात आल्याचं या अभ्यासावरून कळतंय......
प्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय.
प्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय......
कोरोनाचा संसर्ग कमी होत गेल्यामुळे जगभरात बर्याच अंशी दिलासादायक स्थिती असतानाच, आता या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरून वादंग माजलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार, कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी होत गेल्यामुळे जगभरात बर्याच अंशी दिलासादायक स्थिती असतानाच, आता या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरून वादंग माजलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार, कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे......
हिंदुत्ववादी विचारसणीच्या अंमलबजावणीमुळे अल्पकालीन पातळीवर भारतीय मुस्लिम गंभीररीत्या दुखावले जातील. याची सुरवात झालीच आहे. पण, दीर्घकालीन पातळीवर हिंदूंनाही ही गोष्ट त्रस्त करत राहील. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या लेखाचा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश इथं देत आहोत.
हिंदुत्ववादी विचारसणीच्या अंमलबजावणीमुळे अल्पकालीन पातळीवर भारतीय मुस्लिम गंभीररीत्या दुखावले जातील. याची सुरवात झालीच आहे. पण, दीर्घकालीन पातळीवर हिंदूंनाही ही गोष्ट त्रस्त करत राहील. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या लेखाचा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश इथं देत आहोत......
भारतीय सैन्यदलांमधे अल्पकालीन सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ‘अग्निपथ’ असं संभाव्य नामकरण असलेल्या या योजनेत जवान श्रेणीमधे तरुणांना कंत्राटी पद्धतीने भरती केलं जाणार आहे. सुरवातीला ही योजना लष्करापुरतीच मर्यादित होती; पण आता भारतीय नौदल आणि हवाई दलासाठीही तरुणांना थोड्या काळासाठी देशसेवा करण्याचं नवं दालन खुलं होऊ शकतं.
भारतीय सैन्यदलांमधे अल्पकालीन सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ‘अग्निपथ’ असं संभाव्य नामकरण असलेल्या या योजनेत जवान श्रेणीमधे तरुणांना कंत्राटी पद्धतीने भरती केलं जाणार आहे. सुरवातीला ही योजना लष्करापुरतीच मर्यादित होती; पण आता भारतीय नौदल आणि हवाई दलासाठीही तरुणांना थोड्या काळासाठी देशसेवा करण्याचं नवं दालन खुलं होऊ शकतं......
अमेरिकेने चीनविरोधी आघाडी अधिक भक्कम करण्याचं ठरवलंय. या आघाडीत भारताची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मात्र चीनविरोधी सहकार्याच्या पलीकडे जाऊन भारत एक मोठं लोकशाही राष्ट्र आहे, जगातली मोठी बाजारपेठ आहे, लष्करी आणि आर्थिक शक्ती आहे. हे लक्षात घेऊन अमेरिका भारताशी संबंध वाढवणार आहे का, यावरच उभय राष्ट्रांच्या संबंधांचं भवितव्य अवलंबून असेल.
अमेरिकेने चीनविरोधी आघाडी अधिक भक्कम करण्याचं ठरवलंय. या आघाडीत भारताची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मात्र चीनविरोधी सहकार्याच्या पलीकडे जाऊन भारत एक मोठं लोकशाही राष्ट्र आहे, जगातली मोठी बाजारपेठ आहे, लष्करी आणि आर्थिक शक्ती आहे. हे लक्षात घेऊन अमेरिका भारताशी संबंध वाढवणार आहे का, यावरच उभय राष्ट्रांच्या संबंधांचं भवितव्य अवलंबून असेल......
मार्च महिन्याचे महागाईचे आकडे आलेत. मागच्या १७ महिन्यांच्या तुलनेत यावेळच्या महागाईचा दर सर्वाधिक असल्याचं हे सरकारी आकडे सांगतायत. मागचे तीन महिने महागाईचा दर ६ टक्क्यांवर होता. मार्चमधे हा ६.९५ टक्के झालाय. या वाढत्या महागाईचं ज्येष्ठ आर्थिक पत्रकार अनिंद्यो चक्रवर्ती यांनी न्यूजक्लिक या वेबसाईटवर केलेलं हे विश्लेषण.
मार्च महिन्याचे महागाईचे आकडे आलेत. मागच्या १७ महिन्यांच्या तुलनेत यावेळच्या महागाईचा दर सर्वाधिक असल्याचं हे सरकारी आकडे सांगतायत. मागचे तीन महिने महागाईचा दर ६ टक्क्यांवर होता. मार्चमधे हा ६.९५ टक्के झालाय. या वाढत्या महागाईचं ज्येष्ठ आर्थिक पत्रकार अनिंद्यो चक्रवर्ती यांनी न्यूजक्लिक या वेबसाईटवर केलेलं हे विश्लेषण......
पाकिस्तानमधलं इम्रान खान सरकार अल्पमतात आलंय. मागच्या ६ महिन्यांपासून तिथं सरकार विरुद्ध लष्कर असा संघर्ष पहायला मिळतोय. बहुमत डळमळीत झाल्यामुळे इम्रान खान यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संकल्प गुर्जर यांनी 'थिंक बँक' या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण.
पाकिस्तानमधलं इम्रान खान सरकार अल्पमतात आलंय. मागच्या ६ महिन्यांपासून तिथं सरकार विरुद्ध लष्कर असा संघर्ष पहायला मिळतोय. बहुमत डळमळीत झाल्यामुळे इम्रान खान यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संकल्प गुर्जर यांनी 'थिंक बँक' या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण......
भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा.
भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा......
इस्लामची दहशत सध्या जगभर पसरलीय. विशेषत: अमेरिकेत ट्वीन टॉवरवर हल्ला झाल्यानंतर इस्लामची दहशत पसरलीय. त्यामुळे इस्लामविषयी गैरसमज निर्माण झालेत. हे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी इस्लामच्या धार्मिक नेत्यांवर तसंच इस्लामिक म्हणवून घेणार्या देशांवर आहे.
इस्लामची दहशत सध्या जगभर पसरलीय. विशेषत: अमेरिकेत ट्वीन टॉवरवर हल्ला झाल्यानंतर इस्लामची दहशत पसरलीय. त्यामुळे इस्लामविषयी गैरसमज निर्माण झालेत. हे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी इस्लामच्या धार्मिक नेत्यांवर तसंच इस्लामिक म्हणवून घेणार्या देशांवर आहे......
यावर्षीच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात जर कच्च्या तेलाची किंमत ७० ते ७५ डॉलर प्रति बॅरल राहिली तर देशाचा विकासदर आठ ते साडेआठ टक्क्यांच्या दरम्यान राहू शकेल. पण, रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत आताच १३० डॉलर प्रति बॅरल झालीय. ती आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या ऊर्जासुरक्षेबरोबरच आर्थिक विकासालाही धोका निर्माण झालाय.
यावर्षीच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात जर कच्च्या तेलाची किंमत ७० ते ७५ डॉलर प्रति बॅरल राहिली तर देशाचा विकासदर आठ ते साडेआठ टक्क्यांच्या दरम्यान राहू शकेल. पण, रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत आताच १३० डॉलर प्रति बॅरल झालीय. ती आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या ऊर्जासुरक्षेबरोबरच आर्थिक विकासालाही धोका निर्माण झालाय......
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामुळे भारत सध्या क्रीडा क्षेत्रातली मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचंय. त्यादृष्टीनेच २०३०च्या ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जातोय.
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामुळे भारत सध्या क्रीडा क्षेत्रातली मोठी सत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, हे भारतीय क्रीडा संघटकांना जगाला दाखवून द्यायचंय. त्यादृष्टीनेच २०३०च्या ऑलिम्पिक युवा स्पर्धा आणि २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनासाठी भारत प्रमुख दावेदार मानला जातोय......
रशिया आणि युक्रेनमधे सुरु असलेल्या युद्धाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. महासत्ता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगत सामर्थ्यवान देशांनी कमकुवत देशांवर आक्रमण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राष्ट्रीय वर्चस्ववादातून बलाढ्य राष्ट्रांनी केलेल्या जुन्या सैनिकी कारवायांचा इतिहास मांडणारा ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र गुहा यांचा साधना साप्ताहिकातला लेख.
रशिया आणि युक्रेनमधे सुरु असलेल्या युद्धाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. महासत्ता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगत सामर्थ्यवान देशांनी कमकुवत देशांवर आक्रमण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राष्ट्रीय वर्चस्ववादातून बलाढ्य राष्ट्रांनी केलेल्या जुन्या सैनिकी कारवायांचा इतिहास मांडणारा ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र गुहा यांचा साधना साप्ताहिकातला लेख......
सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. रशिया आणि अमेरिका संबंधांमुळे भारत सावध पवित्र्यात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी 'द वायर'ला भारताचे माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांचा इंटरव्यू घेतलाय. त्यात सरन यांनी भारत हा रशिया, चीन आणि अमेरिकेच्या कचाट्यात सापडून एकटा पडण्याची भीती व्यक्त केलीय.
सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. रशिया आणि अमेरिका संबंधांमुळे भारत सावध पवित्र्यात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी 'द वायर'ला भारताचे माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांचा इंटरव्यू घेतलाय. त्यात सरन यांनी भारत हा रशिया, चीन आणि अमेरिकेच्या कचाट्यात सापडून एकटा पडण्याची भीती व्यक्त केलीय......
ईशान्य भारतातल्या मणिपूरमधे विधानसभा निवडणुकीची धामधूम शेवटच्या टप्प्यात आलीय. ५ मार्चला इथं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. भाजप आणि काँग्रेसबरोबरच सगळ्या पक्षांनी प्रचारात जीव ओतलाय. आश्वासनांचा पूर राज्यात दुथडी भरून वाहतोय. त्यात मणिपूरमधून वादग्रस्त ‘आफ्स्पा’ कायदा गायब करण्याचं वचन सत्ताधारी भाजपच्या जाहीरनाम्यात नसल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.
ईशान्य भारतातल्या मणिपूरमधे विधानसभा निवडणुकीची धामधूम शेवटच्या टप्प्यात आलीय. ५ मार्चला इथं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. भाजप आणि काँग्रेसबरोबरच सगळ्या पक्षांनी प्रचारात जीव ओतलाय. आश्वासनांचा पूर राज्यात दुथडी भरून वाहतोय. त्यात मणिपूरमधून वादग्रस्त ‘आफ्स्पा’ कायदा गायब करण्याचं वचन सत्ताधारी भाजपच्या जाहीरनाम्यात नसल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात......
रशिया आणि युक्रेन यांच्यातला वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय. या वादात मध्यस्थी करायचं की मौनव्रत पाळायचं हा भारतासमोर मोठा पेच आहे. याच संदर्भाने आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक रोहन चौधरी यांनी भारताच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त केलंय. पुढारी ऑनलाईनवर त्यांनी केलेल्या विश्लेषणाचं हे शब्दांकन.
रशिया आणि युक्रेन यांच्यातला वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय. या वादात मध्यस्थी करायचं की मौनव्रत पाळायचं हा भारतासमोर मोठा पेच आहे. याच संदर्भाने आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक रोहन चौधरी यांनी भारताच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त केलंय. पुढारी ऑनलाईनवर त्यांनी केलेल्या विश्लेषणाचं हे शब्दांकन......
रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडालाय. त्याचा परिणाम थेट पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होतोय. अशावेळी कचऱ्यातून पेट्रोल, डिझेल बनवणाऱ्या आफ्रिकेतल्या झांबिया देशाची फार चर्चा होतेय. देशातल्या एका कंपनीनं पेट्रोलियम पदार्थांमधे झांबियाला स्वयंपूर्ण बनवायचा चंग बांधलाय. त्यामुळे जगही या प्रोजेक्टकडे आशेनं पाहतंय.
रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडालाय. त्याचा परिणाम थेट पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होतोय. अशावेळी कचऱ्यातून पेट्रोल, डिझेल बनवणाऱ्या आफ्रिकेतल्या झांबिया देशाची फार चर्चा होतेय. देशातल्या एका कंपनीनं पेट्रोलियम पदार्थांमधे झांबियाला स्वयंपूर्ण बनवायचा चंग बांधलाय. त्यामुळे जगही या प्रोजेक्टकडे आशेनं पाहतंय......
वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं.
वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं......
ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दुनियेत आघाडीच्या स्थानावर बसलेल्या नेटफ्लिक्सला आता भारतीय बैठक काही मानवत नाहीय. एकीकडे गेल्या दोन वर्षांत व्यवस्थित जम बसवलेले ओटीटी प्लॅटफॉर्म आणि हळूहळू चालू होणारे थिएटर यांचा संघर्ष रंगात येत असताना नेटफ्लिक्स मात्र हा डाव सोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचलाय.
ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दुनियेत आघाडीच्या स्थानावर बसलेल्या नेटफ्लिक्सला आता भारतीय बैठक काही मानवत नाहीय. एकीकडे गेल्या दोन वर्षांत व्यवस्थित जम बसवलेले ओटीटी प्लॅटफॉर्म आणि हळूहळू चालू होणारे थिएटर यांचा संघर्ष रंगात येत असताना नेटफ्लिक्स मात्र हा डाव सोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचलाय......
रोजच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांना फाटा देत सोनी टीवीवरचा एक 'रिऍलिटी शो' सध्या प्रेक्षकांना भुरळ घालतोय. 'शार्क टॅंक इंडिया' असं या शोचं नाव आहे. आपल्या आजूबाजूच्या व्यावसायिकांना एक नवा प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांची क्रिएटिवीटी जगापर्यंत पोचावी, व्यवसायाला प्रोत्साहन मिळावं हा शोचा उद्देश आहे. त्यामुळे जगभर पोचलेल्या या बिजनेस रिऍलिटी शोचा भारतीय अंदाज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.
रोजच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांना फाटा देत सोनी टीवीवरचा एक 'रिऍलिटी शो' सध्या प्रेक्षकांना भुरळ घालतोय. 'शार्क टॅंक इंडिया' असं या शोचं नाव आहे. आपल्या आजूबाजूच्या व्यावसायिकांना एक नवा प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांची क्रिएटिवीटी जगापर्यंत पोचावी, व्यवसायाला प्रोत्साहन मिळावं हा शोचा उद्देश आहे. त्यामुळे जगभर पोचलेल्या या बिजनेस रिऍलिटी शोचा भारतीय अंदाज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय......
१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. तो करताना त्यात नेहमीप्रमाणे घोषणांचा रतीब नव्हता. हा अर्थसंकल्प २५ वर्षाची दिशा असणार आहे असं सूतोवाच करत हे अमृत महोत्सवाचा अर्थसंकल्प असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय. यावर भाष्य करणारी गुंतवणूक सल्लागार समीर दिघे यांची फेसबुक पोस्ट.
१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. तो करताना त्यात नेहमीप्रमाणे घोषणांचा रतीब नव्हता. हा अर्थसंकल्प २५ वर्षाची दिशा असणार आहे असं सूतोवाच करत हे अमृत महोत्सवाचा अर्थसंकल्प असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय. यावर भाष्य करणारी गुंतवणूक सल्लागार समीर दिघे यांची फेसबुक पोस्ट......
१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. ५ राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना अर्थसंकल्प तसं वळण घेईल असं म्हटलं जात होतं. पण कोणत्याही प्रकारच्या लोकानुनयी घोषणा, चमकदार योजना, अतिमहत्त्वाकांक्षी उपक्रम यांचा वर्षाव तर सोडाच साधा उल्लेखही अर्थसंकल्पामधे नाही. वरकरणी तो सपक वाटला, तरी बर्यापैकी वस्तुनिष्ठ आणि व्यवहार्य आहे.
१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. ५ राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना अर्थसंकल्प तसं वळण घेईल असं म्हटलं जात होतं. पण कोणत्याही प्रकारच्या लोकानुनयी घोषणा, चमकदार योजना, अतिमहत्त्वाकांक्षी उपक्रम यांचा वर्षाव तर सोडाच साधा उल्लेखही अर्थसंकल्पामधे नाही. वरकरणी तो सपक वाटला, तरी बर्यापैकी वस्तुनिष्ठ आणि व्यवहार्य आहे......
उद्याच्या पिढ्या कोणत्या वातावरणात वाढतायत आणि कसलं विष घेऊन मोठ्या होतायत याची आपल्याला कल्पना आहे का? विखार ही या नव्या जगाची मातृभाषा होत असताना आमची आजची आई काय करतेय? बाप काय करतोय? तरुणाईला घडवणाऱ्या पिढीला आत्मभानाचा जाब विचारणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची फेसबुक पोस्ट.
उद्याच्या पिढ्या कोणत्या वातावरणात वाढतायत आणि कसलं विष घेऊन मोठ्या होतायत याची आपल्याला कल्पना आहे का? विखार ही या नव्या जगाची मातृभाषा होत असताना आमची आजची आई काय करतेय? बाप काय करतोय? तरुणाईला घडवणाऱ्या पिढीला आत्मभानाचा जाब विचारणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची फेसबुक पोस्ट......
