सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पेन्शनेतर लाभ हा कर्मचार्यांच्या हक्काचा विषय. पण त्यामागे अर्थवास्तवाचा विचार गरजेचा असतो. सध्या जे जुन्या पेन्शनच्या मागणीचं पेव फुटलंय ते राज्यांच्या अर्थकारणाचे तीन-तेरा वाजवणारं आहे. या विषयामधे सर्वच पक्षांकडून अपरिपक्वतादर्शक भूमिका घेतल्या जातायत. जुन्या पेन्शनची मागणी मान्य झाली तर होणारा खर्च एकूण महसुलाच्या ८० टक्क्यांपर्यंत जाईल. त्यातून राज्याच्या विकासात अनर्थ घडेल.
सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पेन्शनेतर लाभ हा कर्मचार्यांच्या हक्काचा विषय. पण त्यामागे अर्थवास्तवाचा विचार गरजेचा असतो. सध्या जे जुन्या पेन्शनच्या मागणीचं पेव फुटलंय ते राज्यांच्या अर्थकारणाचे तीन-तेरा वाजवणारं आहे. या विषयामधे सर्वच पक्षांकडून अपरिपक्वतादर्शक भूमिका घेतल्या जातायत. जुन्या पेन्शनची मागणी मान्य झाली तर होणारा खर्च एकूण महसुलाच्या ८० टक्क्यांपर्यंत जाईल. त्यातून राज्याच्या विकासात अनर्थ घडेल......
शहरांच्या नामांतरांवरून सध्या महाराष्ट्र आणि देशभर वाद होतायत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्राज्यवादी ब्रिटीशांची प्रतिकं, नावं शांततामय मार्गानं बदलली गेली. यावर देशात कोणताही वाद नव्हता. ती स्वतंत्र भारताची नवी प्रतिकं होती. अलीकडच्या नामांतरांमधे मात्र धार्मिक अस्मितेचा रंग बटबटीतपणे दिसतो. यात जसं राजकारण अग्रणी आहे तसंच भाषिक-सांस्कृतिक अस्मिताही दिसतेय.
शहरांच्या नामांतरांवरून सध्या महाराष्ट्र आणि देशभर वाद होतायत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्राज्यवादी ब्रिटीशांची प्रतिकं, नावं शांततामय मार्गानं बदलली गेली. यावर देशात कोणताही वाद नव्हता. ती स्वतंत्र भारताची नवी प्रतिकं होती. अलीकडच्या नामांतरांमधे मात्र धार्मिक अस्मितेचा रंग बटबटीतपणे दिसतो. यात जसं राजकारण अग्रणी आहे तसंच भाषिक-सांस्कृतिक अस्मिताही दिसतेय......
एकीकडे खासगी लग्झरी बससेवा चालवणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपन्या प्रवाशांना लुटतायत. दुसरीकडे कर्नाटक राज्याच्या बस महाराष्ट्रात तुफान धावतायत. पण, महाराष्ट्राची लाडकी लालपरी म्हणून ओळखली जाणारी ‘एसटी’ अजूनही खडखडतेय. राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक योजना आखल्यात, पण त्या प्रत्यक्षात येताना मात्र दिसत नाहीत.
एकीकडे खासगी लग्झरी बससेवा चालवणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपन्या प्रवाशांना लुटतायत. दुसरीकडे कर्नाटक राज्याच्या बस महाराष्ट्रात तुफान धावतायत. पण, महाराष्ट्राची लाडकी लालपरी म्हणून ओळखली जाणारी ‘एसटी’ अजूनही खडखडतेय. राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक योजना आखल्यात, पण त्या प्रत्यक्षात येताना मात्र दिसत नाहीत......
छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनचरित्र आजही दीपस्तंभाप्रमाणे जगाला मार्गदर्शन करत आहे. देशाचं स्वातंत्र्य युद्ध असो की सामाजिक, राजकीय आंदोलनं प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या शिवाजी महाराजांच्या कार्यानेच प्रज्वलीत झाली. कारण स्वातंत्र्य हे शिवाजी महाराजांचं साध्य होतं आणि प्रभावी युद्धतंत्र हे त्यांचं साधन होतं.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनचरित्र आजही दीपस्तंभाप्रमाणे जगाला मार्गदर्शन करत आहे. देशाचं स्वातंत्र्य युद्ध असो की सामाजिक, राजकीय आंदोलनं प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या शिवाजी महाराजांच्या कार्यानेच प्रज्वलीत झाली. कारण स्वातंत्र्य हे शिवाजी महाराजांचं साध्य होतं आणि प्रभावी युद्धतंत्र हे त्यांचं साधन होतं......
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई… हे गदिमांनी लिहून कैक वर्ष उलटली. पण देवळांच्याच जीवावर ज्यांचं राजकारण उभं आहे, त्यांना हे कसं समजवणार? आता खरा भीमाशंकर महाराष्ट्रात नसून, आसाममधे आहे, असा वाद आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंत सरमा यांनी उकरून काढलाय. त्यामुळे आता लोकांच्या रोजीरोटीपेक्षा देवाची पेटी महत्त्वाची ठरलीय.
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई… हे गदिमांनी लिहून कैक वर्ष उलटली. पण देवळांच्याच जीवावर ज्यांचं राजकारण उभं आहे, त्यांना हे कसं समजवणार? आता खरा भीमाशंकर महाराष्ट्रात नसून, आसाममधे आहे, असा वाद आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंत सरमा यांनी उकरून काढलाय. त्यामुळे आता लोकांच्या रोजीरोटीपेक्षा देवाची पेटी महत्त्वाची ठरलीय......
भगतसिंग कोश्यारी यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्यं महाराष्ट्राच्या कायम लक्षात राहतील. याच कोश्यारींच्या जागी रमेश बैस यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. बैसनी यापूर्वी त्रिपुरा आणि झारखंडचं राज्यपालपद सांभाळलंय. पण कोश्यारींसारखीच तिथंही त्यांची वादग्रस्त वक्तव्यं चर्चेत राहिलीत. कोश्यारींचं जुनं वर्जन असलेल्या या राज्यपालांना आता महाराष्ट्राच्या माथी बसवलं गेलंय.
भगतसिंग कोश्यारी यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्यं महाराष्ट्राच्या कायम लक्षात राहतील. याच कोश्यारींच्या जागी रमेश बैस यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. बैसनी यापूर्वी त्रिपुरा आणि झारखंडचं राज्यपालपद सांभाळलंय. पण कोश्यारींसारखीच तिथंही त्यांची वादग्रस्त वक्तव्यं चर्चेत राहिलीत. कोश्यारींचं जुनं वर्जन असलेल्या या राज्यपालांना आता महाराष्ट्राच्या माथी बसवलं गेलंय......
महावितरणनं पुढच्या दोन वर्षांसाठी जवळपास ३७ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलाय. या दरवाढीचे राज्याच्या हितावर आणि विकासावर अत्यंत गंभीर आणि घातक परिणाम होणार आहेत. राज्याच्या हिताच्या दृष्टीने आयोगाने ही संपूर्ण दरवाढ रद्द केली पाहिजे. इतकंच नाही तर गुजरातप्रमाणे आपलेही वीजदर इतर राज्यांच्या तुलनेनं स्पर्धात्मक पातळीवर कमी करणं आवश्यक आहे.
महावितरणनं पुढच्या दोन वर्षांसाठी जवळपास ३७ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलाय. या दरवाढीचे राज्याच्या हितावर आणि विकासावर अत्यंत गंभीर आणि घातक परिणाम होणार आहेत. राज्याच्या हिताच्या दृष्टीने आयोगाने ही संपूर्ण दरवाढ रद्द केली पाहिजे. इतकंच नाही तर गुजरातप्रमाणे आपलेही वीजदर इतर राज्यांच्या तुलनेनं स्पर्धात्मक पातळीवर कमी करणं आवश्यक आहे......
महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात.
महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात......
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे.
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे......
प्रश्न शेतकऱ्यांचा असो, कामगारांचा असो किंवा सीमाभागातल्या गावांचा असो एन. डी. पाटील हे नाव त्यात कायमच आघाडीवर असायचं. अंधश्रद्धा निर्मुलनातही त्यांनी नरेंद्र दाभोलकरांसोबत काम करून विधीमंडळात पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्त्व केलं. आज दाभोलकरही नाहीत आणि 'एन.डी'ही नाहीत. आज 'एन.डीं'ना जाऊन वर्ष झालं. त्यामुळे दाभोलकरांनी 'एन.डीं'वर लिहिलेला हा जुना लेख एक दस्तावेज म्हणून महत्त्वाचा आहे.
प्रश्न शेतकऱ्यांचा असो, कामगारांचा असो किंवा सीमाभागातल्या गावांचा असो एन. डी. पाटील हे नाव त्यात कायमच आघाडीवर असायचं. अंधश्रद्धा निर्मुलनातही त्यांनी नरेंद्र दाभोलकरांसोबत काम करून विधीमंडळात पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्त्व केलं. आज दाभोलकरही नाहीत आणि 'एन.डी'ही नाहीत. आज 'एन.डीं'ना जाऊन वर्ष झालं. त्यामुळे दाभोलकरांनी 'एन.डीं'वर लिहिलेला हा जुना लेख एक दस्तावेज म्हणून महत्त्वाचा आहे......
पुण्याच्या कोथरूडमधे ६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. नांदेड विभागाचं प्रतिनिधित्व करणारा शिवराज राक्षे यावेळच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. या स्पर्धेतली माती विभागाची फायनल मात्र वादग्रस्त ठरली. पराभूत पैलवान सिकंदर शेखला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. हा निर्णय कुणाच्या दबावाने देण्यात आला, याबद्दल कुस्तीशौकिनांकडून प्रश्न उपस्थित केले जातायत.
पुण्याच्या कोथरूडमधे ६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. नांदेड विभागाचं प्रतिनिधित्व करणारा शिवराज राक्षे यावेळच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. या स्पर्धेतली माती विभागाची फायनल मात्र वादग्रस्त ठरली. पराभूत पैलवान सिकंदर शेखला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. हा निर्णय कुणाच्या दबावाने देण्यात आला, याबद्दल कुस्तीशौकिनांकडून प्रश्न उपस्थित केले जातायत......
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजेंना धर्मवीरऐवजी स्वराज्यरक्षक म्हणल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. या वैचारिक वादात राजकारणी, इतिहास संशोधक आणि साहित्यिकांनीही उडी घातलीय. पण छत्रपती संभाजी राजेंना नेमकी कोणती पदवी द्यायची यासाठी त्यांच्या राज्यकारभाराचा आढावा घेणं गरजेचं आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजेंना धर्मवीरऐवजी स्वराज्यरक्षक म्हणल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. या वैचारिक वादात राजकारणी, इतिहास संशोधक आणि साहित्यिकांनीही उडी घातलीय. पण छत्रपती संभाजी राजेंना नेमकी कोणती पदवी द्यायची यासाठी त्यांच्या राज्यकारभाराचा आढावा घेणं गरजेचं आहे......
पैसा कमावणारे अनेकजण असतात. ते कमावलेल्या प्रचंड पैशातून बंगले, सेकंड होम, सोनं, गाड्या, गुंतवणूक याकडे लक्ष देतात. पण अमेरिकेत राहून, उदंड पैसे कमावूनही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना, चळवळींना आर्थिक रसद पुरवत राहणारा कार्यकर्ता म्हणजे सुनील देशमुख. नुकतंच त्यांचं अमेरिकेत निधन झालं आणि 'कार्यकर्त्यांचं मोहोळ' खिन्न झालं.
पैसा कमावणारे अनेकजण असतात. ते कमावलेल्या प्रचंड पैशातून बंगले, सेकंड होम, सोनं, गाड्या, गुंतवणूक याकडे लक्ष देतात. पण अमेरिकेत राहून, उदंड पैसे कमावूनही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना, चळवळींना आर्थिक रसद पुरवत राहणारा कार्यकर्ता म्हणजे सुनील देशमुख. नुकतंच त्यांचं अमेरिकेत निधन झालं आणि 'कार्यकर्त्यांचं मोहोळ' खिन्न झालं......
राजकारण सगळेच करतात. पण काही राजकारणी आपल्या निष्ठेमुळे, स्पष्टवक्तेपणामुळे आणि लोकांशी राखलेल्या आपल्या इमानामुळे कायमचे लक्षात राहतात. अशा मोजक्या राजकारण्यांमधलं एक नाव म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाड्यातले नेते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक केशवराव धोंगडे. ‘मन्याड खोऱ्याची तोफ' असं ज्यांचं वर्णन केलं जायचं त्या केशवरावांचं नुकतंच निधन झालंय.
राजकारण सगळेच करतात. पण काही राजकारणी आपल्या निष्ठेमुळे, स्पष्टवक्तेपणामुळे आणि लोकांशी राखलेल्या आपल्या इमानामुळे कायमचे लक्षात राहतात. अशा मोजक्या राजकारण्यांमधलं एक नाव म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाड्यातले नेते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक केशवराव धोंगडे. ‘मन्याड खोऱ्याची तोफ' असं ज्यांचं वर्णन केलं जायचं त्या केशवरावांचं नुकतंच निधन झालंय......
महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात. गावातल्या शेवटच्या माणसाला, विकासात पहिलं स्थान मिळालं पाहिजं. त्यामुळे निवडणुकीचा हा पर्याय स्थानिक लोकशाही बळकट करण्यासाठी असतो. पण मतदार हा एका दिवसाचा राजा किंवा राणी म्हणून बोली लावतोय आणि उमेदवार गावाचा राजा किंवा राणी व्हायचं म्हणून जिद्दीला पेटलाय असं चित्र या निवडणुकीत स्पष्ट दिसलं!
महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात. गावातल्या शेवटच्या माणसाला, विकासात पहिलं स्थान मिळालं पाहिजं. त्यामुळे निवडणुकीचा हा पर्याय स्थानिक लोकशाही बळकट करण्यासाठी असतो. पण मतदार हा एका दिवसाचा राजा किंवा राणी म्हणून बोली लावतोय आणि उमेदवार गावाचा राजा किंवा राणी व्हायचं म्हणून जिद्दीला पेटलाय असं चित्र या निवडणुकीत स्पष्ट दिसलं!.....
महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल परवा लागलाय. कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसलेले असंख्य सर्वसामान्य चेहरे या निवडणुकीतून थेट सरपंचपदी निवडून आलेत. यात कुणी गुराखी आहे कुणी बँडवाला आहे तर कुणी ऊसतोड कामगार. तसंच पहिल्यांदाच राजकारणात एण्ट्री केलेली आणि थेट सरपंचपदी पोचलेली तरणीबांड पोरंही यात आहेत.
महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल परवा लागलाय. कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसलेले असंख्य सर्वसामान्य चेहरे या निवडणुकीतून थेट सरपंचपदी निवडून आलेत. यात कुणी गुराखी आहे कुणी बँडवाला आहे तर कुणी ऊसतोड कामगार. तसंच पहिल्यांदाच राजकारणात एण्ट्री केलेली आणि थेट सरपंचपदी पोचलेली तरणीबांड पोरंही यात आहेत......
कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ पुरस्कार रद्द करण्यात आला. पण सरकारने राज्य पुरस्कार समिती बरखास्त करून नियोजित पुरस्कार रद्द केल्यामुळे महाराष्ट्राच्या साहित्यिक विश्वात मोठी खळबळ उडालीय. त्यामिनित्ताने राज्य सरकारच्या निषेधार्थ पुरस्कार परत केले जातायंत.
कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ पुरस्कार रद्द करण्यात आला. पण सरकारने राज्य पुरस्कार समिती बरखास्त करून नियोजित पुरस्कार रद्द केल्यामुळे महाराष्ट्राच्या साहित्यिक विश्वात मोठी खळबळ उडालीय. त्यामिनित्ताने राज्य सरकारच्या निषेधार्थ पुरस्कार परत केले जातायंत......
कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रिडम या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकाचा पुरस्कार जाहीर करून, नंतर रद्द करण्यात आला. एवढंच नाही, तर निवड समितीही सरकारने बरखास्त केली. यामुळे एकीकडे सरकारच्या साहित्यविषयक धोरणांवर प्रकाश पडलाच, पण एक चांगलं पुस्तक अधिकाधिक लोकांना माहिती झालं. याबद्दल सरकारचं अभिनंदनच करायला हवं.
कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रिडम या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकाचा पुरस्कार जाहीर करून, नंतर रद्द करण्यात आला. एवढंच नाही, तर निवड समितीही सरकारने बरखास्त केली. यामुळे एकीकडे सरकारच्या साहित्यविषयक धोरणांवर प्रकाश पडलाच, पण एक चांगलं पुस्तक अधिकाधिक लोकांना माहिती झालं. याबद्दल सरकारचं अभिनंदनच करायला हवं......
१९५६पासून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात सतत वाद सुरुच आहे. केंद्रीय नेतृत्त्वानं मनात आणलं असतं तर, या सहा जिल्ह्यांच्या, ८६५ गावांमधे राहणार्या तेव्हाच्या २५ लाख आणि आताच्या सुमारे ४० लाख मराठी भाषिकांचा रोजच्या जगण्यामरण्याचा कधीच सोडवला गेला असता. पण ते झालं नाही. किमान आता तरी महाराष्ट्रानं केंद्रावर दबाव आणण्याची गरज आहे.
१९५६पासून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात सतत वाद सुरुच आहे. केंद्रीय नेतृत्त्वानं मनात आणलं असतं तर, या सहा जिल्ह्यांच्या, ८६५ गावांमधे राहणार्या तेव्हाच्या २५ लाख आणि आताच्या सुमारे ४० लाख मराठी भाषिकांचा रोजच्या जगण्यामरण्याचा कधीच सोडवला गेला असता. पण ते झालं नाही. किमान आता तरी महाराष्ट्रानं केंद्रावर दबाव आणण्याची गरज आहे......
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत काँग्रेस पक्षासोबतच सर्वसामान्यांनाही जोडून घेतलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने राहुल यांची उभी केलेली पप्पू ही प्रतिमा या यात्रेमुळे फोल ठरतेय. राहुल गांधींमधे झालेल्या प्रगल्भ बदलाचे साक्षीदार असलेले पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी या यात्रेच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने राहुल यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत काँग्रेस पक्षासोबतच सर्वसामान्यांनाही जोडून घेतलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने राहुल यांची उभी केलेली पप्पू ही प्रतिमा या यात्रेमुळे फोल ठरतेय. राहुल गांधींमधे झालेल्या प्रगल्भ बदलाचे साक्षीदार असलेले पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी या यात्रेच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने राहुल यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय......
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून पुढे सरकलीय. यात्रेबद्दलची लोकांमधली उत्सुकता कमी झालेली नाही. ही यात्रा केवळ काँग्रेस पक्षाची नाही तर सर्वसामान्यांची, सामाजिक संघटनांची, शेतकरी, कष्टकऱ्यांची राहील यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन आणि धोरण आखलं गेलं. त्यामुळे यात्रा सर्वसमावेशक झाली. या यात्रेत महाराष्ट्रातल्या टप्प्यात सहभागी झालेले पत्रकार प्रमोद चुंचूवार यांची या यात्रेबद्दलची निरिक्षणं.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून पुढे सरकलीय. यात्रेबद्दलची लोकांमधली उत्सुकता कमी झालेली नाही. ही यात्रा केवळ काँग्रेस पक्षाची नाही तर सर्वसामान्यांची, सामाजिक संघटनांची, शेतकरी, कष्टकऱ्यांची राहील यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन आणि धोरण आखलं गेलं. त्यामुळे यात्रा सर्वसमावेशक झाली. या यात्रेत महाराष्ट्रातल्या टप्प्यात सहभागी झालेले पत्रकार प्रमोद चुंचूवार यांची या यात्रेबद्दलची निरिक्षणं......
कर्नाटकात २०२३ मधे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातलं भाजपसोबत सुरू असलेलं शिंदे सरकारही भक्कम आहे, अशी परिस्थिती नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटवला जातोय. तीन-चार पिढ्या उलटल्या तरी या प्रश्नावर दूरपर्यंत उत्तर दिसत नाही. तरीही राजकीय गणितासाठी हा विषय कायमच जिवंत ठेवला जातोय का, अशी शंका येत राहते.
कर्नाटकात २०२३ मधे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातलं भाजपसोबत सुरू असलेलं शिंदे सरकारही भक्कम आहे, अशी परिस्थिती नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटवला जातोय. तीन-चार पिढ्या उलटल्या तरी या प्रश्नावर दूरपर्यंत उत्तर दिसत नाही. तरीही राजकीय गणितासाठी हा विषय कायमच जिवंत ठेवला जातोय का, अशी शंका येत राहते......
दोन आठवड्यांपूर्वी ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात पोचली. ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यापासून सुरु झालेला यात्रेचा हा दोन आठवड्यांचा झंझावाती प्रवास २० नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात संपला. यावेळी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या आवेशपूर्ण भाषणांनी महाराष्ट्रातलं आणि देशातलंही राजकीय तापमान चांगलंच वाढवलं.
दोन आठवड्यांपूर्वी ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात पोचली. ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यापासून सुरु झालेला यात्रेचा हा दोन आठवड्यांचा झंझावाती प्रवास २० नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात संपला. यावेळी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या आवेशपूर्ण भाषणांनी महाराष्ट्रातलं आणि देशातलंही राजकीय तापमान चांगलंच वाढवलं......
राहुल गांधींची बहुचर्चित भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आलीय. याआधी राहुल गांधींची लोकांमधे 'पप्पू' अशी प्रतिमा तयार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. त्याला छेद देणारी ही यात्रा ठरतेय. लोकांमधे या यात्रेविषयी प्रचंड आवड, उत्सुकता, सद्भावना असल्याचं आपल्याला सोशल मीडियातून दिसतंय. पण प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती काय आहे याचा आढावा घेणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची ही फेसबुक पोस्ट.
राहुल गांधींची बहुचर्चित भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आलीय. याआधी राहुल गांधींची लोकांमधे 'पप्पू' अशी प्रतिमा तयार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. त्याला छेद देणारी ही यात्रा ठरतेय. लोकांमधे या यात्रेविषयी प्रचंड आवड, उत्सुकता, सद्भावना असल्याचं आपल्याला सोशल मीडियातून दिसतंय. पण प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती काय आहे याचा आढावा घेणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची ही फेसबुक पोस्ट......
एकानं सुरू केलं की ते बघून दुसरा करतो, हा माणसाचा स्वभाव आहे. गावागावातही तसंच होतं. दोन महिन्यांपूर्वी सांगलीतल्या एका ग्रामपंचायतीनं संध्याकाळी गावातले सर्व टीवी-मोबाईल बंद करण्याचा निर्णय घेतला. आता यवतमाळमधेही त्याचं अनुकरण झालंय. सगळ्या गावानं टीवी-मोबाईल बंद करणं, याकडं 'डिग्लोबलायझेशन'च्या दृष्टिनं पाहता येईल. पण ते नेमकं कसं?
एकानं सुरू केलं की ते बघून दुसरा करतो, हा माणसाचा स्वभाव आहे. गावागावातही तसंच होतं. दोन महिन्यांपूर्वी सांगलीतल्या एका ग्रामपंचायतीनं संध्याकाळी गावातले सर्व टीवी-मोबाईल बंद करण्याचा निर्णय घेतला. आता यवतमाळमधेही त्याचं अनुकरण झालंय. सगळ्या गावानं टीवी-मोबाईल बंद करणं, याकडं 'डिग्लोबलायझेशन'च्या दृष्टिनं पाहता येईल. पण ते नेमकं कसं?.....
आज कार्तिक वद्य कालाष्टमी. हा दिवस भारतभर काळभैरव जयंती म्हणून साजरा केला जातो. काळभैरवाच्या प्रमुख स्थानांपैकी एक असलेल्या उज्जैनमधे त्याला ‘बेवडा भैरव’ म्हणतात. इंटरनेटवरही त्याचं हेच रूप प्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्रात त्याचं माणूसपण साजरं केलं जातं. तो इथं क्षेत्रपाल म्हणून पूजला जातो. आज त्याचं हे वेगळं स्वरूप समजून घ्यायलाच हवं.
आज कार्तिक वद्य कालाष्टमी. हा दिवस भारतभर काळभैरव जयंती म्हणून साजरा केला जातो. काळभैरवाच्या प्रमुख स्थानांपैकी एक असलेल्या उज्जैनमधे त्याला ‘बेवडा भैरव’ म्हणतात. इंटरनेटवरही त्याचं हेच रूप प्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्रात त्याचं माणूसपण साजरं केलं जातं. तो इथं क्षेत्रपाल म्हणून पूजला जातो. आज त्याचं हे वेगळं स्वरूप समजून घ्यायलाच हवं......
मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र यांचा इतिहास नेमक्या स्फूर्तिदायी शब्दांत वर्णन करणाऱ्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गौरव गीताला ‘राज्यगीता’चा दर्जा देण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलाय. त्यावर लवकरच राज्य मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब होईल.
मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र यांचा इतिहास नेमक्या स्फूर्तिदायी शब्दांत वर्णन करणाऱ्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गौरव गीताला ‘राज्यगीता’चा दर्जा देण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलाय. त्यावर लवकरच राज्य मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब होईल......
अमरावतीतून ‘खोके’ शब्द सरकारी गोटातून उच्चारला जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही सरकारांनी एकाच तडफेने खुलासा करणं अपेक्षित होतं. तसंच अपक्ष आमदार रवी राणांना गप्प करायला हवं होतं. बच्चू कडूंची साथ द्यायला हवी होती. पण, तसं झालं नाही. त्यामुळे या दोन्ही सरकारांच्या मौनातून काही राजकीय संकेत मिळतायत.
अमरावतीतून ‘खोके’ शब्द सरकारी गोटातून उच्चारला जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही सरकारांनी एकाच तडफेने खुलासा करणं अपेक्षित होतं. तसंच अपक्ष आमदार रवी राणांना गप्प करायला हवं होतं. बच्चू कडूंची साथ द्यायला हवी होती. पण, तसं झालं नाही. त्यामुळे या दोन्ही सरकारांच्या मौनातून काही राजकीय संकेत मिळतायत......
दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणीसह सीमावर्ती भागाला संयुक्त महाराष्ट्रातून वगळगल्याबद्दल निषेध व्यक्त करणारा हा दिवस आहे. महाराष्ट्राला आता सीमाभागाबद्दल फारसं काही वाटत नाही, अशी भावना सीमावासीयांची बनत चाललीय. त्यामुळे आता महाराष्ट्रावर विश्वास का ठेवावा, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतोय.
दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणीसह सीमावर्ती भागाला संयुक्त महाराष्ट्रातून वगळगल्याबद्दल निषेध व्यक्त करणारा हा दिवस आहे. महाराष्ट्राला आता सीमाभागाबद्दल फारसं काही वाटत नाही, अशी भावना सीमावासीयांची बनत चाललीय. त्यामुळे आता महाराष्ट्रावर विश्वास का ठेवावा, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतोय......
वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि आता टाटा एअरबस असे महाराष्ट्रात येऊ घातलेले तीन प्रोजेक्ट गुजरातला गेलेत. हा प्रोजेक्ट पळवापळवीचा खेळ काही सहजपणे झालेला नाही. गुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खेळी खेळली गेलीय. त्यात महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारला हाताशी धरुन महाराष्ट्राचं महत्व कमी करायचा घाट घातला गेलाय.
वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि आता टाटा एअरबस असे महाराष्ट्रात येऊ घातलेले तीन प्रोजेक्ट गुजरातला गेलेत. हा प्रोजेक्ट पळवापळवीचा खेळ काही सहजपणे झालेला नाही. गुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खेळी खेळली गेलीय. त्यात महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारला हाताशी धरुन महाराष्ट्राचं महत्व कमी करायचा घाट घातला गेलाय......
कर्नाटकातल्या कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवावी, असं मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केलंय. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी फारच धोकादायक ठरू शकते. जर असं घडलं तर, कदाचित भविष्यात सांगली आणि कोल्हापूर शहरांसह, कृष्णा-पंचगंगेच्या काठावरची शेकडो गावं आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊ शकते.
कर्नाटकातल्या कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवावी, असं मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केलंय. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी फारच धोकादायक ठरू शकते. जर असं घडलं तर, कदाचित भविष्यात सांगली आणि कोल्हापूर शहरांसह, कृष्णा-पंचगंगेच्या काठावरची शेकडो गावं आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊ शकते......
स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे.
स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे......
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा ९ ऑक्टोबरला कोल्हापुरात नागरी सत्कार झाला. या सत्कार कार्यक्रमात लवटे यांच्या गौरवग्रंथाचं प्रकाशनही झालं. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमधे संस्थात्मक काम उभं केलंय. त्यात ते यशस्वीही झाले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या सत्कारानिमित्त केलेलं छोटेखानी भाषण.
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा ९ ऑक्टोबरला कोल्हापुरात नागरी सत्कार झाला. या सत्कार कार्यक्रमात लवटे यांच्या गौरवग्रंथाचं प्रकाशनही झालं. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमधे संस्थात्मक काम उभं केलंय. त्यात ते यशस्वीही झाले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या सत्कारानिमित्त केलेलं छोटेखानी भाषण......
आज महात्मा गांधी यांची जयंती. भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वोत्तम राज्यघटना समजली जाते. पण याची मूळं ही महात्मा गांधीजींच्या कृतिशील विचारांची देण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यातल्या औंध संस्थानात अशीच एक राज्यघटना लागू करण्यात आली होती. गांधींजींच्या कल्पनेतून साकारलेल्या या घटनेला ‘स्वराज्य राज्यघटना’ असं नावही देण्यात आलं होतं.
आज महात्मा गांधी यांची जयंती. भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वोत्तम राज्यघटना समजली जाते. पण याची मूळं ही महात्मा गांधीजींच्या कृतिशील विचारांची देण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यातल्या औंध संस्थानात अशीच एक राज्यघटना लागू करण्यात आली होती. गांधींजींच्या कल्पनेतून साकारलेल्या या घटनेला ‘स्वराज्य राज्यघटना’ असं नावही देण्यात आलं होतं......
गणपतीपाठोपाठ गौराई येते. गौराईची प्रथा महाराष्ट्रात आहे, तेवढी इतर प्रांतांमधे नाही. गौरी ही यक्षकुळातली आहे. ती कुबेर कुळातली आहे. ‘धनदा’ म्हणूनही तिची उपासना केली जाते. गौराईच्या रूपानं ‘सर्जक-पोषक-रक्षक’ अशी तिन्ही रूपं आपण ‘स्त्री’देवतेमधे पाहतो.
