तळीयेच्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या माणसांचे मृतदेह ४ दिवसानंतरही सापडले नाहीत तेव्हा त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आलं. सध्याची परिस्थिती पाहता बेपत्तांच्या नातेवाईकांना आपल्या जीवाभावाच्या लोकांना संत ज्ञानेश्वरांसारखी 'संजीवन समाधी' देणं सोयीचं वाटलं असावं. पण अशा सोयीस्कर आणि व्यावहारिक भूमिकेमुळे सरकारचं फावतं. वारसांना मदतीचे चेक दिले की शासनाच्या जबाबदारीचं सुतक सुटतं.