केडर रूल्समधे केंद्र सरकारने केलेल्या बदलांमुळे सध्या राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष निर्माण होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. यामधे प्रतिनियुक्तीचा मुद्दा अधिक चर्चेत आहे. कोण चूक आणि कोण बरोबर यापेक्षा जनता आणि आपली संघराज्यीय रचना यांचा विचार करून केंद्र आणि राज्यांनी एकत्र हे पेल्यातलं वादळ शमवावं.
केडर रूल्समधे केंद्र सरकारने केलेल्या बदलांमुळे सध्या राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष निर्माण होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. यामधे प्रतिनियुक्तीचा मुद्दा अधिक चर्चेत आहे. कोण चूक आणि कोण बरोबर यापेक्षा जनता आणि आपली संघराज्यीय रचना यांचा विचार करून केंद्र आणि राज्यांनी एकत्र हे पेल्यातलं वादळ शमवावं......
२०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात आर्थिक चक्र पुनरुज्जीवित करण्यासाठी कितीतरी अधिक राजकोषीय सहकार्याची आवश्यकता असेल. सरकारला रोजगार, आरोग्य आणि शिक्षणासारख्या सामाजिक क्षेत्रांमधे मोठा खर्च करावा लागेल. मध्यमवर्गीयांवर अधिक करांचा बोजा टाकला जाणार नाही; पण श्रीमंतांवर काही आर्थिक बोजा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात आर्थिक चक्र पुनरुज्जीवित करण्यासाठी कितीतरी अधिक राजकोषीय सहकार्याची आवश्यकता असेल. सरकारला रोजगार, आरोग्य आणि शिक्षणासारख्या सामाजिक क्षेत्रांमधे मोठा खर्च करावा लागेल. मध्यमवर्गीयांवर अधिक करांचा बोजा टाकला जाणार नाही; पण श्रीमंतांवर काही आर्थिक बोजा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही......
मुंबईतल्या एका मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वादंग निर्माण झालाय. यावरून शिवसेना-भाजप अशी राजकीय लढाईही पहायला मिळतेय. टिपूवर हिंदूविरोधी असल्याचा ठपका ठेवला गेलाय. पण त्याबद्दल इतिहासाचे दाखले नेमकं काय सांगतात तेही बघायला हवं. या सगळ्याचा आढावा घेणारी इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांची ही फेसबूक पोस्ट.
मुंबईतल्या एका मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वादंग निर्माण झालाय. यावरून शिवसेना-भाजप अशी राजकीय लढाईही पहायला मिळतेय. टिपूवर हिंदूविरोधी असल्याचा ठपका ठेवला गेलाय. पण त्याबद्दल इतिहासाचे दाखले नेमकं काय सांगतात तेही बघायला हवं. या सगळ्याचा आढावा घेणारी इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांची ही फेसबूक पोस्ट......
सध्या बाजारात असलेला सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा ही जगभरातल्या औद्योगिक क्षेत्रासाठी मोठीच डोकेदुखी आहे. कोरोना आणि इतर कारणांमुळे अनेक कारखान्यांनी या समस्येपुढे हात टेकले आहेत. पण भारतातल्या संशोधकांना मात्र यावर उपाय सापडलाय. आता जर भारतातच या चिप बनवल्या गेल्या तर भविष्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेचं वैश्विक केंद्र बनू शकतो.
सध्या बाजारात असलेला सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा ही जगभरातल्या औद्योगिक क्षेत्रासाठी मोठीच डोकेदुखी आहे. कोरोना आणि इतर कारणांमुळे अनेक कारखान्यांनी या समस्येपुढे हात टेकले आहेत. पण भारतातल्या संशोधकांना मात्र यावर उपाय सापडलाय. आता जर भारतातच या चिप बनवल्या गेल्या तर भविष्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेचं वैश्विक केंद्र बनू शकतो......
विराटनं मॅच जिंकणं ही प्रक्रिया बनवली आणि त्यासाठी लागणारे सर्व घटक त्याने टीममधे उपलब्ध केले. तो आक्रमक होता. सहकार्यांच्या चुकांवर चेहर्यावरच्या हावभावांवरून प्रतिक्रिया द्यायचा. वेळप्रसंगी पंचांच्या निर्णयावर शिक्षेची पर्वा न करता नाराजी व्यक्त करायचा. या सगळ्या गोष्टी भारतीय टीमसाठी जमेची बाजू ठरायच्या.
विराटनं मॅच जिंकणं ही प्रक्रिया बनवली आणि त्यासाठी लागणारे सर्व घटक त्याने टीममधे उपलब्ध केले. तो आक्रमक होता. सहकार्यांच्या चुकांवर चेहर्यावरच्या हावभावांवरून प्रतिक्रिया द्यायचा. वेळप्रसंगी पंचांच्या निर्णयावर शिक्षेची पर्वा न करता नाराजी व्यक्त करायचा. या सगळ्या गोष्टी भारतीय टीमसाठी जमेची बाजू ठरायच्या......
पंडित बिरजू महाराजांनी जो वारसा दिलाय तो अद्वितीय आहे. कथ्थक नृत्याला त्यांनी एक वेगळाच सन्मान मिळवून दिला आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेला. त्यांची कलासृष्टी अद्भुत होती. महाराजांचे शिष्यगण सबंध जगभरात विस्तारलेले आहेत. त्यांची प्रेरणा, शिकवण्याची शैली, त्यांचं गुरुत्व या सर्व गोष्टींचा विचार केला तर कलाविश्वातला एक महान वटवृक्ष कोसळल्याची भावना मनात येते.
पंडित बिरजू महाराजांनी जो वारसा दिलाय तो अद्वितीय आहे. कथ्थक नृत्याला त्यांनी एक वेगळाच सन्मान मिळवून दिला आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेला. त्यांची कलासृष्टी अद्भुत होती. महाराजांचे शिष्यगण सबंध जगभरात विस्तारलेले आहेत. त्यांची प्रेरणा, शिकवण्याची शैली, त्यांचं गुरुत्व या सर्व गोष्टींचा विचार केला तर कलाविश्वातला एक महान वटवृक्ष कोसळल्याची भावना मनात येते......
ध्येय, आत्मविश्वास आणि धाडस काय असतं हे दाखवत कपिल देवने भारतीयांची मानसिकता बदलली. क्रिकेट दुनियेला भारतीय टीमची दखल घ्यायला भाग पडलं. नंतरच्या काळात भारतीय टीमच्या दिमाखदार कामगिरीने 83चं यश हा नुसता नशिबाने मिळालेला विजय नव्हता हे दाखवून दिलं. 83च्या विजयाने भारतीयांना मोठी स्वप्नं बघायची शिकवण दिली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणता येईल.
ध्येय, आत्मविश्वास आणि धाडस काय असतं हे दाखवत कपिल देवने भारतीयांची मानसिकता बदलली. क्रिकेट दुनियेला भारतीय टीमची दखल घ्यायला भाग पडलं. नंतरच्या काळात भारतीय टीमच्या दिमाखदार कामगिरीने 83चं यश हा नुसता नशिबाने मिळालेला विजय नव्हता हे दाखवून दिलं. 83च्या विजयाने भारतीयांना मोठी स्वप्नं बघायची शिकवण दिली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणता येईल......
एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी मुघल राष्ट्रनिर्माते असल्याचं म्हटलं. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. मराठ्यांना आमनेसामने आव्हान दिल्यामुळे इथल्या इतिहास अभ्यासकांनी आपल्या शत्रूच्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचं इतिहासाचे अभ्यासक विशाल फुटाणे म्हणतात. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका दुस-या बाजूवर प्रकाश टाकणारी त्यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी मुघल राष्ट्रनिर्माते असल्याचं म्हटलं. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. मराठ्यांना आमनेसामने आव्हान दिल्यामुळे इथल्या इतिहास अभ्यासकांनी आपल्या शत्रूच्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचं इतिहासाचे अभ्यासक विशाल फुटाणे म्हणतात. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका दुस-या बाजूवर प्रकाश टाकणारी त्यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......
२०२१ला बाय-बाय करण्याची वेळ आलीय. वर्षभरात अनेक घडामोडी घडल्यात. कोरोना वायरस होताच पण त्याच सोबतीनं बेरोजगारीचे आकडेही डोळे पांढरे करणारे होते. पेट्रोल-डिझेलसोबत महागाईही वाढत होती. सर्वसामान्य लोकांना मात्र याचा विसर पडला. भारतात नव्या कॅटेगरींचा झालेला उदय यामागचं खरं कारण होतं. त्याबद्दल सांगतायत ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार. त्यांच्या एनडीटीवीवरच्या प्राईम टाईमचं हे शब्दांकन.