गणपतीपाठोपाठ गौराई येते. गौराईची प्रथा महाराष्ट्रात आहे, तेवढी इतर प्रांतांमधे नाही. गौरी ही यक्षकुळातली आहे. ती कुबेर कुळातली आहे. ‘धनदा’ म्हणूनही तिची उपासना केली जाते. गौराईच्या रूपानं ‘सर्जक-पोषक-रक्षक’ अशी तिन्ही रूपं आपण ‘स्त्री’देवतेमधे पाहतो......
पाच वर्षांपूर्वी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शरद यादव आणि अली अन्वर या दोघांची खासदारकी रद्द ठरवली. ज्या संयुक्त जनता दलाच्या तिकिटावर ते राज्यसभेवर गेले त्याच पक्षाविरुद्ध त्यांनी कारवाया केल्या. विधानं केली. भाजपशी युती करायला विरोध केला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत सेनेच्या ४० बंडखोर आमदारांनीही हाच गुन्हा केला आहे. त्यामुळे फैसला घटनापीठाच्या हाती आहे.
पाच वर्षांपूर्वी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शरद यादव आणि अली अन्वर या दोघांची खासदारकी रद्द ठरवली. ज्या संयुक्त जनता दलाच्या तिकिटावर ते राज्यसभेवर गेले त्याच पक्षाविरुद्ध त्यांनी कारवाया केल्या. विधानं केली. भाजपशी युती करायला विरोध केला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत सेनेच्या ४० बंडखोर आमदारांनीही हाच गुन्हा केला आहे. त्यामुळे फैसला घटनापीठाच्या हाती आहे......
महाराष्ट्रात केवळ द्विध्रुवीय राजकीय स्पर्धा ठेवायची असेल तर ठाकरे बंधूंना निष्प्रभ करणं हा एककलमी कार्यक्रम भाजपसाठी असला पाहिजे असा विचार मोदी-शहा या जोडगोळीने केला असावा. नाहीतर त्यांना धूर्त, मुरब्बी किंवा कपटी कसं म्हणता येईल? त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना खाली खेचण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद घ्यायला लावलं, या तर्काला फार थोडा अर्थ आहे. भाजपच्या व्यापक रणनीतीचा हा भाग आहे!
महाराष्ट्रात केवळ द्विध्रुवीय राजकीय स्पर्धा ठेवायची असेल तर ठाकरे बंधूंना निष्प्रभ करणं हा एककलमी कार्यक्रम भाजपसाठी असला पाहिजे असा विचार मोदी-शहा या जोडगोळीने केला असावा. नाहीतर त्यांना धूर्त, मुरब्बी किंवा कपटी कसं म्हणता येईल? त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना खाली खेचण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद घ्यायला लावलं, या तर्काला फार थोडा अर्थ आहे. भाजपच्या व्यापक रणनीतीचा हा भाग आहे!.....
देवेंद्र फडणवीस हेच आजच्या महाराष्ट्रातलं खरे किंगमेकर आहेत हे महिनाभरातल्या घडामोडींवरून सिद्ध झालंय. देवेंद्र फडणवीस ही एक व्यक्ती आहे, त्याबरोबरच ते एक राजकीय प्रारूपही आहे. हे राजकीय प्रारूप समजून घेतलं, तर सत्तांतर का झालं? ते समजून येतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सत्ता का दिली? यांची कारणंही समजून घेता येतात.
देवेंद्र फडणवीस हेच आजच्या महाराष्ट्रातलं खरे किंगमेकर आहेत हे महिनाभरातल्या घडामोडींवरून सिद्ध झालंय. देवेंद्र फडणवीस ही एक व्यक्ती आहे, त्याबरोबरच ते एक राजकीय प्रारूपही आहे. हे राजकीय प्रारूप समजून घेतलं, तर सत्तांतर का झालं? ते समजून येतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सत्ता का दिली? यांची कारणंही समजून घेता येतात. .....
चित्रकार नाथ वैराळ यांनी रेखाटलेली मूळ चित्रं, त्यांच्या पहिल्या पत्नीचं पोट्रेट वगळता आता उपलब्ध नाहीत. त्यांच्या चित्रांची मुखपृष्ठ असलेली काही पुस्तकं बघायला मिळाली. त्यात एक अप्रकाशित चित्रकथाही होती, शिर्डीच्या साईबाबांची. नगरचं कला आणि साहित्य वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करणार्या मंडळींना चित्रकार नाथ वैराळ यांची ओळख करुन देणारी ही भूषण देशमुख यांची फेसबुक पोस्ट.
चित्रकार नाथ वैराळ यांनी रेखाटलेली मूळ चित्रं, त्यांच्या पहिल्या पत्नीचं पोट्रेट वगळता आता उपलब्ध नाहीत. त्यांच्या चित्रांची मुखपृष्ठ असलेली काही पुस्तकं बघायला मिळाली. त्यात एक अप्रकाशित चित्रकथाही होती, शिर्डीच्या साईबाबांची. नगरचं कला आणि साहित्य वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करणार्या मंडळींना चित्रकार नाथ वैराळ यांची ओळख करुन देणारी ही भूषण देशमुख यांची फेसबुक पोस्ट......
महाराष्ट्र फाऊंडेशन देत असलेल्या साहित्य आणि समाजकार्य क्षेत्राशी संबंधित पुरस्कारांमागची भूमिका, विजेत्या व्यक्तींवर लिहलेले आटोपशीर लेख, त्यांचं मनोगत, फोटो आणि इतर कामं, यापूर्वीच्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी असं सगळं सामावलेली ‘स्मरणिका २०२२-महाराष्ट्र फाउंडेशन’ नुकतीच प्रसिद्ध झाली. यातला पत्रकार, लेखक, संपादक राम जगताप यांच्यावर लिहलेला हा लेख.
महाराष्ट्र फाऊंडेशन देत असलेल्या साहित्य आणि समाजकार्य क्षेत्राशी संबंधित पुरस्कारांमागची भूमिका, विजेत्या व्यक्तींवर लिहलेले आटोपशीर लेख, त्यांचं मनोगत, फोटो आणि इतर कामं, यापूर्वीच्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी असं सगळं सामावलेली ‘स्मरणिका २०२२-महाराष्ट्र फाउंडेशन’ नुकतीच प्रसिद्ध झाली. यातला पत्रकार, लेखक, संपादक राम जगताप यांच्यावर लिहलेला हा लेख......
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट......
महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट करायला निघालेल्या पक्षाला स्वत:ची वेबसाईटसुद्धा नीट उभारता आलेली नाही. त्यामुळे मनसेची दखल घेत राहावं असं काही नाही, पण या पक्षाला उपद्रवमूल्य आहे. ‘उपयुक्ततामूल्य नसेना, उपद्रवमूल्य हीच आमची ताकद’ असं त्यांना अभिमानानं मिरवायचं असेल, आणि त्यावर मिळणाऱ्या टाळ्यांवर खूष व्हायचं असेल तर ते त्यांचं समाधान मात्र कुणालाही हिरावून घेता येणार नाही.
महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट करायला निघालेल्या पक्षाला स्वत:ची वेबसाईटसुद्धा नीट उभारता आलेली नाही. त्यामुळे मनसेची दखल घेत राहावं असं काही नाही, पण या पक्षाला उपद्रवमूल्य आहे. ‘उपयुक्ततामूल्य नसेना, उपद्रवमूल्य हीच आमची ताकद’ असं त्यांना अभिमानानं मिरवायचं असेल, आणि त्यावर मिळणाऱ्या टाळ्यांवर खूष व्हायचं असेल तर ते त्यांचं समाधान मात्र कुणालाही हिरावून घेता येणार नाही......
आज एक मे. महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठीच्या आंदोलनात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या लेखणी आणि वाणीनं मराठी जनतेमधे चैतन्याचं स्फुल्लिंग निर्माण केलं होतं. आजच्या महाराष्ट्राचं चित्र पाहून त्यांनी कदाचित अशाच प्रकारचं भाषण केलं असतं.
आज एक मे. महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठीच्या आंदोलनात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या लेखणी आणि वाणीनं मराठी जनतेमधे चैतन्याचं स्फुल्लिंग निर्माण केलं होतं. आजच्या महाराष्ट्राचं चित्र पाहून त्यांनी कदाचित अशाच प्रकारचं भाषण केलं असतं......
ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आजपर्यंत ज्या पद्धतीने हा विषय हाताळलाय त्यावरून घटनेबद्दलचं अज्ञान अधोरेखित झाल्याची टीका अनेक कायदेतज्ज्ञांनी केलीय. त्यासाठी घटनातज्ज्ञांच्या योग्य सल्ल्यानेच राज्य सरकारने मार्गक्रमण करायला हवं. आजपर्यंत सुप्रीम कोर्टात जी नामुष्की ओढावलीय त्याची पुनरावृत्ती झाली तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातही ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेणं शक्य होणार नाही.
ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आजपर्यंत ज्या पद्धतीने हा विषय हाताळलाय त्यावरून घटनेबद्दलचं अज्ञान अधोरेखित झाल्याची टीका अनेक कायदेतज्ज्ञांनी केलीय. त्यासाठी घटनातज्ज्ञांच्या योग्य सल्ल्यानेच राज्य सरकारने मार्गक्रमण करायला हवं. आजपर्यंत सुप्रीम कोर्टात जी नामुष्की ओढावलीय त्याची पुनरावृत्ती झाली तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातही ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेणं शक्य होणार नाही......
राजकारण हे हवामानासारखं असतं. ते सतत बदलत असतं. या हवा बदलात विरोधक सत्ताप्राप्तीची संधी शोधतात; तर सत्ताधारी पक्ष सत्तापुनर्प्राप्तीची संधी शोधत असतो. के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही शासकीय होती. पण त्यात बरेचसे राजकीय अर्थही दडलेत.
राजकारण हे हवामानासारखं असतं. ते सतत बदलत असतं. या हवा बदलात विरोधक सत्ताप्राप्तीची संधी शोधतात; तर सत्ताधारी पक्ष सत्तापुनर्प्राप्तीची संधी शोधत असतो. के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही शासकीय होती. पण त्यात बरेचसे राजकीय अर्थही दडलेत......
आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा जातो. अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. आपल्या मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे.
आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा जातो. अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. आपल्या मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे......
सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं बनलेल्या प्रसारभारतीचा नवा निर्णय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. आता या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या स्थानिक रेडिओ कार्यक्रमांवर बंधनं येणार आहेत. ‘एक राज्य एक आकाशवाणी केंद्र’ या योजनेची नांदी म्हणून या निर्णयाकडे आता पाहिलं जातंय.
सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं बनलेल्या प्रसारभारतीचा नवा निर्णय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. आता या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या स्थानिक रेडिओ कार्यक्रमांवर बंधनं येणार आहेत. ‘एक राज्य एक आकाशवाणी केंद्र’ या योजनेची नांदी म्हणून या निर्णयाकडे आता पाहिलं जातंय......
महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमधे वाईन विक्रीला परवानगी दिली आणि वाद निर्माण झाला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी या निर्णयाला विरोध केलाय. तसंच या निर्णयाविरोधात १४ फेब्रुवारीला उपोषण करण्याचा इशाराही दिलाय. त्यावरून अण्णांचे एकेकाळीचे कार्यकर्ते आणि भ्रष्ट-आचार जनजागरण कृती समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी त्यांना पत्र लिहिलंय.
महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमधे वाईन विक्रीला परवानगी दिली आणि वाद निर्माण झाला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी या निर्णयाला विरोध केलाय. तसंच या निर्णयाविरोधात १४ फेब्रुवारीला उपोषण करण्याचा इशाराही दिलाय. त्यावरून अण्णांचे एकेकाळीचे कार्यकर्ते आणि भ्रष्ट-आचार जनजागरण कृती समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी त्यांना पत्र लिहिलंय......
नुकतीच राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. सायकलिंग स्पर्धा म्हटलं की, रेल्वे आणि सेनादल या टीमच्या खेळाडूंचं वर्चस्व असं समीकरण असायचं. पण गेल्या सहा-सात वर्षांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमधे आणि शर्यतीत अव्वल दर्जाचं यश मिळवत अपेक्षा उंचावणारी कामगिरी केलीय.
नुकतीच राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. सायकलिंग स्पर्धा म्हटलं की, रेल्वे आणि सेनादल या टीमच्या खेळाडूंचं वर्चस्व असं समीकरण असायचं. पण गेल्या सहा-सात वर्षांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमधे आणि शर्यतीत अव्वल दर्जाचं यश मिळवत अपेक्षा उंचावणारी कामगिरी केलीय......
नाशिक शहरात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गजबज सुरू झालीय. समृद्ध परंपरा हा कोणत्याही समाजाचा अभिमानाचा विषय असतो; पण त्यासाठी ती परंपरा लवचीक असावी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी तिला क्वचित नवं रूपही घ्यावं लागतं. हा विचार मराठी सारस्वतांनी आता केला नाही, तर ‘उत्सव बहु थोर होत’ एवढ्यापुरतीच ही परंपरा उरेल, हे नक्की.
नाशिक शहरात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गजबज सुरू झालीय. समृद्ध परंपरा हा कोणत्याही समाजाचा अभिमानाचा विषय असतो; पण त्यासाठी ती परंपरा लवचीक असावी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी तिला क्वचित नवं रूपही घ्यावं लागतं. हा विचार मराठी सारस्वतांनी आता केला नाही, तर ‘उत्सव बहु थोर होत’ एवढ्यापुरतीच ही परंपरा उरेल, हे नक्की......
देशात सध्या भीषण कोळसा टंचाई आहे. देशात निर्माण होणाऱ्या वीजेच्या जवळपास ७० टक्के वीज ही कोळसा प्रकल्पांमधून निर्माण होते. त्यामुळे कोळसाच नाही म्हटल्यावर वीज निर्माण कशी करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनोत्तर काळात अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येत असताना अचानक झालेल्या या वीज टंचाईमुळे पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लावलाय.
देशात सध्या भीषण कोळसा टंचाई आहे. देशात निर्माण होणाऱ्या वीजेच्या जवळपास ७० टक्के वीज ही कोळसा प्रकल्पांमधून निर्माण होते. त्यामुळे कोळसाच नाही म्हटल्यावर वीज निर्माण कशी करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनोत्तर काळात अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येत असताना अचानक झालेल्या या वीज टंचाईमुळे पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लावलाय......
आज २६ सप्टेंबर. जागतिक नदी दिन. नद्या ही निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे. आपलं सगळं भवितव्य नद्यांवर अवलंबून आहे. पण आपण या नद्यांची काळजी किती घेतो? आज देशातल्या सगळ्याच नद्यांचं प्रदूषण झालंय. या दूषित पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न बिकट बनलेत.
आज २६ सप्टेंबर. जागतिक नदी दिन. नद्या ही निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे. आपलं सगळं भवितव्य नद्यांवर अवलंबून आहे. पण आपण या नद्यांची काळजी किती घेतो? आज देशातल्या सगळ्याच नद्यांचं प्रदूषण झालंय. या दूषित पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न बिकट बनलेत......
