गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 'आप'मधे आपल्याला फारसं भवितव्य नाही म्हणत काही आमदारांनी काँग्रेसमधे प्रवेश केला. त्याच आपने चार महिन्यात धुव्वाधार कामगिरी करत ९२ जागा जिंकल्या. सुरवातीच्या टप्प्यात आम आदमी पक्षाला एवढं यश अपेक्षित नव्हतं. पण काँग्रेसमधले रुसवे-फुगवे, अंतर्गत दुफळी 'आप'च्या पथ्यावर पडली. यावर भाष्य करणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची फेसबुक पोस्ट.
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रियांका गांधी यांचा चेहरा पुढे केला आहे. पण इंदिरा गांधी यांच्यापेक्षा विषम परिस्थिती प्रियांका यांच्यापुढे आहे. देशातल्या राजकीय अवकाशात काँग्रेस पक्षाचा प्रभाव अत्यंत क्षीण झालाय. या परिस्थितीत प्रियांका यांच्या रूपाने काँग्रेसने टाकलेला डाव काय करू शकतो याची उत्सुकता असेल.
कोणताही राजकीय पक्ष कालसुसंगत आणि गतिमान राहण्यासाठी सातत्याने नवीन नेतृत्व उभं राहणं आवश्यक असतं. भाजपसारखा बलाढ्य राजकीय शत्रू समोर असतानाही काँग्रेस पक्ष पारंपरिक राजकारणात गुरफटून पडलाय. त्यातून जुने-नवे यांच्यातला वाद उफाळून येतो. काँग्रेसला आजही पूर्णवेळ अध्यक्ष नाही. ही निवड पुढच्या वर्षाअखेरपर्यंत होईल. तोपर्यंत पक्षाची दशा आणि दिशा काय असेल, हे काळच ठरवेल.
झारखंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपतोय. शेवटच्या दिवशी काँग्रेसने प्रचारासाठी पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवलंय. एक प्रकारे झारखंडच्या निवडणुकीत काँग्रेसने खेळलेलं हे ट्रम्प कार्डच आहे. हे कार्ड चालणार की नाही हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल. पण आता हे कार्ड काढण्याला मोठा राजकीय अर्थ आहे. झारखंडी भूमीवर फिरत असताना काढलेले हे चार अर्थ.
फोटोतल्या प्रियंका गांधींच्या छातीवर २८-२८ असे आकडे चिटकवून सोबत `तुम छप्पन इंचपर अडे रहना`, असं लिहिलेली पोस्टो वायरल होतेय. त्यासाठी बिहारमधल्या एका मोदीभक्ताला अटक झालीय. निव्वळ एक अवयव असलेल्या बाईच्या छातीकडे केवळ विकृतीनेच पाहणारी मानसिकता आणि तिचं वेगवेगळ्या पातळ्यांवरचं राजकारण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?