२०२१ला बाय-बाय करण्याची वेळ आलीय. वर्षभरात अनेक घडामोडी घडल्यात. कोरोना वायरस होताच पण त्याच सोबतीनं बेरोजगारीचे आकडेही डोळे पांढरे करणारे होते. पेट्रोल-डिझेलसोबत महागाईही वाढत होती. सर्वसामान्य लोकांना मात्र याचा विसर पडला. भारतात नव्या कॅटेगरींचा झालेला उदय यामागचं खरं कारण होतं. त्याबद्दल सांगतायत ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार. त्यांच्या एनडीटीवीवरच्या प्राईम टाईमचं हे शब्दांकन......
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन नुकतेच भारत दौऱ्यावर होते. यावेळी दोन्ही देशांमधे झालेली चर्चा, संरक्षण साहित्य, तंत्रज्ञानसंबंधीचे करार, या सगळ्यातून भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणात संतुलन साधायचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. पुतीन यांनी भारताचं रशियासाठी असलेलं महत्त्व या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. त्यामुळे भारत-रशिया यांच्यातले संबंध कालातीत असल्याचं दिसून येतं.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन नुकतेच भारत दौऱ्यावर होते. यावेळी दोन्ही देशांमधे झालेली चर्चा, संरक्षण साहित्य, तंत्रज्ञानसंबंधीचे करार, या सगळ्यातून भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणात संतुलन साधायचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. पुतीन यांनी भारताचं रशियासाठी असलेलं महत्त्व या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. त्यामुळे भारत-रशिया यांच्यातले संबंध कालातीत असल्याचं दिसून येतं......
संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणाऱ्या 'मिस युनिवर्स २०२१'चा निकाल नुकताच जाहीर झालाय. पंजाबच्या हरनाझ संधूने सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ही स्पर्धा जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. अभिनेत्री सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यानंतर तब्बल २१ वर्षांनी विश्वसुंदरीचा मान मिळवणारी ती तिसरी भारतीय ठरलीय.
संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणाऱ्या 'मिस युनिवर्स २०२१'चा निकाल नुकताच जाहीर झालाय. पंजाबच्या हरनाझ संधूने सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ही स्पर्धा जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. अभिनेत्री सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यानंतर तब्बल २१ वर्षांनी विश्वसुंदरीचा मान मिळवणारी ती तिसरी भारतीय ठरलीय......
नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं नुकतीच आपल्या आगामी चंद्र आणि मंगळ ग्रहावरच्या मोहिमांची घोषणा केलीय. त्याच्या प्रशिक्षणासाठी नासाने १२ हजारामधून १० जणांची निवड केलीय. या १० जणांमधे भारतीय वंशाचे फ्लाईट सर्जन डॉ. अनिल मेनन यांचं नाव आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही फार अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी.
नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं नुकतीच आपल्या आगामी चंद्र आणि मंगळ ग्रहावरच्या मोहिमांची घोषणा केलीय. त्याच्या प्रशिक्षणासाठी नासाने १२ हजारामधून १० जणांची निवड केलीय. या १० जणांमधे भारतीय वंशाचे फ्लाईट सर्जन डॉ. अनिल मेनन यांचं नाव आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही फार अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी......
भारताची अर्थव्यवस्थेतल्या 'वी-शेप रिकवरी'मुळे केंद्र सरकार स्वतःची पाठ थोपटतंय. पण अर्थव्यस्थेतली ही नॉर्मल गोष्ट असल्याचं म्हणत जगप्रसिद्ध अर्थतज्ञ आणि रिझर्व बँकेचे माजी गवर्नर रघुराम राजन यांनी सरकारला आरसा दाखवलाय. त्यामागे अर्थव्यवस्थेची घसरण कारणीभूत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इंडिया टुडे टीवीचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांनी त्यांचा नुकताच इंटरव्यू घेतलाय. त्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांचं शब्दांकन.
भारताची अर्थव्यवस्थेतल्या 'वी-शेप रिकवरी'मुळे केंद्र सरकार स्वतःची पाठ थोपटतंय. पण अर्थव्यस्थेतली ही नॉर्मल गोष्ट असल्याचं म्हणत जगप्रसिद्ध अर्थतज्ञ आणि रिझर्व बँकेचे माजी गवर्नर रघुराम राजन यांनी सरकारला आरसा दाखवलाय. त्यामागे अर्थव्यवस्थेची घसरण कारणीभूत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इंडिया टुडे टीवीचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांनी त्यांचा नुकताच इंटरव्यू घेतलाय. त्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांचं शब्दांकन......
ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध टीवी अँकर विनोद दुआ यांचं निधन झालंय. विनोद दुआ भारताच्या टीवी पत्रकारितेतलं एक महत्वाचं नाव होतं. बोलण्यातल्या सहजतेमुळे त्यांचं नेमकं बोलणं लोकांपर्यंत पोचायचं. त्यांचं निर्भीडपणे प्रश्न विचारणं शेवटपर्यंत चालू राहिलं. एनडीटीवीचे संपादक रवीश कुमार यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना फेसबुक पोस्टमधून उजाळा दिलाय. त्या पोस्टचा हा अनुवाद.
ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध टीवी अँकर विनोद दुआ यांचं निधन झालंय. विनोद दुआ भारताच्या टीवी पत्रकारितेतलं एक महत्वाचं नाव होतं. बोलण्यातल्या सहजतेमुळे त्यांचं नेमकं बोलणं लोकांपर्यंत पोचायचं. त्यांचं निर्भीडपणे प्रश्न विचारणं शेवटपर्यंत चालू राहिलं. एनडीटीवीचे संपादक रवीश कुमार यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना फेसबुक पोस्टमधून उजाळा दिलाय. त्या पोस्टचा हा अनुवाद......
डोकलाममधे भारतीय सैन्याकडून दणका बसल्यानंतर चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांनी सीमावर्ती भागासाठी नवं धोरण निश्चित केलं. बॉर्डर डिफेन्स व्हिलेजची उभारणी हा या धोरणाचा गाभा म्हटला पाहिजे. आता चीनने आपला मोहरा अरुणाचल प्रदेशच्या दिशेने वळवलाय. आपल्या सीमा अधिक प्रभावीपणे स्वतःच्या कब्जात असल्या पाहिजेत, या हेतूने चीनने हे उद्योग सुरू केले आहेत.
डोकलाममधे भारतीय सैन्याकडून दणका बसल्यानंतर चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांनी सीमावर्ती भागासाठी नवं धोरण निश्चित केलं. बॉर्डर डिफेन्स व्हिलेजची उभारणी हा या धोरणाचा गाभा म्हटला पाहिजे. आता चीनने आपला मोहरा अरुणाचल प्रदेशच्या दिशेने वळवलाय. आपल्या सीमा अधिक प्रभावीपणे स्वतःच्या कब्जात असल्या पाहिजेत, या हेतूने चीनने हे उद्योग सुरू केले आहेत......
पोलीस, कोर्ट याकडे आपण फार आशेनं पाहत असतो. इथं आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा असते. पण आपण हायप्रोफाईल नसू तर आपल्यासाठी इथलं जगणं फार काळजीचं ठरू शकतं. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, तुरुंगातले ३ लाखपेक्षा अधिक कैदी मागची अनेक वर्ष गजांआड खितपत पडलेत. हे असे कैदी आहेत ज्यांना अटक झालीय पण त्यांच्यावरचे आरोप अद्यापही सिद्ध झालेले नाहीत.
पोलीस, कोर्ट याकडे आपण फार आशेनं पाहत असतो. इथं आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा असते. पण आपण हायप्रोफाईल नसू तर आपल्यासाठी इथलं जगणं फार काळजीचं ठरू शकतं. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, तुरुंगातले ३ लाखपेक्षा अधिक कैदी मागची अनेक वर्ष गजांआड खितपत पडलेत. हे असे कैदी आहेत ज्यांना अटक झालीय पण त्यांच्यावरचे आरोप अद्यापही सिद्ध झालेले नाहीत......
१९ नोव्हेंबरला तीनही वादग्रस्त शेती कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मागचं वर्षभर दिल्लीच्या सीमांवर त्यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे ऐतिहासिक यश होतं. १९२८चा गुजरातमधल्या बारडोलीचा शेतकऱ्यांचा सत्याग्रह, दिल्लीतलं १९८८चं शेतकऱ्यांचं आंदोलनं ऐतिहासिक ठरलं होतं. या ऐतिहासिक आंदोलनांचा वेध घेणारं लेखक निलांजन मुखोपाध्याय यांचं न्यूजक्लिकवरच्या विश्लेषणाचं हे शब्दांकन.