राज्यात बलात्काराच्या घटना वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा कठोर कायदे करण्याची मागणी होताना दिसत आहे. ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार ‘शक्ती कायदा’ आणणार आहे. बलात्कारांच्या अनेक खटल्यांमधे पीडितेचं शोषण होतं. गुन्हेगार मोकाट सुटतात. एखादा कायदा केला म्हणून बदल होणार नाहीत; तर त्याच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करायला हवं.
राज्यात बलात्काराच्या घटना वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा कठोर कायदे करण्याची मागणी होताना दिसत आहे. ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार ‘शक्ती कायदा’ आणणार आहे. बलात्कारांच्या अनेक खटल्यांमधे पीडितेचं शोषण होतं. गुन्हेगार मोकाट सुटतात. एखादा कायदा केला म्हणून बदल होणार नाहीत; तर त्याच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करायला हवं......
मुंबईतल्या साकीनाका इथं एका महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली. दोन दिवसानं या महिलेचा मृत्यू झाला. हा रानटीपणा, ही पाशवी वृत्ती पाहता २१ व्या शतकात असलो तरीही आपण मनाने मध्ययुगात अडकल्याची साक्ष देते. दोषींना शिक्षा देण्यात इथली व्यवस्था अपयशी ठरतेय. त्यामुळेच बलात्कार केला तरी आपली सुटका होईल असा विश्वास गुन्हेगारांमधे निर्माण होतोय.
मुंबईतल्या साकीनाका इथं एका महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली. दोन दिवसानं या महिलेचा मृत्यू झाला. हा रानटीपणा, ही पाशवी वृत्ती पाहता २१ व्या शतकात असलो तरीही आपण मनाने मध्ययुगात अडकल्याची साक्ष देते. दोषींना शिक्षा देण्यात इथली व्यवस्था अपयशी ठरतेय. त्यामुळेच बलात्कार केला तरी आपली सुटका होईल असा विश्वास गुन्हेगारांमधे निर्माण होतोय......
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे......
गेल्या वर्षीच्या केरळमधल्या ओणम सणानंतर तिथं कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ झाली होती. याहीवर्षी केरळनं तोच अनुभव घेतलाय. महाराष्ट्रातही उत्सवांचा हंगाम सुरू होतोय. ओणमनंतर केरळला ठेच लागलीय. त्यातून महाराष्ट्रानं शहाणं होणं अपेक्षित आहे. येणार्या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलायला हवी. उत्सव साजरे करताना विवेकाचं भान ठेवायला हवं.
गेल्या वर्षीच्या केरळमधल्या ओणम सणानंतर तिथं कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ झाली होती. याहीवर्षी केरळनं तोच अनुभव घेतलाय. महाराष्ट्रातही उत्सवांचा हंगाम सुरू होतोय. ओणमनंतर केरळला ठेच लागलीय. त्यातून महाराष्ट्रानं शहाणं होणं अपेक्षित आहे. येणार्या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलायला हवी. उत्सव साजरे करताना विवेकाचं भान ठेवायला हवं......
प्रवाशांना हिरवा निसर्ग दाखवत हळूहळू धावणार्या टॉय ट्रेन सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो. आपल्या देशात पाच ठिकाणी अशा ऐतिहासिक टॉय ट्रेन्स आहेत. महाराष्ट्रातल्या माथेरानमधली टॉय ट्रेन ही त्यापैकी एक. ‘युनेस्को’च्या जागतिक वारशांच्या संभाव्य यादीत माथेरानच्या टॉय ट्रेनची एण्ट्री झालीय. यादीतलं पक्कं स्थान मिळवण्यासाठी ती सज्ज होतेय.
प्रवाशांना हिरवा निसर्ग दाखवत हळूहळू धावणार्या टॉय ट्रेन सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो. आपल्या देशात पाच ठिकाणी अशा ऐतिहासिक टॉय ट्रेन्स आहेत. महाराष्ट्रातल्या माथेरानमधली टॉय ट्रेन ही त्यापैकी एक. ‘युनेस्को’च्या जागतिक वारशांच्या संभाव्य यादीत माथेरानच्या टॉय ट्रेनची एण्ट्री झालीय. यादीतलं पक्कं स्थान मिळवण्यासाठी ती सज्ज होतेय......
महाराष्ट्रामधे राजकीय कार्यसंस्कृती आहे. ती धोक्यात आणण्याचे प्रयत्न झुंडगिरीने झाले, तरी राज्यातल्या माणसाने या प्रवृत्तींना कधीच थारा दिलेला नाही. अनेक संकटं झेलत हे राज्य प्रगतिपथावर राहिलं. ते पश्चिम बंगालच्या वाटेवर नेलं जाण्याचा धोका मात्र कायम आहे. या सगळ्या राजकीय वितंडवादात राज्यासमोरच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होणं राज्याच्या हिताचं नाही.
महाराष्ट्रामधे राजकीय कार्यसंस्कृती आहे. ती धोक्यात आणण्याचे प्रयत्न झुंडगिरीने झाले, तरी राज्यातल्या माणसाने या प्रवृत्तींना कधीच थारा दिलेला नाही. अनेक संकटं झेलत हे राज्य प्रगतिपथावर राहिलं. ते पश्चिम बंगालच्या वाटेवर नेलं जाण्याचा धोका मात्र कायम आहे. या सगळ्या राजकीय वितंडवादात राज्यासमोरच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होणं राज्याच्या हिताचं नाही......
'भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा' हे प्रसिद्ध कुस्ती समालोचक शंकरराव पुजारी यांचं पुस्तक. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी लढाया आणि चढाया करत होता. त्यातून कुस्तीचा उगम झाला. त्यामुळेच अगदी रामायण काळापासून ते २०२० पर्यंतच्या कलेचा आढावा या पुस्तकातून त्यांनी घेतलाय. त्याला समकालीन असा खूप चांगला संदर्भही आहे.
'भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा' हे प्रसिद्ध कुस्ती समालोचक शंकरराव पुजारी यांचं पुस्तक. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी लढाया आणि चढाया करत होता. त्यातून कुस्तीचा उगम झाला. त्यामुळेच अगदी रामायण काळापासून ते २०२० पर्यंतच्या कलेचा आढावा या पुस्तकातून त्यांनी घेतलाय. त्याला समकालीन असा खूप चांगला संदर्भही आहे......
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचा आज जन्मदिवस. त्यांचं आयुष्य जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष याची प्रचिती देणारं आहे. भारत ते रशिया हा त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणा देतो. त्यांच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगत घराघरात त्यांच्या फोटो सोबतच त्यांचे विचारही पोचवायला हवेत.
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचा आज जन्मदिवस. त्यांचं आयुष्य जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष याची प्रचिती देणारं आहे. भारत ते रशिया हा त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणा देतो. त्यांच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगत घराघरात त्यांच्या फोटो सोबतच त्यांचे विचारही पोचवायला हवेत......
महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट.
महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट......
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत......
गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत.
गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत......
गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची मालिका सुरू आहे. सततच्या पावसाने नद्यांना पूर आलेत, कुठे घरं कोसळतायत, कुठे दरड पडतेय तर कुठे जमीन खचतेय. निसर्गानं अचानक असा तांडव का सुरू केलाय? त्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दलचा एक वीडियो पर्यावरणतज्ञ आणि पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांच्या 'भवताल' या युट्यूब चॅनेलवर टाकलाय. या वीडियोचं हे शब्दांकन.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची मालिका सुरू आहे. सततच्या पावसाने नद्यांना पूर आलेत, कुठे घरं कोसळतायत, कुठे दरड पडतेय तर कुठे जमीन खचतेय. निसर्गानं अचानक असा तांडव का सुरू केलाय? त्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दलचा एक वीडियो पर्यावरणतज्ञ आणि पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांच्या 'भवताल' या युट्यूब चॅनेलवर टाकलाय. या वीडियोचं हे शब्दांकन......
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या प्रश्नांवरून त्यांनी आघाडी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलंय. ज्येष्ठ पत्रकार आणि भाजप पुणे शहर चिटणीस यांनी त्यांच्या कामाचा घेतलेला वेध.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या प्रश्नांवरून त्यांनी आघाडी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलंय. ज्येष्ठ पत्रकार आणि भाजप पुणे शहर चिटणीस यांनी त्यांच्या कामाचा घेतलेला वेध......
आज १५ जुलै. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांची जयंती. लग्न करून, पोरं बाळं जन्माला घालूनही समाज कामाच्या ओढीमुळे अण्णा संन्याशासारखं आयुष्य जगले. शेवटी, राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या आग्रहाखातर ४० वर्षांनी त्यांनी आपल्या घराची पायरी चढली. त्यादिवशी घरच्यांना आपल्या घरी राष्ट्रपती आल्याने नाही तर खुद्द अण्णा आल्याने अधिक आनंद झाला होता.
आज १५ जुलै. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांची जयंती. लग्न करून, पोरं बाळं जन्माला घालूनही समाज कामाच्या ओढीमुळे अण्णा संन्याशासारखं आयुष्य जगले. शेवटी, राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या आग्रहाखातर ४० वर्षांनी त्यांनी आपल्या घराची पायरी चढली. त्यादिवशी घरच्यांना आपल्या घरी राष्ट्रपती आल्याने नाही तर खुद्द अण्णा आल्याने अधिक आनंद झाला होता......
गाडगेबाबांचं चरित्र, विचार आणि कार्य यांचा आजच्या संदर्भात परिचय करून देणारं संतोष अरसोड यांचं एक नवं पुस्तक आलंय. 'प्रबोधन पंढरीचा क्रांतीकारी संत गाडगेबाबा' असं या पुस्तकाचं नाव आहे. पुण्याच्या मनोविकास प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आजचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर गाडगेबाबांशिवाय आणि गाडगेबाबा समजून घ्यायचे असतील तर या पुस्तकाशिवाय पर्याय नाही.
गाडगेबाबांचं चरित्र, विचार आणि कार्य यांचा आजच्या संदर्भात परिचय करून देणारं संतोष अरसोड यांचं एक नवं पुस्तक आलंय. 'प्रबोधन पंढरीचा क्रांतीकारी संत गाडगेबाबा' असं या पुस्तकाचं नाव आहे. पुण्याच्या मनोविकास प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आजचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर गाडगेबाबांशिवाय आणि गाडगेबाबा समजून घ्यायचे असतील तर या पुस्तकाशिवाय पर्याय नाही......
निवड झाल्यापासून आठ महिन्यांमधे नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली तरच भविष्यातल्या स्वप्नील लोणकरसारख्या तरुणांच्या आत्महत्या थांबतील. यासाठी नोकरशाहीला स्वतःमधली मरगळ झटकावी लागेल. याचबरोबर केवळ नोकरीवर अवलंबून न राहता तरुणांनी उद्योग, छोटे व्यवसाय, प्रक्रिया उद्योग याकडे लक्ष दिलं तर रोजगाराचा प्रश्न सुटेल.
निवड झाल्यापासून आठ महिन्यांमधे नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली तरच भविष्यातल्या स्वप्नील लोणकरसारख्या तरुणांच्या आत्महत्या थांबतील. यासाठी नोकरशाहीला स्वतःमधली मरगळ झटकावी लागेल. याचबरोबर केवळ नोकरीवर अवलंबून न राहता तरुणांनी उद्योग, छोटे व्यवसाय, प्रक्रिया उद्योग याकडे लक्ष दिलं तर रोजगाराचा प्रश्न सुटेल......
सरकारी कामकाजाची भाषा सोपी करण्यासाठी शब्दांना पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा खात्याने एक पत्रक काढलंय. पण ते सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती, उत्तम कौशल्य असणारं मनुष्यबळ आणि चिकाटीची गरज आहे. साक्षात आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी सुचवलेल्या सुधारणा आजही प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. तर साध्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनांना कोण विचारतं?
सरकारी कामकाजाची भाषा सोपी करण्यासाठी शब्दांना पर्याय सुचवण्यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा खात्याने एक पत्रक काढलंय. पण ते सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती, उत्तम कौशल्य असणारं मनुष्यबळ आणि चिकाटीची गरज आहे. साक्षात आचार्य अत्रेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेत याविषयी सुचवलेल्या सुधारणा आजही प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. तर साध्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनांना कोण विचारतं? .....
आज जागतिक पर्यावरण दिवस. पंढरपूरमधलं चिंचणी गाव आपल्या पर्यावरणपूरक भूमिकेमुळे आदर्श ठरतंय. निसर्गप्रेमी अशी या गावची ओळख बनलीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गाव खेडी उद्ध्वस्त होत असताना या गावात कोरोनाचा एकही पेशंट सापडलेला नाही. गावकऱ्यांनाही ऑक्सिजनसाठी भटकावं लागत नाहीय. त्यामुळेच या गावाची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागलीय.
आज जागतिक पर्यावरण दिवस. पंढरपूरमधलं चिंचणी गाव आपल्या पर्यावरणपूरक भूमिकेमुळे आदर्श ठरतंय. निसर्गप्रेमी अशी या गावची ओळख बनलीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गाव खेडी उद्ध्वस्त होत असताना या गावात कोरोनाचा एकही पेशंट सापडलेला नाही. गावकऱ्यांनाही ऑक्सिजनसाठी भटकावं लागत नाहीय. त्यामुळेच या गावाची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागलीय......
महाराष्ट्रातील १४ किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळ संभाव्य यादीत समावेश करण्यात आलाय. त्यासाठी २०१६ ला मोहीम हाती घेण्यात आली होती. एक मोठं स्वप्न पूर्ण होण्याच्या पायरीवर आपण उभे आहोत. गडकिल्ले जागतिक नकाशावर आल्यामुळे आपल्याला ‘गोल्डन हेरिटेज सर्किट’ अशी ओळख मिळू शकेल.
महाराष्ट्रातील १४ किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळ संभाव्य यादीत समावेश करण्यात आलाय. त्यासाठी २०१६ ला मोहीम हाती घेण्यात आली होती. एक मोठं स्वप्न पूर्ण होण्याच्या पायरीवर आपण उभे आहोत. गडकिल्ले जागतिक नकाशावर आल्यामुळे आपल्याला ‘गोल्डन हेरिटेज सर्किट’ अशी ओळख मिळू शकेल......
'वाळवाण' ही ग्रामीण लेखक रवी राजमाने यांची कादंबरी. साकेत प्रकाशनाने ती प्रकाशित केलीय. ही कादंबरी प्रकल्पग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाची वाताहत आपल्या समोर मांडते. विकासाचा चेहरा मानवी नसतो. इथं सामान्य शेतकरी आणि कष्टकरी कायम भरडला जातो. लोकशाहीच्या बुरख्याआड ठोकशाही चालू असते. या सगळ्याचं दर्शन लेखक 'वाळवाण' कादंबरीत घडवतात.
'वाळवाण' ही ग्रामीण लेखक रवी राजमाने यांची कादंबरी. साकेत प्रकाशनाने ती प्रकाशित केलीय. ही कादंबरी प्रकल्पग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाची वाताहत आपल्या समोर मांडते. विकासाचा चेहरा मानवी नसतो. इथं सामान्य शेतकरी आणि कष्टकरी कायम भरडला जातो. लोकशाहीच्या बुरख्याआड ठोकशाही चालू असते. या सगळ्याचं दर्शन लेखक 'वाळवाण' कादंबरीत घडवतात......
