lock
संपूर्ण लेख

हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव

गेली पाच वर्षं एकामागून एक छोट्या छोट्या लढाया जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचं निर्णायक युद्ध जिंकूनही हरलेत. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतीलही, पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा दणदणीत पराभव झालेला असल्याचे पडसाद त्यांच्या पुढच्या सगळया राजकारणावर उमटत राहतील.
lock
संपूर्ण लेख

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणातल्या चार महत्त्वाच्या गोष्टी

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. भाजपसोबत युतीची घोषणा झाल्यावर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. त्यामुळे ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचा लक्ष लागलं होतं.
lock
संपूर्ण लेख

किसान सन्मान निधीतून पाच कोटी शेतकऱ्यांची नावं गाळलीत

शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावं म्हणून सुरू करण्यात आलेली पीएम किसान योजना आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतेय. देशभरातल्या जवळपास ५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातला लाभ मिळला नाही. सरकारनेच ही नावं काढून टाकलीत. या सगळ्या गोंधळावर भाष्य करणारा पत्रकार रवीश कुमार यांचा लेख.
lock
संपूर्ण लेख

साताऱ्यात तिसरी मिशी इतिहास घडवणार का?

विधानसभेसोबतच सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणुकही होतेय. भाजपमधे गेले उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. स्वतः शरद पवार यांनी साताऱ्यात जाऊन मोर्चेबांधणी केलीय. त्यामुळे साताऱ्यात तिसरी मिशी इतिहास घडवणार का, अशी चर्चा सुरू झालीय.
lock
संपूर्ण लेख

कोल्हापुरी ‘आमचं ठरलंय’ कॅम्पेनची इनसाईड स्टोरी

नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना युतीविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी पत्रकारांना उत्तर दिलं, `आमचं ठरलंय`. लोकसभा निवडणुकीत गाजलेलं हे अस्सल कोल्हापुरी कॅम्पेन आता राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या बोलचालीतला वाक्प्रचार बनलाय. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या या सुपरहिट कॅम्पेनची जन्मकथा वाचलायलाच हवी अशी. सांगत आहेत या कॅम्पेनमधे मोलाचा वाटा असणारे सोशल मीडिया कन्सल्टंट विनायक पाचलग. 
lock
संपूर्ण लेख

प्रचंड बहुमताने जिंकलेल्या भाजपला हरवता येऊ शकतं, हे सांगणारा निकाल

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक राज्य जिंकणाऱ्या भाजपला कुणीच हरवू शकत नाही, अशी चर्चा सुरू झाली. अमित शहा यांनीही आपण ५० वर्षांसाठी सत्तेत आल्याचं सांगितलं. यंदाच्या निवडणुकीतही पुन्हा एकदा मोदी मॅजिकचा जलवा दिसला. पण हा जलवा निष्प्रभ करता येतो, हे कर्नाटकमधे झालेल्या पालिका निवडणुकीच्या निकालावरून अधोरेखित होतं.
lock
संपूर्ण लेख

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाची पाच वैशिष्ट्यं

नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ३० मेला दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पहिल्याच फटक्यात तब्बल ५७ मंत्र्यांनी शपथ घेतली. जवळपास सगळ्याच राज्यांना प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न झालाय. अमित शहा आणि एस. जयशंकर यांच्या एंट्रीने तर सगळ्यांनाच चकित केलंय.
lock
संपूर्ण लेख

गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचं चांगभलं होईल?

लोकसभेत सलग दुसऱ्यांदा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधे नेतृत्वाचं संकट निर्माण झालंय. पक्षाला एका धाग्यात बांधून ठेवण्यासाठी गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं आतापर्यंत सांगितलं जायचं. पण राहुल गांधींनी स्वतःच्या राजीनाम्यावर ठाम राहत पक्षातल्या लोकांना पर्याय शोधायला सांगितलंय. त्यामुळे कधी नव्हे ते आता गांधी घराण्याशिवायच्या पर्यायावर गांभीर्याने चर्चा सुरू झालीय.
lock
संपूर्ण लेख

नरेंद्र मोदींना एवढं घवघवीत यश कशामुळे मिळालं?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चीत करून फिर एक बार मोदी सरकार सत्तेत आलंय. नरेंद्र मोदींच्या या घवघवीत यशाची जगभरात चर्चा सुरू आहे. पण मोदींना एवढं यश कशामुळे मिळालं? बेरोजगारीने नवा रेकॉर्ड केलेला असतानाही मोदींनी तरुणांना आपल्याकडे खेचलं. मोदींच्या या करिश्म्यावर टाकलेला हा प्रकाश.
lock
संपूर्ण लेख

यूपीत महागठबंधनचं राजकारण फेल गेलं, त्याची दोन कारणं

उत्तर प्रदेशमधे भाजपच्या स्ट्रॅटेजिसमोर सपा, बसपाच्या महागठबंधनचं जातीचं राजकारण फेल गेलं. दोन्ही पक्षांना आपला सामाजिक जनाधारही सोबत ठेवता आला नाही. यूपीमधे महागठबंधनचा कुणी पराभव करू शकेल असं वाटत नसताना भाजपने हे करून दाखवलं. महागठबंधनचा पराभव कसा झाला हे सांगणारे दोन लॉजिक.