१९ नोव्हेंबरला तीनही वादग्रस्त शेती कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मागचं वर्षभर दिल्लीच्या सीमांवर त्यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे ऐतिहासिक यश होतं. १९२८चा गुजरातमधल्या बारडोलीचा शेतकऱ्यांचा सत्याग्रह, दिल्लीतलं १९८८चं शेतकऱ्यांचं आंदोलनं ऐतिहासिक ठरलं होतं. या ऐतिहासिक आंदोलनांचा वेध घेणारं लेखक निलांजन मुखोपाध्याय यांचं न्यूजक्लिकवरच्या विश्लेषणाचं हे शब्दांकन......
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल......
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिन. त्यांच्यासारखा एक अद्वितीय नेता आणि अत्यंत त्यागी स्वातंत्र्यसैनिक भारताचा नेता होता, हे जेव्हा आठवतं तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामधे जवाहरलाल नेहरू यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं. त्यामुळेच आजच्या काळात नेहरूंसारख्या सौंदर्यवादी, विद्वान आणि विज्ञाननिष्ठ नेत्याची उणीव भासतेय.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिन. त्यांच्यासारखा एक अद्वितीय नेता आणि अत्यंत त्यागी स्वातंत्र्यसैनिक भारताचा नेता होता, हे जेव्हा आठवतं तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामधे जवाहरलाल नेहरू यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं. त्यामुळेच आजच्या काळात नेहरूंसारख्या सौंदर्यवादी, विद्वान आणि विज्ञाननिष्ठ नेत्याची उणीव भासतेय......
रोममधल्या जी-२० देशांच्या आणि ग्लासगो इथल्या सीओपी-२६ या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युरोप दौरा नुकताच पार पडला. या दोन्ही परिषदा केवळ भारतासाठीच नाही तर एकंदर जागतिक हितासाठी महत्त्वाच्या होत्या. पंतप्रधानांचा हा दौरा म्हणजे भारताचं राजनैतिक यश आहे. आशिया खंडातल्या सर्व गरीब आणि विकसनशील देशांच्या वतीने भूमिका मांडल्यामुळे भारत सामूहिक नेतृत्वाच्या दिशेनं जाताना दिसला.
रोममधल्या जी-२० देशांच्या आणि ग्लासगो इथल्या सीओपी-२६ या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युरोप दौरा नुकताच पार पडला. या दोन्ही परिषदा केवळ भारतासाठीच नाही तर एकंदर जागतिक हितासाठी महत्त्वाच्या होत्या. पंतप्रधानांचा हा दौरा म्हणजे भारताचं राजनैतिक यश आहे. आशिया खंडातल्या सर्व गरीब आणि विकसनशील देशांच्या वतीने भूमिका मांडल्यामुळे भारत सामूहिक नेतृत्वाच्या दिशेनं जाताना दिसला......
भारतीय क्रिकेटचं कॅप्टनपद असो किंवा मुख्य प्रशिक्षकपद असो, हा मुकुट काटेरीच असतो. एक खेळाडू असताना 'द वॉल' असं बिरुद घेऊन भारतीय टीमचं रक्षण करणारी राहुल द्रविडची एक अभेद्य भिंत आपल्याकडे होती. आता भारतीय टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडला स्वतःच्या कोशाच्या काही ठरावीक भिंती तोडून वेगवेगळ्या वाटा शोधाव्या लागतील.
भारतीय क्रिकेटचं कॅप्टनपद असो किंवा मुख्य प्रशिक्षकपद असो, हा मुकुट काटेरीच असतो. एक खेळाडू असताना 'द वॉल' असं बिरुद घेऊन भारतीय टीमचं रक्षण करणारी राहुल द्रविडची एक अभेद्य भिंत आपल्याकडे होती. आता भारतीय टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडला स्वतःच्या कोशाच्या काही ठरावीक भिंती तोडून वेगवेगळ्या वाटा शोधाव्या लागतील......
२०२०च्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा ८ नोव्हेंबरला दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडला. या सोहळ्यात अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला आलेल्या तुलसी गौडा यांची चर्चा सगळीकडे सुरू आहे. जंगलातली बाई असणं हे फक्त माणूस असण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इंटरेस्टिंग आहे हे गौडा यांच्याकडे बघितल्यावर कळतं.
२०२०च्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा ८ नोव्हेंबरला दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडला. या सोहळ्यात अनवाणी पायांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला आलेल्या तुलसी गौडा यांची चर्चा सगळीकडे सुरू आहे. जंगलातली बाई असणं हे फक्त माणूस असण्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त इंटरेस्टिंग आहे हे गौडा यांच्याकडे बघितल्यावर कळतं......
पर्यावरणावर काम करणाऱ्या 'फाउंडेशन फॉर इकॉलॉजीकल सिक्युरिटी ' या भारतीय संस्थेनं 'क्लार्ट' नावाचं एक ऍप आणलंय. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतातल्या ६० कोटी लोकांना पाण्याचं संकट सतावत असल्याचं म्हटलंय. अशावेळी जल संवर्धनाची इत्यंभूत माहिती देण्यासोबत आपल्यावर त्याची जबाबदारी टाकणारा हा 'क्लार्ट ऍप' वरदान ठरू शकेल.
पर्यावरणावर काम करणाऱ्या 'फाउंडेशन फॉर इकॉलॉजीकल सिक्युरिटी ' या भारतीय संस्थेनं 'क्लार्ट' नावाचं एक ऍप आणलंय. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतातल्या ६० कोटी लोकांना पाण्याचं संकट सतावत असल्याचं म्हटलंय. अशावेळी जल संवर्धनाची इत्यंभूत माहिती देण्यासोबत आपल्यावर त्याची जबाबदारी टाकणारा हा 'क्लार्ट ऍप' वरदान ठरू शकेल......
पुढचं वर्ष भारत-आसियान मैत्री वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय आसियान शिखर परिषदेत घेण्यात आलाय. त्यामुळे आसियान देशांबरोबर भारताचे नवे द्विपक्षीय आर्थिक करार होण्याची शक्यता वाढेल. नवीन व्यावसायिक करार करण्यासाठी भारतही इच्छुक आहे. त्यामुळे भारत-आसियान आर्थिक संबंधांच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.
पुढचं वर्ष भारत-आसियान मैत्री वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय आसियान शिखर परिषदेत घेण्यात आलाय. त्यामुळे आसियान देशांबरोबर भारताचे नवे द्विपक्षीय आर्थिक करार होण्याची शक्यता वाढेल. नवीन व्यावसायिक करार करण्यासाठी भारतही इच्छुक आहे. त्यामुळे भारत-आसियान आर्थिक संबंधांच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत......
टीवी, फ्रीज, मोबाइलसारख्या घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या आयुष्याचा भाग झाल्यात. या वस्तू एकदा बंद पडल्या की त्यांना आपण अडगळीत टाकतो. पण त्यातून तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनाला धोका निर्माण होतोय. ग्राहकांनी एकदा वस्तू विकत घेतली की इलेक्ट्रॉनिक कंपन्यांची जबाबदारी संपते. त्यामुळेच जगभरात 'राईट टू रिपेयर' हे आंदोलन जोर धरतंय.
टीवी, फ्रीज, मोबाइलसारख्या घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या आयुष्याचा भाग झाल्यात. या वस्तू एकदा बंद पडल्या की त्यांना आपण अडगळीत टाकतो. पण त्यातून तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनाला धोका निर्माण होतोय. ग्राहकांनी एकदा वस्तू विकत घेतली की इलेक्ट्रॉनिक कंपन्यांची जबाबदारी संपते. त्यामुळेच जगभरात 'राईट टू रिपेयर' हे आंदोलन जोर धरतंय......
ऍड. लटारी मडावी यांनी ‘मूळ रहिवासी जंगलातून संयुक्त राष्ट्र संघात’ या पुस्तकात भारतीय आदिवासींच्या अस्तित्व, आणि जागतिक, स्थानिक पातळीवरच्या समस्या फार टोकदार शब्दात मांडल्या आहेत. केवळ कायदा आणि संविधान यांचाच प्रश्न नाही तर बहुसंख्य धार्मिक कट्टरपंथी आदिवासींची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख पुसून टाकायचा प्रयत्न होत असताना हे पुस्तक का महत्वाचंय हे सांगणारी प्रमोद मुनघाटे यांची फेसबुक पोस्ट.
ऍड. लटारी मडावी यांनी ‘मूळ रहिवासी जंगलातून संयुक्त राष्ट्र संघात’ या पुस्तकात भारतीय आदिवासींच्या अस्तित्व, आणि जागतिक, स्थानिक पातळीवरच्या समस्या फार टोकदार शब्दात मांडल्या आहेत. केवळ कायदा आणि संविधान यांचाच प्रश्न नाही तर बहुसंख्य धार्मिक कट्टरपंथी आदिवासींची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख पुसून टाकायचा प्रयत्न होत असताना हे पुस्तक का महत्वाचंय हे सांगणारी प्रमोद मुनघाटे यांची फेसबुक पोस्ट......