मूळचे कोल्हापूरचे आणि गेली ५० वर्ष मुंबईत असलेले ज्येष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी २७ मेला पंचाहत्तरी प्रवेश केलाय. गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी कला क्षेत्रातली चौफेर कारकीर्द त्यांनी गाजवली. कला क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्ष पूर्ण झालीत.
मूळचे कोल्हापूरचे आणि गेली ५० वर्ष मुंबईत असलेले ज्येष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी २७ मेला पंचाहत्तरी प्रवेश केलाय. गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी कला क्षेत्रातली चौफेर कारकीर्द त्यांनी गाजवली. कला क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्ष पूर्ण झालीत. .....
तौक्ते चक्रीवादळानंतर आता पूर्व किनारपट्टीवर धडकणाऱ्या ‘यास’ चक्रीवादळाशी भारताला दोन हात करायचेत. गेल्या काही वर्षांत समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळांची संख्या खूप वाढलीय. संशोधकांच्या मते, जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राचं तापमान वाढल्यानं चक्रीवादळांची संख्या वाढतेय. पर्यावरणातला अवाजवी हस्तक्षेप थांबवला तर जागतिक तापमान वाढ आपण रोखू शकतो. पण प्रश्न हा आहे की आपण हे करणार का?
तौक्ते चक्रीवादळानंतर आता पूर्व किनारपट्टीवर धडकणाऱ्या ‘यास’ चक्रीवादळाशी भारताला दोन हात करायचेत. गेल्या काही वर्षांत समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळांची संख्या खूप वाढलीय. संशोधकांच्या मते, जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राचं तापमान वाढल्यानं चक्रीवादळांची संख्या वाढतेय. पर्यावरणातला अवाजवी हस्तक्षेप थांबवला तर जागतिक तापमान वाढ आपण रोखू शकतो. पण प्रश्न हा आहे की आपण हे करणार का?.....
सध्या तरी देशाचं एकूणच जीवन कोरोनानं व्यापून टाकलंय. बारकाईने विचार केला तर भयानक परिस्थितीचं विश्लेषण करणारी एकच बाजू समाजापुढे येत आहे. दुसर्या बाजूचा विचार फारसा होताना दिसत नाही. आपली कामगिरी सरस दिसतेय. पण ती केवळ सांत्वना आहे, समस्येचं समाधान मुळीच नाही हे मात्र विसरता नये.
सध्या तरी देशाचं एकूणच जीवन कोरोनानं व्यापून टाकलंय. बारकाईने विचार केला तर भयानक परिस्थितीचं विश्लेषण करणारी एकच बाजू समाजापुढे येत आहे. दुसर्या बाजूचा विचार फारसा होताना दिसत नाही. आपली कामगिरी सरस दिसतेय. पण ती केवळ सांत्वना आहे, समस्येचं समाधान मुळीच नाही हे मात्र विसरता नये......
हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचं १६ मेला निधन झालं. चकचकीत अवास्तवाला त्यांनी कधीही त्यांच्या जवळ येऊ दिलं नाही किंवा फिरकूही दिलं नाही. राजकारणात शब्दांची रांगोळी काढणारे आणि कशिदा विणणारे पदोपदी भेटतात. पण त्यांना शब्द स्वच्छ धुवून वापरायची सवय होती. त्यांचा मार्गच निराळा आणि मैदानही वेगळंच. गंभीर प्रश्नांना घेऊन त्यात उतरणंही वेगळंच होतं.
हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांचं १६ मेला निधन झालं. चकचकीत अवास्तवाला त्यांनी कधीही त्यांच्या जवळ येऊ दिलं नाही किंवा फिरकूही दिलं नाही. राजकारणात शब्दांची रांगोळी काढणारे आणि कशिदा विणणारे पदोपदी भेटतात. पण त्यांना शब्द स्वच्छ धुवून वापरायची सवय होती. त्यांचा मार्गच निराळा आणि मैदानही वेगळंच. गंभीर प्रश्नांना घेऊन त्यात उतरणंही वेगळंच होतं......
कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलंय. जनतेच्या मनातून सर्वच राजकीय नेते उतरलेत. डोळ्यासमोर हजारो लोक मरतायत. जनतेच्या मनातला व्यवस्थेवरचा विश्वासही उडू लागलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मागच्या खूर्चीवर बसून काही महिने डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ञांना निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत. त्यांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होते का ते पहावं.
कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलंय. जनतेच्या मनातून सर्वच राजकीय नेते उतरलेत. डोळ्यासमोर हजारो लोक मरतायत. जनतेच्या मनातला व्यवस्थेवरचा विश्वासही उडू लागलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मागच्या खूर्चीवर बसून काही महिने डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ञांना निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत. त्यांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होते का ते पहावं......
गेल्यावर्षी डिसेंबरपासून कोरोनाबाधितांचे आकडे कमी व्हायला लागले. तसं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल हलगर्जीपणा दिसून आला. हा हलगर्जीपणा दुसर्या लाटेच्या रूपाने आव्हान म्हणून उभा राहिलाय. आज देशात दररोज सापडणार्या कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊन पोचलाय. महाराष्ट्रात दिवसात ५५ ते ६० हजार पेशंटची भर पडतेय. यामागे तीन प्रमुख कारणं आहेत.
गेल्यावर्षी डिसेंबरपासून कोरोनाबाधितांचे आकडे कमी व्हायला लागले. तसं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल हलगर्जीपणा दिसून आला. हा हलगर्जीपणा दुसर्या लाटेच्या रूपाने आव्हान म्हणून उभा राहिलाय. आज देशात दररोज सापडणार्या कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊन पोचलाय. महाराष्ट्रात दिवसात ५५ ते ६० हजार पेशंटची भर पडतेय. यामागे तीन प्रमुख कारणं आहेत......
भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलीय. महाराष्ट्र देशातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. रोज ५० हजार पेशंटचा आकडा पार होतोय. युरोप आणि अमेरिकेने गेल्यावर्षी दुसऱ्या लाटेचा अनुभव घेतलाय. या लाटेमुळे आरोग्य सुविधांवर ताण पडला. आपणही सध्या त्याच स्थितीतून जात आहोत.
भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलीय. महाराष्ट्र देशातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. रोज ५० हजार पेशंटचा आकडा पार होतोय. युरोप आणि अमेरिकेने गेल्यावर्षी दुसऱ्या लाटेचा अनुभव घेतलाय. या लाटेमुळे आरोग्य सुविधांवर ताण पडला. आपणही सध्या त्याच स्थितीतून जात आहोत......
संकट आलं की महाराष्ट्र एकदिलाने एकजूट होऊन सामना करतो, असा आजवरचा अनुभव आहे. सगळे वाद विरोध मावळतात. पण आता कोरोनाकाळात असं होताना दिसत नाही. राजकारणी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे लढत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण सगळेही विभागलोत. एका महाराष्ट्राचे किती महाराष्ट्र झालेत?
संकट आलं की महाराष्ट्र एकदिलाने एकजूट होऊन सामना करतो, असा आजवरचा अनुभव आहे. सगळे वाद विरोध मावळतात. पण आता कोरोनाकाळात असं होताना दिसत नाही. राजकारणी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे लढत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण सगळेही विभागलोत. एका महाराष्ट्राचे किती महाराष्ट्र झालेत?.....
सध्या भाजप काहीही करून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतंय. आश्चर्य वाटावं इतका उतावीळपणा त्यातून दिसतोय. उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यांमुळे संघाची ताकदही नव्या दमाने फडणवीसांच्या मागे उभी राहतेय. त्यातून परमबीर सिंह, रश्मी शुक्ला अशी प्रशासनातली मंडळी उघडपणे सरसावलीयत. हेच सांस्कृतिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरही घडणार आहे.
सध्या भाजप काहीही करून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतंय. आश्चर्य वाटावं इतका उतावीळपणा त्यातून दिसतोय. उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यांमुळे संघाची ताकदही नव्या दमाने फडणवीसांच्या मागे उभी राहतेय. त्यातून परमबीर सिंह, रश्मी शुक्ला अशी प्रशासनातली मंडळी उघडपणे सरसावलीयत. हेच सांस्कृतिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरही घडणार आहे......
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी शिक्षण ऑनलाईन घेतल्याने दहावी बारावीच्या परीक्षाही ऑनलाईनच असल्या पाहिजेत, असं मत व्यक्ती केलं जातंय. तर सरकारानं या परीक्षा ऑफलाईन घ्यायचं ठरवलंय. ३० लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेणं शक्य नाही, हे खरंच. अशावेळी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेणं ही खरंतर आपल्यासमोरची परीक्षाच असणार आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी शिक्षण ऑनलाईन घेतल्याने दहावी बारावीच्या परीक्षाही ऑनलाईनच असल्या पाहिजेत, असं मत व्यक्ती केलं जातंय. तर सरकारानं या परीक्षा ऑफलाईन घ्यायचं ठरवलंय. ३० लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेणं शक्य नाही, हे खरंच. अशावेळी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेणं ही खरंतर आपल्यासमोरची परीक्षाच असणार आहे......
माजी आमदार संभाजी पवार यांचं १५ मार्चला निधन झालं. सांगली विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा आमदार होते. राजकीय आखाड्यासोबत त्यांनी कुस्तीचा आखाडाही गाजवला. त्यांना बिजलीमल्ल म्हणून ओळखलं जायचं. २०१७ ला त्यांचे चिरंजीव गौतम पवार यांनी लिहिलेल्या 'राजकीय पैलवान संभाजी पवार' या पुस्तकातला हा भाग त्यांचं व्यक्तिमत्व उभं करतो.
माजी आमदार संभाजी पवार यांचं १५ मार्चला निधन झालं. सांगली विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा आमदार होते. राजकीय आखाड्यासोबत त्यांनी कुस्तीचा आखाडाही गाजवला. त्यांना बिजलीमल्ल म्हणून ओळखलं जायचं. २०१७ ला त्यांचे चिरंजीव गौतम पवार यांनी लिहिलेल्या 'राजकीय पैलवान संभाजी पवार' या पुस्तकातला हा भाग त्यांचं व्यक्तिमत्व उभं करतो......
सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग उचलबांगडी झाली. त्यांनी टाकलेला लेटरबॉम्ब राजकीय धुळवडीचं निमित्त ठरलाय. भाजप ठाकरे सरकारला सगळ्या बाजूने घेरण्याचा प्रयत्न करतंय. मुळात प्रत्येक सरकारांना काही खास जबाबदारी पार पाडणारे लोक हवे असतात. त्यामुळे अशा उचापतखोर लोकांची काही कमतरता नाही आणि त्यांच्या सेवा वापरणाऱ्यांचीही काही उणीव नाही.
सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग उचलबांगडी झाली. त्यांनी टाकलेला लेटरबॉम्ब राजकीय धुळवडीचं निमित्त ठरलाय. भाजप ठाकरे सरकारला सगळ्या बाजूने घेरण्याचा प्रयत्न करतंय. मुळात प्रत्येक सरकारांना काही खास जबाबदारी पार पाडणारे लोक हवे असतात. त्यामुळे अशा उचापतखोर लोकांची काही कमतरता नाही आणि त्यांच्या सेवा वापरणाऱ्यांचीही काही उणीव नाही......
सचिन वाझेंची अटक आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने ठाकरे सरकारला खिंडीत पकडायचा प्रयत्न विरोधक करतायत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोय. फक्त एखाद्या मंत्र्याने भ्रष्टाचार केला किंवा एखाद्या अधिकाऱ्याने तसे आरोप केले म्हणून 'राष्ट्रपती राजवट' लागू होऊ शकते?
सचिन वाझेंची अटक आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने ठाकरे सरकारला खिंडीत पकडायचा प्रयत्न विरोधक करतायत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोय. फक्त एखाद्या मंत्र्याने भ्रष्टाचार केला किंवा एखाद्या अधिकाऱ्याने तसे आरोप केले म्हणून 'राष्ट्रपती राजवट' लागू होऊ शकते?.....
आपल्या डीएनएत मराठीपण घेऊन मिरवणारी शिवसेना आता मुंबईतल्या गुजराती समाजावर राजकीय जाळं टाकतेय. पुढच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ‘जलेबी अने फाफडा अने उद्धव ठाकरे आपडा’ अशी साद घातली जातेय. यामागचं कारण म्हणजे गुजराती समाजाचा मुंबईत वाढत असलेला प्रभाव. भाजपबरोबर युती तुटल्यापासून महानगरपालिकेतल्या जागा जिंकण्यासाठी लागणाऱ्या मतांची रुखरुख नक्कीच शिवसेनेला लागून राहिलीय.
आपल्या डीएनएत मराठीपण घेऊन मिरवणारी शिवसेना आता मुंबईतल्या गुजराती समाजावर राजकीय जाळं टाकतेय. पुढच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ‘जलेबी अने फाफडा अने उद्धव ठाकरे आपडा’ अशी साद घातली जातेय. यामागचं कारण म्हणजे गुजराती समाजाचा मुंबईत वाढत असलेला प्रभाव. भाजपबरोबर युती तुटल्यापासून महानगरपालिकेतल्या जागा जिंकण्यासाठी लागणाऱ्या मतांची रुखरुख नक्कीच शिवसेनेला लागून राहिलीय......
राज्यभरात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. गेले १० दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोबतीने गावपातळीवरची वेगवेगळी पॅनेलही मैदानात उतरलीयत. तरूणांचा या निवडणुकीतला लक्षणीय सहभाग ही त्यातली विशेष गोष्ट! पार्ट्या आणि बाटल्या या पलिकडे जाऊन हे तरूण निवडणुकीकडे पाहतायत. हा सगळा जांगडगुत्ता एका तरूणाच्या नजरेतून पहायलाच हवा.
राज्यभरात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. गेले १० दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोबतीने गावपातळीवरची वेगवेगळी पॅनेलही मैदानात उतरलीयत. तरूणांचा या निवडणुकीतला लक्षणीय सहभाग ही त्यातली विशेष गोष्ट! पार्ट्या आणि बाटल्या या पलिकडे जाऊन हे तरूण निवडणुकीकडे पाहतायत. हा सगळा जांगडगुत्ता एका तरूणाच्या नजरेतून पहायलाच हवा......
युपीएच्या चेअरमन पदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेला सत्तांतराचा प्रयोग देशभर पोचला. ८० वर्षांचा महाराष्ट्राचा नायक देशाच्या राजकारणाच्या सारीपाटावर ‘महानायक’ ठरला. सध्या शेतकर्यांच्या मुद्यावरुन केंद्र सरकार कमालीचं बॅकफूटवर गेलंय. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसतोय. विरोधकांना या परिस्थितीचा राजकीय फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे शरद पवार हेच एकमेव हुकमी एक्का आहेत.
युपीएच्या चेअरमन पदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेला सत्तांतराचा प्रयोग देशभर पोचला. ८० वर्षांचा महाराष्ट्राचा नायक देशाच्या राजकारणाच्या सारीपाटावर ‘महानायक’ ठरला. सध्या शेतकर्यांच्या मुद्यावरुन केंद्र सरकार कमालीचं बॅकफूटवर गेलंय. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसतोय. विरोधकांना या परिस्थितीचा राजकीय फायदा घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे शरद पवार हेच एकमेव हुकमी एक्का आहेत......
