नाशिक शहरात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गजबज सुरू झालीय. समृद्ध परंपरा हा कोणत्याही समाजाचा अभिमानाचा विषय असतो; पण त्यासाठी ती परंपरा लवचीक असावी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी तिला क्वचित नवं रूपही घ्यावं लागतं. हा विचार मराठी सारस्वतांनी आता केला नाही, तर ‘उत्सव बहु थोर होत’ एवढ्यापुरतीच ही परंपरा उरेल, हे नक्की.
महाराष्ट्र सरकारच्या सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांच्या जीवन चरित्रावरच्या १३ खंडांचं प्रकाशन बडोदा इथल्या साहित्य संमेलनात झालं. १३ खंडांतल्या ५० ग्रंथांचं प्रकाशन नाशिक इथल्या साहित्य संमेलनात होतंय. महाराजांच्या विद्याव्यासंगाची, साहित्यप्रेम, साहित्याची माहिती आपल्याला फार कमी प्रमाणात आहे. या पुस्तकांच्या निमित्ताने त्यांचा एक दुर्लक्षित पैलू आपल्यासमोर येतोय.
'बिल्वदल साखळी' या संस्थेकडून गोव्यातल्या सत्तरीत तालुका पातळीवर सातव्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. अनुजा जोशी यांनी केलेलं भाषण फारच गाजलं. या भाषणात गोव्यात निसर्गदत्त हिरवाळीसोबतच सरकारी अर्थिक भरभराट असतानाही इथल्या साहित्यात आलेल्या दुष्काळावर त्यांनी बोट ठेवलं. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.