'स्टारलिंक' ही जगातले श्रीमंत व्यक्ती अॅलन मस्क यांची कंपनी आहे. लहान उपग्रह तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी 'स्टारलिंक' एक आहे. सॅटेलाइटचा वापर करून ग्रामीण भागात इंटरनेट सेवा पोचवणं हा या कंपनीचा महत्वाचा उद्देश आहे. सध्या जगभरातल्या १४ देशांमधे तिचं काम सुरू आहे. मस्क यांनी भारतातल्या गावागावात इंटरनेट पोचवायचं स्वप्न पाहिलंय. स्टारलिंकची भारतातली एण्ट्री त्यामुळेच फार महत्वाची आहे.
'स्टारलिंक' ही जगातले श्रीमंत व्यक्ती अॅलन मस्क यांची कंपनी आहे. लहान उपग्रह तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी 'स्टारलिंक' एक आहे. सॅटेलाइटचा वापर करून ग्रामीण भागात इंटरनेट सेवा पोचवणं हा या कंपनीचा महत्वाचा उद्देश आहे. सध्या जगभरातल्या १४ देशांमधे तिचं काम सुरू आहे. मस्क यांनी भारतातल्या गावागावात इंटरनेट पोचवायचं स्वप्न पाहिलंय. स्टारलिंकची भारतातली एण्ट्री त्यामुळेच फार महत्वाची आहे......
दरवर्षी दक्षिण कोरियाचं शिष्टमंडळ अयोध्येला येऊन आपल्या कुलमातेला आदरांजली अर्पण करतं. सुरीरत्ना ही कोरियाची कुलमाता अयोध्येची की कन्याकुमारीची, हा ऐतिहासिक वाद चालूच राहणार. राजकारण इतिहास घडवतं तसंच बदलवतही. असं असलं तरी कोरियाच्या कुलमातेचा भारतीय मातीशी असलेला अनुबंध आणि त्याचा शोध अनेक वाटा-वळणांनी पुढं जात राहील.
दरवर्षी दक्षिण कोरियाचं शिष्टमंडळ अयोध्येला येऊन आपल्या कुलमातेला आदरांजली अर्पण करतं. सुरीरत्ना ही कोरियाची कुलमाता अयोध्येची की कन्याकुमारीची, हा ऐतिहासिक वाद चालूच राहणार. राजकारण इतिहास घडवतं तसंच बदलवतही. असं असलं तरी कोरियाच्या कुलमातेचा भारतीय मातीशी असलेला अनुबंध आणि त्याचा शोध अनेक वाटा-वळणांनी पुढं जात राहील......
क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही.
क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही......
देशात सध्या भीषण कोळसा टंचाई आहे. देशात निर्माण होणाऱ्या वीजेच्या जवळपास ७० टक्के वीज ही कोळसा प्रकल्पांमधून निर्माण होते. त्यामुळे कोळसाच नाही म्हटल्यावर वीज निर्माण कशी करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनोत्तर काळात अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येत असताना अचानक झालेल्या या वीज टंचाईमुळे पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लावलाय.
देशात सध्या भीषण कोळसा टंचाई आहे. देशात निर्माण होणाऱ्या वीजेच्या जवळपास ७० टक्के वीज ही कोळसा प्रकल्पांमधून निर्माण होते. त्यामुळे कोळसाच नाही म्हटल्यावर वीज निर्माण कशी करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनोत्तर काळात अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येत असताना अचानक झालेल्या या वीज टंचाईमुळे पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लावलाय......
२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे.
२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे......
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी.
भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी......
अब्दुल मनाफ म्हणजेच 'मनु मास्टर' भरतनाट्यम नृत्यशैलीतले एक ज्येष्ठ नर्तक. केरळमधल्या एका मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. भरतनाट्यम या नृत्यशैलीची ओढ लागली आणि पुढे परंपरा आणि नाविन्याचा अनोखा मेळ घालत त्यांनी या कलेला एक नवा आयाम दिला. त्यांच्या नृत्यकारकीर्दीवर एक डॉक्युमेंटरी आलीय. या अभिजात नृत्यशैलीचा आढावा घेणारी ओंकार थोरात यांची फेसबुक पोस्ट.
अब्दुल मनाफ म्हणजेच 'मनु मास्टर' भरतनाट्यम नृत्यशैलीतले एक ज्येष्ठ नर्तक. केरळमधल्या एका मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. भरतनाट्यम या नृत्यशैलीची ओढ लागली आणि पुढे परंपरा आणि नाविन्याचा अनोखा मेळ घालत त्यांनी या कलेला एक नवा आयाम दिला. त्यांच्या नृत्यकारकीर्दीवर एक डॉक्युमेंटरी आलीय. या अभिजात नृत्यशैलीचा आढावा घेणारी ओंकार थोरात यांची फेसबुक पोस्ट......
दर्जेदार खेळी करणार्या ऋतुराज गायकवाडला भारतीय टीममधे मोठी स्पर्धा आहे. क्रिकेटमधली त्याची प्रगती समाधानकारक राहिलीय. हल्ली आयपीएल हेच मुलांचं उद्दिष्ट होऊ लागलंय. ज्यांचं खेळावर प्रेम आहे आणि जे देशाकडून खेळण्याचं महत्त्व मानतात, ते यात अडकून पडत नाहीत. ऋतुराजसुद्धा भारतीय टीममधलं आपलं स्थान महत्त्वाचं मानतो हे त्याच्या एकूण खेळावरून स्पष्ट होतं.
दर्जेदार खेळी करणार्या ऋतुराज गायकवाडला भारतीय टीममधे मोठी स्पर्धा आहे. क्रिकेटमधली त्याची प्रगती समाधानकारक राहिलीय. हल्ली आयपीएल हेच मुलांचं उद्दिष्ट होऊ लागलंय. ज्यांचं खेळावर प्रेम आहे आणि जे देशाकडून खेळण्याचं महत्त्व मानतात, ते यात अडकून पडत नाहीत. ऋतुराजसुद्धा भारतीय टीममधलं आपलं स्थान महत्त्वाचं मानतो हे त्याच्या एकूण खेळावरून स्पष्ट होतं......
आज २८ सप्टेंबर. शहीद भगतसिंग यांचा जन्मदिवस. अगदी तरुण वयात ते स्वातंत्र्याच्या चळवळीत ओढले गेले. बुद्धिप्रामाण्यवादी, जहाल क्रांतिकारक अशी त्यांची ओळख बनली. भगतसिंग केवळ भारतीय स्वातंत्र्याची लढाई लढले नाहीत तर स्वातंत्र्योत्तर भारत कसा असेल याविषयी त्यांनी मांडणी केली. हीच मांडणी इथल्या तरुणाईची ऊर्जा बनली.
आज २८ सप्टेंबर. शहीद भगतसिंग यांचा जन्मदिवस. अगदी तरुण वयात ते स्वातंत्र्याच्या चळवळीत ओढले गेले. बुद्धिप्रामाण्यवादी, जहाल क्रांतिकारक अशी त्यांची ओळख बनली. भगतसिंग केवळ भारतीय स्वातंत्र्याची लढाई लढले नाहीत तर स्वातंत्र्योत्तर भारत कसा असेल याविषयी त्यांनी मांडणी केली. हीच मांडणी इथल्या तरुणाईची ऊर्जा बनली......
राज्यात बलात्काराच्या घटना वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा कठोर कायदे करण्याची मागणी होताना दिसत आहे. ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार ‘शक्ती कायदा’ आणणार आहे. बलात्कारांच्या अनेक खटल्यांमधे पीडितेचं शोषण होतं. गुन्हेगार मोकाट सुटतात. एखादा कायदा केला म्हणून बदल होणार नाहीत; तर त्याच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करायला हवं.
राज्यात बलात्काराच्या घटना वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा कठोर कायदे करण्याची मागणी होताना दिसत आहे. ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार ‘शक्ती कायदा’ आणणार आहे. बलात्कारांच्या अनेक खटल्यांमधे पीडितेचं शोषण होतं. गुन्हेगार मोकाट सुटतात. एखादा कायदा केला म्हणून बदल होणार नाहीत; तर त्याच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करायला हवं......
लंडनच्या ओवल इथल्या चौथ्या क्रिकेट टेस्टमधे इंग्लंडला खिंडार पडलं ते भारतीय टीमच्या शार्दुल ठाकूरमुळे. या मराठमोळ्या खेळाडूनं टीममधलं आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय. रणजीपासून भारतीय टीमपर्यंत त्याचा प्रवास सोप्पा नाही. हे यश त्याला एका रात्रीत मिळालेलं नाही. अपार मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तो आज नावारूपाला आलाय.