जानेवारी फेब्रुवारीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय. लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं आपल्याला परवडणारं नाही. आणि लॉकडाऊन नसेल तर या दुसऱ्या लाटेमुळे जास्तीचं नुकसान व्हायची शक्यता आहे. ही लाट साधीसुधी नाही तर त्सुनामी सारखी येईल अशी भीती वाटू लागलीय.
जानेवारी फेब्रुवारीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय. लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं आपल्याला परवडणारं नाही. आणि लॉकडाऊन नसेल तर या दुसऱ्या लाटेमुळे जास्तीचं नुकसान व्हायची शक्यता आहे. ही लाट साधीसुधी नाही तर त्सुनामी सारखी येईल अशी भीती वाटू लागलीय......
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. चाळीसेक वर्ष सहजीवनाच्या सोबती राहिलेल्या वेणूताई गेल्यावर यशवंतराव पुरते खचून गेले. पुण्यातल्या एका भाषणात तर त्यांना रडूच कोसळलं. भाषण न करताच ते जागेवर जाऊन बसले. धुरंधर राजकारणी असलेले यशवंतराव आपल्या अखेरच्या दिवसांत साहित्य वर्तुळात रमले. यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतल्या या काही आठवणी.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. चाळीसेक वर्ष सहजीवनाच्या सोबती राहिलेल्या वेणूताई गेल्यावर यशवंतराव पुरते खचून गेले. पुण्यातल्या एका भाषणात तर त्यांना रडूच कोसळलं. भाषण न करताच ते जागेवर जाऊन बसले. धुरंधर राजकारणी असलेले यशवंतराव आपल्या अखेरच्या दिवसांत साहित्य वर्तुळात रमले. यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसांतल्या या काही आठवणी......
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय.
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय......
भावनांना वापरणं सर्वात सोपं असतं. तसं सुशांत प्रकरणातही झालं. करण जोहर वगैरेंचा तडका तेवढा चित्तवेधक ठरत नाही दिसताच पुन्हा त्यात ‘खान’दानीपणा देऊन धार्मिक रंग मिसळण्याचा प्रयत्न झाला. प्रकरण चांगलंच तापत असताना अचानक थंडावलं. राजकारणी राजकीय डाव खेळले. माध्यमांनी त्यांचे अजेंडे चालवले. रोजच्या जगण्यात काय भोगावं लागतंय ते वास्तव विसरून आपण या सगळ्या भ्रमात अडकलो.
भावनांना वापरणं सर्वात सोपं असतं. तसं सुशांत प्रकरणातही झालं. करण जोहर वगैरेंचा तडका तेवढा चित्तवेधक ठरत नाही दिसताच पुन्हा त्यात ‘खान’दानीपणा देऊन धार्मिक रंग मिसळण्याचा प्रयत्न झाला. प्रकरण चांगलंच तापत असताना अचानक थंडावलं. राजकारणी राजकीय डाव खेळले. माध्यमांनी त्यांचे अजेंडे चालवले. रोजच्या जगण्यात काय भोगावं लागतंय ते वास्तव विसरून आपण या सगळ्या भ्रमात अडकलो......
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता स्टे आहे. कायमचा नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे घाबरण्याचं आणि गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही. घटना पीठासमोर सर्व पुरावे आल्यानंतर आरक्षण १०० टक्के टिकेल अशी कायदेतज्ञांची खात्री आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई सक्षमपणे लढणं हाच पर्याय आहे. परंतु काही जाणकार काही पर्याय पुढे आणत आहेत.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता स्टे आहे. कायमचा नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे घाबरण्याचं आणि गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही. घटना पीठासमोर सर्व पुरावे आल्यानंतर आरक्षण १०० टक्के टिकेल अशी कायदेतज्ञांची खात्री आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई सक्षमपणे लढणं हाच पर्याय आहे. परंतु काही जाणकार काही पर्याय पुढे आणत आहेत......
लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे.
लोकांना सतत एक दृष्टिकोन देण्याचं काम पुष्पा भावे यांनी केलं. जमिनीवर केल्या जाणार्या कामाइतकंच हेही महत्वाचं. आता आतापर्यंत, महाराष्ट्रात असा काळ होता की, सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जायचा नाही. खरोखरच, पुष्पाबाईं इतकं, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचं मोठं सोशल नेटवर्किंग त्यांच्या पिढीतल्या क्वचितच कुणाचं असेल! हे युनिक आहे......
आज १७ सप्टेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे.
आज १७ सप्टेंबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३. त्यातलं जवळपास पाऊण शतक ते सतत लिहित होते. त्यांनी लिहिलेलं सगळंच साहित्य उपलब्ध नाही. पण जे आहे ते आजही निखाऱ्यासारखं ज्वलंत आहे......
आयएएस अधिकारी सरकारी यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी असतात. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी त्या यंत्रणेरच्या नियंत्रणासाठी संघर्ष करतात. काही अधिकारी ती यंत्रणा राजकारण्यांच्या पायावर वाहतात. काही अधिकारी ही यंत्रमा लोकांचं भलं करण्यासाठी वापरतात. पण त्यातलं कुणी सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे स्वतः दाखल होत नाही किंवा बायकोची बाळंतपणं त्यात करत नाही. मात्र त्याला नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर अपवाद ठरले आहेत.
आयएएस अधिकारी सरकारी यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी असतात. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी त्या यंत्रणेरच्या नियंत्रणासाठी संघर्ष करतात. काही अधिकारी ती यंत्रणा राजकारण्यांच्या पायावर वाहतात. काही अधिकारी ही यंत्रमा लोकांचं भलं करण्यासाठी वापरतात. पण त्यातलं कुणी सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे स्वतः दाखल होत नाही किंवा बायकोची बाळंतपणं त्यात करत नाही. मात्र त्याला नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर अपवाद ठरले आहेत......
आज ३ ऑगस्ट. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व समर्थपणे केलं. इंग्रज शासनाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या नानांनी प्रतिसरकार अर्थात समांतर सरकार स्थापन केलं. प्रामुख्याने सातारा आणि सांगलीत हे काम मोठ्या प्रमाणात चालत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षाला महात्मा गांधींनीही पाठिंबा दिला होता.
आज ३ ऑगस्ट. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व समर्थपणे केलं. इंग्रज शासनाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या नानांनी प्रतिसरकार अर्थात समांतर सरकार स्थापन केलं. प्रामुख्याने सातारा आणि सांगलीत हे काम मोठ्या प्रमाणात चालत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षाला महात्मा गांधींनीही पाठिंबा दिला होता......
आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आता विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख.
आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आता विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख......
आजपासून अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. यानिमित्त मोठे समारंभ, पुतळ्यांची पूजा, पुरस्कार, स्वागत-सत्कार होतील. प्रामाणिकपणे काही उपक्रमही राबवले गेले. पण या सगळ्यात अण्णा भाऊंचं साहित्य, कार्य समजून घेताना ‘अण्णा भाऊ’ नावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून जाऊ नये.
आजपासून अण्णा भाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. यानिमित्त मोठे समारंभ, पुतळ्यांची पूजा, पुरस्कार, स्वागत-सत्कार होतील. प्रामाणिकपणे काही उपक्रमही राबवले गेले. पण या सगळ्यात अण्णा भाऊंचं साहित्य, कार्य समजून घेताना ‘अण्णा भाऊ’ नावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून जाऊ नये......
आपल्या भोवतालच्या बदलत्या वास्तवाचं आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचं भान ठेवून साहित्यप्रकार जन्म घेतो. तो त्या त्या समाजाच्या जनमानसाची पकड घेतो. या सगळ्या वस्तुस्थितीचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ साठेंची लोकनाट्य. लोकांचं जगणं हे साहित्याचं केंद्र मानणाऱ्या अण्णा भाऊंचा आज स्मृतिदिन.
आपल्या भोवतालच्या बदलत्या वास्तवाचं आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचं भान ठेवून साहित्यप्रकार जन्म घेतो. तो त्या त्या समाजाच्या जनमानसाची पकड घेतो. या सगळ्या वस्तुस्थितीचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ साठेंची लोकनाट्य. लोकांचं जगणं हे साहित्याचं केंद्र मानणाऱ्या अण्णा भाऊंचा आज स्मृतिदिन......
जिल्ह्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. यंत्रणा अपुरी पडतेय. बेड मिळत नाहीत म्हणून पेशंट मरू लागलेत. वेंटिलेटरची गरज असलेल्या पेशंट्सचे नातेवाईक `वेंटिलेटर मिळेल का वेंटिलेटर…` म्हणून आकांत करताहेत. हे सगळे अपयश कोणत्या सरकारचं आहे? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करायला हरकत नाही, पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांनाही जाब विचारायला पाहिजे.
जिल्ह्याजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. यंत्रणा अपुरी पडतेय. बेड मिळत नाहीत म्हणून पेशंट मरू लागलेत. वेंटिलेटरची गरज असलेल्या पेशंट्सचे नातेवाईक `वेंटिलेटर मिळेल का वेंटिलेटर…` म्हणून आकांत करताहेत. हे सगळे अपयश कोणत्या सरकारचं आहे? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करायला हरकत नाही, पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांनाही जाब विचारायला पाहिजे......
बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला त्यांचं निधन झालं. नव्या पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून ते आपल्यातून गेले.
बरेचसे व्यावसायिक नाट्य निर्माते कमल शेडगे यांच्याकडून संस्थेचा आणि नाटकाचा 'लोगो' बनवून घेत. हाडाच्या कलावंताला साजेसं त्यांचं दिसणं आणि वागणं होतं. चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता 'ऐसी अक्षरे खेळवीन' अशी हिम्मत दाखवणारा हा 'अक्षर सम्राट' होता. ४ जुलैला त्यांचं निधन झालं. नव्या पिढीला अक्षरांना अर्थपूर्ण करणारा अक्षय ठेवा ठेवून ते आपल्यातून गेले......
राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती. शाहू महाराज आपल्याला कधी राज्यकर्ते म्हणून आठवत नाहीत, ते नेहमी सुधारणावादी म्हणूनच आठवतात. ते महाराज होते म्हणून त्यांच्यासाठी खालच्या जातीतल्या लोकांना प्रगतीपथावर आणणं सोपं होतं. असं वरकरणी वाटत असलं तरी त्यांनाही विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं गेलं.
राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती. शाहू महाराज आपल्याला कधी राज्यकर्ते म्हणून आठवत नाहीत, ते नेहमी सुधारणावादी म्हणूनच आठवतात. ते महाराज होते म्हणून त्यांच्यासाठी खालच्या जातीतल्या लोकांना प्रगतीपथावर आणणं सोपं होतं. असं वरकरणी वाटत असलं तरी त्यांनाही विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं गेलं......
आज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतरही त्यांच्यातला जाणता राजा कसा जिवंत होता हे त्यांचं कार्य समजून घेतल्यावर लक्षात येतं. त्यांची भाषणंही तशीच होती. त्यांना कृतीची जोड होती. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं शाहू महाराजांचं हे अध्यक्षीय भाषण.
आज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस. कोल्हापूरच्या राजगादीवर बसल्यानंतरही त्यांच्यातला जाणता राजा कसा जिवंत होता हे त्यांचं कार्य समजून घेतल्यावर लक्षात येतं. त्यांची भाषणंही तशीच होती. त्यांना कृतीची जोड होती. नाशिक इथे निराश्रित सोमवंशीय समाजाच्या सभेतलं शाहू महाराजांचं हे अध्यक्षीय भाषण......
मॅग्नेटिक महाराष्ट्र ०.२ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने देश परदेशातल्या कंपन्यांशी सामंजस्य करार केलेत. येत्या काही दिवसांत आणखी आठ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राकडे अनेक जमेच्या बाजू आहेत. त्याचा वापर करून आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा गाडा इतर देशांच्याही पुढे नेऊ शकतो.
मॅग्नेटिक महाराष्ट्र ०.२ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने देश परदेशातल्या कंपन्यांशी सामंजस्य करार केलेत. येत्या काही दिवसांत आणखी आठ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राकडे अनेक जमेच्या बाजू आहेत. त्याचा वापर करून आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा गाडा इतर देशांच्याही पुढे नेऊ शकतो......
लॉकडाऊन लावल्यावरही कोविड-१९ पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊनमधे थोडीफार ढिलाई दिल्यावर तर परिस्थिती अजून बिकट झालीय. महाराष्ट्रातली परिस्थिती तर आणखी गंभीर बनतेय. रूग्णवाढीचा वेग वाढतोय तशी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतेय. सर्वसामान्यांचं बेहाल जगणं चव्हाट्यावर येतंय. या साऱ्या परिस्थितीच्या अनुषंगानं एका सर्वसामान्य नागरिकानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र.
लॉकडाऊन लावल्यावरही कोविड-१९ पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊनमधे थोडीफार ढिलाई दिल्यावर तर परिस्थिती अजून बिकट झालीय. महाराष्ट्रातली परिस्थिती तर आणखी गंभीर बनतेय. रूग्णवाढीचा वेग वाढतोय तशी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतेय. सर्वसामान्यांचं बेहाल जगणं चव्हाट्यावर येतंय. या साऱ्या परिस्थितीच्या अनुषंगानं एका सर्वसामान्य नागरिकानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र......
महाराष्ट्रातल्या शाळांना एप्रिल आणि मे असे दोन महिने उन्हाळी सुट्टी असतेच. यंदा कोरोना वायरसच्या सावटाखाली जूनमधे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल की नाही याची काळजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना लागून राहिलीय. अनेक देशांनी लॉकडाऊनंतर शाळा सुरू केल्या. पण शाळेतून कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यामुळे पुन्हा बंद कराव्या लागल्या. त्यांना आलेल्या अनुभवातून आपण बरंच काही शिकू शकतो.
महाराष्ट्रातल्या शाळांना एप्रिल आणि मे असे दोन महिने उन्हाळी सुट्टी असतेच. यंदा कोरोना वायरसच्या सावटाखाली जूनमधे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल की नाही याची काळजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना लागून राहिलीय. अनेक देशांनी लॉकडाऊनंतर शाळा सुरू केल्या. पण शाळेतून कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यामुळे पुन्हा बंद कराव्या लागल्या. त्यांना आलेल्या अनुभवातून आपण बरंच काही शिकू शकतो......
संजय नहार गेली चार दशकं पंजाब, काश्मीर आणि ईशान्येकडच्या राज्यांत `सरहद`वरच्या माणसांना देशाशी जोडण्याचं काम करत आहेत. त्यांना तिथे सापडलेली `आयडिया ऑफ महाराष्ट्र` काय आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यांना सापडलेला महाराष्ट्र विचार आहे देशभक्तीचा आणि सर्वसमावेशकतेचा. त्याशिवाय ते सांगत असलेला अनेकांतवादही महाराष्ट्र विचारांच्या दृष्टीने आवर्जून समजून घ्यावा, असाच आहे.
संजय नहार गेली चार दशकं पंजाब, काश्मीर आणि ईशान्येकडच्या राज्यांत `सरहद`वरच्या माणसांना देशाशी जोडण्याचं काम करत आहेत. त्यांना तिथे सापडलेली `आयडिया ऑफ महाराष्ट्र` काय आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यांना सापडलेला महाराष्ट्र विचार आहे देशभक्तीचा आणि सर्वसमावेशकतेचा. त्याशिवाय ते सांगत असलेला अनेकांतवादही महाराष्ट्र विचारांच्या दृष्टीने आवर्जून समजून घ्यावा, असाच आहे......
