संपूर्ण लेख

उत्तरप्रदेशमधे ताकदीने उतरलेल्या भाजपच्या मानसिक पराभवाचं काय? 

१० मार्चला ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागेल. उत्तरप्रदेशकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. उत्तरप्रदेशमधे हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण तसाच सरकारी योजनांचा गाजावाजा यांचे प्रयत्न झाले. यावर भाष्य करणारी एनडीटीवी इंडियाचे संपादक रवीश कुमार यांची फेसबुक पोस्ट.
संपूर्ण लेख

पंतप्रधानांच्या सुरक्षेतली चूक नेत्यांसाठी इवेंट, टीवीसाठी कंटेंट?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंजाब दौरा सुरक्षेच्या कारणामुळे कमी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणानं अधिकच तापला. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्यामुळे त्यावर गांभीर्याने चर्चा, त्याची चौकशी होणं अपेक्षित होतं. पण हा मुद्दा इवेंट आणि कंटेंटमधेच गुरफटून पडला. त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिलेत. यावर भाष्य करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टचं हे शब्दांकन.
संपूर्ण लेख

२०२१मधे भारताने गमावलेल्या विवेकाची गोष्ट – २

कोरोना वायरसमुळे गेल्या वर्षभरात कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाली. वेंटिलेटर, बेड, ऑक्सिजनअभावी लोकांचा तडफडून मृत्यू झाला. सरकारची भूमिका मात्र सब चंगा सी अशीच होती. देश सुतकात असताना सरकार राजेशाही कार्यक्रमांमधे दंग होतं. या सगळ्या भानगडीत लोकांनी आपली ‘ती’ गोष्ट म्हणजेच विवेक कसा हरवलाय ते सांगतायत ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार.
संपूर्ण लेख

२०२१मधे भारताने गमावलेल्या विवेकाची गोष्ट – १

२०२१ला बाय-बाय करण्याची वेळ आलीय. वर्षभरात अनेक घडामोडी घडल्यात. कोरोना वायरस होताच पण त्याच सोबतीनं बेरोजगारीचे आकडेही डोळे पांढरे करणारे होते. पेट्रोल-डिझेलसोबत महागाईही वाढत होती. सर्वसामान्य लोकांना मात्र याचा विसर पडला. भारतात नव्या कॅटेगरींचा झालेला उदय यामागचं खरं कारण होतं. त्याबद्दल सांगतायत ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार. त्यांच्या एनडीटीवीवरच्या प्राईम टाईमचं हे शब्दांकन.
संपूर्ण लेख

विनोद दुआ: न पाहता आठवणं, बघून समाधान देणं

ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध टीवी अँकर विनोद दुआ यांचं निधन झालंय. विनोद दुआ भारताच्या टीवी पत्रकारितेतलं एक महत्वाचं नाव होतं. बोलण्यातल्या सहजतेमुळे त्यांचं नेमकं बोलणं लोकांपर्यंत पोचायचं. त्यांचं निर्भीडपणे प्रश्न विचारणं शेवटपर्यंत चालू राहिलं. एनडीटीवीचे संपादक रवीश कुमार यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना फेसबुक पोस्टमधून उजाळा दिलाय. त्या पोस्टचा हा अनुवाद.
संपूर्ण लेख

काश्मिरी पंडित आणि स्थानिक नागरिकांच्या हत्येचे प्रश्न सरकारला नकोत

श्रीनगरमधली दहशतवादी संघटना टीआरएफ काश्मीर खोऱ्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करतेय. अल्पसंख्यांकामधे भीतीचं वातावरण आहे. दहशतवादी अनेक निष्पाप मुस्लिमांनाही मारतायत. त्यांचा जीव केवळ काश्मिरी मुस्लिमांसाठी नाही तर काश्मिरी पंडितांसाठीही गेलाय. पण या हत्यांना धार्मिक रंग देऊन एक प्रपोगंडा चालवला जातोय. यावर भाष्य करणा-या ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद.
संपूर्ण लेख

संसदेच्या सभागृहांचे पालक योग्य भूमिका घेत आहेत का?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. पेगासस सारख्या मुद्यांमुळे विरोधी पक्ष मोदी सरकारविरोधात आक्रमक झाले. राज्यसभेत विमा विधेयक आलं आणि गदारोळ झाला. लोकशाहीसाठी ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचं म्हणत भर सभागृहात राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या अश्रूंचा बांध फुटला. या सगळ्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांची ही फेसबूक पोस्ट.
संपूर्ण लेख

संकटं, संघर्ष आणि फाळणीत संधी शोधत मुंजाल कुटुंबाने बनवली ‘हिरो’

‘हिरो होंडा’ म्हणजे देश की धडकन! ‘हिरो’च्या दर्जेदार गाड्या आज भारताच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या रस्त्यावरून फिरतात. त्याच्या उभारणीसाठी मुंजाल कुटुंबातल्या चार भावांनी केलेल्या संघर्षामुळे हे शक्य झालंय. या संघर्षाची गोष्ट सांगणारं हिंदी पुस्तक ‘हिरो की कहानी’ २४ मार्चला प्रकाशित झालंय. या पुस्तकावर पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा अनुवाद.
संपूर्ण लेख

२०२० ला अलविदा करण्याच्या भानगडीत पडू नका ते जाणारं वर्ष नाहीय

२०२० जात नाहीय. जाणारही नाही. हे वर्ष आपलं कॅलेंडर घेऊन आलंय. ते याआधीच्याच अनेक वर्षांचं आहे. पुढच्या अनेक वर्षांसाठी ते आलंय. प्रगतीच्या वाटेवरून हे जग चालत होतं त्या प्रवासातलं महत्त्वाचं सामान कुठंतरी मागे सुटलंय. त्याची आठवण करून द्यायला २०२० आलंय. हे वर्ष आपल्या पाठीवर वेताळासारखं बसलंय. त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तरं आपण शोधू तेव्हाच ते खाली उतरेल. स्वतःची फसवणूक करणाऱ्यांसाठी २०२१ आलंय. फसवणुकीची जाणीव असलेल्यांना माहितीय २०२० अनेक वर्ष चालेल.
संपूर्ण लेख

सरकारचा प्रस्ताव धुडकावणारे शेतकरी अंबानी, अदानीशी लढू शकतील?

शेतकऱ्यांनी अंबानी, अदानी यांच्या विरोधात आंदोलन करून मोठा धोका पत्करलाय. त्यांच्या प्रभावाखाली असलेला मीडिया आता अधिक आक्रमक होईल. या गोदी मीडिया बरोबरही संघर्ष करावा लागेल. शेतकऱ्यांनाही मीडिया शिवायच्या आंदोलनाची सवय लावावी लागेल. मीडिया कॉर्पोरेटचं आहे. शेतकऱ्यांचं नाही. गोदी मीडियासाठी शेतकरी दहशतवादी, खलिस्तानी आहेत. त्यामुळे शेतकरी चारही बाजूनं कचाट्यात सापडलेत. गोष्ट केवळ कायद्याची नाहीय तर अस्तित्वाची आहे.