लंडनच्या ओवल इथल्या चौथ्या क्रिकेट टेस्टमधे इंग्लंडला खिंडार पडलं ते भारतीय टीमच्या शार्दुल ठाकूरमुळे. या मराठमोळ्या खेळाडूनं टीममधलं आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलंय. रणजीपासून भारतीय टीमपर्यंत त्याचा प्रवास सोप्पा नाही. हे यश त्याला एका रात्रीत मिळालेलं नाही. अपार मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तो आज नावारूपाला आलाय......
जगभरातल्या गाड्यांच्या ब्रँड कंपन्यांमधे अमेरिकन कार कंपनी असलेल्या फोर्डचं नाव घेतलं जातं. या कंपनीनं भारतातलं उत्पादन बंद करत असल्याची घोषणा केलीय. या ब्रँड कंपनीला भारतीय बाजारपेठांमधली गरज ओळखता आली नाही. इथला आर्थिक स्तर आणि जीवनशैलीतला वेगळेपणा यातला फरक न समजल्यामुळेच फोर्डला आपला गाशा गुंडाळावा लागला.
जगभरातल्या गाड्यांच्या ब्रँड कंपन्यांमधे अमेरिकन कार कंपनी असलेल्या फोर्डचं नाव घेतलं जातं. या कंपनीनं भारतातलं उत्पादन बंद करत असल्याची घोषणा केलीय. या ब्रँड कंपनीला भारतीय बाजारपेठांमधली गरज ओळखता आली नाही. इथला आर्थिक स्तर आणि जीवनशैलीतला वेगळेपणा यातला फरक न समजल्यामुळेच फोर्डला आपला गाशा गुंडाळावा लागला......
बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल.
बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल......
स्वाईन फ्लू, प्लेग, इबोला, स्पॅनिश फ्लू अशा वेगवेगळ्या वायरसच्या साथी जगानं पाहिल्या. काही आल्या, काही गेल्या तर काहींनी पुन्हा डोकं वर काढलं. सध्या कोरोनाच्या वेगवेगळ्या लाटा जगभर येतायत. भारतातही कोरोनाची तिसरी लाट येतेय. वायरस कायम राहील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. अशातच डब्ल्यूएचओच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोना भारतात एंडेमिक अवस्थेला पोचल्याचं म्हटलंय.
स्वाईन फ्लू, प्लेग, इबोला, स्पॅनिश फ्लू अशा वेगवेगळ्या वायरसच्या साथी जगानं पाहिल्या. काही आल्या, काही गेल्या तर काहींनी पुन्हा डोकं वर काढलं. सध्या कोरोनाच्या वेगवेगळ्या लाटा जगभर येतायत. भारतातही कोरोनाची तिसरी लाट येतेय. वायरस कायम राहील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. अशातच डब्ल्यूएचओच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोना भारतात एंडेमिक अवस्थेला पोचल्याचं म्हटलंय......
‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ असं आपण नेहमी म्हणत असतो. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलसह भारतीय खेळाडूंनी सात मेडलची कमाई केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडलचा दुहेरी आकडा गाठताना ‘हम भी कुछ कम नही’असं दाखवून दिलं.
‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ असं आपण नेहमी म्हणत असतो. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलसह भारतीय खेळाडूंनी सात मेडलची कमाई केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडलचा दुहेरी आकडा गाठताना ‘हम भी कुछ कम नही’असं दाखवून दिलं......
सोनिया गांधींच्या नेतृत्वातल्या काँग्रेस पक्षाचा स्पष्ट उद्देश भाजपला हरवणं हाच आहे. त्यासाठी कोणताही त्याग करायला आणि भाजपविरहित कोणत्याही पर्यायी सरकारचा भाग व्हायला काँग्रेस तयार आहे. काँग्रेसला किमान १५० किंवा त्याहून अधिक जागा मिळतील, तेव्हाच काँग्रेस पंतप्रधानपदासाठी दावा करू शकेल. पण सद्यस्थितीत त्याची शक्यता खूपच कमी दिसते.
सोनिया गांधींच्या नेतृत्वातल्या काँग्रेस पक्षाचा स्पष्ट उद्देश भाजपला हरवणं हाच आहे. त्यासाठी कोणताही त्याग करायला आणि भाजपविरहित कोणत्याही पर्यायी सरकारचा भाग व्हायला काँग्रेस तयार आहे. काँग्रेसला किमान १५० किंवा त्याहून अधिक जागा मिळतील, तेव्हाच काँग्रेस पंतप्रधानपदासाठी दावा करू शकेल. पण सद्यस्थितीत त्याची शक्यता खूपच कमी दिसते......
इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी मॅचमधे भारताचा दारुण पराभव झाला. पहिल्या दोन कसोटीत इंग्रजांच्या छाताडावर नाचणारा भारत बॅकफूटवर आला. विराट कोहलीची अवाजवी आक्रमकता आणि अतार्किक टीम निवडीचा बालहट्ट यामुळेच हे झालं. लीड्सने विराट कोहलीला चांगलीच अद्दल घडवली आहे. आता या चुकांमधून विराट शिकणार की आपला हट्टीपणा सोडणार नाही हे काळच ठरवेल.
इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी मॅचमधे भारताचा दारुण पराभव झाला. पहिल्या दोन कसोटीत इंग्रजांच्या छाताडावर नाचणारा भारत बॅकफूटवर आला. विराट कोहलीची अवाजवी आक्रमकता आणि अतार्किक टीम निवडीचा बालहट्ट यामुळेच हे झालं. लीड्सने विराट कोहलीला चांगलीच अद्दल घडवली आहे. आता या चुकांमधून विराट शिकणार की आपला हट्टीपणा सोडणार नाही हे काळच ठरवेल......
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्णाने जनमानसाला आकर्षित करण्यासाठी अत्यंत सहजतेने कलेच्या ज्ञानाचा वापर केला. कलाविश्व श्रीकृष्णाशिवाय अपूर्ण आहे. केवळ कथक नृत्यच नाही, तर भारतात ज्या अन्य नृत्यशैली आहेत, त्या सर्व शैलींमधे श्रीकृष्णाचं महत्त्व मानलं आहे. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून कृष्ण प्रेम व्यक्त केलं.
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्णाने जनमानसाला आकर्षित करण्यासाठी अत्यंत सहजतेने कलेच्या ज्ञानाचा वापर केला. कलाविश्व श्रीकृष्णाशिवाय अपूर्ण आहे. केवळ कथक नृत्यच नाही, तर भारतात ज्या अन्य नृत्यशैली आहेत, त्या सर्व शैलींमधे श्रीकृष्णाचं महत्त्व मानलं आहे. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून कृष्ण प्रेम व्यक्त केलं......
भारतातल्या विचारवंत-विदुषी डॉ. गेल ऑम्व्हेट यांचं निधन झालंय. अमेरिकेतून त्या भारतात आल्या. डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबतचं त्यांचं सहजीवन म्हणजे निखळ मानवी प्रेमाची परीकथा होतं. ऑम्व्हेट यांनी आपलं आयुष्य कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी समर्पित केलं. त्यांचं लेखन सामाजिक राजकीय चळवळींसाठी दस्तऐवज बनलं. त्यांच्या कामाचा वेध घेणारी संपत देसाई यांची फेसबुक पोस्ट.
भारतातल्या विचारवंत-विदुषी डॉ. गेल ऑम्व्हेट यांचं निधन झालंय. अमेरिकेतून त्या भारतात आल्या. डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबतचं त्यांचं सहजीवन म्हणजे निखळ मानवी प्रेमाची परीकथा होतं. ऑम्व्हेट यांनी आपलं आयुष्य कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी समर्पित केलं. त्यांचं लेखन सामाजिक राजकीय चळवळींसाठी दस्तऐवज बनलं. त्यांच्या कामाचा वेध घेणारी संपत देसाई यांची फेसबुक पोस्ट......
अफगाण नागरिक दहशतीखाली आहेत. लोकशाही चिरडून तालिबान अफगाणिस्तानवर हुकूमत गाजवणार असल्याचीही घोषणा झाली आहे. एवढं होऊनही भारतातला एक वर्ग तालिबान्यांचं खुलं समर्थन करतो, हे संतापजनक आहे. या भारतातल्या तालिबानी मानसिकतेला वेसण कशी घालायची याचा विचार आधी करायला हवा.