महाराष्ट्र विचारांतून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. ती होता होता, महाराष्ट्रानं देशालाही आकार आणि विचार दिला. महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा, मानवतावाद, सर्ववमावेशकता यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ला दिशा मिळत गेली. त्याची मुळं ‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’मधेच आहे, सांगत आहेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी.
महाराष्ट्र विचारांतून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. ती होता होता, महाराष्ट्रानं देशालाही आकार आणि विचार दिला. महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा, मानवतावाद, सर्ववमावेशकता यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ला दिशा मिळत गेली. त्याची मुळं ‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’मधेच आहे, सांगत आहेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी......
भाव नसल्याने शेतमाल, दूध रस्त्यावर फेकणं ही गोष्ट आपल्या डोळ्यांच्याही वळणी पडलीय. लॉकडाऊनमधे तर सारंकाही बंद आहे. हॉटेल, सणसमारंभ सगळ्यांवर बंधनं आलीत. पण दुधाचा भाव मात्र तेवढाच आहे. आणि शेतकरीही रस्त्यावर दूध सांडताना दिसत नाहीत. यावर शेतकऱ्यांनी काय आयडिया शोधून काढलीय आणि अजून काय करणं बाकी आहे, ते सांगणारी ही गोष्ट.
भाव नसल्याने शेतमाल, दूध रस्त्यावर फेकणं ही गोष्ट आपल्या डोळ्यांच्याही वळणी पडलीय. लॉकडाऊनमधे तर सारंकाही बंद आहे. हॉटेल, सणसमारंभ सगळ्यांवर बंधनं आलीत. पण दुधाचा भाव मात्र तेवढाच आहे. आणि शेतकरीही रस्त्यावर दूध सांडताना दिसत नाहीत. यावर शेतकऱ्यांनी काय आयडिया शोधून काढलीय आणि अजून काय करणं बाकी आहे, ते सांगणारी ही गोष्ट......
महाराष्ट्राची निर्मिती फक्त भाषक अस्मितेतून झाल्याचं आजच्या पिढीला वाटतं. या गैरसमजाचं कारण या पिढीला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा लढा नीट माहीत नाही. हा संघर्ष प्रामुख्याने मुंबईतले अमराठी भांडवलदार आणि मराठी कामगार यांच्यातला होता. हा वर्गसंघर्ष होता. कष्टकऱ्यांचं राज्य व्हावं, म्हणून हा महाराष्ट्र निर्माण झालाय. `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेत आजची मांडणी करत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर.
महाराष्ट्राची निर्मिती फक्त भाषक अस्मितेतून झाल्याचं आजच्या पिढीला वाटतं. या गैरसमजाचं कारण या पिढीला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा लढा नीट माहीत नाही. हा संघर्ष प्रामुख्याने मुंबईतले अमराठी भांडवलदार आणि मराठी कामगार यांच्यातला होता. हा वर्गसंघर्ष होता. कष्टकऱ्यांचं राज्य व्हावं, म्हणून हा महाराष्ट्र निर्माण झालाय. `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेत आजची मांडणी करत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर......
दि.पु. चित्रेंनी म्हटलंय, `समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्य शोधण्यासाठी मला फ्रेंच राज्यक्रांतीत जावं लागत नाही, ती मला इथेच वारकरी विचारांत सापडतात.` हाच महाराष्ट्रधर्म आहे आणि आयडिया ऑफ महाराष्ट्रही. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी या लेखात इतिहास भूगोलाचा धांडोळा घेत महाराष्ट्रातला महान मूल्यसंचय नेमकेपणाने मांडलाय. कोलाजच्या `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेतला एक महत्त्वाचा लेख.
दि.पु. चित्रेंनी म्हटलंय, `समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्य शोधण्यासाठी मला फ्रेंच राज्यक्रांतीत जावं लागत नाही, ती मला इथेच वारकरी विचारांत सापडतात.` हाच महाराष्ट्रधर्म आहे आणि आयडिया ऑफ महाराष्ट्रही. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी या लेखात इतिहास भूगोलाचा धांडोळा घेत महाराष्ट्रातला महान मूल्यसंचय नेमकेपणाने मांडलाय. कोलाजच्या `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेतला एक महत्त्वाचा लेख......
संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात येण्याच्या पाच महिने आधीच यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप सांगितला होता. ते तेव्हा विशाल द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. ५ जानेवारी १९६०ला सांगलीत झालेल्या सभेत त्यांनी अगदी सविस्तर नव्या महाराष्ट्राचा विचार सांगितला होता. त्यांची आयडिया ऑफ महाराष्ट्र सांगणारं हे भाषण नव्या राज्यासमोरच्या समस्या, त्यांच्यावरचे अक्सीर इलाज आणि नवनिर्मितीची दिशा सांगतं. हे त्यांचं महत्त्वाचं भाषण.
संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात येण्याच्या पाच महिने आधीच यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप सांगितला होता. ते तेव्हा विशाल द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. ५ जानेवारी १९६०ला सांगलीत झालेल्या सभेत त्यांनी अगदी सविस्तर नव्या महाराष्ट्राचा विचार सांगितला होता. त्यांची आयडिया ऑफ महाराष्ट्र सांगणारं हे भाषण नव्या राज्यासमोरच्या समस्या, त्यांच्यावरचे अक्सीर इलाज आणि नवनिर्मितीची दिशा सांगतं. हे त्यांचं महत्त्वाचं भाषण. .....
छत्रपती शिवराय. यशवंतराव चव्हाणांच्या शब्दांत सांगायचं तर महाराष्ट्राचा परमेश्वर. या परमेश्वराच्या जयंतीला २७ एप्रिल १९६०ला नव्या राज्याचा आनंदोत्सव सुरू झाला. यशवंतरावांनी शिवनेरीवर जाऊन नवं राज्य घडवण्याचा विडा उचलला. महाराष्ट्र हे शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य असेल, म्हणजे नेमकं काय, याचा उहापोह करणारं एक भाषणही तिथे दिलं. आजही साठ वर्षांनंतरही हे भाषण आपल्याला दिशा दाखवतं.
छत्रपती शिवराय. यशवंतराव चव्हाणांच्या शब्दांत सांगायचं तर महाराष्ट्राचा परमेश्वर. या परमेश्वराच्या जयंतीला २७ एप्रिल १९६०ला नव्या राज्याचा आनंदोत्सव सुरू झाला. यशवंतरावांनी शिवनेरीवर जाऊन नवं राज्य घडवण्याचा विडा उचलला. महाराष्ट्र हे शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य असेल, म्हणजे नेमकं काय, याचा उहापोह करणारं एक भाषणही तिथे दिलं. आजही साठ वर्षांनंतरही हे भाषण आपल्याला दिशा दाखवतं......
नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं.
नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं......
राजभवनात १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नव्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी छोटंसं भाषण केलं. हिमालयावर संकट आलं तर सह्याद्री काळ्या पत्थराची छाती करून संरक्षणासाठी उभा राहिल, अशी ग्वाही या भाषणात दिली आणि पुढे हे आश्वासन सत्यात उतरवलंही. ते हे भाषण.
राजभवनात १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नव्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी छोटंसं भाषण केलं. हिमालयावर संकट आलं तर सह्याद्री काळ्या पत्थराची छाती करून संरक्षणासाठी उभा राहिल, अशी ग्वाही या भाषणात दिली आणि पुढे हे आश्वासन सत्यात उतरवलंही. ते हे भाषण......
१ मे १९६०च्या सकाळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते राजभवनात महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मंत्रालयात म्हणजे तेव्हाच्या सचिवालयात संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचं भाषण झालं. नव्या राज्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, हे आपल्या सहकाऱ्यांना सांगणारं हे भाषण महत्त्वाचं आहे. म्हणून हे भाषण जसंच्या तसं.
१ मे १९६०च्या सकाळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते राजभवनात महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मंत्रालयात म्हणजे तेव्हाच्या सचिवालयात संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचं भाषण झालं. नव्या राज्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, हे आपल्या सहकाऱ्यांना सांगणारं हे भाषण महत्त्वाचं आहे. म्हणून हे भाषण जसंच्या तसं......
सामाजिक न्याय संकल्पनेच्या वा पुरोगामित्वाच्या संकल्पनांचा दबदबा महाराष्ट्राच्या समाजजीवनात आजही निर्माण झालेला का दिसत नाही?, `आयडिया ऑफ महाराष्ट्र` मांडताना असे अनेक प्रश्न उभे करत आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातले महत्त्वाचे विचारवंत, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे.
सामाजिक न्याय संकल्पनेच्या वा पुरोगामित्वाच्या संकल्पनांचा दबदबा महाराष्ट्राच्या समाजजीवनात आजही निर्माण झालेला का दिसत नाही?, `आयडिया ऑफ महाराष्ट्र` मांडताना असे अनेक प्रश्न उभे करत आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातले महत्त्वाचे विचारवंत, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे......
आज कोरोनाशी झुंजणारा महाराष्ट्र आपल्याला `आयडिया ऑफ महाराष्ट्र` खऱ्या अर्थाने समजावून सांगतोय. पुढची आव्हानं पेलण्यासाठीही हीच `आयडिया ऑफ महाराष्ट्र` आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्याची मुहूर्तमेढ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी घातलीय. तो यशवंतराव नावाचा विचार काय आहे, ते हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिनानिमित्त सांगत आहेत, महाराष्ट्राचे नेते शरद पवार.
आज कोरोनाशी झुंजणारा महाराष्ट्र आपल्याला `आयडिया ऑफ महाराष्ट्र` खऱ्या अर्थाने समजावून सांगतोय. पुढची आव्हानं पेलण्यासाठीही हीच `आयडिया ऑफ महाराष्ट्र` आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्याची मुहूर्तमेढ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी घातलीय. तो यशवंतराव नावाचा विचार काय आहे, ते हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिनानिमित्त सांगत आहेत, महाराष्ट्राचे नेते शरद पवार......
महाराष्ट्र हा फक्त एक जमिनीचा तुकडा नाही. महाराष्ट्र हा फक्त नकाशाचा आकार नाही. महाराष्ट्र हा एक विचार आहे. महाराष्ट्र हा एक मूल्यसंचय आहे. महाराष्ट्र हे एक तत्त्व आहे. पण आज साठाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त ते नव्याने शोधायला हवंय. त्यासाठी कोलाज `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या मालिकेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना लिहितं करतंय.
महाराष्ट्र हा फक्त एक जमिनीचा तुकडा नाही. महाराष्ट्र हा फक्त नकाशाचा आकार नाही. महाराष्ट्र हा एक विचार आहे. महाराष्ट्र हा एक मूल्यसंचय आहे. महाराष्ट्र हे एक तत्त्व आहे. पण आज साठाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त ते नव्याने शोधायला हवंय. त्यासाठी कोलाज `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या मालिकेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना लिहितं करतंय......
लॉकडाऊन असताना आपल्या परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी आडवळणानं गुजरातकडे निघालेल्या तिघांची एका झुंडीनं हत्या केली. महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सीमेवरच्या झुंडबळीच्या घटनेनं सारा देश हादरलाय. चार दिवसांनी अचानक देशाचं पॉलिटिक्स ढवळून काढणाऱ्या या घटनेचे रोज नवेनवे अँगल समोर येताहेत. या निमित्तानं काही प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजेत.
लॉकडाऊन असताना आपल्या परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी आडवळणानं गुजरातकडे निघालेल्या तिघांची एका झुंडीनं हत्या केली. महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सीमेवरच्या झुंडबळीच्या घटनेनं सारा देश हादरलाय. चार दिवसांनी अचानक देशाचं पॉलिटिक्स ढवळून काढणाऱ्या या घटनेचे रोज नवेनवे अँगल समोर येताहेत. या निमित्तानं काही प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजेत......
राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या मराठी माणसाला राजेश टोपे हे नाव अनोळखी नाही. पण आता हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलंय. इतकंच नाही, तर देशभरातल्या जाणकारांनाही टोपेंचा परिचय झालाय. ही ओळख आहे एक संवेदनशील तरीही कार्यक्षम, अभ्यासू तरीही विनम्र आणि लढाऊ तरीही संयत कर्तृत्वाचा नेता म्हणून. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्री म्हणून नेतृत्व करणाऱ्या या नेत्याची ही ओळख.
राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या मराठी माणसाला राजेश टोपे हे नाव अनोळखी नाही. पण आता हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलंय. इतकंच नाही, तर देशभरातल्या जाणकारांनाही टोपेंचा परिचय झालाय. ही ओळख आहे एक संवेदनशील तरीही कार्यक्षम, अभ्यासू तरीही विनम्र आणि लढाऊ तरीही संयत कर्तृत्वाचा नेता म्हणून. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्री म्हणून नेतृत्व करणाऱ्या या नेत्याची ही ओळख......
पालघरमधे कल्पवृक्षगिरी महाराजांसह इतर दोघांची एका झुंडीनं हत्या केली. मॉब लिंचिंग करणाऱ्या समाजात आत्ता साधुसंतही सुरक्षित राहिले नाहीत. विश्वास एवढा गमावून बसलोय की जमावाचं टाळकं सरकून जातं. ते समोर कोण आहे हे साधं बघतही नाहीत. त्यांना एवढंच माहीत असतं की आपण आत्ता हत्येच्या कर्मात सामील आहोत. कारण आपल्या आजूबाजूचा लोकही या कर्मात सामील आहेत.
पालघरमधे कल्पवृक्षगिरी महाराजांसह इतर दोघांची एका झुंडीनं हत्या केली. मॉब लिंचिंग करणाऱ्या समाजात आत्ता साधुसंतही सुरक्षित राहिले नाहीत. विश्वास एवढा गमावून बसलोय की जमावाचं टाळकं सरकून जातं. ते समोर कोण आहे हे साधं बघतही नाहीत. त्यांना एवढंच माहीत असतं की आपण आत्ता हत्येच्या कर्मात सामील आहोत. कारण आपल्या आजूबाजूचा लोकही या कर्मात सामील आहेत......
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली......
कोरोना आला तेव्हापासून देशभरातले बहुसंख्य मंत्रीसंत्री चूपचाप घरात बंद झालेत. पण बच्चू कडूंसारखे लोकांत राहणारे लोकांचे नेते महिला बालकल्याण, शालेय शिक्षण अशा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून लोकांना धीर देत फिरत राहिले. पण अचानक त्यांनाच कोरोना झाल्याची शंका डॉक्टरांना आली. तीन दिवस ते स्वतःचा मृत्यू डोळ्यांनी पाहत होते. त्या दिवसांची घालमेल त्यांच्याच शब्दांत सांगणारा हा लेख.
कोरोना आला तेव्हापासून देशभरातले बहुसंख्य मंत्रीसंत्री चूपचाप घरात बंद झालेत. पण बच्चू कडूंसारखे लोकांत राहणारे लोकांचे नेते महिला बालकल्याण, शालेय शिक्षण अशा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून लोकांना धीर देत फिरत राहिले. पण अचानक त्यांनाच कोरोना झाल्याची शंका डॉक्टरांना आली. तीन दिवस ते स्वतःचा मृत्यू डोळ्यांनी पाहत होते. त्या दिवसांची घालमेल त्यांच्याच शब्दांत सांगणारा हा लेख......
