तर वंचितला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं असतं
राजकारणात कुणी कधीच कुणाचाही पूर्णवेळ शत्रु नसतो. पण मित्र मात्र सदासर्वकाळ असतो. फडणवीसांनी हीच चूक केली. अत्यंत डूख धरून राजकारण केलं. पाताळयंत्री भूमिका बजावल्या. आज मँडेट हाती असूनही घरी बसावं लागलंय. त्यांना मित्र जोडता आलं नाही, असं मत पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट वैभव छाया यांनी एका फेसबूक पोस्टमधून नोंदवलंय. त्या पोस्टचा हा संपादित अंश.