अफगाण नागरिक दहशतीखाली आहेत. लोकशाही चिरडून तालिबान अफगाणिस्तानवर हुकूमत गाजवणार असल्याचीही घोषणा झाली आहे. एवढं होऊनही भारतातला एक वर्ग तालिबान्यांचं खुलं समर्थन करतो, हे संतापजनक आहे. या भारतातल्या तालिबानी मानसिकतेला वेसण कशी घालायची याचा विचार आधी करायला हवा......
'भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा' हे प्रसिद्ध कुस्ती समालोचक शंकरराव पुजारी यांचं पुस्तक. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी लढाया आणि चढाया करत होता. त्यातून कुस्तीचा उगम झाला. त्यामुळेच अगदी रामायण काळापासून ते २०२० पर्यंतच्या कलेचा आढावा या पुस्तकातून त्यांनी घेतलाय. त्याला समकालीन असा खूप चांगला संदर्भही आहे.
'भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा' हे प्रसिद्ध कुस्ती समालोचक शंकरराव पुजारी यांचं पुस्तक. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी लढाया आणि चढाया करत होता. त्यातून कुस्तीचा उगम झाला. त्यामुळेच अगदी रामायण काळापासून ते २०२० पर्यंतच्या कलेचा आढावा या पुस्तकातून त्यांनी घेतलाय. त्याला समकालीन असा खूप चांगला संदर्भही आहे......
आज १५ ऑगस्ट. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतायत. देशात जाती-धर्म-संस्कृती-भाषा इतकी सारी विविधता असूनही आपण एकसंध राहिलो. या विविधतेला देशातल्या फॅसिस्ट शक्ती नख लावायचा प्रयत्न करतायत. हा डाव संविधानाच्या मार्गानेच उधळून लावाला लागेल. कसा ते सांगतायत सामाजिक कार्यकर्ते आणि देशातल्या सफाई कर्मचारी आंदोलनाचे नेते राज वाल्मिकी. न्यूज क्लिकवरच्या त्यांच्या लेखाचा हा अनुवाद.
आज १५ ऑगस्ट. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतायत. देशात जाती-धर्म-संस्कृती-भाषा इतकी सारी विविधता असूनही आपण एकसंध राहिलो. या विविधतेला देशातल्या फॅसिस्ट शक्ती नख लावायचा प्रयत्न करतायत. हा डाव संविधानाच्या मार्गानेच उधळून लावाला लागेल. कसा ते सांगतायत सामाजिक कार्यकर्ते आणि देशातल्या सफाई कर्मचारी आंदोलनाचे नेते राज वाल्मिकी. न्यूज क्लिकवरच्या त्यांच्या लेखाचा हा अनुवाद......
एखादा देश परकीयांच्या गुलामीत असतो तेव्हा फक्त त्या देशाचीच नाही तर देशातल्या लोकांना जन्मतः मिळालेली सगळ्या प्रकारची स्वातंत्र्य बंधनात असतात. १५ ऑगस्टला देशाला राजकीय स्वातंत्र्य तर मिळालं. पण देशातल्या लोकांपर्यंत स्वातंत्र्य पोचवलं ते संविधानानेच. त्यामुळे आज अमृतमहोत्सवी वर्षाची सुरवात होत असताना हे स्वातंत्र्य चिरायू ठेवण्यासाठी भारतीय संविधानासारखा दुसरा दीपस्तंभ नाही हे लक्षात ठेवायला हवं.
एखादा देश परकीयांच्या गुलामीत असतो तेव्हा फक्त त्या देशाचीच नाही तर देशातल्या लोकांना जन्मतः मिळालेली सगळ्या प्रकारची स्वातंत्र्य बंधनात असतात. १५ ऑगस्टला देशाला राजकीय स्वातंत्र्य तर मिळालं. पण देशातल्या लोकांपर्यंत स्वातंत्र्य पोचवलं ते संविधानानेच. त्यामुळे आज अमृतमहोत्सवी वर्षाची सुरवात होत असताना हे स्वातंत्र्य चिरायू ठेवण्यासाठी भारतीय संविधानासारखा दुसरा दीपस्तंभ नाही हे लक्षात ठेवायला हवं......
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. पेगासस सारख्या मुद्यांमुळे विरोधी पक्ष मोदी सरकारविरोधात आक्रमक झाले. राज्यसभेत विमा विधेयक आलं आणि गदारोळ झाला. लोकशाहीसाठी ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचं म्हणत भर सभागृहात राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या अश्रूंचा बांध फुटला. या सगळ्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांची ही फेसबूक पोस्ट.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. पेगासस सारख्या मुद्यांमुळे विरोधी पक्ष मोदी सरकारविरोधात आक्रमक झाले. राज्यसभेत विमा विधेयक आलं आणि गदारोळ झाला. लोकशाहीसाठी ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचं म्हणत भर सभागृहात राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या अश्रूंचा बांध फुटला. या सगळ्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांची ही फेसबूक पोस्ट......
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी टीमची ऑलिम्पिकमधली कामगिरी फिनिक्स भरारी ठरली आहे. भारतीय टीम ऑलिम्पिकमधे ब्राँझ मेडलपर्यंत पोचू शकते हा आत्मविश्वास संघटनांप्रमाणेच प्रायोजकांमधेही निर्माण झालाय. त्यामुळेच ही एका सुवर्णयुगाची पायाभरणी ठरतेय.
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी टीमची ऑलिम्पिकमधली कामगिरी फिनिक्स भरारी ठरली आहे. भारतीय टीम ऑलिम्पिकमधे ब्राँझ मेडलपर्यंत पोचू शकते हा आत्मविश्वास संघटनांप्रमाणेच प्रायोजकांमधेही निर्माण झालाय. त्यामुळेच ही एका सुवर्णयुगाची पायाभरणी ठरतेय......
भारतात ईशान्येकडच्या आसाम-मणिपूर या राज्यांमधे सीमावादातून संघर्ष उभा राहिलाय. यात ५ पोलिसांचा मृत्यू झाला. हिंसा, दगडफेक झाली. दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना आव्हान देत वादात अधिकच भर टाकली. अशातच आसामने मिझोरामची आर्थिक नाकेबंदी करत एक इंचही जमीन देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला.
भारतात ईशान्येकडच्या आसाम-मणिपूर या राज्यांमधे सीमावादातून संघर्ष उभा राहिलाय. यात ५ पोलिसांचा मृत्यू झाला. हिंसा, दगडफेक झाली. दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना आव्हान देत वादात अधिकच भर टाकली. अशातच आसामने मिझोरामची आर्थिक नाकेबंदी करत एक इंचही जमीन देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला......
बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर २८ जुलैला बसवराज बोमामी यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर नेमणूक झालीय. येडियुरप्पा यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याने सगळ्यांचेच डोळे चक्रावलेत. पण त्यांना बाजूला सारून भाजपला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी येडियुरप्पा आपलं महत्त्व टिकवून असतील यात शंका नाही.
बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर २८ जुलैला बसवराज बोमामी यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर नेमणूक झालीय. येडियुरप्पा यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याने सगळ्यांचेच डोळे चक्रावलेत. पण त्यांना बाजूला सारून भाजपला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी येडियुरप्पा आपलं महत्त्व टिकवून असतील यात शंका नाही......
मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरमधे झालेल्या हत्यांकांडाला जुलै महिन्यात २४ वर्ष पूर्ण झाली. अमानुष पद्धतीने लोकांची हत्या करणाऱ्या जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. आजही ही परिस्थिती बदलेली नाही. रचनात्मक आणि व्यवस्थात्मक पातळीवर जातीची समस्या सोडवण्यासाठी कधीच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळेच पायल तडवी, रोहित वेमुलासारखे बळी जात राहतात.
मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरमधे झालेल्या हत्यांकांडाला जुलै महिन्यात २४ वर्ष पूर्ण झाली. अमानुष पद्धतीने लोकांची हत्या करणाऱ्या जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. आजही ही परिस्थिती बदलेली नाही. रचनात्मक आणि व्यवस्थात्मक पातळीवर जातीची समस्या सोडवण्यासाठी कधीच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळेच पायल तडवी, रोहित वेमुलासारखे बळी जात राहतात......
१९९१ च्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानं भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणली. त्याचं श्रेय तत्कालीन पंतप्रधान पीवी. नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना जातं. त्याला ३ दशकं झालीयत. पण आर्थिक सुधारणांमधे बँकिंग क्षेत्र मात्र कायम दुर्लक्षित राहिलं. त्यामुळेच या सुधारणा अपूर्ण राहिलेल्या एका अजेंड्याचा भाग बनल्याची खंत अर्थतज्ज्ञ डॉ. इला पटनायक यांनी व्यक्त केलीय.