lock
संपूर्ण लेख

तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

दिवाळी अंक ही महाराष्ट्राची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकांच्या मांडणीत अनेक उलटफेर झालेत. दिवाळी अंकांची परंपरा पुढे नेण्यासाठी तरुणांनीही मोठा पुढाकार घेतलाय. यंदाच्या दिवाळी अंकांचा ज्येष्ठ कवी, साहित्यिक पी. विठ्ठल यांनी धावता आढावा घेतलाय.
lock
संपूर्ण लेख

आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?

शरद पवारांचा सहा दिवसांचा दौरा काल संपला. अनेक दशकं सत्तेचं बळ दिलेले सरदार सोडून गेल्यावर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न घेऊन हा दौरा सुरू झाला. पण संपताना या दौऱ्याने एक नवाच प्रश्न उभा केलाय. आजोबांच्या वयाच्या शरद पवारांना तरुणांमधून एवढा मोठा प्रतिसाद का मिळतोय?
lock
संपूर्ण लेख

काश्मीरसारखी मेगा नोकरभरती, सरकार इतर राज्यांत का करत नाही?

जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्याला आता महिना होतोय. अजून तिथे संचारबंदी आहे. मोबाईल, इंटरनेट सेवा बंद आहे. परिस्थिती रूळावर यावी म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करतंय. सरकारने काश्मीरमधल्या ५० हजार रिक्त जागा भरण्याची घोषणा केलीय. काश्मीरमधल्या रिकाम्या जागा भरायला तयार असलेलं सरकार इतर राज्यांत अशी भूमिका का घेत नाही, असा सवाल निर्माण होतोय.
lock
संपूर्ण लेख

बॅननंतरही टिक टॉक वाजतं जोरात

अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असा पीजे आपण खूपदा ऐकलाय. सध्या मोबाईलला आपण सावलीसारखं जवळ ठेवतो. त्यातले अॅप जणू आपले मित्रच झालेत. सध्या टिक टॉक मित्र आपल्यापासून दुरावलाय. पण तो आधीपासूनच आपल्या मोबाईलवर सेव असेल तर तो आपल्या सोबतच असेल.
lock
संपूर्ण लेख

राहुल गांधींच्या संवादामुळे मराठी तरुण काँग्रेसकडे वळणार?

काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी शुक्रवारी पुण्यातल्या तरुणांशी संवाद साधला. तरुणांच्या प्रश्नांना उत्तर दिली. सोशल मीडियावर काल दिवसभर राहुल गांधींच्या या कार्यक्रमाची चर्चा होती. हा कार्यक्रम पुण्यात घेत काँग्रेसने महाराष्ट्रातल्या तरुणाईपुढे आपला अजेंडा मांडला. या कार्यक्रमाचा हा लाईव रिपोर्ट.
lock
संपूर्ण लेख

राहुल गांधी ७२ हजारांत गरिबीवर वार कसा करणार?

आजवर नरेंद्र मोदींवर टीका या निगेटिव अजेंड्यावर असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यातून आपला टोन बदललाय. बऱ्यापैकी जमिनीवर राहून नवे वायदे केलेत. रोजगार आणि शेतीची समस्या सोडवण्याची पाच मोठी आश्वासनं दिलीत. `हम निभाएंगे` असं म्हणत गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देणारी न्याय योजना हाच काँग्रेसचा निवडणुकीचा अजेंडा असल्याचं या जाहीरनाम्यातून स्पष्ट झालंय.
lock
संपूर्ण लेख

मुंबईत माघी गणेशोत्सव कसा रुजला माहीत आहे?

भाद्रपदातल्या गणपतींची जुनी परंपरा आहे, तशी माघातल्या गणपतींचीही आहे. पण भाद्रपदातल्या गणपतीचा गणेशोत्सव झाला, तसा माघातल्या गणपतीचा झाला नव्हता. मात्र गेल्या दहाएक वर्षांपासून मुंबईत माघी गणेशोत्सवाचं प्रमाण वाढलंय. त्याचा थाटमाटही वाढलाय. त्यांचं कारण फक्त मुंबईच्या उत्सवप्रियतेत नाही, तर राजकारणातही आहे.
lock
संपूर्ण लेख

लॅक्मेचा फॅशन वीक किती दिवस बघायचा, आता आपणही उतरलं पाहिजे

मुंबईत सध्या लॅक्मे फॅशन वीक सुरू आहे. जगभरातले डिझायनर्स आपलं काम घेऊन इथे आलेत. टीवीवर, पेपरात रॅम्प वॉकवर आज हे झालं, ते झालं अशा बातम्या येतात. पण या शोमधे नेमकं काय घडतं, हा शो कशासाठी आहे, तुम्हा-आम्हाला यातून काय मिळतं या सगळ्या शंकांविषयी चर्चा करणार हा लेख.
lock
संपूर्ण लेख

काश्मिरी तरुण गिटार हाती घेतात तेव्हा!

काश्मिर म्हटलं, की दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार एवढंच चित्र उभं राहतं. जणू काही काश्मिरमधला प्रत्येक तरुण हातात दगड किंवा बंदुकी घेऊन उभा आहे, असा विखारी प्रचार केला जातो. यात विद्वेषी संघटनांनी बऱ्यापैकी यश मिळवलंय. पण काश्मिरची ही काही खरी ओळख नाही. त्यासाठीच काश्मिरी तरुणांनी आपली मूळ ओळख भारतभूमिला सांगण्यासाठी हाती गिटार घेतलीय.