सभोवती काळाची काजळी पसरलेली असताना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातून आनंदाची बातमी आलीय. महाराष्ट्रातले कोरोनाच्या संसर्गानं कोविड-१९ आजाराचं पहिलं पेशंट असणारं एक जोडपं खडखडीत बरं होऊन घरी परतलंय. या सगळ्या प्रवासाचे सहभागी साक्षीदार असणारे डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यावर एक कविता लिहिलीय. ती वाचली तर आपलाही जगण्यावरचा विश्वास वाढेल.
सभोवती काळाची काजळी पसरलेली असताना ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातून आनंदाची बातमी आलीय. महाराष्ट्रातले कोरोनाच्या संसर्गानं कोविड-१९ आजाराचं पहिलं पेशंट असणारं एक जोडपं खडखडीत बरं होऊन घरी परतलंय. या सगळ्या प्रवासाचे सहभागी साक्षीदार असणारे डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यावर एक कविता लिहिलीय. ती वाचली तर आपलाही जगण्यावरचा विश्वास वाढेल......
मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारविरोधात ऑपरेशन कमळ राबवण्यात येतंय. पण ही मोहीम भाजप फत्ते करणार की कमलनाथ हे अजून गुलदस्त्यातच आहे. कारण काल पहिल्याच दिवशी विधानसभेचं अधिवेशन कोरोनामुळं २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलंय. दुसरीकडे भाजपनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याची मागणी केलीय.
मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारविरोधात ऑपरेशन कमळ राबवण्यात येतंय. पण ही मोहीम भाजप फत्ते करणार की कमलनाथ हे अजून गुलदस्त्यातच आहे. कारण काल पहिल्याच दिवशी विधानसभेचं अधिवेशन कोरोनामुळं २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलंय. दुसरीकडे भाजपनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याची मागणी केलीय......
१९९५ मधे शिवसेना भाजपचं युती सरकार होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छेने मंत्रालयात कुसुमाग्रजांची स्वातंत्र्यदेवतेस विनवणीचे पोस्टर लावले होते. पण त्यानुसार कुणी वागताना दिसलं नाही. आता उद्धव ठाकरे त्याच्या दहा पावलं पुढं गेलेत. त्यांनी गाडगेबाबांची दशसुत्री मंत्रालयाच्या गेटवरच लावलीय. आता त्यानुसार वागण्याचं आव्हान त्यांच्या सरकारपुढे आहे. ते आव्हान सोपं नाही.
१९९५ मधे शिवसेना भाजपचं युती सरकार होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छेने मंत्रालयात कुसुमाग्रजांची स्वातंत्र्यदेवतेस विनवणीचे पोस्टर लावले होते. पण त्यानुसार कुणी वागताना दिसलं नाही. आता उद्धव ठाकरे त्याच्या दहा पावलं पुढं गेलेत. त्यांनी गाडगेबाबांची दशसुत्री मंत्रालयाच्या गेटवरच लावलीय. आता त्यानुसार वागण्याचं आव्हान त्यांच्या सरकारपुढे आहे. ते आव्हान सोपं नाही......
महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या महिलांच्या प्रश्नांवर ५ मार्च २०२० ला अर्ध्या दिवसाची विशेष चर्चा झाली. त्यापैकी विधानसभेत आपल्या लोकप्रतिनिधींनी काय मांडलं, हे ऐकण्यासाठी पत्रकार शर्मिष्ठा भोसले विशेष उपस्थित होत्या. सात तास चाललेल्या या चर्चेचं हे रिपोर्टिंग आपण सगळ्यांनी वाचायलाच हवं.
महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या महिलांच्या प्रश्नांवर ५ मार्च २०२० ला अर्ध्या दिवसाची विशेष चर्चा झाली. त्यापैकी विधानसभेत आपल्या लोकप्रतिनिधींनी काय मांडलं, हे ऐकण्यासाठी पत्रकार शर्मिष्ठा भोसले विशेष उपस्थित होत्या. सात तास चाललेल्या या चर्चेचं हे रिपोर्टिंग आपण सगळ्यांनी वाचायलाच हवं. .....
ठाकरे सरकारचं पहिलंवहिलं बजेट आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलं. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर एकत्र येऊन सत्ता स्थापन करणाऱ्या सरकारचं बजेट नेमकं कसं असणार याकडे निव्वळ महाराष्ट्राचंच नाही तर अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं. अशा या लक्षवेधी बजेटमधल्या ७ महत्त्वाच्या गोष्टी.
ठाकरे सरकारचं पहिलंवहिलं बजेट आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलं. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर एकत्र येऊन सत्ता स्थापन करणाऱ्या सरकारचं बजेट नेमकं कसं असणार याकडे निव्वळ महाराष्ट्राचंच नाही तर अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं. अशा या लक्षवेधी बजेटमधल्या ७ महत्त्वाच्या गोष्टी......
विधानसभेतल्या गौरव प्रस्तावामुळे वीर सावरकरांना भारतरत्न का दिला जात नाही अशी चर्चा पुन्हा सुरू झालीय. राज्य सरकारच्या राष्ट्रपुरुषांच्या यादीतही सावरकरांचं नाव नसल्याचा खुलासा लोकसत्ताने केलाय. राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकरांचं नाव चुकून विसरलो म्हणणारे भाजपवाले भारतरत्नाची मागणी कसे करू शकतात?
विधानसभेतल्या गौरव प्रस्तावामुळे वीर सावरकरांना भारतरत्न का दिला जात नाही अशी चर्चा पुन्हा सुरू झालीय. राज्य सरकारच्या राष्ट्रपुरुषांच्या यादीतही सावरकरांचं नाव नसल्याचा खुलासा लोकसत्ताने केलाय. राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकरांचं नाव चुकून विसरलो म्हणणारे भाजपवाले भारतरत्नाची मागणी कसे करू शकतात?.....
प्रियांका रेड्डी बलात्कार प्ररकणानंतर आंध्र प्रदेश सरकारनं दिशा कायदा लागू केला. यात बलात्काराच्या खटलाचा २१ दिवसांत निकाल लावण्याची तरतूद आहे. हिंगणघाट प्रकरणानंतर महाराष्ट्रातही असाच कायदा लागू करण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केलीय. त्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आलीय. असं काय वैशिष्ट्य आहे या कायद्याचं?
प्रियांका रेड्डी बलात्कार प्ररकणानंतर आंध्र प्रदेश सरकारनं दिशा कायदा लागू केला. यात बलात्काराच्या खटलाचा २१ दिवसांत निकाल लावण्याची तरतूद आहे. हिंगणघाट प्रकरणानंतर महाराष्ट्रातही असाच कायदा लागू करण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केलीय. त्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आलीय. असं काय वैशिष्ट्य आहे या कायद्याचं? .....
गांधी आणि आंबेडकर या विचार परंपरेची जागा आता नथुरामी द्वेषाचं आणि भेदभावाचं राजकारण घेतंय. भारताची बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक ओळख पुसून ती एका रंगात रंगवण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाची एकता आणि लोकांमधला बंधूभाव घट्ट करूनच या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. संजय राऊत यांनी सामनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणूनच आश्वासक आहे.
गांधी आणि आंबेडकर या विचार परंपरेची जागा आता नथुरामी द्वेषाचं आणि भेदभावाचं राजकारण घेतंय. भारताची बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक ओळख पुसून ती एका रंगात रंगवण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाची एकता आणि लोकांमधला बंधूभाव घट्ट करूनच या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. संजय राऊत यांनी सामनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणूनच आश्वासक आहे......
भारतीय सिनेमाच्या इतिहासात ११ फेब्रुवारी १९२० हा दिवस महत्त्वाचाय. पुण्यातल्या आर्यन थिएटरमधे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा गौरव करण्यात आला. याच समारंभात टिळकांनी बाबुरावांना ‘सिनेमा केसरी’ असं संबोधलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘सैरंध्री’ सिनेमाच्या निर्मितीबद्दलचा हा गौरव होता. आज या सिनेमानं शंभरी गाठलीय.
भारतीय सिनेमाच्या इतिहासात ११ फेब्रुवारी १९२० हा दिवस महत्त्वाचाय. पुण्यातल्या आर्यन थिएटरमधे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा गौरव करण्यात आला. याच समारंभात टिळकांनी बाबुरावांना ‘सिनेमा केसरी’ असं संबोधलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘सैरंध्री’ सिनेमाच्या निर्मितीबद्दलचा हा गौरव होता. आज या सिनेमानं शंभरी गाठलीय......
कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत.
कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत......
महाराष्ट्र सरकार लंडन आय च्या धर्तीवर आपल्या मुंबईतही एक प्रचंड मोठा पाळणा उभारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल याची घोषणा केली. बांद्रा वरळी सी लिंकजवळच्या एका कोपऱ्यात हा मुंबई आय प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केलीय. यानिमित्ताने लंडन आयचा हा धावता पण रंजक आढावा.
महाराष्ट्र सरकार लंडन आय च्या धर्तीवर आपल्या मुंबईतही एक प्रचंड मोठा पाळणा उभारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल याची घोषणा केली. बांद्रा वरळी सी लिंकजवळच्या एका कोपऱ्यात हा मुंबई आय प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केलीय. यानिमित्ताने लंडन आयचा हा धावता पण रंजक आढावा......
महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्या. ब्रिजमोहन लोया संशयास्पद मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचे संकेत दिलेत. लोया प्रकरणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप झालेत. त्यामुळे देशमुखांनी खरंच हिंमत दाखवली तर लोया प्रकरणात राजकारण उलटंपालटं करण्याची ताकद आहे. म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय आहे, हे समजून घ्यायला हवंय.
महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्या. ब्रिजमोहन लोया संशयास्पद मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचे संकेत दिलेत. लोया प्रकरणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप झालेत. त्यामुळे देशमुखांनी खरंच हिंमत दाखवली तर लोया प्रकरणात राजकारण उलटंपालटं करण्याची ताकद आहे. म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय आहे, हे समजून घ्यायला हवंय......
महाविकास आघाडी सरकारने नागपुरात विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. या कर्जमाफीची नियमावली म्हणजेच शासनादेश काल रात्री उशिरा जारी करण्यात आला. या नियम अटींमुळे विरोधकांनी चहुबाजुंनी घेरत उद्धव ठाकरे सरकारवर सरसकट विश्वासघाताचा आरोप केलाय. ठाकरे सरकारच्या पहिल्या मोठ्या निर्णयावर टीका होतेय.
महाविकास आघाडी सरकारने नागपुरात विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. या कर्जमाफीची नियमावली म्हणजेच शासनादेश काल रात्री उशिरा जारी करण्यात आला. या नियम अटींमुळे विरोधकांनी चहुबाजुंनी घेरत उद्धव ठाकरे सरकारवर सरसकट विश्वासघाताचा आरोप केलाय. ठाकरे सरकारच्या पहिल्या मोठ्या निर्णयावर टीका होतेय......
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आला. भाजपने १५ पैकी १३ जागांवर आघाडी घेतलीय. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएस यांचा सुपडा साफ झालाय. या निकालाने पोटनिवडणुकीत पराभवाची आपली परंपरा भाजपने मोडीत काढलीय. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारने या निकालातून धडा घेतला पाहिजे.
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आला. भाजपने १५ पैकी १३ जागांवर आघाडी घेतलीय. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएस यांचा सुपडा साफ झालाय. या निकालाने पोटनिवडणुकीत पराभवाची आपली परंपरा भाजपने मोडीत काढलीय. पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारने या निकालातून धडा घेतला पाहिजे......
हरियाणात जननायक जनता पार्टीच्या नवोदित नेत्याला हाताशी धरून कसंबसं सरकार स्थापन करण्यात पक्षाला यश आलं. महाराष्ट्रात मात्र कुरघोडीच्या राजकारणात ३० वर्षांपासूनचा जुना साथीदार असलेल्या शिवसेनेने भाजपला अस्मान दाखवलंय. अपयशाच्या गर्तेतून नेते आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचं खडतर आव्हान भाजपसमोर आहे. त्यामुळेच झारखंडची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची बनलीय.
हरियाणात जननायक जनता पार्टीच्या नवोदित नेत्याला हाताशी धरून कसंबसं सरकार स्थापन करण्यात पक्षाला यश आलं. महाराष्ट्रात मात्र कुरघोडीच्या राजकारणात ३० वर्षांपासूनचा जुना साथीदार असलेल्या शिवसेनेने भाजपला अस्मान दाखवलंय. अपयशाच्या गर्तेतून नेते आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचं खडतर आव्हान भाजपसमोर आहे. त्यामुळेच झारखंडची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची बनलीय......
महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा वारसा आहे. महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही विचारांचा वारसा आहे. ही तीन नावं घेत महाराष्ट्र भाजपपुढे झुकणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. तोच टर्निंग पॉईंट होता. सांगत आहेत, लोकभारतीचे प्रमुख आणि विधानपरिषदतले शिक्षक आमदार कपिल पाटील.
महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा वारसा आहे. महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही विचारांचा वारसा आहे. ही तीन नावं घेत महाराष्ट्र भाजपपुढे झुकणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. तोच टर्निंग पॉईंट होता. सांगत आहेत, लोकभारतीचे प्रमुख आणि विधानपरिषदतले शिक्षक आमदार कपिल पाटील......
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता २५ दिवस उलटलेत. सत्ता कुणाची येणार हेच काही स्पष्ट होताना दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढवलीय. दोन टोकांच्या विचारधारेचे हे पक्ष एका कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, असं या पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता २५ दिवस उलटलेत. सत्ता कुणाची येणार हेच काही स्पष्ट होताना दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढवलीय. दोन टोकांच्या विचारधारेचे हे पक्ष एका कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, असं या पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय......
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका वेगळ्या प्रकारचं महाभारत बघायला मिळतंय. कौरव, पांडवांमधे सत्तेवरून भांडणं झाली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यापर्यंत गोष्टी गेल्या. आणि नंतर महाशिवआघाडीची चर्चा जोर धरू लागली. काय आहे हे महाभारत?
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका वेगळ्या प्रकारचं महाभारत बघायला मिळतंय. कौरव, पांडवांमधे सत्तेवरून भांडणं झाली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यापर्यंत गोष्टी गेल्या. आणि नंतर महाशिवआघाडीची चर्चा जोर धरू लागली. काय आहे हे महाभारत?.....
महाराष्ट्रातला सत्तापेचाला काल नवी कलाटणी मिळाली. ज्यांच्याकडे कुणी साधा विरोधी पक्ष म्हणूनही बघत नव्हतं त्यांच्यावरच आता किंग होण्याची जबाबदारी आलीय. ही वेळ भाजप, शिवसेनेमुळे आलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या बोलणीलाही काल खीळ बसली. आता काँग्रेस आघाडीकडे स्वतःहून नव्या काळातलं, नवं राजकारण उभारण्याची संधी आलीय.
महाराष्ट्रातला सत्तापेचाला काल नवी कलाटणी मिळाली. ज्यांच्याकडे कुणी साधा विरोधी पक्ष म्हणूनही बघत नव्हतं त्यांच्यावरच आता किंग होण्याची जबाबदारी आलीय. ही वेळ भाजप, शिवसेनेमुळे आलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या बोलणीलाही काल खीळ बसली. आता काँग्रेस आघाडीकडे स्वतःहून नव्या काळातलं, नवं राजकारण उभारण्याची संधी आलीय......